तिच्या लग्नाची पत्रिका

तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली,
थरथरत्या हातांनी त्यावरची आसवं पुसली,
एक आसू नेमका तिच्या नावावरच पडला,
... नाव ख़राब होइल, म्हणुन पुसनारा हात अडला...,

दोन-चार थेम्बं तिच्या बापाच्या नावावरही पडली होती,
ज्याच्याकडे पदर पसरवून ,'ती' माझ्यासाठी रडली होती,

एक थेम्ब पडला तिथे, जिथे आप्तांची नावे दाटली होती,
बहुदा माझ्यासोबत फिरताना, तिला ह्यांचीच भीती वाटली होती.,

'आमच्या ताईच्या लग्नाला नक्की यायचे हं'..,
यावरही एक थेम्ब पडला,
'ताई तू जा, मी नाही सांगणार कुणाला,..
तो भाबडा बोल आठवला...,

काही घसरलेली आसवं, लग्नस्थळ दर्शवत होती,
अगदी त्याच्याच समोर आमची भेटायची जागा होती,

'अहेर आनु नये' यावरही थोडा ओलावा होता,
तिच्या बर्थडे गिफ्ट साठी, मी मोबाइल विकला होता.......,

सगळी मित्रमंडळी माझ्यावर हसली.,
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली.......,
आज घरी दिसली............!

करायला गेल तर ...........

तोंड देता आले तर
संकटही शुल्लक असत

चालायला गेलं तर
निखाऱ्यांही फूले होतात

बघायला गेलं तर
आयुष्यही खूप सोपे असत

जगायला गेलं तर
दु:खातही सुख असत

वाटायला गेलं तर
अश्रूंतही समाधान असत

पचवायला गेलं तर
अपयशही सोपे असत
गमावलं मी पण होतं..
.
गमावलं तिने पण होतं..
.
फरक फक्त एवढा आहे..?
.
तिला मिळविण्या करीता मी सर्व
काही गमावलं..
.
अन्..?
.
तिने सर्व
काही मिळविण्या करीता मला गमावलं..

उपाशी रहा, मुर्ख व्हा

स्टीव्ह जॉब्जचे भाषण
उपाशी रहा, मुर्ख व्हा
उल्हास हरी जोशी

नुकतेच ऍपलचा संस्थापक स्टिव्ह जॉब्ज याचे निधन झाले. अमेरिकेचे प्रेसिडेन्ट बराक ओबामा पासुन आय.टी. इन्डस्ट्रीमधील बील गेट्स, मार्क झुकेरबर्ग, लॅरी ऍलीसन सारखे दिग्गज पण हळहळले. स्टिव्ह हा इतिहासात एडीसन नंतरचा सर्वात हुषार व कल्पक इंजिनीयर म्हणुन ओळखला जाईल असे अमेरिकेतील तद्यांचे मत आहे. एडीसन प्रामाणेच स्टिव्ह कडे पण इंजिनीअरींगची कोणत्याही प्रकारची डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट किंवा क्वालिफिकेशन नव्हते. कॉलेजमधला ड्रॉप आऊट असलेला, वयाच्या 21 व्या वर्षी स्वतःची कंपनी काढणार्या्, वयाच्या 30 व्या वर्षी आपल्याच कंपनितुन हकालपट्टी झालेल्या, नंतर कंपनीत परत आल्यावर ऑपल ही जगातील एक दिग्ग्ज-आघाडिची कंपनी बनविणार्याु स्टिव्हला हे कसे जमले? 12 जुन 2005 सली त्याने स्टॅनफोर्ड युनिव्हरसिटीत केलेले भाषण जगभर गाजले. या भाषणाचा हा स्वैर मराठी अनुवाद.
प्रिय मित्रांनो,
जगातील सर्वोकृष्ट युनिव्हर्सिटिमधील आजचा तुमचा पहिला दीवस आहे. या निमित्ताने तुम्ही मला भषण देण्यासाठी निमंत्रीत केलेत हा माझ्या दृष्टिने मोठा गौरव आहे. कारण मी स्वतः कॉलेज ग्रॅज्युएट नाही. खरे सांगायचे तर आजच्या या निमंत्रणाच्या निमित्ताने, पहिल्यांदाच, कॉलेज ग्रॅज्युएशनच्या जवळपास मी आलो आहे. आज मी माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. फक्त तीनच गोष्टी ! फार काही नाही.
मझी पहिली गोष्ट आहे ती बींदु जोडण्याची, डॉट्स कनेक्ट करण्याची.
माझ्या जन्माच्या आधीपासुनच याची सुरवात झाली. माझी खरी आई कॉलेजमधे शीकणारी एक तरुण कुमारी माता होती. माझा जन्म झाला तेव्हा तिचे लग्न झाले नव्हते. माझा सांभाळ करणे तिला शक्य नव्हते म्हणुन तिने माझी रवानगी ऍडॉप्शनसाठी म्हणजे दत्तक देण्यासाठी म्हणुन केली. तिची इच्छा होती की कॉलेजमधुन ग्रॅज्युएट झालेल्या जोडप्याने मला दत्तक घ्यावे. त्याप्रमाणे एक वकील जोडपे मला दत्तक घ्यायला तयार पण झाले होते.पण ऐनवेळी कुठेतरी माशी शींकली. त्यांनी अचानक एक मुलगी दत्तक घ्यायचे ठरवले. त्यामुळे वेटींग लिस्टवर असलेल्या माझ्या आई वडिलांना मध्यरात्री फोन आला. ‘ अचानक एक मुलगा दत्तक देण्यासाठी उपलब्ध झाला आहे. तुम्हाला तो मुलगा हवा आहे का?’ त्यांना विचारण्यात आले. ‘अर्थातच आम्हाला हवा आहे.’ माझ्या आई वडिलांनी उत्तर दिले. नंतर माझ्या खर्यात आइला कळले की माझी दत्तक आई कॉलेज ग्रॅज्युएट नाही तर माझे दत्तक वडील शाळेचे सुध्धा ग्रॅज्युएट नाहीत. त्यामुळे दत्तकाच्या कागदांवर सही करायला माझी खरी आई तयार होत नव्हती. पण ज्यावेळी माझ्या दत्तक आईवडिलांनी माझ्या खर्याख आईला वचन दिले की ते मला कॉलेजमधे नक्की पाठवतील, त्यानंतर काही महिन्यांनी माझ्या खर्या आइने कागदावर सही केली.
त्यानंतर 17 वर्षांनी मी खरोखरच कॉलेजमधे जॉईन झालो. पण मी चुकुन स्टॅनफोर्डसारखेच महागडे कॉलेज निवडले. वर्कींग क्लासमधुन आलेल्या माझ्या दत्तक आई वडिलांनी पै पै जमवुन माझ्या शीक्षणासाठी पैसे जमा केले होते ते खर्च होऊ लागले. सहा महिन्यांनंतर माझ्या लक्षात आले की मी घेत असलेले शीक्षण त्या लायकिचे नाही. एक म्हणजे आपण आयुष्यात पुढे काय करायचे हे ठरले नव्हते आणि या साठी माझे कॉलेज मला काय मदत करु शकेल हे पण समजत नव्हते. मी उगीचच माझ्या दत्तक आईवडिलांनी मोठ्या कष्टाने जमवलेले पैसे वाया घालवत होतो. त्यामुळे मी ड्रॉप आऊट व्हायचे ठरवले. पण मी मनातुन थोडा घाबरलो होतो. पण मागे वळुन पहाता मला वाटते की तो माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय होता. मी ड्रॉप आऊट झाल्यामुळे मला इंटरेस्ट नसेलेले क्लासेस अटेन्ड करण्यापासुन माझी सुटका झाली. पण त्याचवेळी मला आवडु शकेल अशा कोर्ससाठी मी ड्रप ईंन पण झालो.
पण ही गोष्ट वाटते तेव्हडी सोपी नव्हती. आता मी कॉलेजचा स्टुडंट नव्हतो. त्यामुळे मला मिळालेली खोली गेली होती. मित्राच्या खोलीवर जमिनीवर झोपावे लागत होते. खिषात पैसे नव्हते. त्यामुळे जुन्या कोकच्या बाटल्या 5 सेन्टस ला विकुन पैसे मीळवावे लागले. गावात एक हरेकृष्ण मंदीर होते. तेथे दर रविवारी संध्याकाळी पोटभर मोफत जेवण मिळे. त्यासाठी 7 मैलांची पायपीट करत जावे लागत होते. परंतु मला ते आवडले. त्यावेळी केवळ उत्सुकतेपोटी मी ज्या गोष्टी केल्या आणि माझ्या अंतर्मनाने ज्या गोष्टी मला करायला सांगितल्या त्या पुढे लाख मोलाच्या ठरल्या. याचे एकच उदाहरण मी तुम्हाला देतो.
त्यावेळी रीड कॉलेजमधे कॅलिग्राफीचे देशातील सर्वोत्तम शीक्षण मीळत असे. कॉलेजच्या कॉम्पसमधे प्रत्येक पोस्टर, प्रत्येक लेबल सुंदर पध्ध्दतिने हाताने कॅलिग्रा॑फ केलेले असायचे. मी ड्रॉप आऊट होतो. कुठलेच क्लासेस अटेन्ड करण्यावे बंधन माझ्यावर नव्हते. त्यामुळे मी कॅलिग्राफी क्लासमधे जाऊन बसु लागलो. त्या ठिकाणी माझी खर्यान अर्थाने अक्षरांशी अक्षराओळख झाली. तेथे मला सेरीफ आणि सॅन सेरीफ टाईप फेसेसचे ज्ञान मिळाले. अक्षरांमधल्या जागेचे महत्व कळले. ग्रेट टायफोग्राफी कशामुळे ग्रेट होते याची थोडीशी समज आली. ही गोष्ट सुरेख, ऐतिहासीक, कलापुर्ण अशी होती. ही अशी गोष्ट होती की ती सायन्स शीकवु शकत नाही. मला हे शीकताना खुप मजा आली.
मी हे सगळे छंद म्हणुन शीकत होतो. याचा मला आयुष्यात काहीच उपयोग होणार नाही असेच मी समजुन चाललो होतो. पण दहा वर्षांनंतर, जेव्हा आम्ही पहिला मॅसिनटोश(Macintosh) कॉम्युटर डिझाईन करत होतो, हे सगळे मला आठवले. आम्ही त्याचा मॅकमधे उपयोग केला. हा जगातील पहिला कॅम्युटर होता की ज्यामधे एक सुंदर अक्षरलिपी होती. जर मी रीड कॉलेजमधील हा कोर्स केला नसता तर आमच्या कॉम्युटरमधे ही सुरेख लिपी आलीच नसती. त्यानंतर विन्डोने हीच लिपी कॉपी केल्यामुळे सगळ्या पी.सी. ( पर्सनल कॉंम्युटर) वर याचा उपयोग सुरु झाला. मी जर कॉलेजमधुन ड्रॉप आऊट झालो नसतो आणि कॅलिग्राफी क्लासला ड्रॉप ईन झालो नसतो तर आज पर्सनल कॉम्पुटरमधे जी सुरेख अक्षरलिपी पहायला मीळते ती मिळाली नसती.
त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातील बिंदु किंवा डॉट्स जोडण्यासाठी नेहमी पुढेच म्हणजे भविष्यकाळाकडेच बघायला हवे असे नही. उलट तुम्हाला मागे वळुन, म्हणजे भुतकाळाकडेच बघावे लागते. भूतकाळातील घटनाच भविष्यकाळातील डॉट्स जोडायला कारणिभुत असतात यावर तुम्ही विश्वास ठेवायला हवा. तुम्ही कशावर तरी विश्वास ठेवायला हवा. मग ते तुमचे गट्स, डेस्टिनी, आयुष्य, कर्म- काहिही असेल. मझ्या या अप्रोचने मला कधिही खाली पहायला लावले नाही, तर त्यामुळे माझ्या आयुष्यात प्रचंड परिवर्तन घडले.
कदा एक वयोवृद्ध बाप आपल्या उच्च शिक्षित मुलासोबत घराच्या छतावरती बसला होता.
तेथे एक कावळा आला....
मुलाला बापाने विचारले, ते काय आहे?
मुलगा म्हणाला कावळा.
पुन्हा दुसऱ्यांदा बापाने विचारले, ते काय आहे?
मुलाने पुन्हा उत्तर दिले कावळा.
तिसऱ्यांदाही बापाने विचारले ते काय आहे?
मुलाने जरासे दात-ओठ खात म्हटले, कावळा............
मग ते दोघे घरात गेले. त्याला पुन्हा बापाने विचारले ते आत्ता आले होते ते काय होते?
मुलाचा संयम सुटला होता त्याने ओरडत सांगितले, समजत नाही का?
कावळा...... कावळा... कावळा.

पाचव्यांदा बापाने विचारले ते आपण पाहिले ते काय होते?
मुलगा आता मात्र जाम भडकला त्याने त्यांना सांगितले,
का टाईमपास करताय? तुम्हाला कितीदा सांगितले तो कावळा होता म्हणून,
तरी तुम्हाला समजत नाही का? का जाणून- बुजून त्रास देताय?
मग त्या वयोवृद्ध बापाने त्या मुलाला घरातील एक डायरी आणायला सांगितली.
त्याने ती आणली, त्यात हीच कथा लिहिली होती.
परंतु, ती थोडी वेगळी होती. त्या बापाच्या जागी एक लहान मुलगा होता.
त्याने बापाला एक-दोन नाही तर तब्बल 25 वेळा हाच प्रश्न केला होता,
आणि तितक्याच वेळा त्याच्या वडिलांनी त्याच्या प्रश्नाला हसत हसत उत्तर दिले.
त्यांना त्याच्या विचारण्याचा मुळीच राग येत नव्हता,
उलट त्यांना त्या मुलाचा निरागस स्वभाव आणि त्याचे ते विचारणे आवडत होते.
तो बाप त्या मुलाचाच होता जो त्याला केवळ पाच वेळा विचारल्यावर त्यांच्यावर खेकसला.
फरक फक्त हाच, की मुलासाठी बापाने केलेले कष्ट,
त्यांनी सहन केलेल्या सर्व वेदना तो विसरला होता.
उलट त्याने वडिलांना केवळ दु:खच दिले.
लक्षात ठेवा. तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी कितीतरी कष्ट केले आहेत आणि तुम्ही त्यांच्यासाठी केवळ दु:खच देत आहात?
आई-वडिलांना विसरू नका. त्यांनी केलेल्या कष्टांना विसरू नका.
एक २४ वर्षाचा तरुण मुलागा आणि त्याचे वडील train ने जात असतात.त्यांच्या समोर एक नवीन लग्न झालेलं कपल बसलेल असतं. तो तरुण मुलगा खिडकीतून बाहेर बघतो आणि ओरडतो..”बाबा ते बघा झाडे मागे जात आहेत..” त्याचे बाबा फक्त हसतात. त्या समोर बसलेल्या कपल ला ते पाहून नवल वाटत...हा २४-२५ वर्षाचा तरुण आणि हा अगदी लहान मुला सारखा वागतोय. तो तरुण मुलगा बाहेर बघतो आणि पुन्हा ...ओरडतो..”बाबा ते बघा ते ढग आपल्या सोबत धावत आहेत...” तेव्हा समोर बसलेला व्यक्ति त्या तरुणाच्या वडिलाला म्हणतो..”त ुम्ही तुमच्या मुलाला एका चांगल्या डॉक्टर कडे का नेत नाही..?” वडील हसतात आणि म्हणतात..” आम्ही आता डॉक्टर कडूनच आलो आहोत..माझा मुलगा जन्मापासूनच अंध होता आणि त्याला दोनच दिवसांपासून दिसायला लागले.”

तेव्हा कुठलाही निर्णय घाईत घेवू नका... सत्य कदाचित तुम्ही पाहता त्या पेक्षा वेगळे असू शकते..
कंजूस साहेब - हे तू ह्यावर्षी इमानदारिने काम केलेस त्याबद्दल तुला ५००० रुपयांचा बोनस धनादेश........

आणि

तू जर असाच काम करत राहिलास तर ह्यावारती पुढच्या वर्षी नक्कीच स्वाक्षरी करीन.....
हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी
आणि लग्न होणार असलेल्यांनी ......

नक्कीच वाचा: विचार करा.

एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.

जेवताना मी तिचा हात हातात

घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."

तिच्या डोळ्यांत वेदना उमटली;

तरीही ती शांतपणे जेवत होती,

सगळे शब्द जुळवून मी तीला सांगितलं,

मला घटस्पोट हवाय."

तिने शांतपणे विचारल,- "का?"

तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.

समोरच ताट तिने भिरकावून दिलं.

लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,

हे तिल जाणून घ्यायचं होत;

पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे मि तिला

स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो.

माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं:

पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.

दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.

तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि

या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती.....

तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती

आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता.

तिची आणखी एक अट होती.

लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत.

त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.

मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.

घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता.

त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो.

मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने

बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.

दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती.

आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस

नित बघितलेच नाही हे मला जाणवलं;

आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला.

आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय,

असा प्रश्न पडला.

त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं.

रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां

हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.

दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन

माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच

पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना

नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.

आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती.

जी परत आयुष्यात येत होती.

महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला.

माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले.

ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच नव्हते.

माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.

मी वेगाने CAR चालवत घरी आलो.

माझ्या चेहऱ्यावर हसू होत.

हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो,

तर... माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती.

मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो.

माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता.

ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.

जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही.

आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.

पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.

महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.

वाचा आणि विचार करा. स्वताला विचारा --- "

आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"

या कहाणीचा एकच संदेश आहे.---

" जे आहे-- जे प्रेमात आहे,

जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.

नाही तर पश्याताप...

"आपण किती जरी नाही म्हणालो तरी आपण प्रेमात आंधळे होतोच, तसे आंधळे राहू नका... सावध राहा..कधी काही हि घडू शकत ..!

ब्लँक कॉल

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी …(१)

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते …(२)

नदी नि शेतं नि वार्‍याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
“तुझा” पुढे मी खोडलेला “मित्र” …(३)

टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून…(४)

वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू …(५)

बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय…(६)

माणूस आहेस “गलत” पण लिहितोस “सही”
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे…. काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही…(७)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ…(८)

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात…(९)

उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो “नको… आता नाही”
फार नाही… चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन…(१०)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन….

-संदीप खरे
कॉलेजच्या मुलांमध्ये आणि वाऱ्यामध्ये काय साम्य आहे ?
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
दोघेही पुस्तक न वाचता त्याची पाने पलटतात......
एक पुणेरी मुलगी आपल्या बॉयफ्रेंडला घरी घेऊन आली आणि म्हणाली, तू बस इथे मी चहा घेऊन येते.. .. .. ...

... थोड्या वेळाने परत आली आणि म्हणाली,

.. चल निघू आता, मी घेतला चहा....
चिकटराव त्यांच्या मुलाला असा रोबोट आणून देतात कि जो खोट बोलल्यानंतर चापट मारतो .

मुलगा : पप्पा, आज मला बरे वाटत नाहीये , मी शाळेत जाणार नाही. ( चापट बसते…चटाक ! )
चिकटराव : तू खोटे बोलतोस. मी तुझ्या वयाचा असताना कधीच खोटे बोललो नाही. ( चटाक ! )
मम्मी : काय झाले? चिकटराव : हा चिंटू खोटे बोलतो.
मम्मी : शेवटी तुमचाच मुलगा आहे . ( चटाक ! ! )
बायको : अहो तुम्ही म्हणाला होतात ना की, मी आता कारणाशिवाय दारू पीणार नाही म्हणून मग आता का पिताय????

नवरा : अग आता दिवाळी जवळ आली ना, मग रॉकेट सोडायला रिकामी बाटली नको का ????
डॉक्टर : तुम्ही रोज सकाळी उठल्यावर गरम पाणी पीत जा.
पेशंट : कमाल आहे. मी तर ते रोजच पितो. फकत माझी बायको त्याला "चहा" म्हणते.

शेअर बाजार !!

एकदा एका गावात एक माणुस आला. त्याने गावकर्यांना सांगितले की त्याला माकडे पकडायची आहेत. प्रत्येक माकडामागे तो गावकर्यांना दहा रुपये देईल. गावकरी खुश झाले व जवळच्या जंगलात जाउन माकडे पकडायला लागले... माकडे पकडायला गावकर्यामधे स्पर्धाच लागली. प्रत्येक जण माकडे पकडायचा व तो माणुस त्यांना माकडामागे दहा रुपये द्यायचा. ... काही दिवसांनी माकडे कमी सापडू लागली तेंव्हा त्या माणसाने गावकर्यांना सांगीतले तो आता माकडामागे वीस रुपये देईल. गावकर्यांनी बाजुच्या जंगलातुन माकडे आणली व माकडामागे वीस रुपये वसुल केलेत. काही दिवसांनी त्याने माकडामागे तीस रुपये देतो असे सांगीतले व फार थोडे माकड खरेदी केले कारण गावकर्यांना माकडे सापडेनात. आता माकडे पन्नास रुपयाला खरेदी करतो असे सांगून तो वाट बघू लागला. गावकरी त्याला माकडे देऊ शकले नाहीत तेंव्हा तो त्यांना म्हणाला, "मी काही दिवसांत जवळच्या शहरात जाऊन येतो तो पर्यंत माकड सापडल्यास त्याच्या मदतनिसाकडे जमा करावी व तो त्यांचे पैसे देईल.."

माणुस शहरात गेल्यावर त्याचा मदतनिस गावकर्यांना म्हणाला तुम्हाला माकडे सापडत नसल्यास तो जमा झालेले माकड पस्तीस रुपयांना गावकर्यांना देईल व तो माणुस शहरांतुन परत आल्यावर तेच माकडा गावकरी त्याला पन्नास रुपयांना विकू शकतात म्हणजे त्यांना पंधरा रुपयांचा फायदा होईल. गावकर्यांना योजना पटली व त्यांनी शक्य तिथुन पैसे गोळा करुन पस्तीस रुपयांना माकड खरेदी केले. सर्व माकड पस्तीस रूपयांना विकुन मदतनिस शहरात गेला. त्यानंतर गावकर्यांना तो माणुस दिसला नाही व त्याचा मदतनिसही. पण सर्व गावात फक्त माकड दिसु लागले.

असा चालतो शेअर बाजार !!
एक कवी कविता ऐकवित होता. पण तो जसा कविता सांगायला सुरवात करीत असे त्याच्या तोंडातली कवळी बाहेर यायची. असं बराच वेळ चालत राहालं.
शेवटी कंटाळून एक श्रोता म्हणाला, '' ओ महाशय काही कविता सांगता की नुसती कॅसेटच बदलत राहाता''
एकदा एक अमेरिकन जोडपं भारतात फिरायला येत, त्यांना एक सरदार पर्यटन मार्गदर्शक म्हणून माहिती सांगत असतो-- सरदार:-" हा ताजमहाल याला बांधायला ४ वर्ष लागली."

अमे. जोडपं:-"ह्या $$ , अमेरिकेत तर हे १ वर्षात बांधल असतं"
सरदार:-"हा लाल किल्ला याला तर ३ वर्षात तयार केला"

अमे जोडपं:-"काहीतरीच, हे तर अमेरिकेत सहा महिन्यात तयार होईल "
सरदारला त्यांचं बोलणं ऐकून खूप राग येतो, थोडं पुढं गेल्यावर कुतुबमिनार येतो; अमे. जोडप्याला ते पाहून आश्चर्य वाटते..

अमे. जोडपं:- "हे काय आहे?"
सरदार:-"मला काय माहित?? काल तर इथे काहीच नव्हतं!!!!"
हॅल्लो….. !!
मुलगी - हॅल्लो…. हॅल्लो…
मम्मी - हां हॅल्लो…
मुलगी - हॅल्लो, मम्मी मी बोलतेय.
मम्मी - अग बोल आणि आवाजाला काय झालय तुझ्या ?
मुलगी - बसलाय.
मम्मी - कशाने गं ?
मुलगी - आईसक्रिम
मम्मी - मग काही घेतलस की नाही ?
मुलगी - घेतलं ना. दुसरं आईसक्रिम.. म्हटलं काट्यानेच काटा काढावा.
मम्मी - सुपीक आहेस हो, आज अचानक कसा काय फोन केलास ?
मुलगी - अग, ‘करेन करेन‘ म्हणत होते. जमलच नाही. तसं आताच कळलय यापुढे आमचं बिल कंपनी भरणार म्हणून. तसा केला फोन.
मम्मी - खरच की काय ?
मुलगी - मग. हवं तेवढं बोलू. फुल्ल टॉकटाईम आहे.
मम्मी - बरं, तू कशी आहेस ?
मुलगी - कशी काय ? तशीच आहे. पाच फुट दोन इंच, रंग गोरा…
मम्मी - अग कशी म्हणजे … मजेत आहेस ना ?
मुलगी - अगदी मजेत.
मम्मी - आणि जावयबापू काय म्हणताहेत ?
मुलगी - कुठे काय म्हणतोय तो ? घरात असला तर म्हणेल ना ?
मम्मी - देवा, तुझी सेकंड लेंग्वेज निदान मराठी घ्यायला हवी होती. कसे आहेत जावयबापू ? मजेत आहेत ना ?
मुलगी - काय माहीत. असेल कदाचित. त्याचा ना एक प्रोब्लेमच झालाय.
मम्मी - काय ग, काय झालं ?
मुलगी - कसं सांगू ? लाज वाटते बघ सांगायला.
मम्मी - अरे देवा, अस झालय तरी काय ?
मुलगी - अग त्याला ना…… अ‍ॅसिडीटी झालीय.
मम्मी - अ‍ॅसिडीटी ?
मुलगी - हो ना…. त्याला हा प्रोब्लेम छोटाच वाटतो पण मला किती मोठा प्रोब्लेम होतो म्हणून सांगू ?
मम्मी - तुला कसला ग प्रोब्लेम ?
मुलगी - अगं, हा कायम पोट धरून आणि मी नाक धरून.
मम्मी - पण अचानक अ‍ॅसिडीटी कशी काय झालीय ?
मुलगी - काही नाही ग. हा सगळा बाहेरख्यालीपणाचा परिणाम
मम्मी - अग, काय बोलतेस काय तू ?
मुलगी - खरं तेच सांगतेय.
मम्मी - इतक्या कॅज्युअली कसं काय बोलू शकतेस ?
मुलगी - आता जे आहे ते आहे. सांगायला लाज कसली ?
मम्मी - म्हणजे तुला त्याचा हा बाहेरख्यालीपणा चालतो ?
मुलगी - नाईलाज आहे ग माझा. मी तरी काय करू ? मला नाही जमत.. सकाळी सकाळी उठायला… डबा बनवायला..
मम्मी - आता हा डबा कुठे आला मध्येच ?
मुलगी - अग, मी जेवणाचा डबा बनवून देत नाही म्हणून तर तो…
मम्मी - तुला हे बोलवतं तरी कसं ? एवढ्याश्या कारणांमुळे तो दुसर्‍या बायकांकडे जातो आणि तू…
मुलगी - अग मीच सांगितल त्याला. जा म्हणून.
मम्मी - तू ?
मुलगी - घरगुती जेवण असतं त्या बायकांकडे. पण याला काही स्वतःची अक्कल आहे की नाही ? रोज रोज ती करी, बिरयाणी कशाला खायची ? असलं चमचमीत खाल्ल्यावर होणारच ना अ‍ॅसिडीटी.
मम्मी - तू काय बोलतेयस हेच मला कळत नाही.
मुलगी - अग, असं उठसुठ बाहेर खाल्ल तर मग दुसरं काय होणार ?
मम्मी - याला तू बाहेरख्यालीपणा म्हणतेस ?
मुलगी - असं काय करतेस ? तुझं मराठी एकदम विक झालय बघ. बाहेर खाण्याला हाच शब्द आहे मराठीत.
मम्मी - कळलं तुझ ज्ञान. एक काम कर, रोज त्याला दुध देत जा.
मुलगी - चल…. काहीतरीच काय ? दुध प्यायला तो काय कुक्कुलं बाळ आहे ?
मम्मी - अगं, माझ्या बाये, थंड दुध देत जा. त्याने अ‍ॅसिडीटी कमी होईल. अजून काही प्रोब्लेम नाही ना ?
मुलगी - नाही कसा ? हल्ली फारच आंबटशौकीन झालय तो.
मम्मी - अरे देवा, हे आता काय नवीन ?
मुलगी - हो ना. परवा कैर्‍या घेऊन आला, काल आवळे आणि आज लिंबू आणणार आहे म्हणे. लोणचं कर म्हणतो ? मला कुठे येतय ते ?आंबटशौकीन कुठचा !
मम्मी - माझ्याकडे पाठव.
मुलगी - त्याला ?
मम्मी - गधडे, कैर्‍या, आवळे माझ्याकडे पाठव. मी देईन लोणचं बनवून.
मुलगी - तुला कुठे येतं लोणचं बनवायला ? आपल्याकडे तर जेवणसुद्धा बाबाच बनवतात. लोणचं बनवायला शिकले की काय ते ?
मम्मी - बाबा ? अग तुझे बाबा जाऊन चार वर्षे झाली ? विसरलीस की काय ? तू मधूराच बोलतेयस ना ?
मुलगी - नाही. मी माधूरी…. अय्या, राँग नंबर लागला वाटतं. सॉरी हें… मधुराच्या मम्मी..
चंदूच्या बायोकोचे मराठी थोडे कच्चे असते……..
तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते काळात नसते……..
तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण विराम देऊन टाकले मध्ये मध्ये ……
ते असे…….
” प्रिय प्राण नाथ,
तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला.
काल मुलगा झाला आजीला.
दम्याचा त्रास होतो कुत्रीला.
आज चार पिल्ले झाली मामाला.
दाढी करताना ब्लेड लागली वहिनीला.
दवाखान्यात अद्मित केले बकरीला.
हजार रुपयात विकले आत्याला.
भारतात सध्या ४ प्रमुख मोठ्या समस्या आहेत ...

१) लोकसंख्या

.
...
२) भ्रष्टाचार

.
३) महागाई

.

आणि सर्वात मोठी समस्या

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
४) तरुणांना प्रत्येक आठवड्यात होणारे अगदी खरे खरे... प्रेम....

चोर आणि मॅनेजर

1 ला कैदी : किती वर्षांची शिक्षा?

2 रा कैदी : पाच वर्षांची.

1 ला कैदी : कुठला गुन्हा?

2 रा कैदी : जनता बँक लुटली म्हणून. आणि तुला?

1 ला कैदी : दहा वर्षे.

2 रा कैदी : कुठला गुन्हा?

1 ला कैदी : मी जनता बँकेचा मॅनेजर होतो.

शंकराचा त्रिशूळ

शंकर(पार्वतीला) : माझा त्रिशूळ कोठे आहे?

पार्वती : गणेशाने घेतला आहे.

शंकर : कशासाठी घेतला?

पार्वती : मॅगी खायला
स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले होते. या भ्रमण काळात त्यांना अनेक संत महापुरुष भेटले. एका संतांने त्यांना पवहारी बाबांची गोष्ट सांगितली. ती कथा पुढीलप्रमाणे होती...

प्रसिद्ध योगी पवहारी बाबा यांचे गंगा किना-यावर निर्जन ठिकाणी वास्तव्य होते. एके दिवशी रात्री बाबांच्या कुटीत एक चोर घुसला. काही भांडी, कपडे आणि एक घोंगडी हीच काय ती बाबांची संपत्ती. भांडी बांधून चोर पळण्याच्या तयारीत होता. घाई गडबडीत तो कुटीच्या एका भिंतीवर आदळला. घाबरून पळताना चोरलेले साहित्य खाली पडले.

बाबा उठले आणि चोराच्या मागे धावू लागले. खूप दूर गेल्यानंतर का होईना बाबांनी चोराला पकडलेच. घाबरलेला चोर थरथरत होता. परंतु बाबा त्याच्या चरणावर कोसळले. रडू लागले. बाबा चोराला विनवणीच्या सुरात म्हणू लागले, 'प्रभू, तुम्ही आज चोराच्या रूपात माझ्या कुटीत आलात. चुकून काही वस्तू तुम्ही तिथेच टाकलीत. कृपया त्याही सोबत घेऊन जा.'

चोराला काय करावे समजेना. बाबांच्या प्रेमाच्या आग्रहापोटी त्याने ते साहित्य स्वीकारले. बाबांनी एका गुन्हेगारातही देव पाहिला होता.

कथा ऐकवून त्या साधू पुरुषाने स्वामी विवेकानंदांना विचारले, 'तुम्हाला माहिती आहे तो चोर कोण होता.' स्वामींनी अनभिज्ञता दर्शविली. त्यावर त्यांनी सांगितले, तो चोर मीच होतो.
एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पण पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला “बाळपणीचा काळ सुखाचा ” स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत.

"बाप"- उन्हामधलं सावली देणारं झाड

उन होऊन माथ्यावरती पाखरांचे तो करतो लाड
"बाप"असतो उन्हामधलं सावली देणारं वडाचं झाड

पाखरांचा चिवचिवाट कानी पडताच
वड आनंदाने बहरून येतो
पाखरं बांधतात घरटी. तेव्हा-
वड केवढा मोहरून जातो
फांदीच्या हातावर नि पानाच्या तळव्यावर
पाखरांचे तो करतो लाड
"बाप" असतो उन्हामधलं सावली देणारं वडाचं झाड

मातीमध्ये मुळे त्याची -
खोल-खोल जातात. आणि-
खडकाच्याही पोटामधले
घेऊन येतात नारळपाणी
पाखरं उडून गेली तरी-
येत नाही त्यांच्या आड
"बाप" असतो उन्हामधलं सावली देणार वडाचं झाड

डोक्यावरती उन घेऊन
सर्वांना तो सावली देतो
उन्हाचा मुकुट पेलता पेलता
अचानक तो म्हातारा होतो
पारंब्याची काठी घेवून
तोल सावरतो जणू पहाड
"बाप" असतो उन्हामधलं सावली देणारं वडाचं झाड

वड उन्मळून पडतो तेव्हा
सावली होते सैरभैर
बाप नाही जाणवल्यावर
पाखरांचाही तुटतो धीर
उपसला तरी आटत नाही त्याच्या आठवणींचा आड
"बाप" असतो उन्हामधलं सावली देणारं वडाचं

एका वेड्याचं पत्र

एक वेडा पत्र लिहित होता.

डॉक्टरांनी त्याला विचारले, '' कुणाला पत्र लिहितोस ?''

वेडा , '' मला स्वत:ला ''

डॉक्टर, '' काय लिहिलं आहे पत्रात ?''

वेडा , '' काय माहित... अजुन मला पत्र मिळालंच कुठं? ''

११ नंबरच बटन

एक सरदार पाहूणा म्हणून अमेरिकेला आपल्या मित्राकडे गेला. मित्राने बाहेर कामावर जातांना सरदारजीला , '' समोरचं दार आतून बंद करुन घे, बाहेर जातांना दाराला कुलूप लावून जा, काही प्रॉब्लेम असल्यास 911 ला फोन कर '' वैगेरे वैगेरे सगळ्या सुचना दिल्या. कारण त्या भागात खुप चोऱ्या व्हायच्या.

सरदारजीचा मित्र संध्याकाळी कामावरुन घरी आला, पाहतो तर जे व्हायला नको होतं तेच झालं होतं. घरात चोरी झाली होती. सरदारजीचा मित्र सरदारजीवर जाम भडकला -

'' तुला सांगितलं होतं ना मी बाहेर जातांना कुलूप लावून जा म्हणून''

'' मी बाहेर गेलोच नाही'' सरदारजी म्हणाला.

'' तुला सांगितलं होतं ना मी की दार आतून बंद करुन घे म्हणून"

'' हो मी दार आतून बंद केलं होतं.. पण चोर खिडकीतून आत आले''

'' म्हणजे तुला चोर आल्याचं माहित होतं?''

'' हो मी या खोलीत बसून त्यांची त्या खोलीत चाललेली सगळी खुडबुड ऎकत होतो''

'' मग तु त्यांना का नाही रोखलं'' त्याच्या मित्राने विचारले.

'' कारण ते चार होते आणि मी एकटा... आणि त्यांच्याजवळ बंदूका होत्या''

'' मी तुला सांगितलं होतं ना की काही गडबड झाल्यास 911 ला फोन कर म्हणून... फोन तर तुझ्या खोलीतच होता''

'' मी प्रयत्न केला ना ... तुझ्या फोनवर मला 9 नंबरचं बटण सापडलं पण 11 नंबरचं बटन किती शोधलं तरी सापडलंच नाही'' सरदारजी म्हणाला.

गुन्हेगाराचा शोध

एक सरदार आपल्या घरासमोर आपल्या कंपाऊंडमध्ये झाडांना पाणी देत होता. तेवढ्यात तिथे बाईकवर एक पोलीस आला. सरदारजीच्या घरासमोर गाडीवरुन उतरला. सरदारजीच्या घरापासून 40-50 फुट पळतच समोर गेला आणि थोड्या वेळाने सरदारजीच्या घरासमोर परत आला. नंतर तो दुसऱ्या बाजुला 30-40 फुट पळत गेला आणी थोड्या वेळाने पुन्हा परत आला. झाडांना पाणी देणारा सरदारजी हे सगळं पाहतच होता. सरदारजीच्या लक्षात आलेकी कदाचित पोलीस कुण्या गुन्हेगाराला शोधत असावा.

''काय साहेब ... कुणाला शोधताय?'' सरदारजीने विचारले.

पोलिस सरदारजीजवळ गेला. त्याने खिशातून एक फोटो काढला आणि सरदारजीला दाखवित म्हणाला,

'' हा एका अट्टल गुन्हेगाराचा फोटो आहे... मी त्यालाच शोधत आहे... तुम्ही याला एवढ्यात इथून जातांना बघितले तर नाही? '' पोलिसाने विचारले.

सरदारजीने फोटो हातात घेतला आणि निरखुन त्या फोटोकडे पाहाले. फोटो पोलिसाला परत करीत सरदारजी म्हणाला, '' नाही ... मी नाही बघितलं ''

पोलिस फोटो परत घेवून तिथून जावू लागला. थोड्या अंतरावर गेल्यावर सरदारजीने आवाज दिला, '' साहेब एक मिनिट''

पोलिस वळून पुन्हा सरदारजीजवळ आला.

'' जरा तो फोटो तर दाखवा ''

पोलिसाने पुन्हा तो फोटो सरदारजीकडे दिला.

सरदारजीने थोडा वेळ त्या फोटोकडे पुन्हा निरखून बघितले आणि म्हटले,

'' मला एक गोष्ट कळत नाही ... जर हा एवढा अट्टल गुन्हेगार होता तर त्याचा फोटो काढला तेव्हाच त्याला का पकडलं नाही ?''

सरदारजीची डायरी

बुधवार - एका शुजच्या दुकानदाराला मुर्ख बनविले. एका जोड्याच्या किमतीत दोन जोडे खरेदी केले. ( त्याने एकाच जोड्यावर किंमत लिहिली होती. दुसऱ्या जोड्यावर बहुधा तो किंमत लिहिण्याचे विसरला असावा )

गुरवार - औषधीच्या दुकानातून मालकाने कामावरुन काढून टाकले. त्याने बॉटल्सचे लेबल्स प्रिंट करण्यासाठी सांगितले होते. पण काय करणार बॉटल प्रिंटरमधे जात नव्हती.

शुक्रवार - रात्री खुप हसलो, पांडेजीने बुधवारी सांगितलेला विनोद फार चांगला होता.

शनिवार - पाऊस आला आणि संध्याकाळी पावसात झाडांना पाणी द्यायचं काम पडलं.

रविवार - वॉटर स्कीईंगसाठी घराच्या बाहेर पडलो. सगळं गाव पालथं घातलं पण उतार असलेला एकही तलाव सापडला नाही

आठवण

संता - अरे माहीत आहे मी लहानपणी दहाव्या मजल्यावरुन खाली पडलो होतो.

बंता - मग? ... मग काय झालं साल्या वाचला की मेला?

संता - आता आठवत नाही यार ... खुप जुनी गोष्ट आहे.

देव हरवला आहे

दोन भाऊ एक आठ वर्षाचा आणि दुसरा दहा वर्षाचा, खुपच खोडकर होते. त्या इलाक्यात काहीही गडबड झाली तरी नेहमी शेवटी त्यात त्यांचाच हात असल्याचं उघडकीस यायचं.

त्यांने पालक सगळे प्रयत्न करुन थकले पण त्यांच्या खोड्या काही कमी व्हायच्या नाहीत. एक दिवस त्यांच्या पालकांनी त्यांच्या इलाक्यात एक साधू आल्याचं ऐकलं. आणि तो अश्या मुलांना दुरुस्त करु शकतो हेही ऐकलं. म्हणून त्या मुलांच्या पालकाने त्यांना त्या साधूकडे न्यायचं ठरविलं.

मुलांचे पालक त्या साधूकडे गेले आणि त्यांनी त्यांच्या मुलांना दुरुस्त करण्याबद्दल साधूकडे आग्रह केला. साधू तयार झाला पण तो आधी त्या दोघांपैकी लहान भावास भेटू इच्छीत होता आणि तेही एकट्यात.

झालं मुलांच्या पालकांनी आठ वर्षाच्या लहान भावास साधूकडे पाठविलं.

साधूने त्या मुलास त्याच्या समोर बसविलं. जवळजवळ पाच मिनीट ते दोघंही नुसतेच एकमेकांकडे पाहत होते. शेवटी साधूने मुलाकडे बोट दाखवित त्याला विचारले '' देव कुठं आहे?''

तो मुलगा खोलीत इकडे तिकडे पाहू लागला, खोलीतल्या सगळ्या वस्तू न्याहाळू लागला पण बोलला काहीच नाही.

पुन्हा साधूने त्या मुलाकडे बोट दाखवित मोठ्या आवाजात विचारले , '' देव कुठं आहे?''

पुन्हा तो मुलगा काहीच बोलला नाही, नुसता खोलीतल्या वस्तू न्याहाळत राहाला.

आता तिसऱ्यांदा साधूने त्या मुलाकडे वाकत आपलं बोट त्या मुलाच्या नाकावर ठेवत विचारले, '' कुठं आहे देव?''

तो मुलगा घाबरला आणि उठून सरळ घराकडे पळत सुटला. घरी आल्यावर तो सरळ आपल्या मोठ्या भावाकडे गेला आणि त्याला म्हणाला, '' आपलं काही खरं नाही ... एक मोठी गडबड झाली आहे''

'' काय झालं?.. काय गडबड झाली?'' मोठ्या भावाने विचारले.

लहाना भाऊ म्हणाला, '' तिकडं देव हरवला आहे आणि त्यांना वाटतं की ते आपलंच काम आहे''

सरदारजी आणि जिन

एकदा सरदारजीने आपल्या घरी अडगळीत पडलेला दिवा स्वच्छ करण्यासाठी घासला आणि काय आश्चर्य त्यातून एक जिन अवतरीत झाला.

'' सरदारजी माग तुला जे पाहिजे ते माग... पण लक्षात ठेव तू फक्त तिन गोष्टी मागू शकतोस... '' तो जिन म्हणाला.

सरदारजीने पहली गोष्ट मागीतली - '' मला खुप श्रीमंत व्हायचे आहे''

एका क्षणात सरदारजी गडगंज श्रीमंत झाला.

सरदारजीने दूसरी गोष्ट मागितली '' मला या सरदारजी नावाची फार चिड आहे मी अमेरीकन बनू इच्छीतो ''

एका क्षणात सरदारचा अमेरीकन झाला.

अमेरीकन झालेल्या सरदारजीने आता तिसरी आणि शेवटची गोष्ट मागितली, '' मी पुढेही असंच डोकं न लावता पैसे कमावू इच्छीतो''

एका झटक्यात अमेरीकनचा पुन्हा सरदारजी झाला.

सरदारजीच्या इथे चोरी.

एक रेल्वेत काम करणारा सरदारजी पोलिस स्टेशनला गेला.

" इन्सपेक्टर साहेब माझ्या इथे चोरी झालेली आहे... जरा रिपोर्ट तर लिहा'

इन्सपेक्टरने विचारले, "केव्हा झाली चोरी.?''

सरदारजीने उत्तर दिले "1945 ला'

इन्स्पेक्टरने त्याची टिंगल उडवित म्हटले , ' फार लवकर रिपोर्ट करता आहात महाशय '

' मग आपलं कामच फार फास्ट आहे... 1945 ला चोरी झाली आणि बघा आता 2030 झालेत ... 45 मिनटात इथे पोहोचलो''

सरदारजीचं गाढव

एकदा एका सरदारजीचं गाढव हरवलं. दिवसभर त्याने सगळं गाव गाढव शोधण्यासाठी पालथं घातलं पण त्याला काही त्याचं गाढव सापडलं नाही. संध्याकाळी थकून घरी आल्यावर त्याने देवाचे धन्यावाद देवून त्याचे आभार मानले. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला आश्चर्याने विचारले, '' इकडे आपलं गाढव हरवलं आणि तुम्ही देवाचे आभार का मानता आहात''

'' कारण, ते तरी बरं झालं जेव्हा हरवलं तेव्हा ते गाढव एकटं होतं... त्याच्या पाठीवर मी बसलेलो असतो तर!''

आयुष्य सुंदर वाटत...

गाडी मिरवणाऱ्या श्रीमंत पेक्षा ...
झोपडीत हसणाऱ्या गरीबाकडे पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत.......
नशिबाची चाकरी करण्यापेक्षा ...
कर्तृत्वाला आपल्या हाताखाली बाळगाव आयुष्य जास्त सुंदर बनत..........
भविष्याचे चित्र काढण्यापेक्षा...
वर्तमानातल पूर्ण कराव भूतकालातल रंगवून पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत.........
कायमच मागण्या करण्यापेक्षा...
कधीतरी काहीतरी देऊन पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत......
हरल्यावर एकटेच पश्चात्ताप करण्यापेक्षा...
मित्राच्या खांद्यावर रडून पहावं आयुष्य नक्कीच सुंदर वाटत...........
चारचौघात एकट बसण्यापेक्षा...
कधी कधी समुद्रकिनाऱ्यावर आठवणींना घेऊन बसावं आयुष्य जास्त सुंदर वाटत........
आपल्याला कोण हवंय यापेक्षा...
आपण कोणाला हवंय हे सुद्धा कधीतरी पहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत......
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत...
शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत.......

देवाची देणगी- पाकिस्तान

एकदा ब्रम्हदेव आपल्या सर्व दूतांना व कर्मचार्‍यांना एका बैठकित सांगत होते," हे बघा, आपल्याला काही चांगले निर्माण करायचे असेल तर तेथेच काहीतरी वाईट पण द्यावे. म्हणजे त्या क्षेत्रात संतुलन कायम रहाते. सर्व कामे अशी करायची कि कोठेही संतुलन बिघडता कामा नये.
थोडे थांबुन देव म्हणाले," कुणाला काही अडचण ? माझे म्हणणे कुणाला कळले नसेल तर विचारा मी माझ्या म्हणण्य़ाचे स्पष्टीकरण द्यायला तयार आहे."
काही वेळाने एक देवदूत ऊभा राहिला व देवाला म्हणाला,"देवा आपले म्हणणे कळले पण आपण एखादे उदाहरण द्याल का ?"
ब्रम्हदेव म्हणाले," हे बघा मी अमेरिकेला सर्व काही दिले आहे. तेथील लोकांना मी भरभरुन श्रीमंती दिली, मजा करायला बरिच ठिकाणे दिली पण त्यांना भितीही दिली. त्यांना कायम भिती वाटत असते."
दूसरा देवदूत म्हणाला, " देवा अजुन एक उदाहरण द्याना."
ब्रम्हदेव म्हणाले," मी अफ्रिकेला निसर्गाचे दान भरभरुन दिले पण त्यासोबतच गरिबीही दिली."
तर तिसरा देवदूत म्हणाला," देवा तुम्ही म्हणता ते बरोबर नाही, आपण सर्वच ठिकाणी असे संतुलन सांभाळत नाही. आता बघाना भारताला निसर्गाचे दान दिले, समॄद्धि दिली, श्रीमंती दिली व कुठेच काही कमी दिसत नाही."
देव म्हणाले," होय तेथेही मी संतुलन कायम राखले आहे. त्यांना शेजारी मी पाकिस्तान दिलाय ना."

ट्रेनर

एका प्रसिद्ध मासिकासाठी काम करणार्‍या फोटोग्राफरला एकदा जंगलात लागलेल्या आगीचा चांगला फोटो काढायचा होता. त्याने बराच प्रयत्न केल्यावरही चांगला फोटो मिळेना, प्रत्येक फोटोत आग दिसण्या ऎवजी धुरच दिसायचा, तेंव्हा त्याने आपल्या संपादकांना फोनवरुन कळवले कि जंगलात आग लागली आहे व आगीचा फोटो विमानातुनच काढणे शक्य आहे तर लौकरात लौकर विमानाची व्यवस्था करा.
संपादक म्हणाले लगेच करतो तु विमानतळावर जा.
फोटोग्राफरला घाई झाल्याने त्याने विमानतळावर पोहोचल्यावर सोपस्कार पूर्ण केले व एका लहान विमानात जाऊन बसला व पायलटच्या जागेवर बसलेल्याला म्हणाला चल लगेच उडूया.
पायलटने विमान आकाशात नेल्यावर त्यांनी आगीच्या दिशेने ते वळवले.
फोटोग्राफर म्हणाल चल आता विमान जरा खाली घेऊन ३ ते ४ फेर्‍या मार.
पायलट म्हणाला," का ?"
फोटोग्राफर," मी फोटोग्राफर आहे, मला या आगीचे जवळून फोटो काढायचे आहेत."
"अरे बापरे, मला वाटले तुम्ही नविन ट्रेनर आहात व मला आज विमान कसे उतरवायचे हे शिकवणार आहात.",
पर्यटक म्युझियममध्ये फिरत असतात.

पर्यटक : हा कोणाचा सांगाड आहे?

गाइड : हा या भागातल्या राजाचा सांगाडा आहे.

पर्यटक : आणि हा लहान सांगाडा कोणाचा आहे?

गाइड : तो राजा लहान असतानाचा सांगाडा आहे!
पार्टी ऐन रंगात आलेली असते. गंपू एका खुर्चीत बसून बघत असतो. तेवढ्यात डान्सफ्लोअरवरची एक सुंदर मुलगी त्याच्याकडे येऊन विचारते, काय डान्स करणार का?

गंपू : हो!
मुलगी : ठीक आहे, मग तुझी खुर्ची मला दे!!
पत्नी : (रागाने) मी आपल्या ड्रायव्हरला नोकरीवरुन काढून टाकणार आहे. आज तिस-यांदा मी मरता-मरता वाचलेय.

पती : अं...मला वाटतं आपण त्याला आणखी एक चान्स द्यायला हवा.
वडील : तुला यंदा ९५ टक्के मिळाले पाहिजेत.
मुलगा : ९५ काय, १०५ टक्के मिळवून दाखवतो.
वडील : मस्करी करतोस काय?
मुलगा : सुरुवात कोणी केली!!
शिक्षक : शहामृगाची मान लांब का असते?

विद्यार्थी : कारण त्याचं डोकं आणि शरीर याच्यामध्ये खूप अंतर असतं. त्यामुळे त्यांना जोडण्यासाठी त्याची मान पण लांब असते.
एक खाष्ट सासू आपल्या दोन जावयांची परीक्षा घेण्यासाठी शक्कल लढवते. पहिल्या जावयाला घेऊन नदीकाठी फिरायला जाते आणि पाय घसरून नदीत पडल्याचे नाटक करत.
जावई चटकन पाण्यात सूर मारून तिला वाचवतो. दुसऱ्या दिवशी त्याच्या दारात एक नवीकोरी गाडी उभी असते. त्यावर लिहिलेलं असतं- 'तुझ्या प्रेमळ सासूबाईंकडून सप्रेम भेट!'
नंतर दुसऱ्या जावयाला घेऊन नदीकाठी जाते, पुन्हा पाय घसरून पडल्याचे नाटक करते. जावई ढिम्म हलत नाही... बिच्चारी सासू वाहून जाते. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जावयाच्या दारात नवीकोरी गाडी उभी असते. त्यावर लिहिलेलं असतं- 'तुझ्या प्रेमळ सासरेबुवांकडून सप्रेम भेट!'
शेअर रिक्षावाला : १०० रुपये झाले साहेब.
गंपू फक्त ५० रुपये देतो.
रिक्षावाला : ही काय दादागिरी आहे? अधेर्च पैसे?
गंपू : मग? तू पण बसून आलास ना? तुझे पैसे पण मीच भरू?

चिकटपणाचा कळस

चंचुमल : बाबा...मी आज तुम्हाला अभिमान वाटेल असं काम केलंय.
कवडीमल : हो का...काय केलंस तरी काय?
चुंचूमल : मी दादरपासून वांद्यापर्यंत बसच्या मागे धावत गेलो आणि दहा रुपये वाचवले चक्क.
कवडीमल : अरे मूर्खा...पण बसच्या ऐवजी जर कूलकॅबच्या मागे धावला असतास तर शंभर रुपये नसते का वाचले.
गंपू : पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी काय करावे लागेल?
.
.
.
.
.
झंपू : पाप!
मी कवी असतो... तर तू माझी कविता असतीस
मी लेखक असतो... तर तू माझी कथा असतीस!

मी चित्रकार असतो... तर तू माझं चित्र असतीस!

... पण काय करू मी कार्टूनिस्ट आहे!!!
गंपू : अरे, डिझेलचे दर किती वाढलेत ना..
झंपू : वाढू देत. मला काय फरक पडतो? मी आधीपण शंभर रुपयांचं भरायचो आणि आता पण शंभर रुपयांचं भरतो.
मनोहररावांना बरेच दिवसांनी रजा मिळाल्याने ते फार आनंदात होते. त्यामुळे सक्काळी सक्काळी उठुन बाहेर फिरुन आले. घरी आल्यावर बायकोला उठवल व मस्त चहा केला दोघांसाठी. बाहेरच्या खोलीत आल्यावर सोफ्यावर बसुन मोठ्ठ्या आवाजात आपल्या आवडिची गाणी लावली. गाणी इतक्या जोरात लावली होती कि शेजार्यां्नाही स्पष्ट ऎकू जावी ! थोड्या वेळाने शेजारचे रामराव आले व
मनोहररावांना म्हणाले, “मनोहरराव तुम्हाला माझ्या TV चा आवाज ऎकू येतोय ?
मनोहरराव -”नाही.”
रामराव-मला पण नाही. तुमची गाणी जरा हळू वाजवाल काय ...

नसते चाळे

पहिला मुलगा : माझे बाबा एवढे उंच आहेत कि हात वर करून छताला लावतात
दुसरा मुलगा: माझे बाबा तर एवढे उंच आहेत कि हात वर करून विमानाला लावतात
तिसरा मुलगा : माझे बाबा पण खूप उंच आहेत पण ते असले चाळे करत नाहीत..

सर्वात लहान

बाई चिंटूला:तुमच्या घरात सगळ्यात लहान कोण आहे?
चिंटू: माझे बाबा ...!
बाई : का?
.
.
.
चिंटू : कारण ते अजुनही आई जवळ झोपतात ...!

होम वर्क

सर - homework का नाही केला?
मुलगा - सर लाईट गेले होते.
सर - मेणबत्ती लावायची मग..
मुलगा - काडेपेटी नव्हती.
सर - का?
मुलगा - देवघरात होती.
सर - घ्यायची मग.
मुलगा - अंघोळ नव्हती केली.
सर - का?
मुलगा - पाणी नव्हत.
सर - का?
मुलगा - मोटार चालू होत नव्हती.
सर - का?
मुलगा - आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून....

सांग सांग भोलानाथ - आधुनिक


सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ...

भोलानाथ Reliance रिझल्ट सांगेल काय?
Investors ना बख्खळ divident देईल काय?
भोलानाथ... भोलानाथ...
भोलानाथ Reliance मार्केट चढेल काय?
Investors ना बख्खळ Divident देईल काय?
भोलानाथ... भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ...

भोलानाथ उदया आहे महत्त्वाचे Chapter...
ONGC म्हणेल का रे "उत्तम होते Quarter"?
भोलानाथ... भोलानाथ...
भोलानाथ उदया आहे महत्त्वाचे Chapter...
ONGC म्हणेल का रे "उत्तम होते Quarter"?
भोलानाथ... भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ...

भोलानाथ, भोलानाथ खरं सांग एकदा...
IT आणि BPO चा वाढेल काय रे धंदा?
भोलानाथ... भोलानाथ...
IT आणि BPO चा वाढेल काय रे धंदा?
भोलानाथ... भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ...
सांग सांग भोलानाथ...
सांग सांग भोलानाथ...
चंद्रजीत

क्रम

बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!

रेबिज

डॉक्टर : सांगायला वाईट वाटते कि तुम्हाला पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे रेबिज हा रोग झाला आहे. तुम्ही यातुन बरे व्हायची शक्यता फार कमी आहे.

पेशंट : डॉक्टर मला एक कागद व पेन देता का ?

डॉक्टर : कागद व पेन कशासाठी ?

पेशंट : यादी तयार करतो. कुणा कुणाला चावायच आहे अशा लोकांची.

हाय जॅक

विमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, ''हाय जॅक!''

... तत्क्षणी हवाई संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले...

... तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून उभा राहिला आणि पहिल्या प्रवाशाला पाहून ओरडला, ''हाय टॉम!!!!!''

मरून पडलेला पांडुरंग

वक्तशीर मुलगा
पाठीवर दप्तर घेऊन
शाळेत वेळेवर पोहोचतो
तसा येऊन पोहोचला पाऊस,
एखादं आदिम तत्त्वज्ञान रूजवावं
तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं
जमिनीच्या पोटात

मग भुरभुर वारा सुटला...
छोट्या स्टेशनवर न थांबता
एक्सप्रेस गाडी
धाड धाड निघून गेल्याप्रमाणे
काळे ढग नुस्तेच तरंगत गेले,
वाटचुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा
अचानक पाऊस बेपत्ता झाला

बियाच्या पोपटी अंकुरानं
जमिनीला धडका मारून
वर येण्यासाठी रचलेले मनसुभे
दिवसागणिक वाळून गेले,
जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप
दवाखान्यातल्या व्हरांड्यात
विमनस्क फेऱ्या मारतो
तसा शेतकरी धुऱ्यावर उभा

लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात
पंढरपुराकडे निघालेली दिंडी
आणि इथं काळ्या शेतात
मरून पडलेला हिरवा पांडुरंग!

कवी - दासू वैद्य
कवितासंग्रह - तूर्तास

किती देऊ किती घेऊ

किती देऊ किती घेऊ
गेले आभाळ संपून
चंद्र ओंजळीत आला
डोळे हळुच मिटून

धुके कातर बोटांचे
फिरे पापण्यांवरून
झुले काजव्यांची रात्र
ओथंबल्या केसातून

श्वास तेव्हा शब्द होते
अर्थ मिटलेले डोळे
होय मातीचे आभाळ
रक्त जुई जुई झाले

वीज नग्न क्षणांत त्या
बुडे दिशांचेही माप
सर्वस्वाची गाढ कळ
बुडे पुण्य बुडे पाप

किती देऊ किती घेऊ
गेले आभाळ संपून
रात्र ओसरली तरी
चंद्र उरला अजून

कवी - मंगेश पाडगावकर
संग्रह - ओंजळीत स्वर तुझेच

पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे, न ती आग अंगात आता उरे
विझुनी अता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न नेणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तिवाचून देवा, मला वाटले विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचुनिया दिव्य तेज:कण
मला मोहवाया बघे हा सुधांशु, तपाचार स्वीकारुनि दारूण

पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी याचना प्रीतीची लाजुनि लाल होऊनिया लाजरा मंगळ

निराशेत संन्यस्त होऊनी बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव
पिसाटापरी केस पिंजारुनि हा, करी धूमकेतू कधी आर्जव

परी भव्य ते तेज पाहुन पूजुन घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनि साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तुझ्या स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रूद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालोनिया गळा
तुझ्या लाल ओठांतली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन् मला ज्ञात मी एक धूलिकण
अलंकारण्या परी पाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

पसायदान

आता विश्वात्मके देवे| येणे वाग्यज्ञे तोषावें|
तोषोनी मज द्यावे| पसायदान हे।|

जे खळांची व्यंकटी सांडो| तयां सत्कर्मी रती वाढो|
भूतां परस्परे जडों| मैत्र जीवांचे।|

दुरितांचे तिमीर जाओ| विश्वस्वधर्मसूर्ये पाहो|
जो जे वांछिल तो ते लाहो| प्राणिजात।|

वर्षत सकळ्मंगळी| ईश्वरनिष्ठांची मांदियाळी|
अनवरत भूमंडळी| भेटतु भूतां।|

चला कल्पतरूंचे आरव| चेतना चिंतामणीचे गाव|
बोलते जे अर्णव| पीयुषाचे।|

चंद्रमे जे अलांछन| मार्तंड जे तापहीन|
ते सर्वांही सदा सज्जन| सोयरे होतु।|

किंबहुना सर्व सुखी| पूर्ण होवोनी तिन्ही लोकी|
भजि जो आदिपुरुषी| अखंडित।|

आणि ग्रंथोपजीविये| विशेषीं लोकी इये|
दृष्टादृष्टविजयें| होआवें जी।|

येथ म्हणे श्री ज्ञानेश्वराओ| आ होईल दान पसाओ|
येणे वरें ज्ञानदेओ| सुखिया जाला।|

कणा

ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!

प्रेम नावाचा "टाईमपास"

त्याची अन तिची पहिली भॆट दोघांची होणाऱी "नजऱभेट" काळजाला जाऊन भिडणारी थेट दोघांचं एकमेकांना पाहून हसणं अन नाजुकशा जाळ्यात अलगद फसणं... या हसण्या या फसण्याची सवय झालीय सगळयांना... नजऱभेटीचं रूपांतर चोरून भॆटीत भेटीचं रूपांतर हळुवार मिठीत अन त्याहीपुढे कित्येक पटीत नात्यातल्या या वेगाची सवय झालीय सगळयांना... मग रंगू लागतात स्वप्नं एक त्याचं,एक तिचं फक्त दोन मनं त्याचं हसणं तेव्हा तिचं हसणं तिचं रडणं तेव्हा त्याचं रडणं या हसण्या या रडण्याची सवय झालीय सगळयांना... दिल्या जातात वेळा,पाळल्याही जातात वेळा घेतल्या जातात शपथा दिल्या जातात उपमा त्याला ती वाटते "रांझ्याची हीर" तिलाही तो वाटतो "कपूरांचा रणबीर" या शपथा या उपमांची सवय झालीय सगळयांना... मग येतो असाही एक दिवस पूनवेची रात्र वाटू लागते अवस दोघांनाही येऊ लागतो एकमेकांचा कंटाळा हीर वाटू लागते "बधीर" अन रणबीर वाटू लागतो चक्क "काळा" या अवसेची या पूनवेची सवय झालीय सगळयांना... पहिल्या भेटीच्या चौकातच फूटतात "नव्या वाटा" दोघंही करतात एकमेकांना "टाटा" अहो तु्म्ही कशाला होताय डिस्टर्ब दुःख वैगरे विसरा त्याला भॆटते दूसरी तिलाही भॆटतो दूसरा पुन्हा होते देवाणघेवाण,पुन्हा होते "दिलफेक" पुन्हा जुन्या कहानीचा नव्याने "रिटेक" बदलत्या प्रेमाच्या रंगाची सवय झालीय सगळयांना... खरं सांगायचं अगदी मनापासून तर प्रेम नावाचा "टाईमपास" करण्याची सवय झालीय सगळयांना.....
परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या
पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या
पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात
पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.

पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या
पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा
पुरवला.

पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी
पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर
पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.

पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी
पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी
पदार्थ पचवले.

पंतांना परमेश्वरच पावला!
पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा
पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा
पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत
पोहोचला.

पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच
पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळे
प्राची पेटली.

पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला
पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या
पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.

पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले.
प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.

पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला
पांगली. प्राचीने पंकजचे पाकिट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच
पाप्या परतवल्या.

पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.
केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर
कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत
कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये '
कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे
कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श
किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श
कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज'
करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला.
काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा
कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय
काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या
कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर
कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या
कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!

कथासार:-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे

साले हे मित्र असतात बाकी मस्त

"काय आयटम चाललीय बघ....जर कोणी म्हटले?" "तर लगेच म्हणणार : वहीनी आहे तुझी साल्या, दुसरीकडे बघ!" हजार पोरी बघून पण यांचे मन काही भरत नसतं. पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! "नडला कि फोडला" असे ह्यांचे ब्रीदवाक्य असतं! पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! पास झाल्यावर पार्टीचे निमंत्रण त्यांना द्यायचं नसतं! निर्लज्ज असतात ते, त्यांनी ते आधीच ग्राह्य धरलं असतं! पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! शाळेचा result असो या प्रेमाचा, ह्यांचाच धिंगाणा जास्त! तुमचे प्रेमप्रकरण अख्या कॉलेजमध्ये ह्यांच्यामुळेच गाजतं! पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! प्रत्तेक दु:खात त्याचं तुम्हाला पाठबळ असतं! उन्हात उभे तुम्ही,तरी ह्यांच्याच पायाला भाजतं! पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! शेवटच्या बेन्चवरच्या कमेंटला दाद देणे हे त्यांच्या हक्काचं काम असतं! Break-up नंतर "अशाच असतात रे पोरी......"हे ठरलेले वाक्य असतं, पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! प्रेमाचे नाही वाजले तरी मैत्रीच नाणं नक्की वाजतं, तोंडावर नाही केली स्तुती त्यांनी तरी, दुसर्यासमोर त्यांच्या तोंडून तुमचच नाव गाजतं! पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!
राम आणि रावणाचं घमासान युद्ध सुरू असतं.
राम रावणावर ब्रह्मास्त्र सोडणार एवढ्यात रावणाला रामाच्या शेजारी एक व्यक्ती दिसते.
ते पाहून रावण आपली सश्त्र खाली ठेवतो
आणि तिथून निघून जायला लागतो.
राम: काय झालं?
रावण: काही नाही... मी निघतो.
राम: ए पण काय झालं सांग ना. ...
रावण: काही नाही यार बास झालं.
राम: अरे असं काय करतोस? काय झालं ते तर सांग. . . .
रावण: काय राव तू पण... एवढ्या लहान सहान गोष्टींसाठी रजनीकांतला बरोबर आणायची काय आवश्यकता होती?.
एक लिंबु झेलू बाई, दोन लिंबं झेलूं ।
दोन लिंब झेलूं बाई, तीन लिंबं झेलूं ।
तीन लिंबं झेलूं बाई, चार लिंबं झेलू ।
चार लिंब झेलू बाई, पाच लिंबं झेलूं ।
पाचा लिंबांचा पानवडा , माळ घाली हनुमंताला ।
हनुमंताची निळी घोडी. येतां जातां कमळं तोडी ।
कमळ्याच्या पाठीमागं होती राणी ॥
अगं अगं राणी इथं कुठं पाणी ?
पाणी नव्हे यमुना जमुना,
यमुना जमुनेची बारिक वाळू, तिथं खेळे चिलारि बाळू ।
चिलारि बाळाला भूक लागली ।
सोन्याच्या शिंपेनं दूध पाजीलं पाटावरच्या घडीवर निजवलं ।
नीज रे चिलारि बाळा , मी तर जाते सोनारवाड्‍या ।
सोनारदादा सोनारभाई । गौरीचे मोती झले कां नाहीं ?
गौरीच्या घरीं तांब्याच्या चुली , मांडव घातला मखमख पुरी ।
लगीन लागलं सूर्योंदयीं , भोजन झालं आवळीखालीं ।
उष्ट्या पत्रावळी चिंचेखालीं , शेणगोळा आंब्याखालीं ।
पानसुपारी तुळशीवरी , वरात निघाली हत्तीवरी ।

खिरापत(हादगा)

खिरापत(हादगा)

कोल्हापूर अंबा माय गं
खिरापतीला काय गं ?

वंदिन तुझे पाय गं
खिरापतीला काय गं ?

लेक आली हाय गं
खिरापतीला काय गं ?

गुणाची माझी बाय गं
खिरापतीला काय गं ?

साखर जश्शी साय गं
खिरापतीला काय गं ?

लाडू चिवडा खाय गं
खिरापतीला काय गं ?

दारी बांधली गाय गं
खिरापतीला काय गं ?

प्रेमळ जश्शी माय गं
खिरापतीला काय गं ?

दुधाला वाण नाय गं
खिरापतीला काय गं ?

लोणी तूप खाय गं
खिरापतीला काय गं ?

तिखट्ट हाय हाय नाय गं
खिरापतीला काय गं ?

ओळखणार तुम्ही हाय गं
खिरापतीला काय गं ?

सांगणार मी नाय गं
खिरापतीला काय गं ?

हारलात म्हणू काय गं ?
खिरापतीला काय गं ?