दादा कोंडकेंना १ मुलगा त्यांची चड्डी पाहुन विचारतो
मुलगा : दादा तुम्ही चड्डी कुट शिवता?
दादा : कुट म्हन्जे, फ़ाटल तीथ.
एके दिवशी झंप्याच्या स्वप्नात देव येतो...झंप्या: देवा, मला फार काही
नको, फक्त एक बॅग भरून पैसे, एक नोकरी आणि एक मुलींनी भरलेली मोठी गाडी
हवी आहे...
देव: तथास्तु!!!!
आज झम्पेशराव एका मुलींच्या शाळेत बस कंडक्टर आहेत!!!

पटकन

जोशी सर : बंड्या मी आता काहीही प्रश्न विचारला की तू त्याचं उत्तर पटकन
द्यायचं, काय?.
बंड्या : हो सर.
जोशी सर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण?
...
बंड्या : पटकन..!!!

स्वर्ग

बायको-काय हो स्वर्गात म्हणे नवरा-बायकोला एकत्र राहू देत नाहीत.खरे आहे का हे?
नवरा-हो खरे आहे.
बायको- पण का हो असे?
...
नवरा-अगं त्यामुळेच तर त्याला स्वर्ग म्हणतात.
सर्कशीच्या रिंगणात, एक सुंदर स्त्री एका सिंहाला त्याच्या पिंजऱ्यात
जाउन किस करते. सर्व प्रेक्षक श्वास रोखून तो नजारा बघतात. पिंजऱ्याभोवती
गोल चक्कर मारीत रिंग मास्टर प्रेक्षकांनाविचारतो, '' तूम्ही हा नजारा
कधी बघितला नसेल ... आणि बघणारही नाही...प्रेक्षकातले कुणी असं करु
शकते?''
प्रेक्षकातूनएक माणूस उभा राहतो आणि ओरडून ...म्हणतो,
'' हो... मी करु शकतो... पण आधी त्या सिंहाला पिंजऱ्याच्या बाहेर काढा''

शाळेत गेलं माऊचं पिल्लू....

माऊचं पिल्लू गोडुलं
शाळेत एकटंच गेलेलं

बॅग, टिफिन नव्हतं नेलं
मजेत खेळत बसलेलं

टीचर म्हणाली - "हे रे काय ?
अस्से शाळेत चालणार नाय
आईला जाऊन सांग नीट
सारं कसं हवं शिस्तीत.."

"आई आई ऐकलंस काय
बॅग, टिफिन, बूट न टाय
हेच नाही तर बरंच काय"

"माहित आहे सगळं मला
उद्या देईन सगळं तुला.."

जामानिमा सगळा करुन
ऐटीत निघाले पिल्लू घरुन

सुट्टीत जेव्हा टिफिन उघडला
वर्गात एकच गोंधळ माजला

उंदीरमामा निघाले त्यातून
पळाले सगळे ईई किंचाळून

शाळेला आता कायमची बुट्टी
पिल्लाची घरात दंगामस्ती

माऊच्या डोळ्यावर छान सुस्ती
डब्याची संपली कटकट नस्ती....
नवरा - बायको रस्त्यातून जात असतात. समोरून एक तरुण मुलगी येते, नवऱ्याला 'हाय' करून जाते.
बायको : काय रे, कोण होती ती?
नवरा : गप गं! डोकं खाऊ नको... अजून तिला पण सांगायचंय, तू कोण आहेस ते?

काय "मग"

एकदा दोन कॉफी मग्स डायनींग टेबल वर भेटतात
तर एक मग दुसर्यां मगाला काय म्हणेल ???
......विचार करा
...........अरे विचार काय करताय?
....सोप्पय उत्तर : काय "मग" काय चाल्लय?

मानूस

मानूस मानूस

मतलबी रे मानसा,
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं गोठ्यांतलं जनावर
भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा

गायम्हैस देते दूध
मतलबासाठीं
मान मानूस डोलये
इमानाच्यासाठीं
कुत्रा शेंपूट हालये
मानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस
लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस !


कवियत्री - बहीणाबाई चौधरी

स्वैर झिंगलेले..

शब्दावाचून जे
क्षण चांदण्यात शिंपलेले
न घडल्या कहाण्या साऱ्या
तुझ्या वाचून विणलेले

मधहोश झिंगलेल्या
रातीचा आलम सारा
सुगंधलेल्या आठवणी
तुझ्याभोवती पुन्हा पसारा

जगावे तरी कसे
प्रश्न गंजलेले
पुन्हा साठलेले
पुन्हा वेचलेले

मदिरा ती कशाला
ना गरज पामराची
यांच्याविनाच आम्ही
स्वैर झिंगलेले..

१०० रुपयात ५ स्टार

पहिला भिकारी : काल मला १०० रुपये भिक मिळाली,त्यात मी मस्त 5 STAR
हॉटेलात जेवून आलो..
दुसरा भिकारी : ह्या १०० रुपयात जेवण शक्यच नाही..
पहिला भिकारी : मी मस्त आत गेलो..भरपेट जेवलो...न बिल झाले ५०००..तर
त्यांनी पोलिसांना बोलावले..
दुसरा भिकारी: च्यायला मग काय झाले ?
पहिला भिकारी : काही नाही हॉटेल बाहेर येताच मी पोलिसांना १०० रुपये दिले
आणि म्हटलं..घ्या प्रकरण मिटवून..
माझे आणि माझ्या बायकोचे
भांडण नेहमीच नविन असते
आम्ही कितीही भांडलो तरी,
कुठलीही शिवी रिपिट नसते!
पहिला मित्र: ४ दिवस महाबळेश्वर ला चाललोय रे...
....
रस्त्यात बायकोला दरीत लोटून देणार आहे...
... दुसरा मित्र: सही...माझी पण घेऊन जा, तिलापण दे ढकलून..
पहिला मित्र: hmm ... येताना टाकली तर चालेल का?

वय

जनगणने साठी प्रगणक घरी आल्यावर सुरेखाबाईंनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पण स्वत:चे वय काही केल्या सांगेनात.
तेंव्हा प्रगणक म्हणाला," अहो बाई असे काय करता. तुम्हाला तुमचे वय सांगावेच लागेल."

सुरेखाबाई," त्या शेजारच्या कावळे बाईनी आपले वय सांगीतले का ?"

प्रगणक," होय."

सुरेखाबाई,"तर लिहून टाका ना तेवढेच."

आणि प्रगणकाने सुरेखाबाईंचे वय लिहीले "कावळ्या ईतके "

गूढ जन्म

जिथे जीव जडतो
स्वप्ने पाहू लागतो
जळतात फुले तिथे
प्राणात तम भरतो

हे प्राक्तन कसले
सूड भरल्या हाताने
कुणा सटवीने लिहले
मज कळेना असले

का पाहूच नये ती
बाग फुलांनी भरली
का धावूच नये ती
वाट हिरवळ दाटली

हा छंद तारकांचा
का मनातून जाईना
रुतले पाय मातीत
नजर खाली ढळेना

हा जन्म गूढ कोण
कुण्या वाटेवर चालवी
हे गंभीर इशारे का
दिश्या सारख्या वळवी

लाईट

सर - होमवर्क का नाही केला?

मुलगा - सर लाईट गेले होते.

सर - मेणबत्ती लावायची मग..

मुलगा - काडेपेटी नव्हती.

सर - का?

मुलगा - देवघरात होती.

सर - घ्यायची मग.

मुलगा - अंघोळ नव्हती केली.

सर - का?

मुलगा - पाणी नव्हत.

सर - का?

मुलगा - मोटार चालू होत नव्हती.

सर - का?

मुलगा - आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून....

मग उपयोग काय?

जेम्स बाँडचे बैकग्राउंड वाजतय डोक्यात,
हातात भिक्षापात्र..मग उपयोग काय?

लॉटरीच्या पैशाने गुरख्याने घेतला बंगला,
स्वत:च झाला वॉचमन...मग उपयोग काय?

तरुणी आवडली... मनाला भिडली..,
गळ्यात मंगळसुत्र...मग उपयोग काय?

भरपुर पगाराची US ला नौकरी,
व्हिसा रिजेक्ट झाला...मग उपयोग काय?

शहरामधे फुकट अन्न-धान्य वाटले,
गल्लीत माझ्या कर्फ्यु...मग उपयोग काय?

हेअर ट्रांस्प्लांट साठी जमवले होते पैसे,
नुकतेच लग्न झाले...मग उपयोग काय?

नशिबाने नेहमी चॉकलेट दाखवल,
खाउ नाही दिल...मग उपयोग काय?

- शशांक प्रतापवार

दिवस कसे गेले

औफिसमध्ये साहेबांच्या निरोपसमारंभ ... लिनाबाई समारंभाचं भाष्ण करायला आल्या....
"साहेबांच्या हाताखाली काम करता करता दिवस कसे गेले ते कळलंच नाही"
...
.
.
.
.
. आणि सभाग्रहात जोरदार हशा ...!

पोरी महागात पडतात!!

पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो, पोरी महागात पडतात

तुम्हाला काय, मला काय
सर्वांनाच पोरी आवडतात
जास्त जवळ जाऊ नका
कानाखाली ओढतात
खरच सांगतो पोरांनो,..............

आज हा उदया तो
रोज नवा शोधतात
नुस्तच ठेउन वासावर
खीसा मात्र कापातात
खरच सांगतो पोरांनो,................

हा नडतो,तो भांडतो
दहा जन हनतात
पोरगी राहते बाजूला
पोरच भांडनात पडतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी इकडे,कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे की
सॉरी म्हणुन जातात
खरच सांगतो पोरांनो,....................

याला फीरव, त्याला फीरव
दहा लपडयात अडक्तात
कधी धुन्दित, कधी मंदित
नको तस लूडकवतात
खरच सांगतो पोरांनो,...................

कधी सेंट,कधी लिपस्टिक
नुस्तच पावडर थापतात
अन आपण मरला डोळा की
बापाला जाउन सांगतात
खरच सांगतो पोरांनो,....................

कधी सिनेमा,कधी नाटक
नुस्ताच खीसा बघतात
अन खीसा खाली झाला की
दूसरा बकरा शोधतात
खरच सांगतो पोरांनो,पोरी महागात पडतात पोरी महागात पडतात!!
पोरी महागात पडतात
खरच सांगतो पोरंनो,पोरी महागात पडतात
तुम्हाला काय,मला काय सर्वांनाच...........

लग्नाच्या गाठी

जन्मोजन्मीचं वैर काढत
तो दिवसरात्र तिच्याशी भांडत असतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो

लग्नापूर्वीचे गुलाबी दिवस
लग्नानंतर राहत नाही
एकदा लग्न लावून दिलं की
देवसुद्धा खाली पाहत नाही.

मग लग्नापूर्वीचा तो हुशार नवरा
तिला भलताच चक्रम वाटायला लागतो
...आणि हळुहळू तिच्या चेह-यावरचा
प्रेमळ मुखवटा फाटायला लागतो.

आपला नवरा बैल आहे
असं प्रत्येक बाईला वाटत असतं
त्याच्या त-हेवाईक वागण्याचं दुःख
तिच्या मनात दाटत असतं

तो कधी कसा वागेल
ह्याची जरासुद्धा खात्री नसते
नको तेच नेमकं बोलून जाईल
जे बोलायचं त्याला कात्री असते.

मग जमेल तिथं, जमेल तेव्हा, जमेल तितकं
ती त्याला बोलत बसते
त्याच्या तेही डोक्यावरून जातं
पण ह्या नंदीबैलाची मान डोलत असते

त्याचा तो गबळा अवतार
तिला नीट्नेटकं राहयचं असतं
तिला चार दिवस सासूचे
त्याला स्पोर्ट्स चॅनल पाहायचं असतं

लहान मोठ्या चाकाचा हा संसाराचा रथ
पळत कसला, रांगत असतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो

ती तरी थोडी त्याच्यासारखी असेल
असं प्रत्यक्षात घडत नाही
त्याच्या स्वप्नाचे पंख लावून
ती त्याच्या आकाशात उडत नाही

तो गच्चीत तिला घेऊन जातो
इंद्रधनुष्यावर चालायला
ती सोबत पापड कुरडया घेते
गच्चीत वाळत घालायला

त्याच्या डोळ्यात क्षितिजावरची
लखलखती शुक्राची चांदणी असते
हिच्या डोक्यात गोडा मसाला
आणि वर्षभराची भाजणी असते

प्रेमात रंगून, नशेत झिंगून
खूपसं जवळ, काहीसं लांबून
थोडीशी घाई, थोडसं थांबून
पौर्णिमेचा चंद्र त्याला
तिच्या केसात माळायचा असतो
...आणि त्याच वेळेस तिला मोरी धुवायची
किंवा संडास घासायचा असतो.

आपली बायको म्हैस आहे
असं हा रेडा सगळ्यांना सांगत बसतो
कोण म्हणतो लग्नाच्या गाठी
देव स्वर्गात बांधत असतो

- धुंद रवी

सरदारजिची साइड

एका ट्रफिक पोलीसाने रॉंग साईडने जाणाऱ्या सरदारजीच्या गाडीला थांबविले आणि म्हटले -

'' तुला काही कळतं का? तु कुठे गाडी घेवून चालला होता''

'' नाही ... पण हो जिथेही मी माझी गाडी घेवून चाललो होतो तिकडे काहीतरी खुप मोठी दुर्घटना घडलेली दिसते .. कारण सगळेजण तिकडून गाड्या परत आणित आहेत'' सरदारजीने उत्तर दिले.

म्हातारा माणूस व पोपट

एक म्हातारा माणूस एका मॉलमध्ये बेंचवर बसला होता. तेवढ्यात तिथे एक युवक येवून बसला. त्या युवकाचे केस कुठे पिवळे, कुठे हिरवे, कुठ गुलाबी तर कुठे जांभळे असे जागोजागी रंगविलेले होते. त्याच्या डोळ्याभोवती काळा रंगही लावला होता. तो म्हातारा त्या युवकाकडे एकटक पाहत होता. त्या म्हाताऱ्याला आपल्याकडे असे एकटक बघतांना पाहून तो युवक त्याला उद्दामपणे म्हणाला, '' हे म्हाताऱ्या ... असा काय पाहतोस?... तु तुझ्या जवानीत कधी अशी मस्ती केली नाही का?''

त्या म्हाताऱ्याने उत्तर दिले, '' हो केली होती ना... जेव्हा मी जवान होतो तेव्हा एकदा मी खुप पिलो होतो... तश्या पिलेल्या अवस्थेत मला एक पोपट भेटला... त्याला बघताच मी त्याच्या प्रेमात पडलो, आणि पुढेही बरच काही झालं...... मी विचार करीत होतो की तु त्या पोपटाचा आणि माझा मुलगा तर नाहीस ''

एकच कुत्रा

टिचर - बंटी तु ''माझा कुत्रा'' या विषयावर लिहिलेला निबंध अगदी तंतोतंत तुझ्या भावाने लिहिलेल्या निबंधाप्रमाणेच आहे. तु त्याची कॉपी केलीस की काय?

बंटी - नाही सर... पण तो कुत्रा एकच होता...

स्त्री

प्रत्येक भारतीय स्त्री ही आपल्या जीवनात राणी लक्ष्मीबाई असते.
कारण लग्नाच्या आधी ती राणी आसते.
लग्नानंतर लक्ष्मी बनते.
आणि मुलं झाल्यानंतर नुसती राब राब राबनारी बाई बनते

बैलगाडी

एकदा एका सरदारजीचा इंटरव्हू होता. इंटरव्हू घेणाऱ्याने सरदारजीला प्रश्न विचारला

इंटरव्हूअर - सरदारजी हे फोर्ड काय आहे?

सरदारजी - फोर्ड ही गाडी आहे.

इंटरव्हूअर - बरं सरदारजी हे ऑक्सफोर्ड काय आहे?

सरदारजी - ऑक्स म्हणजे बैल आणि फोर्ड म्हणजे गाडी. म्हणजे ऑक्सफोर्डचा अर्थ होतो बैलगाडी.

च्यायला परत हिचा फोन

च्यायला परत हिचा फोन
आणि पुन्हा तेच प्रश्न
कुठे आहेस? कसा आहेस?
काय करतोऽऽऽऽऽय?
झाली का कामं?
कप्पाळ माझं!
हिला समजत नाही का? मी कधी गाडीवर असतो,
कधी मीटिंग मध्ये, कधी बॉसच्या केबिनमध्ये,
कुठेही वाजतो हिच्या प्रष्णांचा रिंगटोन.
च्यायला, च्यायला परत हिचा फोन.
कुठे पळून नाही जाणार, सायंकाळी येइल ना घरी,
तेव्हा विचारनं जे विचारायचं ते.
सारं काही सांगेन.
झालंऽऽऽऽऽ, रडा-रडी सुरु
तू खुप बदललाय.
लग्नाअगोदर असा नव्हतास.
माझ्यासाठी किती वेळ असायचा तुझ्याकडे, इत्यादि, इत्यादि.
अगं, तेव्हा लपून भेटायचो, वाटायचं भेटशील की नाही, वरून घरच्यांची भीती,
आता कधीही भेटलो तरी रोकणार कोण?
च्यायला परत हिचा फोन.
बरं दिवसातून पन्नास वेळा हिचे SMS,
लव यू, मिस यू, यू यू आणि काय काय,
SMS पाठवला, भावना पोचल्या, मग फोन चे काय काम?
तर म्हणे तुझा आवाज ऐकावासा वाटला,
घे ऐक, बोलतो नाही चांगला मोठ्याने ओरडतोच,
मग बसते धारण करून मौन.

च्यायला परत हिचा फोन.

अकबरचा मोबाइल नंबर

गुरुजी : अकबरचा जन्म आणि मृत्यू कधी झाला?

बंडू : माहीत नाही

गुरुजी : अरे असेकाय करतोस......? पुस्तकामध्ये लिहिले आहे की १५४२ - १६०५

.
.
.
.
.

बंडू : मला वाटले की तो अकबरचा मोबाइल नंबर आहे.

अलाण्याच्या ब्रशावरती

अलाण्याच्या ब्रशावरती फलाण्याचे दंतमंजन
अलबत्याचे अंडरवेअर गलबत्याचे थोबाडरंजन
लिलीसारख्या त्वचेसाठी लिलीब्रॅंड साबणजेली
चरबी हटवा, वजन घटवा हजारोंनी खात्री केली
केंटुकीच्या कोंबडीवरती फेंटुकीचे मोहरीचाटण
डबलडेकर सॅंडविचमध्ये बबलछाप मटणघाटण
पिझ्झाहटचा पिझ्झा खा मेपलज्यूस ऍपलपाय
अमूक डोनट तमूक पीनट अजून खाल्ले नाहीत काय?
अ ब क ड ई फ ग ... तयार घरे सात टाईप्स
रेडिमेड खिडक्या दारे भिंती छपरे गटरपाईप्स
होटेल मोटेल खेटर मोटर देशभर करा प्रवास
एकच रूप एकच रंग एकच रुचि एकच वास
आकाशवाणी घटवत असते दूरदर्शन पटवत असते
जहांबाज जाहिरातबाजी गिऱ्हाईकांना गटवत असते
अजब देश! गजब तऱ्हा! व्यक्तिवरती सक्तीनाही
सहस्रशीर्ष पुरुषा!! तुझी गणवेषातून मुक्ती नाही!


कवी - वसंत बापट

शारदेचे आमंत्रण

ज्यांचा शब्द हृदयस्थ ओंकारातुन फुटला असेल,
ज्यांचा शब्द राघवाच्या बाणासारखा सुटला असेल,
ज्यांच्या जित्या फुफ्फ्सांना छिद्र नसेल अवसानघातकी,
जन्मोजन्म ज्यांचा आत्मा राखेमधुन उठला असेल.

ज्यांची मान ताठ असेल प्राचीन लोहखंडाप्रमाणे,
ज्यांच्या जिवात पोलादाचे उभे आडवे ताणेबाणे,
ज्यांच्या धीम्या धीरोदात्त पावलांच्या तालावरती,
धरतीला स्फुरत असेल शाश्वताचे नवे गाणे.

सत्यभार पेलत असता ज्यांचा देह झुकला नसेल,
त्रैलोक्याच्या राज्यासाठी ज्यांनी देह विकला नसेल,
मुर्तिमंत मृत्युचीही आमने-सामने भेट होता,
ज्यांच्या थडथड नाडीमधला एक ठोका चुकला नसेल.

ज्यांच्या अस्थी वज्र-बीजे.....नसांत उकळणारे रक्त,
शारदेचे आमंत्रण आज, त्यांनाच आहे फक्त...


कवी - वसंत बापट

विजयाचे रहस्य

उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्यावर समाजवादी व कॉंग्रेसचे उमेदवार असलेले दोन राजकारणी भेटतात व समाजवादी पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाचे रहस्य काय असावे यावर चर्चा करित असतात.

कॉंग्रेसचा उमेदवार : मी माझ्या पक्षाचा विजय होईल याची कायम काळजी घेत होतो. समजा मी टॅक्सीने प्रवास केला तर त्या टॅक्सी ड्रायव्हरला १०० रुपयाची टीप देउन कॉंग्रेसला मतदान करायला सांगायचो.

समाजवादी पक्षाचा उमेदवार : मी पण तसच करायचॊ. मी टॅक्सी ड्रायव्हरला मीटर प्रमाणेच भाडॆ द्यायचो व कॉंग्रसला मतदान करायला सांगायचो.

छंद घोटाळती ओठी

छंद घोटाळती ओठी
नाचणभिंगरी
त्याच्या साध्या ओळीसुध्दा
झपाटती भारी
डोक्यावर हिंदळता
देह झाला गाणी
एका कवीच्या डोळ्यांची
डोळ्यांना माळणी
असे कसे डोळे त्याचे
मीही नवेपणी
मेंदीओले हात दिले
त्याला खुळ्यावाणी
तेव्हापासूनचे मन
असेच छांदिष्ट
सये तुला सांगू नये
अशी एक गोष्ट:
त्याच्या ओळी माझ्या ओठी
रुंजी घालू आल्या
रानपाखरासारश्या
तळ्यात बुडाल्या.


कवी - ना. धों. महानोर

पक्षांचे थवे

विस्तीर्ण नदीचा काठ, पसरली दाट
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सैराट
बावरा पक्षी

पाण्यात एक सावली, हले बाहुली
थरकते ऊन
ही माल्हन म्हणते गान, चंद्र माळून
बहकते रान

झाडीत हूल बिथरते, गंध विखरते
फुलांची नक्षी
गर्दीत हरवली वाट, कुणी सन्नाट
बावरा पक्षी


कवी - ना. धों. महानोर

झकास शाळा !

स्थळ : शाळा

वर्ग : एकदम गप्प

कारण : इन्स्पेक्शन

अधिकारी : बोल अफ़ज़लखानाचा खून कोनी केला ?

बन्डु : माफ़ करा सर, मला काही माहित नाही.मी काल शाळेतच आलो नव्हतो . मला तर हा अफ़ज़लखान कोन आहे हे सुद्धा माहित नाही .

अधिकारी : काय सर ! हे काय चाल्ले आहे. मुल्लान्ना काहिच माहित नाहिये.

सर : नाही साहेब, बन्डु तसा खोड्कर आहे पण कोनाचा खून काही तो करणार्‍या मधला नाहीये.
अधिकारी : काय ! मुख्याध्यापकाना बोलवा.

अधिकारी : महाशय ! आपल्या शाळेतील विद्यार्थ्याना काहीच माहित नाही.

मुख्याध्यापक : माझ्या शाळेतील विद्यार्थी असे कधी करणारच नाही.मी ह्याची खात्री देतो.

अधिकारी : तुम्ही खरोखरच मुख्याध्यापक आहात काय ? सर तुम्ही रोज विद्यार्थ्यान्ची हजेरी घेता काय ? काय रे बन्डु! तू रोज शाळेत येतोस काय?

बन्डु : माफ़ करा सर, मी शाळेच्या बाहेर केळी विकतो. ह्या वर्गातला एक विद्यार्थी आज भारत- औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेलाय. त्याने मला इथे जबरदस्तीने पाठविले आहे.

सर : माफ़ करा सर, मी समोर पान टपरी चालवितो. ह्या वर्गाचे सर आज भारत-औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेले आहेत. त्यान्नीच मला इथे पाठविले आहे.

मुख्याध्यापक : माफ़ करा सर, मी मुख्यध्यापकान्चा भाऊ आहे. तो आज भारत औस्ट्रेलियाचा सामना बघायला गेलाय. त्याने मला इथे पाठविले आहे.

अधिकारी(हताश होवुन) : अरे बापरे ! मी आलोय तर ही अवस्था आहे.खरे साहेब आले असतेतर काय झाले असते देव जाणे??

गरीब मुली

पप्याचे बाबा FTV बघत असतात..
अचानक पप्या येतो
तर परिस्थिती सांभाळण्यासाठी ते म्हणतात...
"अरे गरीब मुली आहेत या....कपडे घेण्यासाठी पैसे नसतात यांच्याकडे... "
तर पप्या म्हणतो...
"यांच्यापेक्षा अजून गरीब मुली आल्या तर मला पण बोलवा..."

निरागस पप्प्या

छोटा निरागस पप्प्या
पप्याचे बाबा कामानिमित्त वर्षभर परदेशात गेलेले असतात....
तर एक दिवशी अचानक पप्या आईकडे हट्ट करायला लागतो..,
...
" मला अजून एक छोटा भाऊ पाहिजे ..लवकरात लवकर "..
आईला काय बोलावं सुचत नाही....त्याची आई म्हणते," तुझे बाबा आले कि आपण बोलू "
पप्या लगेच म्हणतो...." नको नको बाबांना नको बोलूस.. आपण ते आले कि
त्यांना मस्त आच्यार्याचा धक्का देऊ यात ना !!"

नारदाचा वारस

नारद मेला; मी रडलो मग;
कोण कळी त्या लाविल नाहक!
शोक कशाला? वदला ईश्वर,
धाडुनि दिधला मी संपादक!

कवी - विंदा करंदीकर

पदवी

जिवंत असता, महाकवे, तुज
मिळतील निव्वळ शिव्या घरोघर;
तूं मेल्यावर, त्या मोजुनियां
मिळविल कोणी पदवी त्यावर

कवी - विंदा करंदीकर

जाईन दूर गावा

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा

पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा.

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा.

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा.

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात:
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा.

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा,
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

सद्गुरुवाचोनी

करितो आदरे । सद्गुरुस्तवन
ज्यांनी सत्यज्ञान । वाढवीले.
धन्य पायथॅगोरस । धन्य तो न्यूटन
धन्य आईन्स्टीन । ब्रम्हवेत्ता.
धन्य पाश्चर आणि । धन्य माझी क्युरी
थोर धन्वंतरी । मृत्युंजय.
धन्य फ्राइड आणि । धन्य तो डार्विन
ज्यांनी आत्मज्ञान । दिले आम्हा.
धन्य धन्य मार्क्स । दलितांचा त्राता
इतिहासाचा गुंता । सोडवी जो.
धन्य शेक्सपीअर । धन्य कालीदास
धन्य होमर, व्यास । भावद्रष्टे.
फॅरॅडे, मार्कोनी । वॅट, राईट धन्य
धन्य सारे अन्य । स्वयंसिद्ध.
धन्य धन्य सारे । धन्य धन्य मीही!
सामान्यांना काही । अर्थ आहे!
सद्गुरूंच्या पाशी । एक हे मागणे :
भक्तिभाव नेणे । ऐसे होवो.
सद्गुरुंनी द्यावे । दासा एक दान :
दासाचे दासपण । नष्ट होवो.
सद्गुरुवाचोनी । सापडेल सोय
तेव्हा जन्म होय । धन्य धन्य.


कवी - विंदा करंदीकर

किलबिललेले उजाडताना

किलबिललेले उजाडताना
ओठ उगवतीचा थरथरला
गुलाबलेला ओललालसर

तुंडुंबलेले
संथ निळेपण
पसरत गेले चार दिशांना
तांबुसवेडे

हळुहळु मग नि:स्तब्धातुन
स्वप्ने उडाली गुलाल घेऊन
लालचुटकश्या चोचीमध्ये
पिंजर-पंखी,
आणिक नंतर
’आप’ खुशीने अभ्र वितळले
उरले केशर
आणि भराभर
उधळण झाली आकाशावर
आकारांची
रंगदंगल्या.

नाहि उमगले
केव्हा सरला रजतराग हा
ही अस्ताई,
आणि उमटला रौप्यतराणा
झगमगणा-या जलद लयीतील
... असा विसरलो, विसावलो अन
नीरवतेच्या गुप्त समेवर
आणिक नंतर
न कळे कैसी
मनात माझ्या - काहि न करता-
जाणिव भरली कृतार्थतेची


कवी - विंदा करंदीकर

सर्वस्व तुजला वाहुनी

सर्वस्व तुजला वाहुनी, माझ्या घरी मी पाहुणी
सांगू कसे सारे तुला, सांगू कसे रे याहुनी?

घरदार येते खावया, नसते स्मृतींना का दया ?
अंधार होतो बोलका, वेड्यापिशा स्वप्नांतुनी

माझ्या सभोती घालते, माझ्या जगाची भिंत मी
ठरते परी ती काच रे, दिसतोस मजला त्यातुनी

संसार मी करिते मुका, दाबून माझा हुंदका
दररोज मी जाते सती, आज्ञा तुझी ती मानुनी

वहिवाटलेली वाट ती, मी काटते दररोज रे
अन्‌ प्राक्तनावर रेलते, छाती तुझी ती मानुनी


कवी - विंदा करंदीकर

सांजवेळी सोबतीला

सांजवेळी सोबतीला, सावली देऊन जा...
भैरवी गाईन मी, तू मारवा गाऊन जा...

मी जपोनी ठेविल्या, संवेदना स्पर्शातल्या,
त्या खुणांचे ताटवे, तू एकदा फुलवून जा...

पेरला श्वासातुनी मी गंध ओल्या प्रीतिचा,
धुंद मी माझ्यात आहे, धुंद तू होऊन जा...

घेतला झोळीत माझ्या, मी व्यथेचा जोगवा,
एकदा हातात माझ्या, हात तू देऊन जा...

या पुढे जमणार ना तुज, ओळखीचे, पाहणे,
त्या तुझ्या नजरेत मजला, तू जरा भिजवून जा...

नववधू होऊन तू, जाशील जेव्हा, त्या घरी,
त्या घराच्या वळचणीला, आठवण, ठेवून जा...

- इलाही जमादार

तीर्थाटण

तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी;
अन तुझिया देहात गवसली
सखये मजला तीर्थे सारी

अधरावरती तव वृंदावन
प्रयाग सापडले नेत्री;
भालावरती ते मानसरोवर,
मानेवरती गंगोत्री

गया तुझ्या गालात मिळाली
रामेश्वर खांद्यावरती
मिळे द्वारका कमरेपाशी
अन काशी अवतीभवती

मोक्षाचीही नुरली इच्छा
नको कृपा याहून दुसरी
तीर्थाटण मी करीत पोचलो
नकळत शेवट तव दारी.


कवी - विंदा करंदीकर

देह मंदिर चित्त मंदिर प्रार्थना

देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

जीवनी नव तेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो धैर्य लाभो सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना


कवी - वसंत बापट

या नभाने या भुईला दान द्यावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि या मातीतून चैतन्य गावे
कोणती पुण्ये अशी येती फळाला
जोंधळ्याला चांदणे लगडून जावे

या नभाने या भुईला दान द्यावे
आणि माझ्या पापणीला पूर यावे
पाहता सुगंध कांती सांडलेली
पाखरांशी खेळ मी मांडून गावे

गुंतलेले प्राण या रानात माझे
फाटकी ही झोपडी काळीज माझे
मी असा आनंदुन बेहोष होता
शब्दगंधे तू मला वाहून घ्यावे


कवी - ना. धों. महानोर.

तसेच घुमते शुभ्र कबूतर

मनात माझ्या उंच मनोरे
उंच तयावर कबूतरखाना;
शुभ्र कबूतर घुमते तेथे
स्वप्नांचा खाउनिया दाणा.

शुभ्र कबूतर युगायुगांचे-
कधी जन्मले? आणि कशास्तव?
किती दिवस हे घुमावयाचे?
अर्थावाचुन व्यर्थ न का रव?

प्रश्‍न विचारी असे कुणी तरि;
कुणी देतसे अगम्य उत्तर?
गिरकी घेऊन आपणाभवती
तसेच घुमते शुभ्र कबूतर.


कवी - विंदा करंदीकर

फुलात न्हाली पहाट ओली

फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुले
नभात भुकल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले

रंग फुलांवर ओघळतांना असे जुईला लदबदले
गालावरचे निळे गोंदणे पदराभवती घुटमळले

निळ्या तिच्या डोळ्यांत कथाई, कुणाकुणाच्या आठवणी
एक झोपडी साक्षीमधली करीत बसली साठवणी

अशी झोपडी बोलघेवडी पांथस्थाचा पाय अडे
दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे

आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातुन बोलविले
भरात येउनी नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले

काचोळीची गाठ सावरित हळू तयाला सांगितले
तिचियापोटी पाचघडीचे लख्ख चांदणे अवघडले

फुलात न्हाली पहाट ओली, कळीत केशर साकळते
गंधवतीच्या मनात राजस एक पाखरु भिरभिरते!


कवी - ना. धों. महानोर

प्रेम करावे असे, परंतू....

हिरवे हिरवे माळ मोकळे;
ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई;
प्रेम करावे अशा ठिकाणी
विसरुनि भीती विसरुनि घाई.

प्रेम करावे, रक्तामधले;
प्रेम करावे शुद्ध, पशूसम;
शतजन्मांच्या अवसानाने
रक्तामधली गाठावी सम.

प्रेम करावे मुके अनामिक;
प्रेम करावे होउनिया तृण;
प्रेम करावे असे, परंतू....
प्रेम करावे हे कळल्याविण.


कवी - विंदा करंदीकर

कविता

शेवटची ओळ लिहीली
आणि तो दूर झाला
आपल्या कवितेपासून
बराचसा थकलेला
पण सुटकेचे समाधानही अनुभवणारा
प्रसूतीनंतरच्या ओल्या बाळंतीणीसारखा
जरा प्रसन्न, जरा शांत
नाही खंत, नाही भ्रांत....

आणि ती कविता नवजात
एकाकी, असहाय, पोरकी
आधाराचे बोट सुटलेल्या
अजाण पोरासारखी
भांबावलेली, भयभीत,
अनुभवणारी एका उत्कट नात्याची
परिणती विपरीत

ती आहे आता पडलेली
कागदाच्या उजाड माळावर
आपल्या अस्तिवाचा अर्थ शोधत
तो मैलोगणती दूर, वेगळ्या विश्वात
संपूर्ण, संतुष्ट, आत्मरत!


कवियत्री - शांता शेळके

तुकोबाच्या भेटी शेक्स्पीअर आला

तुकोबाच्या भेटी| शेक्स्पीअर आला|
तो झाला सोहळा| दुकानात ||
जाहली दोघांची| उराउरी भेट|
उरातले थेट| उरामध्ये ||
तुका म्हणे "विल्या,| तुझे कर्म थोर |
अवघाची संसार| उभा केला" ||
शेक्स्पीअर म्हणे, | "एक ते राहिले
तुवा जे पाहिले | विटेवरी"||
तुका म्हणे, "बाबा| ते त्वा बरे केले|
त्याने तडे गेले| संसाराला ||
विठ्ठल अट्टल |त्याची रीत न्यारी |
माझी पाटी कोरी | लिहोनिया"||
शेक्स्पीअर म्हणे,| "तुझ्या शब्दांमुळे
मातीत खेळले| शब्दातीत"||
तुका म्हणे, "गड्या| वृथा शब्दपीट |
प्रत्येकाची वाट |वेगळाली ||
वेगळीये वाटे| वेगळाले काटे |
काट्यासंगे भेटे| पुन्हा तोच||
ऐक ऐक वाजे| घंटा ही मंदिरी|
कजागीण घरी| वाट पाहे"||
दोघे निघोनिया| गेले दोन दिशा|
कवतिक आकाशा| आवरेना||


कवी - विंदा करंदीकर

विरुपिका

तरुणपणी त्याने एकदा दर्यामध्ये
लघवी केली.

आणि आपले उर्वरित आयुष्य
त्यामुळे
दर्याची उंची किती वाढली
हे मोजण्यात खर्ची घातले.


कवी - विंदा करंदीकर

रचना

स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!
अर्थ चालला अंबारीतुन
शब्द बिचारे धडपडले;

प्रतिमा आल्या उंटावरुनी;
नजर तयांची पण वेडी;
शब्द बिथरले त्यांना; भ्याले
स्वप्नांची चढण्या माडी!

थरथरली भावना मुक्याने
तिला न त्यांनी सावरले;
स्वप्नामध्ये रचिल्या ओळी
यमक मला नच सापडले!


कवी - विंदा करंदीकर

रेबिज

डॉक्टर : सांगायला वाईट वाटते कि तुम्हाला पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे रेबिज हा रोग झाला आहे. तुम्ही यातुन बरे व्हायची शक्यता फार कमी आहे.

पेशंट : डॉक्टर मला एक कागद व पेन देता का ?

डॉक्टर : कागद व पेन कशासाठी ?

पेशंट : यादी तयार करतो. कुणा कुणाला चावायच आहे अशा लोकांची.

सगळ्यात जुना प्राणी

गणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?

मंजू : झेब्रा.

गणपुले सर : असं का बरं?

मंजू : कारण तो ब्लॅक अॅण्ड व्हाईट असतो ना

देव

संपोजीराव : डॉक्टर मला सारखं वाटतंय की मी देव आहे.

सायकोलॉजिस्ट : असं कधीपासून वाटतंय तुम्हाला?

संपोजीराव : जेव्हा पासून मी हे विश्व घडवलं ना अगदी तेव्हापासून.

एक पोट्टी

एक पोट्टी रोज माह्या
सपनामंधी येते
हिचक विचक खाता पेता
उचकी देऊन जाते
थयथय नाचे मनामंधी
मोरनी हाय जशी
येड लावुन जाते
तिचे नखरे बावनमिशी

एक दिवस अशी अचानक
माह्यासमोर आली
पाहुन मले काय सांगु
खुदकन हसुन गेली
म्या म्हनलं काय ती
हिच पोट्टी हाय
कोनबी असुदे यार
पन हिले तोड नाय

सपनामंधली पोट्टी पुन्हा
दिवसा दिसुन जाते
कं दिवसा पाह्यलेली पोट्टी
पुन्हा सपनामंधी येते
काय करु चायला
पुरता लोचा झाला
माह्या मनाच्या डुगडुगीचा
चक्का जाम झाला

एक वाटे सुंदरा मले
एक वाटे अप्सरा
चायला सपनातल्या पोट्टीचं
रुप दिवसा आठवत नाही
तिच्या नांदी दिवसाच्या पोट्टीचं
रुप मनी साठवत नाही
डोये खुल्ले तवा माह्या
ध्यानामंधी आलं
दिवसाढवळ्या सपन पाहुन
कोनाचं भलं झालं....

हरकत नाही...

"अक्षर छान आलंय यात !"
माझी कविता वाचताना
मान तिरकी करत
ती एवढंच म्हणते...

डोळ्यांत तुडुंब भरलेली झोप,
कपाळावर पेंगत बसलेले काही भुरटे केस,
निसटून गेलेली एक चुकार जांभई,
आणि नंतर...
वाचता वाचता मध्येच
आपसूक मिटलेले तुझे डोळे,
कलंडलेली मान,
आणि हातातून अशीच कधीतरी निसटलेली,
जमिनीवर पडलेली
माझी कवितांची वही...

हरकर नाही, हरकत नाही;
कविता म्हणजे तरी आणखी काय असतं !!


कवी - संदीप खरे

आफ्रिकन आणि पोपट

एक आफ्रिकन निग्रो एका गोंडस पोपटाला आपल्या खांद्यावर बसवून बारमधे घुसला.

'' अरे वा ... ही एवढी मजेदार गोष्ट तू कुठून आणलीस?'' बार टेंडरने विचारले.

'' आफ्रिकेवरुन'' पोपटाने उत्तर दिले.

मग विमान घेऊन ये!

एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. तेव्हा तो

दारूडा - अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?

ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.

दारूडा- मग कोण आहेस?

ती व्यक्ती- एअर कमांडर!

दारूडा- मग विमान घेऊन ये!

गर्लफ्रेंड

१० वर्षाचा मुलगा आईला : आई, गर्लफ्रेंड म्हणजे काय ग ?

आई : आता नाही कळणार तुला ,

तू जेव्हा मोठा होऊन चांगलामुलगा बनशील तेव्हा तुला पण १ मिळेल .

मुलगा : आणि चांगला नाही बनलो तर ??

आई : तर मग भरपूर मिळतील

मोबाइल कुणाचा?

चार मित्र दारू पीत बसलेले असतात.....
एवढ्यात टेबल वर ठेवलेला मोबाइल वाजतो....
पिंटू - हेलो.
पलीकडचा आवाज - जानू, मी शॉपिंग ला आले आहे.
पिंटू - मग?
... ......मी पंचवीस हजाराचा नेकलेस घेऊ का?
पिंटू - ठीक आहे घे....
.....आणि मला एक दहा हजाराची साडी पण आवडली आहे....
पिंटू - अग मग एक का? चांगल्या तीन चार साड्या घे की.
.....जानु, तुम्ही किती चांगले आहात? मी तुमच्या क्रेडिट कार्ड वरुन खरेदी करत आहे....
पिंटू - ठीक आहे. अजुन जे आवडेल ते घे डार्लिंग....
.....जानु आय लव यू...
पिंटू - सेम टू यू डार्लिंग....... .

मित्र हैराण होऊन विचारतात, अरे तुला काय वेड लागले आहे का? तुझी बायको इतके पैसे खर्च करत आहे आणि तू हो हो काय म्हणत आहेस?
पिंटू - ते जाउ द्या..... आधी सांगा, हा मोबाइल कुणाचा आहे?

आजीचे घड्याळ

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे !


कवी - केशवकुमार

दु:ख ना आनंदही

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.

मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.

एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.

प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा,
जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना.

याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती.

सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा.

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

साधन मदिरा

व्यथा वेदना विसरायाचे साधन मदिरा
स्वतः स्वतःला फसवायाचे साधन मदिरा

गतकाळाच्या रंगमहाली मैफल सजते
भणंग स्वप्ने सजवायाचे साधन मदिरा

बंद उसासे , बंद हुंदके , बंद ओठही
दोन आसवे ढाळायाचे साधन मदिरा

जी काही नासाडी होते ती देहाची
झुरणारे मन रिझवायाचे साधन मदिरा

आनंदोत्सव असेल अथवा असो दुखवटा
झुलवायाचे फुलवायाचे साधन मदिरा

कुरतडणार्‍या कातरणार्‍या कातरवेळी
एकाकीपण रिचवायाचे साधन मदिरा

तुटले फुटले कुस्करले वा जरी चिरडले
सारे काही सांधायाचे साधन मदिरा

रोखुन धरलेल्या श्वासासम कितीक गोष्टी
बंद कवाडे उघडायाचे साधन मदिरा

उजाड झाल्या नगरामध्ये पुन्हा एकदा
नवीन इमले बांधायाचे साधन मदिरा

जे काही कोरले " इलाही" ह्रुदयावरती
पुसण्यासाठी गिरवायाचे साधन मदिरा

- इलाही जमादार

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता

ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता
स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर,
- मला वाटते क्षणभर फुटतो
दगडाला इच्छेचा अंकुर.

ऊन हिवाळ्यांतिल हळदीचे
किरिट घालते वृद्धा वडावर !
- मला वाटते तळ्यांत पाहुन
हात फिरवितो तो दाढीवर!

ऊन हिवाळ्यांतिल कुडकुडते,
कुशीत शिरते दिसतां डोंगर;
-मला वाटते त्यालाही मग
गरम झऱ्याचा फुटतो पाझर.

ऊन हिवाळ्यांतिल भुळभुळते
आजीच्या उघड्या पाठीवर;
- तिच्या भ्रमाला गमते आपण
पुन्हा जरीचा ल्यालो परकर.

ऊन हिवाळ्यांतिल हिरमुसते;
रुसते; अन माळावर बसते;
- मला वाटते त्यालाही पण
असेच भलते वाटत असते.


कवी - विंदा करंदीकर

जगण्यामध्ये ब्रम्हानंद

बरगड्यांच्या तुरुंगातून
मी हृदयाला मुक्त केले;
जिथे जिथे धमनी आहे
तिथे माझे रक्त गेले.

दिक्कालाच्या जबड्यामधील
लवलवणारी जीभ मी;
आसक्तीच्या गर्भामधील
धगधगणारे बीज मी.

माझ्या हातात महायंत्र;
माझ्या मुखात महामंत्र.

सगळे मिळून सगळ्यांसाठी
मरण्यातही मौज आहे;
सगळे मिळून सगळ्यांसाठी
जगण्यामध्ये ब्रम्हानंद.


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - स्वेदगंगा

प्रेम

सत्य युगाच्या अखेर झाली
प्रेम-द्वेष यांच्यात लढाई
द्वेषच होई विजयी आणि,
प्रेम लपे आईच्या हृदयी!

कवी - विंदा करंदीकर

पेर्ते व्हा

पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे
बोलला पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी
आभायात गडगड,
बरस बरस
माझ्या उरी धडधड!

पेरनी पेरनी
आता मिरुग बी सरे.
बोलेना पोपया
पेर्ते व्हा रे, पेर्ते व्हा रे!

पेरनी पेरनी
अवघ्या जगाच्या कारनी.
ढोराच्या चारनी,
कोटी पोटाची भरनी


कवियत्री - बहीणाबाई चौधरी

असं.. कधी वाटलंच नव्हतं..

जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..
अनोळखी नजरेनं अशा.. माझ्याकडे पाहशील..
पाहून नंतर.. हळूच मनाशी हसशील..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मनाच्या बागेत, भावनेचं रोपटं..
एवढ्या खोलवर जाईल..
मुळापासून उखडलं तरी..
थोडी आठवण शिल्लक राहील..
ती आठवण सुद्धा वेदनाच देईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

तुझी निरागसता संपून..
निष्ठुरता डोळ्यांत उरेल..
माझ्या डोळ्यांत मात्र..
काकुळतीने.. पाणी तरेल..
भयाण हे स्वप्न, कधी वास्तवातही उतरेल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

ठसठसणारी वेदना..
तुझीच आठवण करुन देईल..
वेडं.. मनाचं पाखरु..
पुन्हा तुलाच शोधत राहील..
अवघड प्रयत्नानं त्याचा मात्र जीव जाईल..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

मी सुद्धा.. अडखळत..
पुन्हा उभा राहीन..
तुझ्या पलीकडे असणाऱ्या..
अंतिम ध्येयाला पाहीन..
आयुष्य पुढचे, त्याच्या चरणांवर वाहीन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..

आयुष्याच्या पानांवर पुढे..
प्रेमाचं पर्व अधुरंच राहील..
तुझ्या उल्लेखाशिवाय माझं जीवनसुद्धा..
अपुरंच जाईल..
मरताना सुद्धा ओठांवर तुझंच नाव घेत जाईन..
असं.. कधी वाटलंच नव्हतं..


~ आशिष

प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!

!..प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ..!

प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ...!!१!!
दोन मनाचा फक्त शब्दांचा मेळ,
दोन हृदयाचा फक्त तालमेल,
दोन भावनांचा फक्त फक्त मेळ,
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ....!

प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!!२!!
दूर असून सुद्धा जवळ असण्याचा मेळ,
फक्त अवाजावारून दुःख ओळखन्याचा मेळ,
ती नाराजी ओळखन्याची खेळ,
ती वेळ साधून प्रेम करण्याचा खेळ,
सारा सारा फक्त भावनांचा खेळ,
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!!३!!

प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!

किडनॅपर सरदार

चार सरदारांनी एका छोट्या पोराला किडनॅप केले. पोराला सांगितले, घरी जाऊन आपल्या बापाकडून ५ लाख रुपये बर्‍या बोलाने घेऊन ये, नाहीतर तुला जीवे मारू..!
.
तो मुलगा घरी गेला, आणि त्याच्या बापाने पैसेही दिले... का बरे?????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण बाप पण सरदारच होता ना...
जंगलातून एक हत्ती चे पिल्लू चालले होते. उंदराने बिळातून पहिले.
मनाशी म्हणाला " बराच मोठा दिसतोय ! "
तरीही त्याने तोंड बाहेर काढून
हत्तीच्या पिल्लला विचारले "तुझे वय काय?"
हत्ती म्हणाला , " सहा महिने
"हात्तीने विचारले  "तुझे वय काय? "
उंदीर म्हणाला , "माझेही वय सहा महिने च आहे, पण मी सारखा आजारी असतो."

खात्रीचा माल

एक दुकानदार पॅरॅशूट विक्रीचा व्यवसाय करायचं ठरवतो.

एक ग्राहक त्याच्याकडे पॅरॅशूट घेण्यासाठी येतो.

ग्राहक : (शंका येऊन) अहो, हे पॅरॅशूट चांगल्या प्रतीचं आहे ना? उडी मारल्यावर बटन दाबताच उघडेल ना?

दुकानदार : हो नक्कीच. अगदी खात्रीचा माल आहे.

ग्राहक : आणि नाही उघडलं तर?

दुकानदार : तुमचे पैसे परत. अगदी खात्रीचा माल आहे.

20 वर्ष

बंडू आणि चिंगी च्या लग्नाचा 20 वा वाढदिवस असतो, पण बंडू फार शांत बसलेला असतो तेवढ्यात चिंगी विचारते

चिंगी: काय झाल ....? एवढ शांत का बसलायस

बंडू: काही नाही ग तुला आठवत 20 वर्षापूर्वी आपण एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो ...
आपण चोरून भेटायचो ....

चिंगी : हो किती छान दिवस होते ते ...:)

बंडू: तुला आठवत तुझ्या बाबानी आपल्याला पकडल होत आणि माझ्या डोक्याला पिस्तोल लावून मला धमकावल होत की माझ्या मुलीशी

लग्न केल नाहीस तर मी तुला 20 वर्षा साठी खडी फोडायला जेल मधे पाठविन .....

चिंगी :,..... बर त्याच अत्ता काय आल

बंडू: काही नाही ग आज मी जेल मधून सुटलो असतो .........
रेल्वे इंटरव्यू...
इंटरव्युअर - समजा एकाच रुळावरून २ ट्रेन येत असतील
तर काय करशील.
चम्प्या - मी रेड सिग्नलदाखवेल..
इंटरव्युअर - आणि सिग्नल नसेल तर?
चम्प्या - मी टोर्च दाखवेल..
इंटरव्युअर - आणि टोर्च नसेल तर?
चम्प्या - मी माझा लाल शर्ट काढून दाखवेल..
इंटरव्युअर - आणि शर्ट जर लाल नसेल तर?
चम्प्या - मी माझ्या मामांच्या मुलीला बोलवेल..
इंटरव्युअर - हाय? मामाच्या मुलीला? ते कशासाठी?
.
.
.
.
चम्प्या - तिने कधी २ ट्रेनची टक्कर पाहिली नाहीये...:
एक मंत्री भाषण देत असतो. त्यामध्ये ते एक गोष्ट सांगतात .
.
एका व्यक्तीला ३ मुले असतात. त्याने तिघांना १००-१०० रुपये दिले
आणि अशी वस्तू आणायला सांगितली कि त्या वस्तूने खोली पूर्ण भरली पाहिजे .
.
पहिला मुलगा १०० रुपयाचे घास आणतो ...
पण खोली पूर्ण भरत नाही ..
.
दुसरा मुलगा १०० रुपयाचा कापूस आणतो..
तरी पण खोली पूर्ण भरत नाही ..
.
तिसरा मुलगा १ रुपयाची मेणबत्ती आणतो ..
आणि त्याने सर्व खोली प्रकाशमय होते .
.
पुढे तो मंत्री म्हणतो आपले राहुल गांधी त्या तिसर्या मुलासारखे आहेत ..
ज्या दिवशी ते राजनीतीत आले तेव्हापासून आपला देश प्रकाशमय आणी समृद्धीपूर्ण झाला आहे ..
.
.
.
.
.
.
.
तेवढ्यात मागून आपले अन्ना हजारे यांचा आवाज येतो .
"बाकीचे ९९ रुपये कुठे आहेत"...??
अमेरिकेतील एक इंजिनीअर
पुण्यात आप्पा बळवंत चौकात
येतो ...
रस्त्यावर एक पुस्तक
पाहून
तो चक्कर येवून
पडतो ,
पुस्तकाचे नाव असते ,
.
.

.
.
'३० दिवसात इंजिनीअर बना'
एक ६० वर्षांचे गृहस्थ डॉक्टरकडे जातात आणि म्हणतात,"डॉ, माझी बायको १८ वर्षांची आहे आणि ती गरोदर आहे.. तुमचं काय मत आहे??"

डॉ:- मी तुम्हाला १ गोष्ट
सांगतो,"एकदा एक शिकारी अगदी घाईघाईत
शिकारीला जायला निघतो घाईत तो बंदुकीऐवजी छत्री घेतो आणि शिकारीला जातो.
... जंगलात गेल्यावर त्याला १ सिंह दिसतो.

शिकारी सिंहाच्या समोर जातो...
छत्री काढतो.....हँडल खेचतो
आणि
सिंह मरून पडतो....!!"

माणूस - हे अशक्य आहे.. सिंहाला दुसरंच कोणीतरी मारलं असेल.....!!

डॉ. (शांतपणे):- माझंही हेच मत आहे...

फायर ब्रिगेड

संता फायर ब्रिगेडमध्ये नुकताच रुजु होतो आणि एक फोन येतो...

कॉलर - लवकर या माझ्या घरात आग लागली आहे..

संता - आग विझवण्यासाठी पहिले पाणी टाका.

कॉलर - मी टाकल होत पण नाही विझली.

संता - मग आम्ही येउन काय करणार , आम्ही पण पाणीच टाकणार ना
झंप्या रिक्ष्यावाल्याला :
ओ रिक्ष्यावले काका हनुमान मंदिर जाणार का ?
.
.
.
.
.
रिक्षावाला : हो जाणार ना
.
.
.
.
.
झंप्या : ठीक आहे मग येताना प्रसाद घेऊन या

कारण

पत्नी : तू तुझ्या मित्रांना असं का सांगितलंस की, मी खूप चांगला स्वयंपाक
करते?

पती : तुझ्याशी लग्न करण्याचं काही तरी कारण त्यांना सांगायला हवं होतं ना!

काळ

आम्ही जेंव्हा लहान होतो तेंव्हा आम्हाला मोठ्यांचा आदर करण्यास सांगण्यात आले.

आता मोठे झाल्यावर आम्हाला तरुणांच ऎकाव अस सांगतात.

याला म्हणतात नशिब. 
एकदा शाळेत बाई "Best Friend" निबंध लिहायला सांगतात....
.
.
.
.
आपला गण्या उभा राहतो आणि बाईना म्हणतो :-
"बाई.... 'फुकनीच्या'ला इंग्लिश शब्द काय आहे हो..??"

सर्वाधिक बर्फ

एकदा एक फॉरेनर भारतात येतो.... तो सांताला विचारतो...
फॉरेनर - भारतात सर्वाधिक बर्फ कुठे पडतो.
सांता - आठपर्यंत काश्मिरमध्ये आणि आठनंतर दारुच्या ग्लासमध्ये.....

ट्रेनर

एका प्रसिद्ध मासिकासाठी काम करणार्‍या फोटोग्राफरला एकदा जंगलात लागलेल्या आगीचा चांगला फोटो काढायचा होता. त्याने बराच प्रयत्न केल्यावरही चांगला फोटो मिळेना, प्रत्येक फोटोत आग दिसण्या ऎवजी धुरच दिसायचा, तेंव्हा त्याने आपल्या संपादकांना फोनवरुन कळवले कि जंगलात आग लागली आहे व आगीचा फोटो विमानातुनच काढणे शक्य आहे तर लौकरात लौकर विमानाची व्यवस्था करा.
संपादक म्हणाले लगेच करतो तु विमानतळावर जा.
फोटोग्राफरला घाई झाल्याने त्याने विमानतळावर पोहोचल्यावर सोपस्कार पूर्ण केले व एका लहान विमानात जाऊन बसला व पायलटच्या जागेवर बसलेल्याला म्हणाला चल लगेच उडूया.
पायलटने विमान आकाशात नेल्यावर त्यांनी आगीच्या दिशेने ते वळवले.
फोटोग्राफर म्हणाल चल आता विमान जरा खाली घेऊन ३ ते ४ फेर्‍या मार.
पायलट म्हणाला," का ?"
फोटोग्राफर," मी फोटोग्राफर आहे, मला या आगीचे जवळून फोटो काढायचे आहेत."
"अरे बापरे, मला वाटले तुम्ही नविन ट्रेनर आहात व मला आज विमान कसे उतरवायचे हे शिकवणार आहात.", 

लग्नापूर्वी-लग्नानंतर...

लग्नाआधी 'तो' आणि 'ती' लग्नानंतर 'तो' आणि 'ती'
लग्नाआधीचे 'तो' आणि 'ती' लग्नानंतरही तेच असतात, पण लग्नानंतर
त्यांच्यातला संवाद बदलतो... कसा?... असा...
लग्नापू वी र्...
तो : हुश्श! किती वाट पाहात होतो मी या क्षणाची.
ती : मी जाऊ का निघून?
तो : छे गं! तसा विचारसुद्धा मनात आणू नकोस.
ती : तुझं प्रेम आहे माझ्यावर?
तो : अर्थातच!
ती : तू कधी माझी फसवणूक तर नाहीस ना केलेली?
तो : नो, नेव्हर! असा विचार तरी तुझ्या मनात कसा येतो?
ती : तू माझं चुंबन घेशील?
तो : हो तर.
ती : तू मला मारहाण करशील?
तो : अजिबात नाही. मी त्या प्रकारचा पुरुष नाही.
ती : मी तुझ्यावर विश्वास ठेवू शकते का?
तो : हो.
लग्नानंतर...

लग्नानंतर काय होते हे जाणून घेण्यासाठी नवा संवाद लिहिण्याची गरज नाही...
फक्त हाच संवाद खालून वर वाचत जा!

ओळख

बसमध्ये सुरेश सारखा त्या मुलीशी बोलण्याचा व काही ओळख निघते का ते पाहण्याचा प्रयत्न करत होता.

“तुम्हाला कुठं तरी पाहिलयं, पण नक्की आठवत नाही…..आपले वडील काय करतात ?

“ते डॉक्टर आहेत”,

वैतागून मुलगी म्हणाली.

“तरीच………..”,

सुरेशचा धीर वाढला, “…..आता मला आठवल,

मी एकदा आजारीपडलो, तेव्हा त्यांनी औषध दिलं होतं”.

“शक्य आहे”,

ती मुलगी म्हणाली,”

ते जनावरांचे डॉक्टर आहेत”.

टाळ्या वाजवा, वाघ घालवा

एकदा एक माणुस जोर जोरात टाळ्या वाजवत होता.

मित्र ते पाहुन म्हणाला, "का हो असे टाळ्या का वाजवत आहात?"

पहिला म्हणाला कि "टाळ्या वाजवल्या तर वाघ जवळ येत नाहि."

मित्र "पण ईथे कुठे वाघ आहे?"

"येइलच कसा? मी टाळ्या वाजवतो आहे ना!" पहिला उत्तरला.

लॉटरीचे तिकीट

स्थळ : सदाशिव पेठ, पुणे........

जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?

तात्या : अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!

जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?...

तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !
मुलगा : आई, तुझा जन्म कुठे झाला ?

आई : पंढरपुरलां

मुलगा : बाबांचां?

आई : नागपुरला .

मुलगा : माझा आणि ताईचा ?आई : तुझा पुण्याला , ताईचा ठाण्याला .

मुलगा : मग आपण सगळे एकञ कसे आलो ?

लग्न २५ शीतच

दोन मैत्रिणींच्या लग्नाविषयी गप्पा सुरु होत्या

पहिली दुसरीला - माझा निर्णय झाला आहे...
दुसरी - कसला?

पहिली - लग्नाचा... मी २५ वर्षांची झाल्यानंतरच लग्न करणार आहे.

दुसरी - मी पण निर्णय केला आहे...

जो पर्यंत लग्न करणार नाही तोर्यंत २५ वर्षांची होणार नाही.

मुंग्यांची पावडर

एकदा एक बाई दुकानात जाऊंन मुंग्यांची पावडर मागते,
शेजारी उभी असणारी बाई तिला म्हणते,
"अहो मुन्ग्यांचे एवढे लाड करू नका,
आज पावडर मागितली उद्या लिपस्टिक मागतील"

इंग्लिश विन्ग्लीश

मन्या लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.

इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?
"इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला.

"सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...

हजरजबाबी मन्याने म्हटले,"सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. .हि  मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!
जुली फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली,

रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल?

जुली : बॉस ने विचारला " आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटल हो......
...
रिसेप्शनिस्ट : वॉव, मग?

जुली : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली टाइप करायला...

वाघाचा सिनेमा

कायमच खेड्यात राहिलेले छगनराव एकदा शहरात आले.
घरी सर्वांनी एक सिनेमा बघायच ठरवल.
सिनेमा सुरु झाला, सर्वच मजा घेत होते.




आणि



सिनेमात एक वाघ प्रेक्षकांच्या दिशेने येत आहे असा सीन आला.
वाघ प्रेक्षकांकडे येत आहे हे बघुन छगनराव जोरजोरात किंचाळायला लागले.
छगनरावांना सांगण्यात आल घाबरु नका हा सिनेमा आहे.

छगनराव म्हणाले," होय, मला माहित आहे. पण त्या वाघाला माहित आहे का ?"
बंड्या : चंदू.. वेड्या.. तू त्या मुलीसाठी सिगारेट सोडलीस?

चंदू : हो.

बंड्या : वर दारूही सोडलीस लेका?
...
चंदू : होय रे बाबा..

बंड्या : असं? मग तिच्याशी लग्न का नाही केलंस?

चंदू : तू वेडा आहेस. आता इतका सुधारलोय मी. मग आता मला तिच्यापेक्षा आणखी चांगली कोणीतरी मिळेल की रे.

दिल्लीचे तख्त

इतिहासाच्या तासाला पुरंदरे मास्तरांनी झोपलेल्या राजुला ऊठवुन विचारलं
"काय रे! दिल्लीचे तख्त कोणी फोडले ?"

राजु खडबडुन जागा होत " देवाशप्पथ सांगतो सर ! मी नाही फोडले "

पुरंदरे मास्तरांनी हा किस्सा दुपारी शिक्षकांच्या खोलीत सांगितला
तेव्हा जोशी बाई सोडुन सगळे हसले. जोशी बाई  मात्र गंभीरपणे बोलल्या " कोण राजु ना ? एक नंबरचा वाह्यात मुलगा आहे. त्यानेच  फोडले असेल.

हाय जॅक

विमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, ''हाय जॅक!''

... तत्क्षणी हवाई संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले...

... तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून उभा राहिला आणि पहिल्या प्रवाशाला पाहून ओरडला, ''हाय टॉम!!!!!''

रामायण


हवालदार जेलरला : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते.
जेलर : व्वा ! छान सुधारताहेत तर आपले कैदी.
हवालदार : नाही साहेब.
जेलर : नाही ? काय झाले.
हवालदार : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही.

मेल्यानंतरची काळजी !

खमक्या मालतीबाई पेंटर पुढे बसल्या होत्या व पेंटर त्यांचे चित्र काढत होता. मधेच त्या पेंटरला म्हणाल्या ,"हे बघा, माझ्या चित्रात छान हिर्‍याची अंगठी, सुंदर नेक्लेस, अप्रतीम सुंदर मंगळसुत्र व अजुन काही दागीने दाखवता अलेत तर दाखवा."

"पण तुम्ही यातल कहिच घातलेल नाही." पेंटर म्हणाला.

मालतीबाई," तरिही दाखवा. मला माहितेय मी मेल्यावर हे नक्किच दुसर लग्न करणार तेंव्हा माझा हा फोटो बघुन ती यांना सुखाने जगु देणार नाही."
मनोहररावांना बरेच दिवसांनी रजा मिळाल्याने ते फार आनंदात होते. त्यामुळे सक्काळी सक्काळी उठुन बाहेर फिरुन आले. घरी आल्यावर बायकोला उठवल व मस्त चहा केला दोघांसाठी.


बाहेरच्या खोलीत आल्यावर सोफ्यावर बसुन मोठ्ठ्या आवाजात आपल्या आवडिची गाणी लावली. गाणी इतक्या जोरात लावली होती कि शेजार्यां्नाही स्पष्ट ऎकू जावी !

थोड्या वेळाने शेजारचे रामराव आले व मनोहररावांना म्हणाले, “मनोहरराव तुम्हाला माझ्या TV चा आवाज ऎकू येतोय ?

मनोहरराव ,”नाही.”

रामराव,”मला पण नाही. तुमची गाणी जरा हळू वाजवाल काय ?”
   दोन महिन्यांपुर्वी आमच्या कंपनीत एक नविन साहेब आले. त्यांना ऑफिसचे प्रत्येक काम आपल्या सेक्रेटरीला सांगायची सवय असल्यामुळे कोणतीही मशिन चालवता येत नाही.
         परवा त्यांची सेक्रेटरी रजेवर होती व मला ते संध्याकाळी पेपरचे बारिक तुकडे करणार्‍या पेपर श्रेडर पुढे ऊभे दिसले. त्यांना बघुन मी विचारल ,"सर, काही मदत हविय का ?"

साहेब : हो, मला ही मशिन चालवता येत नाही. जरा मदत कर ना.

मी त्यांच्या हातातला कागद घेतला, मशिन मध्ये घातला व स्टार्ट बटन दाबली. बटन दाबताच कागद आत गेला.

कागद आत गेलेला बघुन साहेब मला म्हणाले," अरे, हा एक अतिशय महत्वाचा कागद आहे मला याच्या दोन कॉपी दे"

योग्य क्रम

बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?

मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?

बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!
वत्सलाकाकू वयाच्या सत्तराव्या वर्षी प्रथमच विमान प्रवास करित होत्या. त्यामुळे त्या बर्‍याच अस्वस्थ होत्या. विमानात चढल्यावर त्या पायलटला भेटल्या व म्हणाल्या,"अरे मला सुखरुप परत उतरवशिल ना ?"



पायलट म्हणाला, "खर सांगु का आजी. मी पंधरा वर्षे विमान चालवत आहे. पण अजुन कुणाला आकाशात सोडून आलो नाही."
आपण वाढवावें आपण बुडवावें । ऐसी रिती बरवें तुमचे घरीं ॥१॥
पाळिल्या पोसिल्या विसर पाडावा । समर्थाच्या नांवा लाज येते ॥२॥
रंक मी भिकारी उच्छिष्ठाचा अधिकारी । काय भीड हरि माझी तुम्हां ॥३॥
कर्ममेळा म्हणे पंढरीनिवासा । उगवा हा फांसा लवकरी ॥४॥


- संत कर्ममेळा
आम्ही सखे देवाजीचे । येका विठ्ठ्ल बीजाचे ॥
जन्म पाचही जहाले । बीज नाही पालटले ।
येकबीज आजीवरी । जन्म याच क्षितीवरी ।
दंड्कारण्य देशात । याची कलीयुगा आत ।
शकामाजी शालीवान । जन्म पाच जाले धन्य ।
तुकाविप्र पाचवीया । जन्म जाली गुरु दया ॥

या विठूचा गजर

या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ।
या संतांचा मेळा गोपाळांचा, झेंडा रोविला ॥१॥

कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण ।
नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा ॥२॥

उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्‍गुरूजवळी ।
प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा ॥३॥

पंचतत्त्वांची गोफण, क्रोध पाखरें जाण ।
धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण ।
केशवदास ह्मणे संतांचा मेळा गोपाळांचा ॥४॥


- संत केशवदास

भक्ताचिया काजासाठी

भक्ताचिया काजासाठी, साधुचिया प्रेमासाठी,
सोडली मी लाज रे ॥१॥

धुतो अर्जुनाचे घोडे, सदा राहे मागे पुढे ।
घाली अंगणात सडे, बांधुनिया माज रे ॥२॥

वेडी गवळीयांची पोरे, त्यांचे ताक प्यालो बा रे ।
स्वाता भिल्लिनीची वोरे, उच्छिष्ठाची चोज रे ॥३॥

दुर्योधन सदनी गेलो, विदुराच्या गृहा आलो ।
आवडीने कण्या प्यालो, जोंधळ्‌ची पेज रे ॥४॥

पुर्णब्रह्म ह्मणती माते, पुर्णब्रह्म मींच त्यांते ।
ऐंसी याची जाणीव ते, ह्मणे अमृतराय रे ॥५॥


 - संत अमृतराय महाराज

हरिभजनाविण काळ घालवू नको

हरिभजनाविण काळ घालवू नको रे ॥१॥

दोरीच्या सापा भिवुनी भवा ।
भेटी नाही जिवाशिवा ।
अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे ॥२॥

विवेकाची ठरेल ओल ।
ऐसे की बोलावे बोल ।
आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे ॥३॥

संत संगतीने उमज ।
आणुनि मनी पुरते समज ।
अनुभवावीण मान हालवू नको रे ॥४॥

सोहिरा ह्मणे ज्ञानज्योती ।
तेथ कैचि दिवस-राती ।
तयावीण नेत्रपाती हालवू नको रे ॥५॥


 - संत सोहिरोबानाथ

अजि मी ब्रह्म पाहिले

अजि मी ब्रह्म पाहिले

अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी
कटिकर नटसम चरण विटेवरी, उभे राहिले

एकनाथाच्या भक्तिसाठी, धावत आला तो जगजेठी
खांदी कावड आवड मोठी, पाणी वाहिले

चोख्यासंगे ढोरे ओढिता, शिणला नाही तो तत्त्वतां
जनीसंगे दळिता कांडिता, गाणे गाईले

दामाजीची रसिद पटवली, कान्होपात्रा ती उद्धरिली
अमृतराय ह्मणे ऐसी माऊली, संकटा वारिले


रचना - संत अमृतराय महाराज
राग -  जयजयवंती

देह शुद्ध करुनी

देह शुद्ध करुनी भजनीं भजावे ।
आणिकांचे नाठवावे दोष-गुण ॥१॥

साधनें समाधी नको पां उपाधी ।
सर्व समबुद्धी करी मन ॥२॥

ह्मणे जनार्दन घेई अनुताप ।
सांडी पां संकल्प एकनाथा ॥३॥


 - संत जनार्दन महाराज

संतपदांची जोड दे

संतपदांची जोड दे रे हरि साधुपदाची जोड ॥१॥

संतसमागम आत्मत्वाचा, सुंदर उगवे मोड ॥२॥

सुफलित करुनी पूर्ण मनोरथ । पुरविशि जिविंचें कोड ॥३॥

अमृत ह्मणे रे हरि । भक्ताचा शेवट करिसी गोड ॥४॥


 - संत अमृतराय महाराज

धवळे

विवाहात गायल्या जाणार्‍या नवरदेवाविषयीच्या गीतांना "धवले" किंवा "धवळे" असे म्हणतात

मंगलाष्टके

मंगलाष्टक : हिंदूंमध्ये मातापित्यांच्या पुढाकाराने किंवा संमतीने होत असलेल्या धार्मिक पद्धतीच्या विवाहाप्रसंगी महाराष्ट्र आणि त्याच्या आसपासच्या भागांत म्हटल्या जात असलेल्या पद्यरचनांना मंगलाष्टक या नावाने ओळखले जाते. मंगलाष्टकाची प्रथा विशेषकरून महाराष्ट्रीय हिंदू समाजात प्रचलित आहे. विवाह समारंभात वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करून त्यांना आशीर्वाद देण्याच्या प्रथेचा एक भाग म्हणून मंगलाष्टके आपली ओळख राखून आहेत.

मंगलाष्टकांचे मूळ विवाहप्रसंगी ज्येष्ठांनी वधूवरांना त्यांच्या दांपत्यजीवनासाठी द्यावयाच्या आशीर्वचनात आहे.पारंपरिकरीत्या मंगलाष्टक ही आठ ओळींचा चरण असलेली, विशिष्ट सुरांत म्हणण्याची पद्यरचना असते. तिचा एक चरण संपल्यानंतर जमलेली मंडळी वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करतात. ही पद्यरचना मराठी किंवा संस्कृतमध्ये असते. मात्र विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून मंगलाष्टके स्वरचित म्हणण्याचा परिपाठही वधू वराचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांनी सुरू केला आहे. वधू आणि वराला त्यांच्या दांपत्यजीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद हा या रचनांचा मुख्य गाभा मात्र टिकून आहे.

स्रोत : विकिपीडिया