जाता जाता गाईन मी

जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी

माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामाधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे


कवी - कुसुमाग्रज

ऋणमुक्त

 सहज सहज टाकुन गेलास
ओंजळीमधे
एक ऋणाचा क्षण..एका जन्मासाठी.

दहा बोटांची उधळली फुलपाखरे
आणि,
पांच प्राणाचे झाले संपुष्ट….

कितिदा तुला वाऱ्याने सांगितले असेल;
कितिदा फुल चिमणिने सांगितले असेल;

झुंजु मुंजु धुक्यातुन
कधीच का फिरला नाहीस?
जांभळ्या फुलाच्या शामलीजवळून
कधिच का गेला नाहीस?
त्या फुलावरचा दवाचा थेंब
कधिच का पाहिला नाहीस ?

कधिही
न ढळणारा तो दवाचा थेंब
तुझ्यासाठी.
तुझ्या पापण्या भिजवण्यासाठी.
कितीदा तुला हे वाऱ्याने सांगितले असेल
फुल चिमणिने सांगितले असेल..


कवियत्री – इंदिरा संत

उखाणे

ओळखीच्या वार्‍या
तुझे घर कुठे सांग?
गरूडाच्या पंखामध्ये
डोंगरांची रांग

निळे निर्झरिणी
अगे सारणीचे राणी
खडकाच्या डोळ्यालाही
येते कसे पाणी?

जाईबाई सांगा
तुम्ही मनातले पाप
कळ्यांचीही फुले
कशी आपोआप?

दावणीस गाय
धूळ काळजाला आली
सूर्य फेकून नदीत
कुठे सांज गेली?

खांद्यावर बसे
त्याचे रंग किती ओले
पाखरांच्या सारखाच
वारियाने डोले

झाड मधे आले
होई वाट नागमोडी
उडे पोपटाचे रान
पिंजर्‍याला कडी

दगडाचा घोडा
त्याला अंधाराचे शिंग
शुभ्र हाडांनाही फुटे
कसे काळे अंग?

संध्याकाळी आई
देवघरात रडते
तिच्या पदराच्या मागे
केवड्याचे पाते

आम्ही भावंडेही
भय डोळी वागवितो
चांदण्यात आईसाठी
वारा दारी येतो

ओळखीच्या वार्‍या
तुझे घर कुठे सांग?
ओळखीच्या वार्‍या
तुझे घर कुठे सांग?


कवी - ग्रेस

भय इथले संपत नाही

भय इथले संपत नाही...मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो...तू मला शिकविली गीते...

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई


कवी -  ग्रेस 

लेझिम चाले जोरात

दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले,
शेतकरी मन प्रसन्न जाहले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम चाले जोरात !

चौघांनी वर पाय ऊचलले, सिंहासनिं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफ वाले..., ट्पढुम, ढुमढुम, डफ तो बोले..
लेझिम चाले जोरात !

दिवटी फुरफुर करू लागली, पटक्यांची वर टोंके डूलली,
रांग खेळण्या सज्ज जाहली, छनखळ झुणझिन, ढुमढुम पटढुम् ,
लेझिम चाले जोरात !

भरभर डफ तो बोले घुमुनीं, लेझिम चाले मंड्ल धरुनी,
बाजुस-मागें, पुढे वाकुनी..., झणछीन खळखळ, झिनखळ झिनखळ,
लेझिम चाले जोरात !

डफ तो बोले-लेझिम चाले, वेळेचे त्या भान न ऊरले,
नाद भराने धुंध नाचले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम गुंगे नादात् !

सिंहासन ते डुलु लागले, शाहिर वरती नाचू लागले,
गरगर फिरले लेझिमवाले..., छनछन खळखळ, झणझण छनछन,
लेझिम गुंगे नादात् !

दिनभर शेती श्रमूनी खपले, रात्री साठी लेझीम चाले,
गवई न लगे, सतारवाले..., छनखळ झुणझिन,रात्र संपली नादात्
लेझिम चाले जोरात् !

पहाट झाली - तारा थकल्या, डफवाला तो चंद्र ऊतरला,
परी न थकला लेझिम मेळां..., छनखळ झुणझिन, लेझिम खाली...
चला जाऊया शेतात् ! चला जाऊया शेतात् !!


कवी  - श्रीधर बाळकृष्ण रानडे
बॉयफ्रेंन्ड :मी माझे उरलेले जीवन आनंदाने जगेन....

ती मुलगी दुसऱ्या दिवशी मरते आणि एक
त्याच्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवते.
आणि त्यात लिहिते,
मी तुझ्या आनंदासाठी 
काहीही करायला तयार आहे..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मोरल : मोरल वेगैरे काही नाही, बस डोकं नसलेल्या पोरींबरोबर जोक करू नका..

झूलाघर

सायंकाळ झाली पक्षी जाती घरा माजी
गाय वासरे हंबरती
सांगती झाली वेळ आईची
आले हसु मजला, हे पण माझे सखी सोबती
मी पण पाहते वाट आईची
लागली ओढ तिच्या भेटीची

इतुक्यात एक चिमणी छोटीशी
येऊनी बसली माझ्या पाशी
होती ओठात एक काडी चार्‍याची
आपल्या चिमुकल्यां साठी
सांगत होती जणु घालीन
घास माझ्या पोरांच्या ओठी
ही मिलनाची आस बघुनी
मी व्याकुळ झाले मनी
केव्हा येईल आई माझी

नको वाटते तिची नौकरी
दिवस भराची दुसर्‍याची चाकरी
नको राहणे झूलाघरात
वाटते राहावे आई पाशी
डब्यातले थंड अन्न न मला रूचते
शेव, मिक्चर न मला आवडे
एकटेपणात न दिवस सरे
सारखी आईची आठवण येते
कसे हे जीवन आमचे
न आईची कुशी मिळते
न प्रेमानी अन्न भरवते
बालपण आमचे हे असेच संपते
एकटेपणाची आठवण मनात सलते

कसे हे जीवन चक्र बदलले
आई-वडिल दोघेही घरा बाहेर पडले
वाट पाहता-पाह ता थकले डोळे
सारखी आईची आठवण येते
कधी येईल सांगा माझी आई

पक्ष्यांनो तुम्ही तरी सांगाल का?
निरोप माझ्या आईला
वाट पाहते लेक आईची
सायंकाळ ही आता सरू लागली
सायंकाळ ही आता सरू लागली.


कवियत्री - सौ. स्वाती दांडेकर

दोन याचक


 मलीन खाकी गणवेषातिल, सैनिक तरणाताठा कोणी
नाव? कशाचे नाममात्र ते बाहुवरची बघा निशाणी

शरीर विकुनी पोटासाठी एक थेंब हा सरितेसंगे
प्रवाह नेई तिकडे जाई धावत वाहत मरणामागे

मैदानावर पुढे छावणी फुगीर डेरे अवतीभवती
कबुतरांचा जणू थवा हा थकून बैसे जमिनीवरती

त्या गर्दीच्या सीमेवर हा तरूतळी बसला एकाकी
गर्द सावली, गाढ शांतता, वाराही पद हळुच टाकी

दुर्लभ वेळा असते असली ऐकत होता संथ पडोनी
खाकीखाली धडधडणाऱ्या व्यक्तित्वाची करूण कहाणी

कुणी भिकारीण आली तेथे, नाव? कशाचे नाममात्र ते
होते नवथर त्या नवतीला झाकाया नच वस्त्रही पुरते

कळकट चोळीच्या चिंधीतून स्तन डोकावत उंच सावळे
तलम अनावृत दिसे कातडी लाचारीचे विशाल डोळे

उभी राहिली समोर त्याच्या उपसत कंठामधुनि ताना
बोलपटातील परिचित गीते, म्हणे अखेरीस काही द्या ना

काही द्या ना जीभ न केवळ शरीर अवघे होते मागत
ते डोळे, ते स्तन, ती मांडी, सारे उदरास्तव आक्रोशत

शूर शिपाई किंचित बुजला संकोचाची छटा मुखावर
खिशात गेले हात परंतु, नजरेतुन ओसंडे काहुर

त्यासही होते हवे काहीसे, कसे तरी ते कळवे; कळले
दुनियेपासून तुटलेले ते, दोन अनामिक जवळी आले

दूर जरा दरडीच्या खाली मच्छरदाणी करिती पर्णे
नीरवतेवर मुद्रित झाले विविध भुकांचे एकच गाणे, एकच नाणे!


कवी :- कुसुमाग्रज 
आपली चूक असताना जो माफी मागतो , तो प्रामाणिक असतो.

आपली चूक आहे की नाही , याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो.

आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो!!!

फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती


१. फेसबुक कोंबडा : यांना वाटते किरोज सकाळी ,”गुड मोर्निंग”ची पोस्ट टाकावी आणि लोकांना गुड मोर्निंग म्हणायला भाग पाडावे.

२. फेसबुक सिलीब्रीटी : हे फेसबुक ने दिलेली ५००० ची लिमिट पूर्णवापरतात आणि खूप सारे अनोळखी लोकाना अँड्ड करत सुटतात.

३. फेसबुक बाबा : हे फक्त देवाच्या पोस्ट टाकणार आणि प्रवचन करत सुटणार .

 ४.फेसबुक चोर : हे लोक दुसर्यांचे स्टेटस किवा पोस्ट चोरी करून, पटकन आपल्या नावावर टाकतात.

५ . फेसबुक देवदास : हे लोक नेहमी वेदनामय आणि निराशेच्या पोस्ट आणि कविता टाकतात. आणि आपले दुख जगाला दाखवून लोकांना पण दुखी करतात.
६. फेसबुक न्वूज रीडर : जागत काय चालू, ह्या न्‍युज हे त्यांच्या स्टेटस मध्ये टाकून लोकांना न्‍युज सांगत सुटतात.

७. फेसबुक टीकाकार : हे स्वता तर कधी पोस्ट करणार नाही, पण दुस-यांच्या चांगल्या पोस्ट जावून टीका करत सुटतात. जसे पोस्ट जुनी आहे, पोस्ट जमली नाही वगैरे वगैरे.

८. फेसबुक विदुषक : हे लोक त्यांच्या आयुष्यात किती पण दुख असले तरी सर्वांना कमेंट आणि पोस्ट मधून हसवत असतात.

९. फेसबुक लाईकर : हे लोक गुपचूप पोस्ट वाचून लाईक करतात. पण कमेंटकरायला कधी येत नाही.

१०. फेसबुक कमेंटर : यांना कोणती पण पोस्ट असो पण आपण कमेंट मारली पाहिजे असे वाटत असते. आणि कमेंट मास्तर असतात.

११. फेसबुक विचारक : हे लोक चांगले चागले विचार आपल्यापोस्ट मधून लोकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतात.

१२. फेसबुक कवी आणि कवियित्री : याना कविता सोडली तर दुसरे काहीच जमत नाही. हे कविता टाकून लोकांना बोर करत असतात.
१३. फेसबुक टपोरी : हे लोक फेसबुक वर येतातच मुली पटवायला. दिसली मुलगी कि उठ सुठ फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात. आणि कमेंट करत असतात. आणि मुलींच्या मागे लागतात.

१४. फेसबुक द्वेषी : ह्या लोकांना फेसबुक वर कोणाचीच प्रशंसा करणे जमत नाही. हे फक्त लोकांचा द्वेष करतात आणि दुसर्या लोकांना त्रास देतात.

१५. फेसबुक च्याटर : यांना फेसबुक वर च्याट शिवाय काहीच सुचत नाही आणि जमत पण नाही,

१६. फेसबुक भिकारी : या लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट ब्लोक असते म्हणून उठ सुठ मला अड्ड करा म्हणून लोकांना भिक मागत फिरत असतात.

१७ . फेसबुक लिंग परिवर्तक : हे लोकवेगळ्या लिंगाचे प्रोफाईल काढून फिरत असतात. मुल मुलीचे प्रोफाईल काढतात आणि मुली मुलाचे प्रोफाईल काढतात.

१८. फेसबुक खेळाडू : हे लोक दिवसभर फेसबुक वर गेम्स खेळत बसतात.

१९. फेसबुक माकड : हे कमेंट मध्ये काहीच बोलत नाही फक्त हा हा हि हि करत असतात.

२० . फेसबुक कलेक्टर : हे फक्त फेसबुक वर पेज आणि ग्रुप जाईन करतात पण कधी पोस्ट किवा कमेंट करत नाहीत. तर फक्त ग्रुप आणि पेज कलेक्ट करत असतात
 

आई

सकाळी ऊन पाण्याने मला जी घालिते न्हाऊ
चिऊचे काऊचे प्रेमाने सुखाचे घास दे खाऊ

उठूनी हट्ट मी घेतो, कधी चेंडू कधी बाजा
उद्या आणू म्हणे आई, नको माझ्या रडू राजा

कुठे खेळावया जाता, कशी ही घाबरी होते
जगाची सोडूनी कामे, मला शोधावया येते

अशी ही आमुची आई, तिची माया असे फार
तुलाही देव राया रे अशी आई न मिळणार. 

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर

बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले
वृद्धपणी देवा आता दिसे पैलतीर

जन्म-मरण नको आता, नको येरझार
नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार

चराचरापार न्या हो जाहला उशीर
पांडुरंग पांडुरंग मन करा थोर.


- पं. जितेंद्र अभिषेकी

शाब्बास रावणानो !

तुमचाच काळ आहे हा खास रावणानो..
शाब्बास रावणानो..शाब्बास रावणानो !

खाऊन देश झाला.. खाणार काय आता..
सोसेल काय तुम्हा..उपवास रावणानो



कवी :- ज्ञानेश वाकुडकर

मराठी Girlfriend ची ठळक वैशिष्ट्ये....

१. जर तिची ओळख तुम्ही "माझी Girlfriend" म्हणून करून दिली तर ती रागावते.
२. चारचौघांसमोर जर तुम्ही तिला मिठी मारली तर ती "जन गण मन" गायला सुरु करते.
३. तिच्या आईला आपण "मावशी" किंवा "काकू" म्हणतो.
४. समजा जर भयंकर जोराचं वादळ सुटलं आणि विजा कडाडल्या, तर हिंदी सिनेमातल्या नायिकेप्रमाणे ती तुम्हाला कधीच मिठी मारणार नाही.
५. तुमच्याबद्दल जर तिला कोणी विचारले तर लाजेने ती लालबुंद होते.
६. ती सहसा जीन्स आणि टाइट टी शर्ट वापरत नाही पण हे मात्र गॄहीत धरून चालते की तिचं करिअर तुमच्या करिअरइतकंच महत्त्त्वाचं आहे.
७. तिला शाळेतल्या सगळ्या कविता आठवतात.
८. ती नेहमी "अमके अमके" सरांबद्दल बोलते.... आणि तुम्ही मनातल्या मनात म्हणता...." काय पकवते आहे".
९. राखी पौर्णिमेच्या दिवशी ती तुम्हाला भेटत नाही.
१०. तिचा भाऊ कधीच तुमचा मित्र नसतो.
११. घरात तुमच्या आवडीचा पदार्थ केलेला असेल तर ती आठवणीने डब्यात घेउन येते.
१२. तुमची DATING कुठल्या तरी रेस्तौरन्त मधे नसून चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या राजा किंवा सिद्धीविनायकाच्या मंदिराजवळ असते ...
राजू : अरे विजू, तुला कधि कोणी मुर्ख भेटलाय ?

विजू : मी खुप प्रयत्न केला पण आज तुला टाळू शकलो नाही.
स्थळ-सदाशिव पेठेतील हॉटेल.

गृहस्थ-मी इथले स्वच्छतागृह वापरू शकतो का?
.
व्यवस्थापक-पैसे पडतील.
.
गृहस्थ-नाही! तेवढी काळजी घेईन मी..

एक तरी मैत्रीण असावी

एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !

एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !

एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !

एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..

एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..

एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..

एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात
एका शाळेचे मुख्याध्यापक स्वत:ला खूप (अति) शहाणे समजत असत.

ते एकदा दहावी “अ”मध्ये येऊन मुलांना म्हणतात, “मी आज तुमची परीक्षा घेणार आहे. बघूया कोण हुशार आहे तुमच्यापैकी.”

बंड्याला उभं राहायला सांगून त्याला विचारतात, “मला सांग बंड्या, गाढवा, जर आपल्या शाळेसमोर बॉम्ब दिसला तर तू काय करशील?”

बंड्या : मास्तर, मी जरा वेळ वाट बघीन. कुणी उचलून नेला तर ठीक, नाही तर तो उचलून मी तुमच्या केबिनमध्ये आणून ठेवीन.

तांबे-सोन्याची नांदी

निळसर डोंगर घळीघळीतुन धूर धुक्याचा निघत असे
खेड्यामध्ये गांव पुरातन तसा वसविला मला दिसे

खडकसांधणी परी नदीचे वळण पुलातुन निघे पुढे
पारदर्शनी पाण्याखालून माशांचाही जीव रडे

हातामध्ये रिक्त कमंडलु, तहान गळ्यावर घे जोगी
गावापासुन दूर अरण्ये वणवा वणव्याच्या जागी

अग्नीशी संगनमत सोडूनिया वाराही ईकडेच फिरे
पंथ सोडुनी जशी प्रणाली एकट कवितेतून झरे

मनगट उसवी लख्ख तांबडे कडे चमकते की जळते
जळते तांबे कनकदिप्तीवर खरेच का सोने होते?

वाळुवरुनी पाय उचलिता गुडघे कोपर झांझरती
मेंदुमधुनी शिळा अहिल्या झर्रकन ये चरणावरती

इथे मेघ झरण्याच्या पुर्वी वाकुन बघतो रे खाली
पात्र नदीचे किती भयंकर किती तळाची रे खोली?

उडे कावळा चिमण्यांनीही भुर्रकन अंगण सावरले
खेड्यामधले गावामधले लोक भाबडे बावरले


कवी - ग्रेस
संता कॉलेजमधे प्रोफेस्रर म्हणुन लागला आणि सामान्य ज्ञानाचा पेपर काही अशा पध्द्तीने तयार केला. सगळे प्रश्न सोडवणे गरजेचे आहेत, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर एकच असावे.
१. चीन कुठल्या देशात आहे?
२. 15 ऑगस्ट कुठल्या तारखेला येतो.
३. टमाटरला हिंदीत काय म्हणतात
४. मुमताजच्या कबरीमध्ये कोण दफन आहे
५.हिरवा रंग कुठल्या रंगाचा असतो 

रमेशचा मुलगा गण्या एकदा परीक्षेत नापास होतो

रमेश - इतके कमी गुण ?दोन
कानाखाली मारायला पाहिजेत .

गण्या - चला पप्पा मी त्या मास्तरड्याचं
घरपण बघून ठेवलयं .

खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे


कवी - साने गुरुजी

डॉक्टर डॉक्टर ….

माझे डॉक्टर फारच चांगले आहेत
तुम्हाला वेगळा सल्ला (सेकंड ओपीनियन) हवा असला तर …
ते बाहेर जाऊन परत येतील (आणि तो सांगतील)

त्यांनी एका स्त्रीला पिवळ्या आजारासाठी तीन वर्षे उपचार केल्यानंतर त्यांना समजले ….
की ती बाई चिनी आहे

आणखी एकाला त्यांनी फक्त सहा महिने आय़ुष्य उरले असल्याचे सांगितले होते. सहा महिने झाले तेंव्हा त्याची फी मिळाली नाही ….
डॉक्टरांनी त्याला आणखी सहा महिने बहाल केले

नर्सने येऊन त्यांना सांगितले,”बाहेरचा रोगी म्हणतो आहे की त्याला गायब झाल्यासारखे वाटते आहे.” डॉक्टर म्हणाले, “त्याला सांग की मी त्याला पाहू शकत नाही.”

आणखी एका माणसाने ओरडत सांगितले,”माझ्या मुलाने फिल्म गिळून टाकली आहे” डॉक्टर म्हणाले,”ठीक आहे, तिला डेव्हलप झाल्यावर पाहू”

एका रोग्याने सांगितले,”मला काही आठवत नाही”. डॉक्टरांनी विचारले,”केंव्हापासून?”
रोग्याने विचारले,”केंव्हापासून काय?”

मी डॉक्टरांना सांगितले,”माझ्या कानात (फोनच्या) घंटेचा आवाज येतो. डॉक्टर म्हणाले,”मग तू उचलू नकोस”"

एकाने त्यांना सांगितले, “मला घंटी असल्यासारखे वाटते” त्याला डॉक्टरांनी सांगितले,”या गोळ्या खा, त्या लागू पडल्या नाहीत तर मला रिंग कर

आणखी एकाने सांगतले,”मी पत्त्याचा गठ्ठा झालो आहे” डॉक्टर म्हणाले,”तिथे बस, मी तुला नंतर डील करेन”

मी डॉक्टरांना सांगितले, “माझे तंगडे २ ठिकाणी मोडले आहे”. ते म्हणाले,”पुन्हा त्या ठिकाणी जाऊ नकोस”

चाफ्याच्या झाडा....

चाफ्याच्या झाडा....
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु:ख नाही उरलं आता मनात

फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात

चाफ्याच्या झाडा....
नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू

तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर
तुझ्याच फांद्यांवर बसून
आभाळात हिंडलोय ना

चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा....
पानात, मनात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय.... कळतंय ना....

चाफ्याच्या झाडा.... चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना

कवियत्री - पद्मा गोळे.
बाबा : झम्पू जरा तुझा मोबाईल दे रे….

झम्प्या : एक मिनिट हा बाबा स्विच ऑन करून देतो

(झम्प्या सुमडित आयटमचे फोटो उडवतो,

सर्व मुलींचे मेसेज आणि नंबर डिलीट करतो,

आलेले कॉल डिलीट करतो,

मेमरी कार्ड फॉर्मेट मारतो)….

हा बाबा हा घ्या आता…

बाबा : आभारी आहे….

काही नाही रे घड्याल बंद पडले ना…

फ़क्त टाइम बघायचा होता….

प्रेमाची भजी

बंड्या आणि त्याची गर्लफ्रेंड एकदा नदी काठावर निवांत गप्पा मारत भजी खात बसले होते.
बंड्याची गर्लफ्रेंड त्याला म्हणाली,
"तुला आठवतंय? आपण मागच्या आठवड्यात इथे आलो होतो तेव्हा काय मस्त पाऊस पडत होता...आपण अगदी चिंब भिजलो होतो. मी सारखी शिंकत होते तर तुझाच जीव कासावीस झाला होता. तुझा जाकेट तू मला घालायला दिलंस, रुमाल काढून दिलास, मेडिकल मधून व्हिक्स आणतो म्हणालास...मला खूप दाटून आलं माहितेय! किती प्रेम करतोस रे माझ्यावर?"

बंड्या काहीच न बोलता तिच्याकडे एकटक पाहत राहिला.
ती थोडीशी लाजली.
"असं एकटक का पाहतो आहेस?" तिने दाटलेल्या आवाजात विचारलं. तिचे डोळे त्याच्या डोळ्यात सामावलेलं तिच्यावरचं प्रेम शोधत होते.

बंड्या क्षणभर काहीच बोलला नाही. थोड्या वेळाने हळू आवाजात म्हणाला....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
"हावरे, किती खाशील? मला पण दे की थोडी भजी !!

फॅशन

प्रेम करुन लग्न करणं
आज जुनं झालंय
लग्नापूर्वी पोर काढ्णं
आज फॅशन झालंय

झाकण्यासाठी अंगभर कपडे घालणं
आज जुनं झालंय
कपड्यासाठी अंग उगड ठेवणं
आज फॅशन झालंय

बापापुढं पोरानं नम्र राहणं
आज जुनं झालंय
पोरासंगे बापानं बिअर पिणं
आज फॅशन झालंय

पोरीसंगे आईनं देवळात जाणं
आज जुनं झालंय
आईसंगे पोरीनं डिस्कोत जाणं
आज फॅशन झालंय

डोक्याचं सोडून कंबरेला बांधणं
आज जुनं झालंय
कंबरेच सोडुन डोक्याला बांधणं
आज फॅशन झालंय

जपप्यासाठी संस्कृती प्रयत्न करणं
आज जुनं झालंय
विरोधात संस्कृतीच्या बबाळ करणं
आज फॅशन झालंय


कवी - निलेश दत्ताराम बामणे

देता यावे...

देता यावे हसू
निरभ्र अकलंकित
निरागस तान्ह्याच्या आनंदाइतके सहज कोवळे

देता यावे हात
निर्हेतुक आश्वासक
स्वत:ला स्वत:चा आधार देण्याइतके स्वाभाविक मोकळे

देता यावे शब्द
अम्लान निःसंशय
आयुष्याच्या पायाशी जगणारे निरहंकार

देता यावे हृदय
अपार निरामय
दयाघनाच्या दारापाशी पोचवणारे निराकार


कवियत्री - अरुणा ढेरे

इतक्यातच

इतक्यातच झिमझिमून सर गेली
झुकुन उन्हे, मिटून पुन्हा वर आली

रंग नवा स्वप्नांवर चढत पुन्हा
इतक्यात आस नवी मोहरली

फूल जसे, जीव तसा उमलत ये
इतक्यातच कळ दुखरी सरलेली

खटमधुर जीवनरस टपटपतो
इतक्यातच ऒंजळ ही भरलेली

इतक्यातच गडद तुझी ही सय झाली
विस्कळल्या जगण्याला लय आली


कवियत्री - अरुणा ढेरे

यशाची गुरुकिल्ली (जुनी आणि गंजलेली)

एक वार्ताहर एका यशस्वी उद्योगपतीची मुलाखत घेत होता.
” आपल्या यशाचे रहस्य काय?”
” दोन शब्द”
” कोणते?”
” चांगले निर्णय”
“ते कसे घेतलेत ?”
” एक शब्द”
” कोणता?”
” अनुभव”
” तो कसा मिळाला?”
” दोन शब्द”
“कोणते ?”
” चुकीचे निर्णय” 

जाणीव

अशी जाणीव झाली की
डोळे वळतात आत;
आतला सगळा गोंधळ पाहून
होतात अचंबित.
अहंची रानटी रोपटी,
बिनओळखीची पाळंमुळं,
झणाणणार्‍या वीणाबिणा,
एकदोन पक्षी आभाळखुळे.

— पण खुज्या खुज्या सृष्टीतसुद्‍धा
समुद्र केव्हा वादळतात;
काळेकुट्ट ढग येतात;
वादळवारे झंजाट सुटून
ढग असे बरसतात –
असे… असे बरसतात की
खुजेपणा निघतो धुवून
क्षणभर पडतं लख्ख ऊन !

– त्या क्षणाच्या आठवणींवर
खुजा जीव जगू पहातो;
क्षणभर थोड उंच होऊन
पाऊल थोडं पुढं टाकतो !




कवियत्री - पद्मा गोळे

नजर हटी दुर्घटना घटी

एका मुलीच्या टी-शर्ट वरचा मेसेज .
..
..
..
..
.. ..
..
तुम्ही आता रस्ता सोडून भलतीकडेच
पाहत आहात
अपघात होण्याचा संभव
आहे...
काळजी घ्या.