कुणीतरी असलं पाहिजे…

कुणीतरी असलं पाहिजे…
संध्याकाळी घरी गेल्यावर
आपल्यासाठी दार उघडायला..
सकाळी घरातून बाहेर पडताना
“लवकर ये” असं सांगायला…

मीटिंग मधून बाहेर आल्यावर
“back” असा मेसेज टाकायला…
“कंटाळा आलाय” हे कंटाळवाणं वाक्य
कंटाळा येईपर्यंत सांगायला…

इच्छित स्थळी पोचल्यावर
“सुखरूप पोचले” चा फोन करायला….
ट्रेक साठी जाताना “फार भिजू
नकोस”
असं बजावायला…

उशीर होत असेल, तर
“जेवून घ्या” असं सांगायला…
कितीही वेळा सांगितलं तरीही
आपल्यासाठी जेवायचं
थांबायला…

घरी आल्यावर आज काल झालं
ते सगळं सगळं सांगायला…
कटकटींचं मळभ हटवून
मन स्वच्छ करायला…
एका महानगरात
नौकरी गमावलेला एक तरुण
सिटीबस मधून उतरतो,
तेव्हा त्याच्या लक्षात येते
की त्याचे पाकीट चोराने
लांबवले. तो तरुण बुचकळ्यात पडतो.
कारण
त्याची नौकरी गेलेली असते
आणि खिशात फक्त १५० रुपये
आणि त्याने
त्याच्या आईला लिहून ठेवलेले एक पत्र असते.
ज्यात त्याने लिहिलेले असते
की ,"माझी नौकरी मी गमावून
बसलो आणि तुला आता काही दिवस
पैसे पाठवू शकत नाही."
तीन दिवसापासून ते पत्र त्याच्या खिशात असते. पोस्ट
करू
की नाही ह्या मनस्थितीतच
त्याचे १५० रुपये आणि ते पत्र
चोरी होते.
१५० रुपये काही फार मोठी रक्कम नाही, पण
त्या तरुणासाठी ते १५००
रुपयापेक्षा कमी नव्हते.
काही दिवसांनी त्याच्या आईचे
पत्र त्याला मिळाले. तो तरुण
आपल्या आईचे पत्र वाचून आश्चर्यचकित होतो.
त्याची आई ने पत्रात लिहिले
असते - "बाळ, तु पाठवलेले ५००
रुपयांचे मनीऑर्डर
मला मिळाले. काळजी घे
स्वतःची." तो तरुण जाम बुचकळ्यात पडतो.
त्याला प्रश्न पडतो,
कोणी ५०० ची मनीऑर्डर
केली असेल. काही दिवसांनी परत
त्याला एक पत्र येते,
तोडक्या मोडक्या अक्षरात
लिहिलेले, वाचण्यास अवघड पण
३ ते ४ ओळीचे -
“प्रिय भाई, 150 रुपए तुम्हारे.. और 350 रुपए
अपनी ओर से मिलाकर
मैंने तुम्हारी माँ को..
मनीआर्डर.. भेज दिया है..।
फिकर.. न करना।
माँ तो सबकी.. एक- जैसी ही होती है न..!
वह क्यों भूखी रहे...?

तुम्हारा
— जेबकतरा भाई..!!!!!...

हवंय

एक रिकामा कान हवाय, बरंच काही भरवायला
कुजबुजनारं मन हवंय, सारं काही ठरवायला

एक उशाशी पान हवंय, रात्री साऱ्या झुरवायला
अश्वासारखी जान हवीय, दिवस माझा मिरवायला

एक असा दिलदार हवाय, दिल सारं जिरवायला
चिपचिप सारी माती हवीय, घर माझं सारवायला

एक हिरवं रान हवंय, वाऱ्यावरती डोलवायला
झुळझुळणारं पाणी त्याला, भरभरून जगवायला

सळसळनारा बाण हवाय, राहिलं सारं भेदायला
एक निधडी छाती हवीय, सारं काही झेलायला

गोष्ट तीन आण्यांची.....

आठवडि बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून घराकडे निघाली होती. आया-बाया चपला फरफटत पाय उचलत होत्य. धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती.
म्हातारी बाय पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली. शेवकांडाच्या लाडवांची पुरचुंडी आणि प्लास्टिकच्या पिशवीतल खाजं तिन आवदारपणे चुंबळीच्या पदराखाली सरकवलं. तेवढ्या गडबडीतसुद्धा खाज्याच्या गुळात घातलेल्या आल्याचा दरवळ तिच्या नाकापर्यंत पोहोचला. बाय एस्‌.टी.च्या खांबाशी पोहोचते, तो एस्‌.टी.निघून गेली होती. बांगडीवाल्या मुल्लांन तिला हटकलंच, `म्हातारे, आज उशीरसा?' माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं बारक्यासाठी शेवंतूसाठि खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं सांगावं, असं तिला पण वाटत होतं. पण दाढीचे केस पांढरे फेक झालेला मुल्ला तिला `म्हातारे' म्हणाला होता. बायला भारीच राग आला. कुणी `म्हातारे' म्हटलेलं तिच्या मुळीच कामी यायचं नाही.
म्हातारी काय म्हणून? अजून डोक्यावर पाटी घेऊन ४-४ मैल चालत होत अन्‌ डोळ्याला दिसत होतं. ती स्वभावाप्रमानं काहीतरी फटकून बोलणार होती, पण समोरुन मोटार येताना दिसली. बायनं चकटनं विचार केला, एस्‌.टी.ला दोन आणे पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ. पण अंधारायच्या आतं घरी तर पोहोचू!
बायनं आपला काळा फाटकोळा हात झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदारगडी वाटला. तो बायकडं बघून हसला. `काय पायजे आजी?' त्यानं विचारलं. बायला त्यातला त्यात बर वाटलं. म्हणाली, `माका सत्तर मैलार जांवचा आसा. सोडशील रे? यष्टी चुकली बग!'
ड्रॉयव्हर खाली उतरला. म्हातारीची पाटी डिकीत टाकलि आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितलं. बाय हरकली. चक्क पुढं बसून जायचं? आणि गाडीत कोणी पॅसेंजर्च नाही. पण तिला हळहळपण वाटली. बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही. ती म्हणाली,`ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता. मियां तुका तीन आणे देतयं. चलात?'
`आजे' `बाय म्हणतत माका' ती टेचात उत्तरली. ड्रॉयव्हर हसत म्हणाला,`बाय, तुला परवडतील ते दे. तू मला मायसारखी~' बायचा जीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच हक्कानं ऐसपैस बसली. गाडी सुरु झाली.
बांगडीवाला मुल्ला तोंडवासून आश्चर्यानं पाहत होत. गाडी हलली तसा तो ओरडलाच, `अगे म्हातारे -' पण बायला आता त्याच्याकडे बघायला सवड कुठं होती?
मऊ गादीवर बायला फार सुख वाटलं, एस्‌.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही. गाडी कशी भन्नाट निघाली होती. बायनं मनातल्या मनात ड्रॉयव्हरला मार्क देऊन टाकले. दिवसभराच्या उन्हान, धुळीनं ती थकली होती. आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली. `बाय, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघं. इथंच उतरायच ना? `बाय खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून ड्रॉयव्हरच्या हातावर ठेवले. तेवढ्यात त्यान डिकीतून तिची पाटी काढून दिली. म्हाताऱ्या बायला काय वाटलं कोण जाणे. तिनं अलवार हातानं पुडी उलगडली. त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला. ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली, `खा माझ्या पुता! ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं आणि म्हातारीकडं डोखं भरुन पाहिलं गाडी निघाली तसा बाजूला उभा असलेला माणूस म्हणाला, `कुणाच्या गाडीतून इलंय?' `टुरिंग गाडीतनं.' बायच बोलणं ऐकून तो माणूस आणखीच बुचकळ्यात पडला. तशी बाय खणखणीत आवाजात म्हणाली `तीन आणे मोजून दिलंय त्येका,' `त्यांनी ते घेतलं? अग म्हातारेम तुझं डोकं फिरलं काय? टुरिंग कार नव्हती ती. आपल्या राजांची गाडी. याआपल्या सावंतवाडिच्या महाराजांच्या शेजारी बसून आलीस तू!' दुसऱ्यानं माहिती पुरवली. `अरे माझ्या सोमेश्वरा, खळनाथा' म्हणत म्हातारी भुईला टेकली. गाडी गेली त्या दिशेनं तिन भक्तिभावानं हात जोडले. आपल्याला `माय' म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू खाणाऱ्या, त्या लोकराजाच्या आठवणीनं, तिच अंतःकरण भरुन आलं.
मोहरली काया तुझ्या स्पर्शाने
गुलाबी झाले गाल हर्षाने
मज या घडी साठवू दे मनात
वीज संचारली जशी तनात

पालवी फुटावी तशी
तुझ्यात मी संचारते
तुझ्याच सहवासात
माझ्यावरच बहरते

क्षणाक्षणात या मी बेदुन्धीत वाहते
बंद नयनांनी हि तुला पाहते
रोमांचित तुझ्या ओठांनी माझी काया
उतू जाऊ दे आज मजवरची तुझी माया

आपल्या या मिलनाला
कशाचीही तोड नसावी
तुझ्या हृदयापासून
तनात हि फक्त मीच भिनावी

नको रे जाऊ असा
सोडून इतक्यात मला
थांब अजून हि पूर्तता
नाही आली आपल्या या मिलनाला

कधी कधी वाटत असेल

कधी कधी नभालाही वाटत असेल
घ्यावे धरतीला मिठीत
कधी कधी ढगानाही वाटत असेल
शिरावे ह्या दरीच्या कुशीत

कधी कधी शिखरालाही वाटत असेल
खोल खोल दरीत उतरावे
अन कधी कधी दरीलाही वाटत असेल
उंचावरून जग पहावे

कधी कधी पावसालाही वाटत असेल
ओलेचिंब भिजावे
अन कधी कधी थंडीलाही वाटत असेल
उबदार गोधडीत शिरावे

कधी कधी उन्हालाही वाटत असेल
सर्वस्व सावलीला द्याव
अन सावल्यांनाही वाटत असेल
सोनसळी उन्हात नहाव ..

कधी कधी शब्दानांही वाटत असेल
कवितेला सजवावे
कधी कधी कवितेलाही वाटत असेल
शब्दांचेच होऊन जावे ...

अस नात आपल हव.....

नसावे नाव,कोणते ते गाव,
ना तुला ठाव,ना मला ठाव.
पण अश्याच, नाव नसलेल्या गावी,
मन का हुन्दडत राही?
दोनच मन,त्यात दोघेच जन,
मग कशाला त्यात आणखी कोणी हव?
अस नात आपल हव,
अस नात आपल हव....

जरी दोन काया,पण एकाच माया,
दोघानशिवाय नको तीसर कोणी पहाया,
एकच रस्ता आणि तेवडेच अंतर,
एकत्र चालताना नकोच संपाया नंतर,
नको अडथळे ,आणि जर ठेचालाळच तर,
एकाच्या जखामेची दुसऱ्याच्या यावी कळ,
अस नात आपल हव,
अस नात आपल हव.....

दोघांच्या डोळ्यानी एकच जग पहाव सुंदर,
डोक्यावरही दोघांच्या एकच अंबर,
एकाच दुःख दुसऱ्याच्या डोळ्यातील दंव,
मनातील एकाचे दुसऱ्याला न सांगता समजाव,
पापण्यांच्या सावलीत एक-मेकास जपाव,
कोणी एकास शोधत आले,तर दुसऱ्याच्या डोळ्यात सापडाव,
अस नात आपल हव,
अस नात आपल हव.....

मनात एकमेकांच्या कळीगत उमलाव,
मग नजरेत गुलमोहरागत फुलाव,
प्रेमाचा गंध हवेत पारिजाताकागत पसराव,
मिठीत एकमेकाच्या लाजाळूगत लपाव,
आणि एकदा एकमेकात हरवल्यावर,
कोणालाच न सापडाव,
अस नात आपल हव,
अस नात आपल हव.....

कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

हसता हसता डोळे अलगद भरुनही येतील
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता-जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवती भोवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
स्रुष्टीमध्ये दोनच जीव आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

मोबाईल वाजण्याआधीच तो वाजल्य़ासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुनं बिबरुनं जाण्यासारखं काही नाही
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही......

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला सांभाळावे थोडे
सांगुन द्याव काळजीसारख बिलकुल काही नाही

प्रेम पहाव करून

एक दृष्टिक्षेप टाकुन गेला तो निघून
पण ती नजर ह्रुदयात बसली रुतून
तेव्हा वाटल..
प्रेम पहाव करून...

करत होते कविता पण शब्दच गेले विसरून
मैफिलीत माझ्या सुर गेले दुरून
तेव्हा वाटल...
प्रेम पहाव करून

एकांत हवा म्हणुन बसले दूर जाउन
डोळ्यासमोर तोच दिसला राहून राहून
तेव्हा वाटल...
प्रेम पहाव करून...

त्याच्या विचारान टाकल मला घेरून
आठवणीन डोळ्यात पाणी आल दाटून
तेव्हा वाटल...
प्रेम पहाव करून
खरच एकदा तरी प्रेम पहाव करून...

बायको आणि परीक्षा

बायको आणि परीक्षा यांच्यात साम्य काय...???
.
.
.
.
.
.
.
१.खूप प्रश्न...!!!
२.समजायला कठीण...!!!
३.प्रत्येक प्रश्नांवर तपशीलवार स्पष्टीकरण आवश्यक...!!!
.
.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे
.
.
.
४.निकाल नेहमीच अनपेक्षित असतो...!!!

आई-बाप; आई-बाप म्हणजे नक्की काय असतं?

आई-बाप; आई-बाप, म्हणजे नक्की काय असतं?
आयुष्य जगण्यासाठी; देवाने दिलेलं, अॅडव्हान्स पाठबळ असतं
तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं
तुमच्या जन्मापासून; त्यांच्या मरणापर्यंत,त्यांनी आपल आयुष्य खर्चलेल असतं
आई; तुमच्या आयुष्याच्या, गाडीच; योग्य दिशा देणार स्टीअरींग असतं
अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे “अर्जंट ब्रेक” चा पर्याय असतं
आईच प्रेम हे; रोजच्या आयुष्यात, कामाला येणार बँक बॅलन्स असतं
बाप म्हणजे; गरजेच्या वेळी मिळणारा, तुमचा बोनस किंवा वेरीएबल पेमेंट असतं
आई म्हणजे; तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलच नेटवर्क असतं
कधी नेटवर्क थकले; तर बाप, अर्जंट “एस.एम.एस” असतं
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, “अँटी व्हायरस " असतं
शोधून काढलेले व्हायरस संपवायचं, बाप हे"क्वारनटाईन" बटण असतं
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातलं, शिक्षणाचं विद्यापीठ असते
बाप म्हणजे चालती बोलती, अनुभवाची फॅकटरी असते
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातली, साठवलेली पुण्याई असते
बाप म्हणजे कर्म करून, आयुष्यभर मिळवलेली कमाई असते
आई म्हणजे तुमच्या आयुष्यातला, मार्गदर्शक गुरु असतो
दाखवलेल्या वाटेवर, बाप हा जवळचा मित्र असतो
आई म्हणजे साक्षात, भगवंत; परमेश्वर असतो
त्या परमेश्वरापर्यंत , पोचवणारा बाप एक संत असतो
आई म्हणजे; तुमचे शरीर, मेंदू; हृदय; अन् मन असतं
बाप म्हणजे; भक्कम ठेवणारा, पाठीचा कणा आणि शरीरातलं हाड अन् हाड असतं
कधीही वेदना झाली कि, तोंडात वाक्य "आई गं SSS” असतं
आणि भले मोठे संकट आले, कि उच्चारात "बाप रे बाप" असतं
परमेश्वर समोर आला तरी, उभे राहायला वीट फेकलेल; पुंडलिकाच मन असतं
त्याच्या आई-बापाच्या रुपात, विठ्ठलाने; स्वत:लाच तिथे पाहिलेलं असतं
म्हणूनच म्हणतो, परमेश्वर; अध्यात्म; भगवंत हे सगळ, अजब गणित असतं
त्या सगळ्यापर्यंत पोचवणारं, आई-बाप हे कनेक्शन असतं
आई-बाप म्हणजे नकळत मागे असलेली, मायेची सावली असतं
उगाच नाही ते; आपल्या संस्कृतीत, "मातृ देवो भव- पितृ देवो भव" म्हणलेलं असतं

ती फ़क्त आईच..!

सकाळी दोन धपाटे घालुन उठवते..ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते.. ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते.. ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते..ती आई
पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते.. ती आई
परतीची आतुरतेने वाट बघत असते..ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते.. ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य
अपूर्ण..
ती फ़क्त आईच..! ती फ़क्त आईच.

... म्हणजे प्रेम!

कितीही जवळ जाणार असेल तरी गाडी सावकाश चालव आणि पोहचल्यावर फोन कर असे आईचे काळजीचे बोल म्हणजे प्रेम.

दिवाळीला स्वतःसाठी साधे कपडेही न घेता मुला-मुलीसाठी त्यांच्या पसंतीचे महागातले जीन्स आणि कपडे घेणारे बाबा म्हणजे प्रेम.

कितीही मस्ती केली व रात्री लेट झाले तरी आई-बाबाना न सांगता हळूच दार उघडणारे आजी-आजोबा म्हणजे प्रेम.

कितीही वाद झाले तरी दादा जेवलास का असे विचाणारी बहिण म्हणजे प्रेम.

पगार कितीही कमी असला तरी दिवाळी भाऊबीजेला बहिणीच्या पसंतीचे घड्याळ घेणारा भाऊ म्हणजे प्रेम.

आणि या सर्वांची काळजी घेवून स्वतःची काळजी न करता सकाळी पहाटे उठून जेवणाचा डबा बनवणारी बायको ... म्हणजे प्रेम!

गर्लफ्रेण्ड किंवा बॉयफ्रेण्ड नसण्याचे फायदे

1. एकूण आयुष्यात खूप वेळ वाचतो.

२. झोप चांगली लागते.

३. मिस्ड कॉल्सची फिकीर बाळगावी लागत नाही.

४.आपण कसे दिसतोय, यावर फालतू वेळ खर्च होत नाही.

५. मध्यरात्री,उत्तर-मध्यरात्री, भल्या पहाटे वगैरे भलत्याच वेळांना एसेमेसवाजत
नाहीत आणित्यांना तात्काळ उत्तर देण्याचं बंधन तर मुळीच नसतं.

६.महिन्यातून 100दा मोबाइल रिचार्ज करण्याची गरज पडत नाही.

७.मुलगा कितीही मुलींशी आणि मुलगी कितीही मुलांशी बोलू शकते.

८.कुठेही कुणाहीबरोबर जाता येतं.

नशाबंदी

एक चित्ता सिगरेट पिणारच असतो, तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला म्हणतो ........

"मित्रा चित्त्या , माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,

चित्ता थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो........
... ...
पुढे हत्ती दृग्स घेत बसलेला असतो, त्याला सुद्धा पाहून उंदीर म्हणतो,

"मित्रा हत्ती, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,

हत्ती सुद्धा थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो........

थोडं पुढे गेल्यावर एक सिंह विस्की चा पेग भरत असतो............

त्यला हि पाहून न घाबरता उंदीर त्याला म्हणतो......

"मित्रा सिंहा, माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चाल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,

सिंह त्याचा ग्लास बाजूला ठेवतो आणि उंदराच्या कानाखाली ७ ८ वेळा जाळ काढतो........

हे पाहून हत्ती सिंहाला म्हणतो "अरे सिंहा उंदीर चांगले सांगतो, का मारतोस त्याला"

सिंह म्हणतो "ह्याच्या सोबत ४ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय. हा हरामखोर जेव्हा भंग पितो तेव्हा असाच बोलतो.
एकदा माझ्या गर्लफ्रेंड ने मला तिच्या घरी बोलावले,
मि तिच्या घरी गेलो आणि बेल वाजवली..
तिच्या छोट्या बहिणीने दर उघडले, ति पण खूप सुंदर होती.
ति हसून बोलली"तुम्ही खूप स्मार्ट आहात, आत्ता घरी तर कोणीच नाही.
मि एकटीच आहे, आत या ना."
मि हसलो आणि माझ्या बाईक कडे परत निघालो..तेव्हा तिचा पूर्ण परिवार बाहेर आला
अन् ते माझ्या चांगले पणावर खुश झाले अन् म्हणाले..आम्हाला तु पसंद आहे. . . . . . ..
आता मी काय सांगू त्यांना, की, मी माझी बाईक लॉक करायला चाललो होतो म्हणून...

मास्टर की

एक पोरगी झंप्याला बोलली
मला एक सांग

एखादी पोरगी चार मुलांबरोबर फिरली तर लोकं
तिला चालू समजतात ..बिघडलेली समजतात

पण तेच जर का एखाद्या मुलाने चार मुली फिरवल्या तर
त्या मुलाला सर्वे जण हीरो समजतात..

असं का ?

झंप्या शांतपणे उत्तरला...
जर एखादे कुलप वेगवेगळ्या चाव्यांनी उघडल तर ते कुलप
बिघडलय असे समजतात......

पण

जर का एखादी चावी अनेक कुलपं उघडत असेल तर
त्या चावीला 'MASTER KEY'म्हणतात....

टेलिफोन बिल

८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता,
.
.
मी माझ्या ऑफिसचा फोन वापरतो मग एवढं बिल कस?
... ..
.
बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते.
.
.
मी कशाला घराचा फोन वापरू.
.
.
मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय.
.
.
मी कशाला घराचा फोन वापरू.
.
.
कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो,
मग एवढं बिल कस? ??

सचिन आरती

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता आनंदाची !
अविस्मरणीय खेळी तुझी शतकाची !
सर्वांगी सुंदर उधळण चौकारांची !
आकाशी झळके माळ उत्तुंग षटकाराची !
जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव ..

फलंदाजीला तू खेळपट्टी वरी उभा !
सर्व गोलंदाजांची दिसे दिव्य शोभा !
मदतीला कोहली-रैना आले गा !
धावांचा डोंगर उभा राहिला बघा !
जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव ..

दुमदुमले मैदान झाला जल्लोष !
थरथरला गोलंदाज मानिला खेद !
कडाडली बॅट चेन्डुचा शिरच्छेद !
असामान्य अद्भुत शक्तिचा शोध !
जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव..

घालीन लोटांगण वन्दिन चरणं !
डोळ्याने पाहिले शतक तुझे !
पोस्टर लावूनि, आनंदे पुजिन !
भावे ओवाळीन, "सचिन" नामा !

त्वमेव ब्रॅडमन, बॉर्डर त्वमेव !
त्वमेव गावसकर, लारा त्वमेव !
त्वमेव फलंदाज, गोलंदाज त्वमेव !
त्वमेव क्षेत्ररक्षक, ऑलराउन्डर त्वमेव !

गुड लेन्थ टाकले, यॉर्कर टाकले !
बाउन्सर टाकले , व्यर्थ सारे !
ड्राइव्स तू मारले, पुल तू मारले !
फ्लिक्स तू मारले, सार्थ सारे !

हरे सचिन, हरे सचिन, सचिन सचिन हरे हरे
हरे तेंडुलकर, हरे तेंडुलकर, तेंडुलकर हरे हरे !!
म्हातारा मच्छर:- आमच्या काळात तरुण मुलीच रक्त
पिणे हे खुप कठीन होते.
त्याचा नातु:- का बरे......?????? ??
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
.
.
मच्छर:- कारण त्या वेळीस तरुणी पुर्ण कपडे घालायचे
ना........
बंता : तू आरशासमोर बसून का अभ्यास करतोयस
संता: याचे तीन फायदे आहेत
.
.
.
... .
.
.
.
.
१ -सोबतच रिव्हिजन होऊन जाते
२- आपल्यावर नजर राहते..
३- आपल्याला अभ्यास करायला एक जन सोबती मिळतो

अनावधानाने घडणाऱ्या काही चुका आणि त्यातून होणारे विनोद.......

१) तुळशीबागेत एका दुकानाबाहेर लावलेला बोर्ड : "परकर" बदलण्याची वेळ दुपारी ३ ते ५.
२) रिक्षेमागे लिहिलेलं वाक्य : चिंटू, सोन्या, चिंगी, मन्या --- कॉसमॉस बँकेच्या सौजन्याने.
३) पवित्र रिश्ता मालिकेतली एक कलाकार एकदा घरातून निघताना त्याच्या आईला म्हणते, " दिवस कसे गेले समजलंच नाही हो..!!

मिश्यावाली बायको

एक प्रवासी बसमधून प्रवास
करताना समोरच्या प्रवाशाकडे बघून हसला.
समोरच्या प्रवाशाने हसण्याचे कारण विचारताच
पहिल्या प्रवाशाने सांगितले की, ‘‘एक
मिशा सोडल्या तर तू
अगदी माझ्या बायकोसारखा दिसतोस.’’

त्यावर दुसरा प्रवासी चिडून म्हणाला,
‘‘पण मला मिशा नाहीयेत.’’
त्यावर
पहिला प्रवासी हसून म्हणाला, ‘‘पण
माझ्या बायकोला आहेत ना.’’

खतरनाक पीजे

असा कोणता तारा आहे जो जमिनीवर राहतो.....?
.
.
.
... .
.
.
.
.
.
.
.
म्हातारा....
एकदा एक शहरातील मुलगी शिक्षिका होते .आणि तिची पोस्टिंग
खेडागाव मधील मराठी शाळे मध्ये होते .शाळेमध्ये पहिल्या दिवशी
ती विद्यार्थ्यांना आपली ओळख करून देते. मी आज पासून तुमची
नवीन शिक्षिका आहे,मी तुम्हाला मराठी हा विषय
शिकवणार आहे . वगेरे वगेरे .स्वतःची ओळख
करून दिल्या वर ती शिक्षिका मुलांना उभे
राहून स्वतःचे नाव सांगा असे सांगते .मग
एक मुलगा उभा राहतो आणि सांगतो की बाई
माजे नाव पांडू आहे .बाई लगेच म्हणतात अरे
स्वतःचे नाव " पांडू" असे नाही सांगायचे,
"पांडुरंग" असे सांगायचे .मग तो मुलगा बाई
ला सांगतो की बाई मला सगळेच "पांडू"
म्हणून हाक मारतात. तर बाई लगेच
सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतात की, "
मुलानो आज पासून पांडू ला पांडुरंग
या नावाने हाक मारायची ".सगळी मुले
एका सुरात, "हो बाई" असे म्हणतात .मग
बाई पांडुरंग ला खाली बसवतात
आणि दुसऱ्या मुलाला विचारतात तुजे नाव
काय? .तो मुलगा "बाई माजे नाव बंडूरंग
आहे ".

एका स्त्रीचा स्वर्ग

बाळ माझं बघ कसं.....दुधासाठी रडतंय,
बोबड्या त्याचा शब्दात....माझ्यासाठी हंबरडा फोडतंय,

दारातली तुळस बघ माझ्या....कशी माझ्याविन सुकलीय,
तिला पाणी नाही घातलं....तिची फांदिही झुकलीय,

लेक माझी बघ....दारात माझी वाट बघत बसलीय,
गुणाची आहे रे पोर माझी....दारात एकटीच रुसलीय.

बछडा माझा......आता शाळेतून येईल,
"आई कुठे गेली??"..विचारत....घर डोक्यावर घेईल...

नवरा माझा भोळा आता दमून भागून येणार,
दमला असेल रे तो.....त्याला पाणी कोण देणार?

गाय माझी बघ कशी....गोठ्यात चाऱ्याविन उभी,
माज्यावीन ती चारा खात नाही रे कधी....

संसार माझा मी थोडा सावरून....आवरून येते,
भेटणार नाहीत पुन्हा....माझ्या लेकरांचा मुका घेऊन येते.
नवऱ्याचे माझ्या....माझ्यावर खुप खूप प्रेम रे....
माझंही त्याच्यावरचे प्रेम त्यांना सांगून येते.....

सोड रे देवा मला ....थोडा वेळ जाउ दे,
कांदाभाकर माझ्या माणसांसोबत खाऊ दे,
तुझा स्वर्ग नको......मला माझ्या स्वर्गात राहू दे.

चिउताई

गरीब,मध्यमवर्गीय आणि श्रीमंत

गरीब माणुस दारु पितो,

मध्यमवर्गीय मद्यपान करतो,
तर

श्रीमंत लोक ड्रिंक्स घेतात!



काम केल्यावर गरीब माणसाला मजुरी मिळते,

काम केल्यावर मध्यमवर्गीय गृहस्थाला पगार मिळतो,
तर

काम केल्यावर ऑफिसर लोकांना सॅलरी मिळते!



गरीब माणुस करतो ते लफडं,

मध्यमवर्गीय माणुस करतो ते प्रेम,
तर

श्रीमंत व्यक्ती करतात ते अफेअर!

"ड्राय डे" ,"पुतळे" व "आचारसंहिता"

विद्यार्थी : सर ड्राय डे म्हणजे काय?

मास्तर : कोरडे दिवस.

विद्यार्थी : विस्कटून विस्कटून सांगा सर.

मास्तर : या दिवशी दारूची दुकाने बंद असतात.

विद्यार्थी : का सर?

मास्तर : अरे आपल्याला महापुरुषांची आठवण व्हावी असा शासनाचा यामागचा उद्देश आहे.

विद्यार्थी : मग सर एकतीस डिसेंबरला विशेष परवाने देऊन सरकार उत्तेजन का देतं?

मास्तर : लोकांनी नव्या वर्षाचं आनंदाने स्वागत करावं म्हणून.

विद्यार्थी : म्हणजे आनंदासाठी पिण्यास हरकत नाही असंच ना?

मास्तर : हो तसंच.

विद्यार्थी : मग सर, स्वातंत्र्य दिनी, प्रजासत्ताक दिनी जनतेला दु:ख होत असतं का?

मास्तर : ...........

विद्यार्थी : दु:खामुळे ड्राय डे असतो का?

मास्तर : ...........

विद्यार्थी : बोला ना सर.

मास्तर : हा तुझा विषय नाही. तू पीत नाहीस ना? मग गप्प बस.

विद्यार्थी : पण सर, तीस जानेवारीला दु:खामुळे तर दोन ऑक्टोबरला आनंदामुळे ड्राय डे, असं असतं का?

मास्तर : तसं नाही बाबा. थोर पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीला त्यांची आठवण राहावी म्हणून ड्राय डे असतो.

विद्यार्थी : सर, ड्राय डेच्या दिवशी महापुरुषांची आठवण येते हे भन्नाट आहे. पण अगोदर सवय लागली पाहिजे. ना?

मास्तर : तोच तर सरकारचा उद्देश आहे.

विद्यार्थी : म्हणजे... जाणून बुजून शासनाने लोकांना दारूबाज केले.

ड्राय डेमुळे तर कळले, महात्मा गांधी आज गेले.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

पुतळे

विद्यार्थी : सर देव जळी-स्थळी-पाषाणी आहे ना?

मास्तर : हो.

विद्यार्थी : मग सर दारूची दुकानं मंदिरापासून पंचाहत्तर मीटर दूर का ठेवतात?

विद्यार्थी : देवाला पंचाहत्तर मीटर पलीकडचं दिसत नाही का?

मास्तर : तसं नाही रे बाळा. मंदिराचं पावित्र्य जपलं पाहिजे.

विद्यार्थी : पण काही देवांना दारूचा नैवेद्य लागतो.

मास्तर : तुझं सामान्य ज्ञान बरंच बरं दिसतंय.

विद्यार्थी : देवाचं सोडा, पण राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यासमोरही वाईन शॉपला बंदी आहे.

मास्तर : हो. बरोबरच आहे ते.

विद्यार्थी : पण सर एखादा राष्ट्रपुरुष पिणारा असेल तर?

विद्यार्थी : सांगा ना सर, वाईन शॉप बंद केल्यास त्या पुतळ्यास काय वाटेल?

मास्तर : राष्ट्रपुरुष तसे नसतात रे.

विद्यार्थी : सर, आजकालचे बहुतेक आमदार-खासदार तर घेणारेच आहेत. ह्यांच्यापैकीच काहीजण उद्याचे राष्ट्रपुरुष असणार. त्यांचे पुतळे होणार. समोर वाईन शॉप नसेल तर त्या पुतळ्यांना काय वाटेल सर?

विद्यार्थी : बोला ना सर...

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

आचारसंहिता

विद्यार्थी : सर आचारसंहिता म्हंजी काय?

मास्तर : अरे, निवडणुकीत पाळायचा आचार-विचार.

विद्यार्थी : तसं नाही, विस्कटून विस्कटून सांगा.

मास्तर : अरे बाबा, मतदारांना उमेदवाराने किंवा पक्षाने प्रलोभने दाखवू नयेत यासाठी काही नियम केलेले असतात.

विद्यार्थी : पण सर, पुतळ्यांना-फोटोंना का झाकलं जातं?

मास्तर : गांधी, नेहरू, फुले, आंबेडकर यांच्या चित्रांचा वापर करू नये म्हणून.

विद्यार्थी : पण सर, मतदानाच्या ठिकाणी महापुरुषांची चित्रंसुद्धा झाकली जातात.

मास्तर : हो, त्यांचा परिणाम होऊ नये म्हणून.

विद्यार्थी : सर, महापुरुषांचा वाईट परिणाम होतो?

विद्यार्थी : बोला ना सर, महापुरुष का झाकतात?

विद्यार्थी : सर हत्ती झाकले, कमळ झाकलं, पण हाताचं काय करणार?

विद्यार्थी : सर एक आयडिया. उमेदवाराला सत्यनारायण घालायला सांगा. मतदार आपोआप घरी येतील.

मास्तर : हुशार आहेस!

विद्यार्थी : आणखी एक आयडिया सर...

मास्तर : बोल बाळा.

विद्यार्थी : मतदाराने स्वत:चेच तळहात पाहिले तर त्याचा त्याच्या मनावर परिणाम होईल आणि तो काँग्रेसला मत देईल. त्यामुळे प्रत्येक मतदाराला हातमोजे दिले तर?..

ह्या पोराला 'वाह्यात म्हणावं की विचारवंत' हे गुरुजींना कळेना. तरी नवीन शैक्षणिक धोरणानुसार उत्तर देणं भाग होतं. 'मतदारांना हातमोजे वाटण्याची विनंती आयुक्तांना करू', असं पुटपुटत गुरुजींनी चष्म्याची काच पुसली. पुटपुटत पुटपुटत आपण वाईन शॉपजवळ कधी आलो, ते त्यांचं त्यांना कळलंच नाही.

ड्राय डेमुळेच 'पूर्वनियोजित साठा' करण्याची सवय महाराष्ट्रात वाढू लागली होती. गुरुजींनाही रात्री 'टीचर्स'ची संगत जडली होती. सहाव्या वेतनामुळे मुलेही गुरुजींना गुरुजी न म्हणता 'सर' म्हणू लागली होती. सहाव्या वेतनाचा मान राखण्यासाठीच गुरुजींनी 'देशी'पण सोडलं होतं. ते दिवसाचे 'सर' आणि रात्री 'टीचर्स'झाले होते.

प्रजासत्ताक दिनाच्या आनंदासाठी एक, तीस जानेवारीच्या पुण्यतिथीच्या दु:खासाठी एक आणि निवडणुकीच्या गोंधळासाठी एक असा पूर्वनियोजित साठा घेऊन गुरुजी घराकडे वळले.

खर प्रेम

तीन प्रकारची माणसं गप्पा मारत असतात...

आशियायी माणुस :- आमच्या इथे बायको पण असते आणि गर्लफ्रेण्ठ पण असते. पण आम्ही बायकोवरच जास्त प्रेम करतो..

अमेरिकन माणुस :- आमच्या इकडे आम्हाला बायको पण असते आणि गर्लफ्रेण्ड पण असते
पण आम्ही गर्लफ्रेण्डवरच जास्त प्रेम करतो...

अरेबीयन माणुस :- आम्हाला तर 10-15बायका अन् 5-10 गर्लफ्रेण्ड असतात पण एवढे असुनदेखील आम्ही उंटावरच जास्त प्रेम करतो.

हरवलेल्या संवेदना...

पैसा खुळखुळतोय, पण माणुसकी हरवत चालली आहे. वाटेल तशी वाहने धावत आहेत
आणि अपघात वाढत आहेत; पण जखमींना मदत करण्याची प्रवृत्ती संपत चालली आहे.
समृद्धी येऊनही आपल्या संवेदना, भावना जणू गोठल्या आहेत. कधी जागं होणार
आपल्यातलं "माणूसपण'?

"जखमी तरुणाला लोटले मृत्यूच्या खाईत' ही बातमी वाचली आणि मन सुन्न झाले.
मनात विचार आला, 23 वर्षांचा तरुण मुलगा गेला. त्याच्या कुटुंबीयांवर
आकाशच कोसळले असेल. त्याच्या आई-वडिलांची काय अवस्था झाली असेल? जी मुलं
गाडी चालवीत होती, ती नक्कीच धुंदीत असतील. त्यांच्याच वयाच्या एका
मुलाच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याचं त्यांना काहीच वाटलं नसेल का?
बिचारा जखमी अवस्थेतही त्या मुलांजवळ मदत मागत होता, आपल्या आईला फोन
करायला सांगत होता; तरीही त्या निष्ठुरांना त्याची कीव आली नाही. "या
जागी आपण असतो तर!' असा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. निष्ठुरपणे
त्याला जखमी अवस्थेत निर्जन ठिकाणी सोडून सर्व जण पसार झाले.

अशा तऱ्हेच्या घटना अनेक ठिकाणी अनेक वेळा घडत असतात. त्या वेळी
प्रत्येकाच्या मनात चीड निर्माण झालेली असते; पण नंतर त्यांचा शोध,
चौकशी, पुरावे यामध्ये वेळ जातो, तोवर लोकं विसरून जातात. मग वाटतं, या
अशा गुन्हेगारांना कधी शिक्षा होणारच नाही. स्वत:ला आधुनिक म्हणविणाऱ्या
लोकांमध्ये संवेदना, माणुसकी हरवत चालली आहे, फसवणूक लुबाडणूक वाढत आहे.
माणसाकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे लहान वयातच गाड्या चालवणे, व्यसनाच्या
आहारी जाणे, नियमांचे उल्लंघन करणे या गोष्टी अफाट वाढल्या आहेत. धुंदीत
गाड्या चालवून दुसऱ्यांचे जीव घेतात, मदतीसाठी कुणी हाका मारल्या तर
दुर्लक्ष करतात, त्यामुळे कित्येक जीव उपचाराअभावी मृत्यू पावतात. काही
बातम्या वाचून अंगावर शहारे येतात. छोटी छोटी मुलं गाडीच्या चाकाखाली
चिरडली जातात, ज्येष्ठ नागरिक ठोकरले जातात. गाडी चालविणाऱ्या
प्रत्येकाच्या मनात ही भावना निर्माण झाली पाहिजे, की या मुलांच्या जागी
उद्या आपली मुलंही असू शकतील, या वृद्धांच्या जागी आपले आई-वडील असू
शकतील. वाहन चालविणाऱ्या प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, की
प्रत्येकाचीच कुणीतरी घरी वाट पाहत असतं त्यामुळे प्रत्येकानेच सावधानता
बाळगायला पाहिजे. पण असं होत नाही. आपण "माणूस' आहोत, हेच सर्व जण विसरत
चालले आहेत. आपल्यापेक्षा पशुपक्षी बरे! त्यांना भावना आहेत. एखादा पक्षी
मेला तर त्याचे नातलग एकमेकांना हाका मारून लगोलग भोवती गोळा होतात. जखमी
असेल तर काळजी घेतात; पण आपण माणसे आहोत याची जाणीवही उरली नाही. पूर्वी
असं नव्हतं. दुसऱ्याच्या जाण्यानंही, दुःखानंही डोळे पाणावत असत; पण आज
सगळंच हरवलंय. हीच का आमची आधुनिकता?

आज प्रत्येक माणसागणिक घरात वाहन आहे. ही चैन नसून, गरज आहे. पण या अशा
बेफाम गाड्या चालविणाऱ्यांचाही सुळसुळाट वाढला आहे. आज मला वाटतं,
प्रत्येक घरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की संध्याकाळी सर्व जण
घरात सुखरूप परत आले की आजचा दिवस पार पडला म्हणून परमेश्‍वराचे आभार
मानत असतील. स्त्री ही ममतेचा सागर असते असं म्हणतात. तीच स्त्री आज
मुलीचा गर्भ आहे म्हणून तिला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकत आहे, मग
कुठं हरवली संवेदना?

म्हणून माणसांप्रमाणे संवेदना जागृत ठेवा; व्यावहारिक न होता भावनिक होऊन
जागा. आज गरज आहे संवेदना जपण्याची... माणुसकी जपण्याची...

संध्या गावित...
एका सभेत अत्रे ह्यांचे भाषण सुरु होते, मध्येच टवाळ माणूस
ओरडला,

”अत्रे तुम्ही कुत्रे....”

काही वेळ सर्वत्र शांतता पसरली.
.
.
.
.
.
.
.
.
.
अत्रे त्याला म्हणाले, “ठीक आहे. मग तुम्ही विजेचा खांब
आणि मोटारीचे टायर”
भिकारी : ये माय भाकर दे .....
..
..
..
..
आजी : अजून भाकरी झाल्या नाही नंतर ये

भिकारी : हा माझा मोबाईल नंबर घे.....
आणि भाकर झाल्यावर मला मिस काल दे..

आजी : अरे बाबा, त्यापेक्षा मी माझा फेसबुक स्टेटस अपडेट करते भाकरी झाल्यावर ...
...ते बघ आणि मग ये ...

टाय-बो पार्टी

एकदा चम्या अगदी बारीक चेहरा करून येतो तर पम्या त्याला विचारतो ,''काय झाले? काल तर तू एकदम खुशीत होतास टाय-बो पार्टीला जायचे आहे म्हंणून?"

चम्या म्हणतो "गेलो होतो ना, पण तिथे लोक बाकीचे पण कपडे घालून आलेले होते."

पवित्र चिकन मटन

प्रत्येक शुक्रवारी रात्री संता सिंग आपल्या घरी चिकन आणि मटन कबाब बनवित असे. पण त्याचे सगळे शेजारी कठोर कॅथोलीक होते ... आणि त्यांना त्यांच्या धर्मगुरुने शुक्रवारी चिकन आणि मटन खाण्यास मनाई केली होती. परंतू शुक्रवारच्या रात्री संताच्या घरुन येणारी चिकन आणि मटणाची सुगंध त्या कॅथोलीक लोकांना खुप विचलित करत असे. त्यामुळे त्यांनी शेवटी आपल्या धर्मगुरुला या बाबतीत सांगितले.

धर्मगुरु संताला भेटण्यासाठी त्याच्या घरी आला आणि त्यांनी त्याला कॅथोलीक बनन्याचा सल्ला दिला. त्या धर्मगुरुने आणि त्याच्या शेजाऱ्यांनी त्याची खुप मनधरणी केल्यानंतर संता सिंग अनिच्छेना का होईना एक दिवस कॅथोलीक चर्चमधे त्यांची प्रार्थना अटेंड करण्यास गेला. तो प्रार्थनेसाठी उभा असतांना अचानक त्या धर्मगुरुने संताच्या शरीरावर पवित्र पाणी शिंपडले आणि ते म्हणाले, '' तु धर्माने सिख होता, आणि सिख म्हणूनच मोठा झाला आहेस, परंतू आता तु कॅथोलीक आहेस ''

संताचे शेजारी खुप खुश होते - पण पुढील शुक्रवार येई पर्यंतच.

पुढील शुक्रवारच्या रात्री पुन्हा संताच्या घरातून चिकन आणि मटनाचा सुवास सगळ्या चाळीत पसरला. शेजाऱ्यांनी ताबडतोब कॅथोलीक धर्मगुरुला बोलावले. धर्मगुरु जेव्हा संताच्या घराच्या मागच्या बाजुने त्याच्या घरात शिरले आणि त्याला रागावण्यासाठी तयारच होते, जेव्हा ते अचानक थांबले आणि आश्चर्याने संताकडे पाहू लागले.

तिथे संता एक छोटी पवित्र पाण्याची शीशी घेवून उभा होता. त्याने ते पवित्र पाणी चिकन आणि मटनावर शिंपडले आणि म्हणाला, '' ओए... तुम्ही जन्माने चिकन आणि बकरा होतास, आणि चिकन आणि बकरा म्हणूनच मोठे झालात , पण यारा आता तुम्ही आलू आणि टमाटर आहात ''

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं....

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं

मुंबईतल्या सग्गळ्या एरियांचं ते ’फादर’ असतं!

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं



श्रीसिद्धिविनायकाचं हे गांव,

सा-या भारतात प्रसिद्ध ह्याचं नांव

पार्कात विराजती उद्यान गणेश

नांवाजलेली शाळा-कॊलेजं

म्हणजे साक्षात श्रीसरस्वतीचा प्रदेश!

विद्यार्जन नि विद्यादानाला

जे सदैव सप्रेम सादर असतं

ते माझं दादर, म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं!



वसंत देसाई, वसंत प्रभू

सी रामचंद्र नि सुधीर फडके

दादरचेच तर होते

ब्रॊडवे समोरच्या फूटपाथवर

चक्क नौशादसाहेब झोपत होते!

मीनाकुमारी ’रूपतारा’त चहा द्यायला जायची

‘रणजित’ समोरच्या बसंती हॊल मधे

लताजींची रिहर्सल चालायची!

असं माझं दादर, कला-संगीताचं माहेरघर असतं…

म्हणूनच गडया,

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...



छबिलदासचा फर्मास बटाटावडा

नि शिवाजी मंदिरला ’वस्त्रहरण’

नाटक संपलं की ’सिंधुदुर्गा’ वर

नायतर नाकासमोरच्या गोमांतकात,

खेकडयाचा रस्सा नि खमंग सुरमईचं

दादर हे एक झणझणीत चमचमीत डिनर असतं

ही मज्जा कुठ्ठेच नाही, म्हणूनच तर मित्रा..

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...



शिवाजी पार्कच्या मैदानाला

एक किलोमीटरचा कटटा असतो,

तरुणांपासून ते पेन्शनरांपर्यंत

इथे प्रत्येकाचा हक्काचा अड्डा असतो!

चौपाटीच्या भेळेला सूर्यास्ताचा रंग असतो

’सीसीडी’ किंवा ’बरिस्ता’वाल्या पब्लिक चा

मात्र निराळाच ढंग असतो!

पण कितीही विदेशी रेस्तरां आले तरी

काला-खटटा च्या गाडीवर मात्र

गि-हाईक हमेशा हजर असतं...

नो वंडर देन, की दादर म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं



हिंदमाता पासून ते पार स्टेशनपर्यंत

साधना च्या डोशापासून ते कैलाश च्या लस्सीपर्यंत

लग्नाच्या साडयांपासून पंजाबी ड्रेस पर्यंत

फाळके रोडवर खरेदी करा पाय दुखेपर्यंत!





पश्चिमेचा बाजार नि चोवीस तास वर्दळ

फुलबाजारात घुमतो लिली-गुलाबाचा दर्वळ

भाजीच्या गल्लीत नकळत बसतो धक्का

गरम इडली ’विसावा’ची नि सामंतांचा चक्का

अंडयापासून गेंडयापर्यंत नि पिनपासून पियानोपर्यंत

दादरमध्ये खरेदीला कधीच नसतो अंत!

हज्जारो विक्रेत्यांच्या पोटापाण्याचं साधन असतं

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं...



पोर्तुगीज चर्चची घंटा घणघणते दूर

नि पूर्वेकडच्या मशिदीत बांगेचा सूर

इकडे गुरुद्वारा तिकडे स्वामीनारायण

नि पारशांच्या अग्यारीत रमतो अग्निनारायण

सग्गळ्या धर्मांचं जिथे एक गेट-टुगेदर असतं

ते माझं दादर, म्हणजे दादर, म्हणजे दादर असतं

ज्यांच्या वाडवडिलांची असते बख्खळ पुण्याई

त्याच लोकांचं इथे घर असतं,

दादर म्हणजे दादर म्हणजे दादर असतं....

दिपिकाचा महिमा

दीपिका जेव्हा युवराज सिंग कडे गेली तेव्हा त्याचा फोर्म गेला आणि त्याला भारतीय टीम मधून निघावे लागलेले.
ती जेव्हा रणबीर कपूर कडे गेली तेव्हा रणबीर कपूर च्या फिल्म्स फ्लोप व्हायला लागल्याआता
ती मल्ल्या कडे आहे तर त्यांची किंगफिशर एयरलायींस कंपनी एकदम बंद पडायच्या लायकीला आली आहे
.
.
.
.
.
.
.

माहित नाही ती कॉंग्रेस मध्ये कधी जातेय ?

ग्राहक हेच दैवत

रम्या : अहो चम्या शेठ, ही रिसिट बघा. पाच वर्षांपूवीर् मी माझे फाटलेले बूट तुमच्याकडे शिवायलादिले होते. मी ते विसरूनच गेलो होतो.

चम्या : नो प्रॉब्लेम. मी शोधून काढतो.थोड्या वेळाने चम्या धुळीने माखलेला एक बॉक्स घेऊन येतो.

रम्या : अरे वा, मला तर विश्वासच बसत नाहीय की तुम्ही एवढ्या आठवणीने माझे बूट ठेवले असतील.

चम्या : इट्स ओके. ग्राहकांचं समाधान हेच तर आमचं उद्दीष्ट आहे. असो, आता ८ दिवसांनी बूट न्यायला या. अजून त्याची शिलाई बाकी आहे.