गेलीस तेव्हा

गेलीस तेव्हा
फुले माझ्याजवळ रडली
मी जाऊ दिले म्हणून
माझ्यावरच चिडली

भासे तुझ्याविना
जग हे सुने सुने
भासे तुझ्याविना
शरीर काळजाउणे

डोळ्यांसमोर फ़क्त
तूच उभी असतेस
झाकले तर मात्र
श्वासांतून जाणवतेस

तु येण्याच्या आशेत
क्षण क्षण झुरतो आहे
तू जवळ नसल्याणे
मी अर्धाच उरलो आहे .


- अभिजीत

शेवटी

बेगडी तेजाळुनी अंधारतो मी शेवटी
जे जसे आहे तसे स्वीकारतो मी शेवटी

खूपदा परिपक्वतेने वावरावे लागते
येउनी आईपुढे उंडारतो मी शेवटी

अडगळीला फेकतो जागेपणी स्वप्ने जरी
शोधुनी… झोपेत ती साकारतो मी शेवटी

फक्त मुद्देसूदही बोलून कोठे भागते?
लाच मौनाची जगाला चारतो मी शेवटी

फायदा उंचीमुळे झाला कुठे काही मला?
माणसांची छप्परे शाकारतो मी शेवटी

राग माध्यान्ही कुठे सूर्यावरी मी काढतो?
सांजवेळी सावली पिंजारतो मी शेवटी

मान खाली घालुनी बाहेरच्यांना सोसतो
आपल्यांच्यावर घरी फुत्कारतो मी शेवटी

लाभली खोटे खर्‍याला मानणारी माणसे
थाप वैतागून त्यांना मारतो मी शेवटी

तत्ववेत्ते, संत, जेते, शंभरावरती कवी
संपले ते सर्व की आकारतो मी शेवटी

ग्रंथ अभ्यासून जेव्हा ओळही नाही सुचत
आत डोकावून… बाजू सारतो मी शेवटी

एकदा माझ्याघरी येऊन अभ्यासा मला
जिंकतो तो ‘बेफिकिर’ अन हारतो मी शेवटी

- बेफिकीर

भिकार्‍यांचा

वीट आला जरी शिसार्‍यांचा
हात होतो पुढे भिकार्‍यांचा

होत नाहीत जे स्वतःचेही
कोण वाली अशा बिचार्‍यांचा

आज नसतील… काल होते ते
ठेव आदर्श त्या सितार्‍यांचा

राबती जीवने कुणासाठी
कोण साहेब कर्मचार्‍यांचा

शेवटी भेटलीस की तूही
काय उपयोग त्या पहार्‍यांचा

एकदा जीव घाबरा व्हावा
सावजांच्यामुळे शिकार्‍यांचा

एक साधा सजीव होता तो
काय आवाज हा तुतार्‍यांचा

मूक आहेत, मान्य आहे… पण
दोष आहे तुझ्या पुकार्‍यांचा

मी जमाखर्च ठेवला आहे
चोरलेल्या तुझ्या सहार्‍यांचा

आवराआवरी करू दोघे
घोळ आहे तुझ्या पसार्‍यांचा

शेवटी शेवटी मजा आली
लागला नाद त्या शहार्‍यांचा

तोंड माझे कुठे कुठे होते
सोसतो मी जुगार वार्‍यांचा

फक्त आहे तसे नसावे मी
‘बेफिकिर’सा विचार सार्‍यांचा


- बेफिकिर

हे गंधित वारे फिरणारे

हे गंधित वारे फिरणारे
घन झरझर उत्कट झरणारे . . .
हे परिचित सारे पूर्वीचे . . .
तरी आता त्याही पलिकडचे . . .
बघ मनात काही गजबजते . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

कुठल्या देशी नकळत माझे पाऊल पडले रे
सूर रोजचे कसे नव्याने मनास भिडले रे
हे गीत जयाला पंखसुध्दा . . .
अन हवाहवासा डंखसुध्दा . . .
कधि शंकित अन नि:शंकसुध्दा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

मनात जे जे दडून होते नकळत आकळते
कसे दुज्याच्या स्पर्शाने ‘मीपण’ झगमगते
ही जाणीव अवघी जरतारी . . .
हर श्वासातुन परिमळणारी . . .
हर गात्रातुन तगमगणारी . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

नाव न उरले, गाव न उरले, अवघे ओसरले
बेभानाचे भान जिण्याला बिलगुन बसलेले
हा स्पर्श विजेच्या तारांचा . . .
हा उत्सव बघ अस्वस्थाचा . . .
हा जीव न उरला मोलाचा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

- संदिप खरे

धाडस

एकदा मेडिकल आणि इंजिनियरिंग कॉलेजच्या प्राचार्यांमध्ये कुणाचे विद्यार्थी जास्त धाडसी आहेत, याबद्दल वाद चालू होता.
मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांनी आपल्या काही विद्यार्थ्यांना बोलावून घेतलं आणि त्यांना शार्कचा वावर असलेल्या समुद्रात उड्या मारायला सांगितल्या. 
त्या मुलांनी आपल्या जिवाची पर्वा न करता अतिशय धाडसीपणे उड्या मारल्या. 
मेडिकल कॉलेजचे प्राचार्य : (विजेत्याच्या थाटात) पाहा धाडस !!!

आता इंजिनियरिंग कॉलेजच्या प्राचार्यांनीसुद्धा आपल्या काही विद्यार्थ्यांना बोलावल. त्यांना या समुद्रात उड्या मारायला सांगितल्या. 
विद्यार्थी : पागल है कया साले ? 
प्राचार्य (मेडिकल कॉलेजच्या प्राचार्यांना) : याला म्हणतात धाडस !!!

ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

अखंड धरती ती
अनंत आकाश मी
आणि अस्पर्ष क्षितिजाची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

न संपणारी रात्र ती
न संपणारा दिवस
मी आणि गर्द आसवांची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

स्वप्नातली राजकुमारी ती
स्वप्नातला राजकुमार मी
आणि खरया अस्तीत्वाची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

जीवनाची राणी ती
मृत्यूचा राजा मी
आणि झुरणाऱ्या जीवांची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

अर्धवट प्रेमिका ती
अर्धवट प्रेमी मी
आणि अर्धवट प्रेम कहाणीची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

दूर कुठेतरीची सुरवात ती
जवळचा अंत मी
आणि दोघांच्या मिलनाची
ती एक सायंकाळ
ती , मी आणि ती एक सायंकाळ !!

ती माणसं निराळीच

हृदय अर्पण करतात
ती माणसं निराळीच असतात

पूर असतो त्यांच्या स्वभावात
किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात
कोसळतात खोल तेव्हा किती उंच जातात

जशी हसतात फुलं, पूर्ण उमलतात,
उधळतात गंध, गळून पडतात
नियतीचा सहज स्विकार हृदय देणारेच करतात

अश्रुंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात
प्रीतीचे दिव्य किरण त्यांच्यातून नित्य पाझरतात
ज्यांची दारे बंद होतात त्यांनाही आपले हृदय देतात

हृदय अर्पण करतात
ती माणसं निराळीच असतात


कवियत्री - शिरीष पै

आनंदाचे डोही

आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदची अंग आनंदाचे ॥धृ॥

काय सांगू झाले कांहिचिया बाही
पुढे चाले नाही आवडीने ॥१॥

गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे ॥२॥

तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखा आला ॥ ३ ॥

- संत तुकाराम

गणपतीची आरती

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।

सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती।
दर्शनमात्रें मनकामना पुरती ॥धृ.॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।

हिरे जडित मुकुट शोभतो बरा।
रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ॥जय.॥२॥

लंबोदर पीतांबर फणीवरबंधना।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।

दास रामाचा वाट पाहे सदना।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ॥जय.॥३॥


रचना - संत रामदास

पांडुरंगाची आरती

युगें अठ्ठावीस विटेवर उभा ॥
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ॥
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥ १ ॥

जयदेव जयदेव जय पांडुरंगा ॥
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ धृ ॥

तुळसीमाळा गळां कर ठेउनि कटी ॥
कांसें पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥
देव सुरवर नित्य येती भेटी ॥
गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ॥ जय. ॥ २ ॥

धन्य वेणूनाद अणुक्षेत्र पाळा ॥
सुवर्णाची कमळें वनमाळा गळा ॥
राई रखुमाबाई राणीया सकळा ॥
ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ॥ जय. ॥ ३ ॥

धन्य पुष्पावती भीमासंगम ॥
धन्य वेणूनाद उभें परब्रह्म ॥
धन्य पुंडलीक भक्त निर्वाण ॥
यात्रेसी येती साधु सज्जन ॥ जय. ॥ ४ ॥

ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती ॥
चंद्र्भागेमाजी सोडूनियां देती ॥
दिंड्या पताका वैष्णव नाचती ॥
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ जय. ॥ ५ ॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नानें जे करिती ॥
दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ती ॥
केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ।। जय . ॥ ६ ॥

शंकराची आरती

लवलवथी विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
विषे कंठ कळा त्रिनेत्री ज्वाळा ॥
लावण्य सुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ॥ धृ. ॥

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचे उधळण शीतकंठ नीळा ।
ऎसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव. ॥ २ ॥

दैवी दैत्य सा़गर मंथन पै केलें ।
त्यामाजी अवचीत हळहळ सांपडले ॥
तें त्वा असुरपणे प्राशन केले ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ जय. ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनीजन सुखकारी ॥
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥ जय देव जय देव ॥ ४ ॥

मारुतीची आरती

जयदेव जयदेव, जय हनुमंता
संकटकाळी तुम्हीच, हो त्राता
भक्तावर व्हावे, त्वा कृपावंता
मिटतील जगती साऱ्याच चिंता
जयदेव जयदेव जय हनुमंता

अंजनी माच्या , परमप्रिय सुता
श्री रामाच्या रे, लाडक्या दूता
तूच सर्वांचाच , असे विघ्नहर्ता
कृपा कर आम्हां त्वरित आता
जयदेव जयदेव , जय हनुमंता

शौऱ्याची तूच, साक्षात देवता
तूच धैऱ्याचा, असे रे जनिता
शरण मनोभावे, तुजला रे येता
देसी अभयदान, तूच सर्व भक्ता
जयदेव जयदेव, जय हनुमंता

सीता माईचा, संकटी तू त्राता
लंका दहनाचा ,तूच असे कर्ता
लंकेच्या नृपा, नमविले पुरता
धन्यता मिळते, वीर हनुमंता
जयदेव जयदेव , जय हनुमंता

सप्त चिरंजीवात, तुझे असे स्थान
असे तुजला रे, मृत्युलोकी मान
नमती तुजला मनोमनी, सर्व जन
मागती तुजला, शक्तीचे वरदान
जयदेव जयदेव, जय हनुमंता

पांडुरंगाची आरती

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥

आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥ येई. ॥ १ ॥

पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥ येई. ॥ २ ॥

विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥

दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥

जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥

सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥

दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥

दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥

मारुतीची आरती

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ॥
गडबडिलें ब्रह्मांड धाकें त्रिभुवनीं ।
सुर नर निशाचर त्यां झाल्या पळणी ॥ १॥

जय देव जय देव जय हनुमंता ।
तुमचेनि प्रसादे न भीं कृत्तांता ॥ धृ ॥

दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।
थरथरला धरणीधर मानीला खेद ॥
कडकडिले पर्वत उडुगण उच्छेद ।
रामी रामदासा शक्तीचा बोध ॥ जय. देव. ॥ २॥

दशावताराची आरती

आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्तसंकटी नानास्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ॥ धृ. ॥

अंवऋषी कारणे गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरुनि ब्रह्मा आणुनिया देसी ।
मत्स्यरुपीं नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ १ ॥

रसा तळाशी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकारासाठी देवा कांसव झालासी ॥
दाढें धरुनी पृथ्वी नेता वराहरुप होसी ।
प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरि गुरगुरसी ॥ २ ॥

पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळी नेसी ॥
सर्व समर्पण केले म्हणउनि प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ॥ ३ ॥

सगस्त्रार्जुन मातला जमंदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला ॥
नि:क्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ ४ ॥

मातला रावण सर्वा उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरलें सीतेला ॥
पितृवचना लागीं रामें वनवास केला ।
मिळोनी वानर सहित राजाराम प्रगटला ॥ ५ ॥

देवकी वसुदेव बंदी मोचन त्वां केलें ।
नंदाघरि जाऊन निजसुख गोकुळा दिधले ॥
गोरसचोरी करिता नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचे प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ ६ ॥

बौद्ध कलंकी कवियुगी झाला अधर्म हा अवघा ।
सांडुनि नित्यधर्म सोडुनि नंदाची सेवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनी कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवि द्याचि निजसुखा नंदसेवा ॥ ७ ॥

गणपति आरती

स्थापित प्रथमारंभी तुज मंगलमूर्ती।
विघ्ने वारुनी करिसी दीनेच्छा पुरती।
ब्रह्मा विष्णु महेश तीघे स्तुती करिती।
सुरवर मुनिवर गाती तुझिया गुणकीर्ती॥१॥

जय देव जय देव जय गणराजा।
आरती ओवाळू तुजला महाराजा॥धृ.॥

एकदंता स्वामी हे वक्रतुंडा।
सर्वाआधी तुझा फ़डकतसे झेंडा।
लप लप लप लप लप लप हालति गज शुंडा।
गप गप मोद्क भक्षिसी घेऊनि करि उंडा॥जय.॥२॥

शेंदूर अंगी चर्चित शोभत वेदभुजा।
कर्णी कुंडल झळ्के दिनमनी उदय तुझा।
परशांकुश करि तळपे मूषक वाहन दुजा।
नाभिकमलावरती खेळत फ़णिराजा॥३॥

भाळी केशरिगंधावर कस्तुरी टीळा।
हीरेजडित कंठी मुक्ताफ़ळ माळा॥
माणिकदास शरण तुज पार्वतिबाळा।
प्रेमे आरती ओवाळिन वेळोवेळा॥जय.॥४॥

गणपति आरती

आरती करु तुज मोरया।
मंगळगुणानिधी राजया॥ आरती॥धृ.॥

सिद्धीबुद्धीपती संकटनाशा।
विघ्ननिवारण तूं जगदीशा॥ आरती करुं.॥१॥

धुंडीविनायक तू गजतुंडा।
सिंदूरचर्चित विलसित शुंडा॥ आरती करुं.॥२॥

गोसावीनंदन तन्मय झाला।
देवा देखोनिया तुझ शरण आला॥
आरती करुं तुज मोरया.॥३॥

गणपतीची आरती

उंदरावरि बैसोनि दूडदूडा येसी।
हाती मोद्क लाडू घेउनियां खासी।
भक्तांचे संकटी धावूनि पावसी।
दास विनविती तुझियां चरणासी॥१॥

जय देव जय देव जय गणराजा सकळ देवां आधी तूं देव माझा॥ जय देव.॥धृ.॥

भाद्रपदमासी होसी तू भोळा।
आरक्त पुष्पांच्या घालूनिया माळा।
कपाळी लावूनी कस्तुरी टीळा।
तेणे तू दिससी सुंदर सांवळा॥ जय.॥२॥

प्रदोषाचे दिवशी चंद्र श्रापीला।
समयी देवे मोठा आकांत केला।
इंदु येवोनि चरणी लागला।
श्रीराम बहुत श्राप दिधला॥ जय.॥३॥

पार्वतीच्या सुता तू ये गणनाथा।
नेत्र शिणले तुझी वाट पाहतां॥
किती अंत पाहासी बा विघ्नहर्ता।
मला बुद्धी देई तू गणनाथा॥

निशब्द

मी दिल्या शब्दा असंख्य हाका शब्द ना मागे वळला कधी
शब्दासाठी जाहलो शब्द्खुळा शब्द ना मज मिळाला कधी
शब्द सकाळ, शब्द मध्यान, शब्द सांज, शब्द निशा कधी
मी गाळली असंख्य आसवे पण शब्द माझा ना पाझरला कधी.
शब्दासाठी हा सारा प्रयास पण शब्दा तो ना कळला कधी
शब्दासाठी हा धडपडता प्रवास पण हात शब्दाने ना धरला कधी
शब्द सागर शब्द कीनारा शब्द वारा मग शब्द वादंळ कधी
मला मिळाल्या असंख्य ठेचा पण शब्द माझा ना ओघळला कधी.
शब्दात माझा जीव गुतंला पण जीव शब्दचा ना जडला कधी
मी लिहील्या असंख्य कविता पण शब्दा त्या ना कळल्या कधी
शब्द जीवन शब्द संसार शब्द अस्तित्व शब्द कविता कधी
झालो मी आज निशब्द कवि पण शब्दा हा कवि ना कळला कधी.
आज जीवन माझं प्रश्नचिन्हं पण शब्दास हा प्रश्न ना पडला कधी
शब्दाच्या ओजंळीत श्वास माझा शब्दाने हा जीव ना सोडला कधी
शब्द सावली शब्द आधार शब्द आयुष्य शब्द सर्वस्व कधी
शब्दासाठी मी नेहमी शून्यच होतो पण हा शब्द मी ना खोडला कधी.

या झोपडीत माझ्या

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥

जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥


- संत तुकडोजी महाराज

एक प्रवास

एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी...

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा...

एक प्रवास शुन्याचा
जणु हिमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा...

एक प्रवास जगण्याचा
क्षणा क्षणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा...

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या...

एक प्रवास प्रयत्नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्षणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा...

एक प्रवास...
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा...

प्रवास

प्रवासात सगळेच अनोळखी असतात
म्हणून प्रवास टाळायचा नसतो
कारण त्यातला एखादा प्रवासी
आपल्यासाठी थांबलेला असतो

जीवनात सगळंच मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर
आपला वाट पहाणाराही असतो

एखाद्याला आपलं करता आलं नाही
म्हणून जीव जाळायचा नसतो
जीवनच संपल्यावर आपण
त्या व्यक्तीच्या सहवासालाही मुकतो

जगण्याचे संदर्भ असे क्षणाक्षणाला बदलतात
आणि म्हणूनच माणसे उमलतात आणि फुलतात.

मी कधीच नाही म्हटंल की...

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
कदाचीत माझ्या नजरेतला भाव तुला कधी कळलाच नाही म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
माझ्या डोळ्यातुन ओघळणारा अश्रू तु कधीच टिपला नाहीस म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
भोवतालच्या मित्र-मैत्रिणींच्या गर्दीत मला कधी पाहीलच नाहीस म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
आपल्या ह्रदयाच्या रेशीमगाठी कधी जुळल्याच नाहीत म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
कारण मनातल्या भावना कधी ओठांपर्यंत पोहचल्याच नाहीत म्हणुन

पण आता मी बोलणार आहे
ह्रदयाचे सर्व बंध उलघडणार आहे
कारण मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन...

जगण्याने छळले होते

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
(पाऊल कधी वाऱ्याने माघारी वळले होते?)

मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते


कवी - सुरेश भट
कवितासंग्रह - एल्गार

मैत्री

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु उन्हाळ्यातही पावसाळा
तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं
एखादं जाळीदार पान....
जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं
तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातं
तुझ्या मैत्रिविना आयुष्य धुसर धुसर वाटेल...
तशी वाट सापडेल जगण्याची...
पण...हातात माझ्या हक्काच असं काही नसेल
मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...
म्हणुनच वाटतं...तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही
मैत्रिचा ठेवा हा असाच जपुन ठेव
तु हास अन दु:ख तुझी माझ्याआड लपवुन ठेव
उद्या जर नसलोच तुझ्यासोबत तरी माझे शब्द असतील
तू हसत रहा माझ्यासाठी..तुला बघुन माझे शब्दही हसतील
शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खात एवढीच देऊ शकतो तुला खात्री..


कवी - संदीप सुरळे

किती तरी दिवसांत

किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो

खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच

केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाईन निर्भय;
गांवाकाठच्या नदीत
होईन मी जलमय

आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी

बरा म्हणून हा ईथे
दिवा पारवा पाऱ्याचा
बरी तोतऱ्या नळाची
शिरी धार, मुखी ऋचा


– बा.सी.मर्ढेकर

देव अजब गारोडी

धरीत्रीच्या कुशीमधीं
बीयबियानं निजलीं
व-‍हे पसरली माती
जशी शाल पांघरली

बीय टरारे भुईत
सर्वे कोंब आले व-हे
गह्यरलं शेत जसं
अंगावरतीं शहारे

ऊन वा-‍याशीं खेयतां
एका एका कोंबांतून
पर्गटले दोन पानं
जसे हात जोडीसन

टाया वाजवती पानं
दंग देवाच्या भजनीं
जसे करती कारोन्या
होऊं दे रे आबादानी

दिसामासा व्हये वाढ
रोप झाली आतां मोठी
आला पिकाले बहार
झाली शेतामधी दाटी

कसे वा-‍यानं डोलती
दाने आले गाडी गाडी
दैव गेलं रे उघडी
देव अजब गारोडी !
देव अजब गारोडी !


कवयित्री  - बहिणाबाई चौधरी
संगीत     -  वसंत पवार
स्वर        -  सुमन कल्याणपूर
चित्रपट    -  मानिनी (१९६१)

माझ्या मना बघ दगड

(विंदांच्या माझ्या मना बन दगड़ ह्या कवितेचे विडंबन)

हा रस्ता अटळ आहे
पावसामधून - पाण्यामधून
ट्रॅफिकमधून - खड्ड्यांमधून
अंधेरी, व्हीटी किंवा शीव?
नको - नको! टाक लीव!
नाहीतर अडकून बसशील खास
ट्रॅफिकमध्ये तासनतास
तहान - भुकेने होईल त्रास
विसर ऑफिस किंवा रड
माझ्या मना बघ दगड

हा रस्ता अटळ आहे
बसमध्ये शिरलास तर
उभं राहायला जागा कर
दांड्यावरती हात धर
तरी होशील खाली - वर
म्हणून म्हणतो धर पक्का
संभाळ, संभाळ लागेल धक्का
पडणाऱ्या, पडशील किती?
झुलणाऱ्या, झुलशील किती?
धक्काबुक्की करशील किती?
जिरेल पुरती तुझी रग
माझ्या मना दगड बघ

हा रस्ता अटळ आहे
येथेच असतात सदा'चर'
जागोजाग रस्त्यावर
असतात फिरत गणवेषात
थांबवून करतात पुढे हात
आणि म्हणतात " ही हिंमत?
सिग्नल मोडलास - टाक किंमत! "
पावती महाग, लाच स्वस्त
हां - हां म्हणता करतात फस्त
कमावशील पुन्हा गाळून स्वेद
सरकव नोट, नको खेद

हा रस्ता अटळ आहे
सुट्टी घेणे हाच उपाय
काय अडेल तुझ्याशिवाय?
रस्त्यावरचे सारे पाणी
वाहून काय नेईल कोणी?
काय तुझी ही छत्री
न भिजण्याची देईल खात्री?
रुळावरून वाहतील ओढे
मध्य रेल्वेचे अडेल घोडे
चाल वर धरून विजार
जवळून जाईल मग मोटार
शर्टावरचे डाग रगड
माझ्या मना बघ दगड

हा रस्ता अटळ आहे
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक सर अशी येईल,
घाणीचीच राड होईल
डास-माशा सगळे किडे
घोंगावतील मग चोहीकडे
रोगराईचा धुमाकूळ
रोगी होईल सारे कूळ
ऐका थापा! ऐका आवाज!
निवडणूक येते आज!
निवडणुकीतला उमेदवार
या रस्त्यावर घालिल टार
इतकी चंगळ तुला रगड
माझ्या मना बघ दगड



कवी - नचिकेत कुलकर्णी

'बाटा' रुते कुणाला - विडंबन

मुळ गीत-काटा रुते कुणाला

'बाटा' रुते कुणाला,
आक्रंदतो इथे मी,
मज बूट हे रुतावे,
हा दैवयोग आहे!
(आहे वर तान घ्यावी,
नाहीतर बूट चावतो आहे
हे लक्षात कसे येणार?)
रुते कुणाला....!

सांगु कशी कुणाला,
कळ हाय अंगठ्याची,
हे बूट घालता मी,
अस्वस्थ फार आहे!
(आ.व.ता.घ्या.)
रुते कुणाला....!

चांभार हाय वैरी,
असतो कुठे दुपारी,
म्हणूनी जुनीच आता,
पायी वहाण आहे!
रुते कुणाला.....!

अंगठा विभक्त झाला,
तळवा फकस्त राहे,
हे चालणे बघा ना,
भलतेच मस्त आहे!
रुते कुणाला....!

फुटले नशीब आता,
ह्या दोन पावलांचे,
माझ्या जुन्या वहाणा,
ढापून चोर 'जा', 'ये'!
(म्हणजे चोर माझ्या जुन्या
वाहाणा घालुन माझ्यासमोरुनच
'ये-जा' करतोय)
रुते कुणाला..!

हा 'पायगुण' माझा,
आहे असा करंटा,
नुकताच मंदिरी त्या,
बदलुन बूट राहे!
रुते कुणाला..!


कवी - मानस

कणा (विडंबन)


ओळखलंत का परवेझ मला
पाकिस्तानात आला कोणी
तारवटलेल्या डोळ्यांमध्ये
कणभर नव्हतं पाणी

क्षणभर बसला, भेसूर हसला
बोलला वरती पाहून
मुंबईमधून आत्ताच आलो
आलो बॉम्ब लावून

माज चढल्या सैतानासारखा
लोकल्स मधून नाचलो
साथी सारे पकडले जातील
मीच एकटा वाचलो

वाटलं होतं बॉम्ब लावून
मुंबईची वाट लागली
मुंबईमात्र नेहमी सारखीच
पुन्हा धावायला लागली

खिशाकडे हात जाताच
वर बघून म्हटला
पैसे नकोत सरदार
मनात भकासपणा दाटला

मुंबईकरांचं धैर्य पाहून
मोडलाय माझा कणा
छातीवरती बंदुक ठेवून
फक्त मर म्हणा!

सत्र - विडंबन

ढोसण्याचे सत्र होते
मद्यपी सर्वत्र होते

सुरमईचा गंध आला
तंदुरी इतरत्र होते

पापडांच्या कुरकुरीला
वेफ़रांचे छत्र होते

बाटल्या बरसून गेल्या
'वारुणी' नक्षत्र होते

शेवटी संत्रेच माझे
द्राक्ष ते सावत्र होते

"मी बुवा पाणीच प्यालो!"
(बरळणे एकत्र होते)


कवी - चक्रपाणी चिटणीस.

आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो...

मूळ गीत: आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो

आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो
लाचारीने फिरवून कार्डे सहीस मागवतो

शर्ट नको मज कुठलाही अन पँट नको आहे
बक्कल कुठले मुळात मजला बेल्ट नको आहे
बायकोसंगे परवा माझ्या करार मी केला
सर्व खरेदी तिला करावी, काही नको मजला
बायकोजीच्या पुंगीवर मी नवरोबा डुलतो!

आता आता खरेदीस मज बायको पाठवते
काउंटर बघता लुंगी नाही, साडी आठवते!
आता कुठल्या दिलखुष गप्पा काउंटरवाल्यांशी
आता नाही शॉपिंग उरले पूर्वीगत हौशी
बिलंदरीने दिसतील त्या त्या साड्या मी बघतो!

कळून येता कार्ड लिमिटची इवलिशी त्रिज्या
उडून जाती अत्तरापरी शॉपिंगच्या मौजा
दारी फिरकत नाही कोणी नवा कार्डवाला
राखण करीत बसतो येथे जुना कार्डवाला
कर्जांनाही आता माझा कंटाळा येतो!

आताशा मी फक्त दुकाने कपड्यांची फिरतो
लाचारीने फिरवून कार्डे सहीस मागवतो


कवी - प्रसाद शिरगांवकर

गंऽऽऽ भाजणी

चाल: गं साजणी, कुण्या गावाची तू गं राणी

गंऽऽऽ भाजणी
थालि पीठाची
किंवा चकलीची
आहे कशाची तू गं राणी
गं ऽऽऽ
आली थापुन
आणि भाजुन
थोडी लाजुन माझ्या पानी

थप थप थापण्याच्या
तालावर झाली दंग
तालावर झाली दंग
पाणीथोडं फार
मऊ मऊ झालं अंग
मऊ मऊ झालं अंग
कांदे दोन चार
लाभला तयांचा संग
लाभला तयांचा संग

माझ्या घरात
तुझी परात
येते वरात मझ्या पानी
गं ऽऽऽ
आली थापुन
आणि भाजुन
थोडी लाजुन माझ्या पानी

लोणच्याची फोड तुझ्या
चुरडतो अंगावरी
चुरडतो अंगावरी
तुपाचीही धार तुझ्या
ओततोय अंगावरी
ओततोय अंगावरी
ताजं ताजं दही लोणी
ठेवलंय बाजुवरी
ठेवलंय बाजुवरी

तुज्या वासानं
जीव हैरान
भूक बेभान येड्यावानी
गं ऽऽऽ
आली थापुन
आणि भाजुन
थोडी लाजुन माझ्या पानी


कवी - प्रसाद शिरगांवकर.

रेशमाच्या बाबांनी

रेशमाच्या बाबांनी, काल लाथा बुक्क्यांनी
बाकपुरा आहे माझा काढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

चूक झाली माझी लाखमोलाची
विचारल मी ही पोर कोणाची
विसरलो आहे कोण, आहे कोण जोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

जात होती वाटेनं ती तोऱ्यात
अवचित आला बाप मोऱ्यात
आणि माझ्या नरडीला, धरूनीया ओढीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !

भीड नाही केली आल्यागेल्याची
मागितली माफी मी त्या मेल्याची
म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला
हात नगा लावू माझ्या बॉडीला !



कवी - केशवसुमार

रेशमाच्या रेघांनी

(चाल - रेशमाच्या रेघांनी)

रेशमियाच्या गाण्यांनी
भुंकणाऱ्या प्राण्यांनी
कर्ण माझा कसा की हो फोडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.

नवी कोरी कॉपी सुफ़ी साजाची
'टोपी' चढवली रिमिक्स बाजाची
बाजाची हो बाजाची
माईक आडवा ऐटीमध्ये, तोंडाजवळ ओढीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.

गात जाई प्रत्येक गाणे नाकात
रसिकांच्या उठते तिडिक डोक्यात
डोक्यात हो डोक्यात
चुंबनखोर इम्रानहाश्मी, आणिक असतो जोडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.

कृपा त्याच्यावर सल्लूमियाँची
बाजारात चलती आज कचऱ्याची
कचऱ्याची हो कचऱ्याची
काय म्हणू देवा देवा, जनतेच्या आवडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.

फायदा एक दिसतो त्याच्या गाण्यात
गाढवही गाते वाटे सुरात
सुरात हो सुरात
न्यूनगंड कित्येकांचा, दूरदेशी धाडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला।


कवी - मिलिंद छत्रे
मैत्री म्हंटली की 
आठवतं ते बालपणं 
आणि मैत्रीतून मिळालेलं 
ते खरंखुरं शहाणपण.
मैत्री म्हणजे 
रखरखत्या उन्हात मायेची सावली 
सुखाच्या दवात भिजून 
चिंब चिंब नाहली
मैत्री कशी ह्ळुवार उमलते
उन्हातही मग सावली वाटते
अश्रूत दु:ख वाहून जाते
व्यथांनाही ह्सू येते
मैत्रीविना सारेच फिके
आनंदाचे क्षणही मुके
म्हणूनच मैत्रीला फुलवायचे
फुलासारखे जपायचे
अन त्या सुगंधात
जीवन सुगंधी करायचे

सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण!
हा धागा नीट नपायचा असतो,
तो कधीच विसरायचा नसतो!
कारण ही नाती तुटत नाहीत
ती आपोआप मिटुन जातात
जशी बोटावर रंग ठेवुन
फुलपाखरं हातून सुटुन जातात!
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!
विसरु नको तु मला,
विसरणार नाही मी तुला,
विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
मैञीन तर तुच आहेस माझी खास,
कस विसरु शकतो मी तुला.

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेछ्या

नभं उतरू आलं

नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात

अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात

वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात

नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा


गीतकार : ना.धो.महानोर
गायिका : आशा भोसले
संगीतकार : हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट : जैत रे जैत

मी रात टाकली

मी रात टाकली, मी कात टाकली
मी मुडक्या संसाराची बाई लाज टाकली

हिरव्या पानांत, हिरव्या पानांत
चावंळ चावंळ चालती
भर ज्वानीतली नार
अंग मोडीत चालती

ह्या पंखांवरती, मी नभ पांघरती
मी मुक्त मोरनी बाई, चांदन्यात न्हाती

अंगात माझिया भिनलाय ढोलिया
मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली
मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली

गीत - ना. धों. महानोर
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे
चित्रपट - जैत रे जैत (१९७७)

चिंब पावसानं रानं झालं आबादानी

चिंब पावसानं रानं झालं आबादानी
झाकू कशी पाठीवरली, चांदण गोंदणी…
झाकू नको कमळनबाई, एकांताच्या कोनी
रुपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी…

राया तुझे हात माझ्या हातात गुंफूनी
उन्हात चांदणं आलं लाज पांघरुनी…
तुझ्या डोळ्यांच्या सांदीत, सावल्यांची राणी
पान्यामंदी झिम्मा धरं, आभाळ अस्मानी…

अंगावरी थरथर उठली झिम्मड भिजल्यावानी
सांगता न येई काही साजणा बोलांनी…

- ना. धो. महानोर

घन ओथंबून येती

घन ओथंबून येती, बनांत राघू भिरती

पंखा वरती सर ओघळती, झाडांतून झडझडती

घन ओथंबून झरती, नदीस सागर भरती

डोंगर लाटा वेढित वाटा, वेढित मजला नेती

घन ओथंबून आले, पिकांत केसर ओले

आडोशाला जरा बाजूला, साजन छैल छबिला घन होऊन बिलगला



गीतकार :ना. धो. महानोर
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

अवेळीच केव्हा दाटला अंधार

अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिच्या गळा जड झाले काळे सर
एकद मी तिच्या डोळ्यात पाहिले
हासताना नभ कलून गेलेले

पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार

कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली
तिच्या ओटी कुण्या राव्याची साऊली
तिच्या डोळियात जरा मी पाहिले
काजळात चंद्र बुडून गेले


गीतकार : ना. धों. महानोर
गायक : श्रीधर फडके
संगीतकार : श्रीधर फडके

मी गाताना गीत

मी गाताना गीत तुला लडिवाळा
हा कंठ दाटुनी आला

मी दुःखाच्या बांधुनी पदरी गाठी
जपले तुज ओटी-पोटी
कधी डोळ्यांना काजळ तूज भरताना
गलबला जीव होताना

खोप्यात जिथे चिमणी रोज पिलांना
सांगते गोष्ट नीजताना
ते ऐकुनी का मन तडफड होई
पाळणा म्हणे अंगाई

आयुष्याला नको सावली काळी
इश्वरा तूच सांभाळी
झुलता झोका जावो आकाशाला
धरतीचा टिळा भाळाला

गीत – ना. धों. महानोर
संगीत – आनंद मोडक
स्वर – रवींद्र साठे
चित्रपट – एक होता विदूषक (१९९२)
आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या
एकांताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या

काही केल्या करमनां, कसा जीवच लागंना
बोलघेवडी साळुंकी, कसा शब्द ही बोलंना
असा रुतला पुढ्यात भाव मुका जीवघेणा

चांदण्याची ही रात, रात जळे सुनी सुनी
निळ्या आसमानी तळ्यांत लाख रूसल्या ग गवळणी
दूर लांबल्या वाटेला रूखी रूखी टेहाळणी
दूर गेले घरधनी बाई, दूर गेले धनी



गीतकार: ना. धों. महानोर
गायिका: लता मंगेशकर
संगीतकार: पं. हृदयनाथ मंगेशकर

आतां उजाडेल !

खिन्न आंधळा अंधार
आता ओसरेल पार
लहरींत किरणांची कलाबूत मोहरेल
आतां उजाडेल !

शुभ्र आनंदाच्या लाटा
गात फुटतील आतां
मृदु गळ्यांत खगांच्या किलबिल पालवेल
आतां उजाडेल !

वारा हसेल पर्णांत
मुग्ध हिरवेपणांत
गहिंवरल्या प्रकाशी दहिंवर मिसळेल
आतां उजाडेल !

आनंदात पारिजात
उधळील बरसात
गोड कोवळा गारवा सुगंधांत थरालेल
आतां उजाडेल !

फुलतील नकळत
कळ्यांतले देवदूत
निळा-सोनेरी गौरव दिशांतून उमलेल
आतां उजाडेल !

निळें आकाश भरून
दाही दिशा उजाळून
प्रकाशाचें महादान कणाकणांत स्फ़ुरेल
आतां उजाडेल !

आज सारें भय सरे
उरीं जोतिर्मय झरे
पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल
आतां उजाडेल !

- मंग॓श पाडगांवकर ,
मुंबई ८-७-५०

पावसा

पावसा रे किती आसवे मागतो
मी किती द्यायचे का असे वागतो …..?

मेघ पेंगायला लागले सावना
चंद्र मेघांतला का तरी जागतो ??

काळजाची व्यथा बोललो ना कुणा
थेंब होऊन ये मी तुला सांगतो !!!

पावसाच्या सरी कोसळू लागता
मी कशाला तुझ्या भोवती रांगतो ?

तू भिजूही नको एवढी साजणी
तोल माझा गडे बघ ढळू लागतो !!!


कवी - अभिजीत

खोपा

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

जडाच्या जांभया

रडण्याचेंही बळ नाही;
हसण्याचेही बळ नाही;
मज्जा मेली; इथें आतां
जीवबाची कळ नाही.

संस्कृतीला साज नाही.
मानवाला माज नाही;
आज कोणा, आज कोणा,
जीवनाची खाज नाही.

इथें आतां युद्ध नाही;
इथें आतां बुद्ध नाही;
दु:ख देण्या, दु:ख घेण्या
इथे आतं शुद्ध नाही.

भावनेला गंध नाही;
वेदनेला छंद नाही;
जीवानाची गद्य गाथा
वाहतें ही; बंध नाहीं!

चोर नाही; साव नाही;
मानवाला नांव नाही;
कोळ्शाच भाव तेजीं
कस्तुरीला भाव नाही.

जागतें कैवल्या नाही;
संशयाचे शल्य नाही;
पापपुण्या छेद गेला.
मुक्ततेला मूल्य नाही.

जन्मलेल्या बाप नाही;
संचिताचा ताप नाही;
यापुढे या मानवाला
अमृताचा शाप नाही.

जाणीवेची याच साधी
राहिली मागें उपाधीं;
– या जडाच्या जांभया हो
ना तरी आहे समाधी!


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - मृद्‌गंध
- कागल, २१ सप्टेंबर ५०

राजसा

राजसा…
जवळी जरा बसा
जीव हा पिसा
तुम्हावीण बाई
कोणता करू शिणगार
सांगा तरी काही.
त्या दिशी करुन दिला विडा
टिचला माझा चुडा
कहर भलताच
भलताच रंगला कात
लाल ओठात.

राजसा
जवळी जरा बसा….
ह्या तुम्ही शिकविल्या खुणा
सख्या सजणा
देह सटवार
सोसता न येइल अशी
दिली अंगार.

राजसा
जवळी जरा बसा….
मी ज्वार नवतीचा भार
अंग जरतार ऐन हुरड्यात
तुम्ही नका जाऊ साजणा
हिवाळी रात.

राजसा
जवळी जरा बसा….


- ना.धों.महानोर

माझं इठ्ठल मंदीर

माझं इठ्ठल मंदीर
अवघ्याचं माहेर
माझं इठ्ठल रखूमाई
उभे इटेवर

टाय वाजे खनखन
मुरदुगाची धुन
तठे चाललं भजन
गह्यरी गह्यरीसन

टायकर्‍याचा जमाव
दंगला दंगला
तुकारामाचा अभंग
रंगला रंगला

तुम्ही करा रे भजन
ऐका रे कीर्तन
नका होऊं रे राकेस
सुद्ध ठेवा मन

आता सरला अभंग
चालली पावली
‘जे जे इठ्ठल रखूमाई
ईठाई माऊली’

शेतामंधी गये घाम
हाडं मोडीसनी
आतां घ्या रे हरीनाम
टाया पीटीसनी

उभा भक्तीचा हा झेंडा
हरीच्या नांवानं
हा झेंडा फडकावला
‘झेंडूला बोवानं’

आतां झाली परदक्षीना
भूईले वंदन
‘हेचि दान देगा देवा’
आवरलं भजन

आतां फिरली आरती
भजन गेलं सरी
‘बह्यना’ देवाचीया दारीं
उभी क्षनभरी


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

तुला लागतो चहा , मला लागते कॉफ़ी
तुला नाही आवडत मी ऊलटी घातलेली टोपी
तुला वाजते थंडी , मला होतं गरम
तू आहेस लाजाळू , मी अगदीच बेशरम
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

झोपतेस तू लवकर आणि उठतेस पहाटे
आवडत नाही तुला बॉक्सिंग आणि कराटे
मी मात्र झोपतो बाराच्या नंतर
रविवारी नसतं क्रिकेटशिवाय गत्यंतर
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

फ़िरायला आवडतं , आवडतं तुला शॉपिंग
कपड्यांबद्दल बोलतेस अगदी विदाऊट स्टॉपिंग
मला मात्र खरेदीचा येतो कंटाळा
कळत नाही रंग राखाडी आहे की काळा
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

घालतो मी शर्ट इस्त्री न करता
जाऊन येतो एकटाच इतरांच न ठरता
तू मात्र बघतेस मैत्रिणींची वाट
बाहेर निघताना नखरे सतराशे साठ
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

मला नसतात लक्षात वाढदिवसाच्या तारखा
जातो बाजाराला पण काम विसरतो सारखा
तुला मात्र आठवते पाचवीतली मैत्रिण
बारीक तुझी नजर , डोळे आहेत की दुर्बीण?
तुझं आणि माझं जमणार तरी कसं?

एक सांगू का तुला ?
हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण?
ऊन आणि सावली राहतात ना जसं
तुझं आणि माझं जमेल का तसं?

त्याच वाटेने येणं झालं माझं

हो…………… त्याच वाटेने येणं झालं माझं
चुकून चुकलेल्या शब्दांनी बोलणं झालं माझं ………
काय करू ? अजुनही मी तिथेच आहे थांबुन
माझ्या डोक्यावर तसेच ढग ओथम्बुन …………
दुखाने भरलेले ………आठवणीने शाहारलेले……..

कितीदा वाटलं की आता असंच दूर जावं निघून खूप
जिथे तुझी सावलीही दिसणार नाही मला
आणि जिथे तुझा स्पर्श झालेला वाराही पोहोचणार नाही
पण झाले नाही असे कारन त्या क्षणीही माझा हात तुझ्या हातात होता
………………………………….……. तुझ्या स्पर्शाने भारलेला

दूर जाताना तू माझा हात धरलास
जाऊ नकोस मला एकटा टाकुन डोळ्यात पाणी आणून म्हणालास
मी तशीच अजुन स्तब्धं त्याच वाटेवर तिथेच
माझा हात धरून तू उभा ………..आणि मी तुझ्याकडे बघताना
हतबल आणि ……….मी तशीच

तुमचं काही…माझं काही

मी वेगळ्या लहरीत कविता करतो
तुम्ही वेगळ्याच लहरीत कविता वाचता
मी माझे विचार कवितेत भरतो
तुम्ही तुमच्या जिवनाशी संदर्भ शोधता
मी माझ्या स्वार्थासाठी कविता करतो
तुम्ही कवितेला तुमचा अर्थ देता

म्हणूनच म्हणतो की,

मी एकांतात कविता करतो
तुम्ही एकांतातच वाचाव्या
एकांतात वाचता वाचता
वेग-वेगळ्या अंगाने पहाव्या

माझ्या कविता आहेत,
विचारांकडे जाण्याचे विमान….यात बसाल का?
या आहेत,
न संपणारी दलदल….यात फसाल का?

आहेत कविता दुरध्वनिसारख्या,
आवाज ऐकू येतो पण
विचार कळतातच असे नाही
शब्द हलके-जड कळतात
भावनांचा उतार-चढाव कळतोच असे नाही

शेवटी काय….भाषा सोडा,
विचारांकडे तेवढे लक्ष द्या
मला तसे कमीच समजते
तुम्ही मात्र समजून घ्या!

पोया (पोळा)

आला आला शेतकर्‍या
पोयाचा रे सन मोठा
हातीं घेईसन वाट्या
आतां शेंदूराले घोटा

आतां बांधा रे तोरनं
सजवा रे घरदार
करा आंघोयी बैलाच्या
लावा शिंगाले शेंदुर

लावा शेंदूर शिंगाले
शेंव्या घुंगराच्या लावा
गयामधीं बांधा जीला
घंट्या घुंगरू मिरवा

बांधा कवड्याचा गेठा
आंगावर्‍हे झूल छान
माथां रेसमाचे गोंडे
चारी पायांत पैंजन

उठा उठा बह्यनाई,
चुल्हे पेटवा पेटवा
आज बैलाले नीवद
पुरनाच्या पोया ठेवा

वढे नागर वखर
नहीं कष्टाले गनती
पीक शेतकर्‍या हातीं
याच्या जीवावर शेतीं

उभे कामाचे ढिगारे
बैल कामदार बंदा
याले कहीनाथे झूल
दानचार्‍याचाज मिंधा

चुल्हा पेटवा पेटवा
उठा उठा आयाबाया
आज बैलाले खुराक
रांधा पुरनाच्या पोया

खाऊं द्या रे पोटभरी
होऊं द्यारे मगदूल
बशीसनी यायभरी
आज करूं या बागूल

आतां ऐक मनांतलं
माझं येळीचं सांगन
आज पोयाच्या सनाले
माझं येवढं मांगन

कसे बैल कुदाळता
आदाबादीची आवड
वझं शिंगाले बांधतां
बाशिंगाचं डोईजड

नका हेंडालूं बैलाले
माझं ऐका रे जरासं
व्हते आपली हाऊस
आन बैलाले तरास

आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देनं
बैला, खरा तुझा सन
शेतकर्‍या तुझं रीन !


- बहीणाबाई चौधरी

पिलोक ( प्लेग )

पिलोक पिलोक
आल्या पिलोकाच्या गाठी
उजाडलं गांव
खयामयांमधीं भेटी

पिलोक पिलोक
जीव आला मेटाकुटी
भाईर झोंपड्या
गांवामधीं मसन्‌वटी

पिलोक पिलोक
कशाच्या रे भेठीगांठी !
घरोघरीं दूख
काखाजांगामधीं गांठी

पिलोक पिलोक
आतां नशीबांत ताटी
उचलला रोगी
आन् गांठली करंटी

कवयित्री – बहिणाबाई चौधरी

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
नशीबीं दगड गोटे
काट्याकुट्याचा धनी
पायाले लागे ठेंचा
आलं डोयाले पानी
वरून तापे ऊन
आंग झालं रे लाही
चालला आढवानी
फोड आली रे पायीं
जानच पडीन रे
तुले लोकाच्या साठीं

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
दिवस ढयला रे
पाय उचल झट
असो नसो रे तठी
तुझ्या लाभाची गोट
उतार चढनीच्या
दोन्हि सुखादुखांत
रमव तुझा जीव
धीर धर मनांत
उघडूं नको आतां
तुझ्या झांकल्या मुठी

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
‘माझेज भाऊबंद
धाईसनी येतीन!’
नको धरूं रे आशा
धर एव्हढं ध्यान
तुझ्या पायानें जानं
तुझा तुलेच जीव
लावीन पार आतां
तुझी तुलेच नाव
मतलबाचे धनी
सर्वी माया रे खोटी

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !
वार्‍याचं वाहादन
आलं आलं रे मोठं
त्याच्यातं झुकीसनी
चुकुं नको रे वाट
दोन्ही बाजूनं दर्‍या
धर झुडूप हातीं
सोडूं नको रे धीर
येवो संकट किती
येऊं दे परचीती
काय तुझ्या ललाटीं

वाटच्या वाटसरा, वाट बिकट मोठी !

उपननी उपननी

उपननी उपननी
आतां घ्या रे पाट्या हातीं
राहा आतां उपन्याले
उभे तिव्हारीवरती

चाल ये रे ये रे वार्‍या,
ये रे मारोतीच्या बापा
नको देऊं रे गुंगारा
पुर्‍या झाल्या तुझ्या थापा

नही अझून चाहूल
नको पाडूं रे घोरांत
आज निंघाली कोनाची
वार्‍यावरती वरात ?

ये रे वार्‍या घोंघावत
ये रे खयाकडे आधीं
आज कुठें रे शिरला
वासराच्या कानामधी !

भिनभिन आला वारा
कोन कोनाशीं बोलली ?
मन माझं हारखलं
पानं झाडाची हाललीं !

वारा आलारे झन्नाट्या
झाडं झुडपं डोललीं
धरा मदनाच्या पाट्या
खाले पोखरी चालली

देवा, माझी उपननी
तुझ्या पायी इनवनी
दैवा, तुझी सोपवनी
माझ्या जीवाची कारोनी


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

पह्यला पाऊस

आला पह्यला पाऊस
शिपडली भुई सारी
धरत्रीचा परमय
माझं मन गेलं भरी

आला पाऊस पाऊस
आतां सरीवर सरी
शेतं शिवारं भिजले
नदी नाले गेले भरी

आला पाऊस पाऊस
आतां धूमधडाख्यानं
घरं लागले गयाले
खारी गेली वाहीसन

आला पाऊस पाऊस
आला लल्‌करी ठोकत
पोरं निंघाले भिजत
दारीं चिल्लाया मारत

आला पाऊस पाऊस
गडगडाट करत
धडधड करे छाती
पोरं दडाले घरांत
आतां उगूं दे रे शेतं

आला पाऊस पाऊस
वर्‍हे येऊं दे रे रोपं
आतां फिटली हाऊस
येतां पाऊस पाऊस

पावसाची लागे झडी
आतां खा रे वडे भजे
घरांमधी बसा दडी

देवा, पाऊस पाऊस
तुझ्या डोयांतले आंस
दैवा, तुझा रे हारास
जीवा, तुझी रे मिरास

कवयित्री – बहिणाबाई चौधरी

त्याचा पाऊस तिचा पाऊस

त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो.
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.

मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.

पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.

पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.

पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.

दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं

पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते.

रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात


कवी- सौमित्र

पाऊस

पावसाच्या धारा येती झरझरा
झांकळलें नभ, वाहे
सोंसाट्याचा वारा

रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले
जळ

ढगावर वीज झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया
साज

झोंबे अंगा वारे काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली
पाखरें

हर्षलासे फार नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून
खार

पावसाच्या धारा डोईवरी मारा
झाडांचिया तळी गुरे शोधिती
निवारा

नदीलाही पूर लोटला अपार
फोफावत धांवे जणू नागीणच
थोर

झाडांची पालवी चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें
रंगदार छबी

थांबला पाऊस उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी
प्रकाश

किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें
वस्तुजात खुले

सुस्नात जाहली धरणी हांसली,
वरुणाच्या कृपावर्षावाने
सन्तोषली


कवियत्री - शांता. शेळके

पाऊस

गार वारा हा भरारा, नभं टिपूस टिपूस
रानी वनी, पानोपानी, मन पाऊस पाऊस

माती खाली खोल खोल, ओल मातीच्या मनास
मातीवर थरथरे, ओला सुवास सुवास

पावसाळी पायवाटा, जरा उदास उदास
दाही दिशांत पाखरे, जणू आभास आभास

रान मोकळे मोकळे, बघे भारुन नभास
त्याचा हिरवा हिरवा, आज प्रवास प्रवास


गीतकार : सौमित्र
गायक : सौमित्र
संगीतकार : मिलींद इंगळे
चित्रपट : गारवा

पाऊस

आता आत बाहेर जळत रहातो पाऊस
पुन्हा जखमा ओल्या करत रहातो पाऊस

तुझ्या आठवात कधी तुझ्या विचारात
गाणं तेच तेच म्हणत रहातो पाऊस

चाहूल न लागे , जोवर तुझ्या पावलांची
कसा नभातच झुरत रहातो पाऊस

किती तुज स्पर्शिल्या, अन किती पळ हुकल्या
हिशेब धाराधारांचा करत रहातो पाऊस

तुला न्यायचे पार त्या ढगांचा गावी
कल्पनेत आतल्या आत भिजत रहातो पाऊस

पण पाहुन तव हात , हातात माझ्या
कसा डोंगरा आडूनच परत जातो पाऊस

सोडून तू गेलीस मज, त्या दिवसापासून
मृगातच हस्तासारखा पडत रहातो पाऊस

तुला निभवता नाही आले प्रेम त्या फुलाचे
चिखल चेहर्यावर उडवत रहातो पाऊस

अरे आता बरसणे नाही रे पूर्विसारखे
पांपण्यांवर मेघ ठेवून रडत रहातो पाऊस

आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
न सांगता तुझ्या भेटीला यायला …
धुंद होऊन तुझ्यावर बरसायला …
केसांमधून पाठीवर हळुवार ओघळायला …
अंगावरच्या काट्यांची वाट तुडवायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
गंध होऊनी श् वासात तुझ्या मिसळायला …
श् वासातल्या उबेत मनसोक्त डुंबायला …

काळ्या ढगांमधून पळून यायला …
अलगद तुझ्या कुशीत शिरायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
नकळत हृदयात तुझ्या शिरायला …
हृदयात मेणाचं एक खोपडं बांधायला ..

तुझ्या स्वप्नात येऊन तुला जागवायला ..
काळजाचा तुझ्या वेध घ्यायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
हातात हात घालून तुझ्या रानोमाळ हिंडायला …
पंखात तुला घेऊन भरारी घ्यायला …

आठवण बनून तुझ्या डोळ्यात उतरायला …
अश्रूंमध्ये आनंदाची साखर मिसळायला …
आवडेल मलाही पाऊस व्हायला …

आवडेल मलाही पाऊस व्हायला …
एकट्या मनाची सोबत करायला …
कोणाच्यातरी चेहऱ्यावरचं हसू व्हायला …

भाळशील का तू माझ्या या रुपाला
सांग ना जमेल का तुला साथ द्यायला …
तरच आवडेल मला पाऊस व्हायला …

पाऊस असा रुणझूणता

पाऊस असा रुणझूणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊस भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली …

ओले त्याने दरवळले अस्वस्थ फुलांचे घोस
ओलांडून आला गंध , निस्तब्ध मनाची वेस
पाऊस असा रुणझूणता

पाउस सोहला झाला , पाउस सोहला झाला
कोसळत्या आठवणीचा
कधी उधाणता
अन केव्हा संथ थेम्बंच्या संथ लयीचा
..
नभ नको नको म्हणताना
पाउस कशाने आला
गात्रातून स्वच्छंदी अन
अंतरात घुसमटलेला..
पाऊस असा रुणझूणता
पैंजणे सखीची स्मरली
पाऊस भिजत जाताना
चाहूल विरत गेलेली..

पाऊस कधीचा पडतो…

पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने

डोळयात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती
दुःखाचा उतरला पारा, या नितळ उतरणी वरती

पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला
तार्‍यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला

संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनार्‍यावरती लाटांचा आज पहारा


कवि - ग्रेस

खरा तो एकची धर्म

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे


- साने गुरूजी

गर्ल्फ़्रेंड नसल्याचा आभीमान

आम्च्या बाईक च्या मागच्या सीट वर धूळ नेहमीच असते
बसुन बसुन त्यावर एखादा संटा,तर कधी एखादी माशीच बसते
आणी बाईक पुसण्याचे आम्ही काधिच श्रम घेत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

सीनेमा बघायला आम्ही गॅंग मधे जातो
मस्त एक बास्केट पोपकोर्न तास भर खातो
आणी बूड्ढि का बाल चा चिक्कट.वाडा काधिच घ्यावासा वाट्त नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

वीकएंड्ला आऊटींग कर.तो, फ़क्कत मित्रांबरोबर् च घालवतो
काही नाही तर मसऽत झोपा काढ्ड.तो
आणी रात्री बे रात्री काधिच कोणाला SMS करत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

आमचे मोबाईल चे बिल फ़ार जास्त येत नाही,
दिवस भरात २-४ कॉल होतात, जे फ़क्कत घरी कींवा मीत्रांना असतात,
आणी आमचा फोन कधीच जास्त एंगेज येत नाही
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

मित्रांच्या सगळ्या प्लान मध्ये आम्ही शामील असतो,
कधीच दुसर्यांच्या प्लान्स मध्ये तोंड घालत नाही,
सुट्टी आम्हाला कधीच एकांतात घालवावीशी वाटत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

लोकांना टाळयायला आमच्या कडे बहाने नसतात,
आमचे तर बूवा अड्डे सगळ्याननाच माहीत असतात,
अणी ठरल्या वेळेत तिथे जाणे जिवावर आले, तर त्याचा काहीच फ़रक पड्त नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

सुट्ट्या आणि एक तारखे शिवाय फ़ार से कॅलेंडर चे महत्व नसते,
बाकी लकश्यात ठेवण्या सारखी दोघा-चौघांची बर्थडेत असते,
बाकी तारखा लक्ष्यात ठेवायची आम्हाला गरजच भासत नाही,
कारण , आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

आमचे रेस्टॉरंट चे बील्स फ़ार मोठे नसतात,
टपरी वरच्या कॉफ़ीतच जस्त गप्पा रंगतात,
अणी सि.सि. डि त जायची कधी गरजच भासत नाही,
कारण आम्हाला गर्ल्फ़्रेंड नाही…!

बघीतलं नां, गर्ल्फ़्रेंड नसल्याचे बरेच फ़ायदे असतात,
तरी साले सगळे गर्ल्फ़्रेंड साठीच रडतात,
सांगा कोणी त्यांना, पांढरे हत्ती. फ़ार कामाचे नाही,
आणि अजून तरी आमचा यावरचा अभीमान गेलेला नाही,
कारण आम्हाला अजून तरी गर्ल्फ़्रेंड नाही…!

कुत्र्याकरीता

एक बाई आपल्या कुत्र्याला दुध पिण्याकरिता स्टेनलेस स्टीलची थाळी विकत घ्यावी, म्हणुन दुकानात गेल्या. दुकानदाराने थाळी बांधून देतांना विचारले की, त्यावर कुत्र्याकरीता अशी अक्षरे टाकून देऊ का?

बाई उत्तरल्या, ” त्याची जरूरी नाही. कारण आमचे हे दूध पीत नाहीत आणि कुत्र्याला वाचता येत नाही.”

साफ्टवेयर इंजिनियर

एक छोटी मुलगी तिच्या आजीला विचारतो ., ” आजी , आजी . एक स्त्री आणि एक पुरुष रोज रात्री आपल्या घरी येतात आणि सकाळी पुन्हा गायब होवून जातात ……..ते कोण आहेत ? “
.
.
.
.
आजी : ” हे देवा, हे तुझ्या लक्षात आले तर ……. ते तुझे आई वडील आहेत आणि दोघे पण साफ्टवेयर इंजिनियर आहेत “

जोक चा भावार्थ फार विचार करायला लावणारा आहे……….

पुणेरी गर्लफ्रेंड चि वैशिष्ठे !!

1. आपण तिला गर्लफ्रेंड म्हणून सर्वांशी ओळख करून दिली कि ती रागावते . :/

2. जर आपण पब्लिक मध्ये तिला मिठी मारली किंवा पकडले तर ती जोरात जन-गण-मन म्हणायला सुधा सुरवात करते .

3. आपण तिच्या आईला “मावशी” किंवा “काकू” बोलू शकतो.

4. जेव्हा ती दुखी असते तेव्हा ती “काही नाही झाले” म्हणून सांगते आणि आपल्याकडे बघत राहते.

5. तिच्या लहानपनीच्या फोटोस मध्ये किमान एका तरी फोटो मध्ये तिने परकर-पोळका घालून तिने फोटो काढलेला असेल.

6. एकदम जोरात पाऊस कोसळत असेल आणि विजा चमकत असतील तरीही ती फिल्म मध्ये मुली कशा मिठी मारतात त्याप्रकारे ती बिलकुल मिठी मारणार नाही.

7. जर आपल्याला तिच्या वडिलांनि कुठे बाहेर फिरायला बोलावले असेल तर ती जागा नक्कीच एक नाट्यंदीर असते आणि तिथे “संगीतनाट्य” हाच कार्यक्रम असतो.

8. जर आपण तिला एका गार्डन मध्ये कामानिमित्त भेटायला बोलावल असेल तरीहि ती त्याला एक “डेट”चं समजनार.

9. तिला कोणी जर आपल्याबद्दल विचारले तर ती लाजते .

10. ती जीन्स किंवा टी-शर्ट घालणे आवडत नाही पण हे सर्व आपल्याला आपल्या करीअर् घडवायचे असेल तर त्या रुपामध्ये दिसणे आवश्यक असे असे मानून ती ते कपडे घालते.

11 तिला आजही त्या शाळेतील लहानपणीच्या कविता आठवतात .

12. ती नेहमीच “अमके सर् ,तमके सर् ” बद्दल बोलत असते त्यांचे किस्से सांगत असते आणि आपण मनातल्या मनात त्या साराची आई बहिण एक करत असतो.

13. रक्षाबंधन च्या दिवशी ती तुमच्या आसपास पण दिसणार नाही .

14. तुम्ही आणि तिचा भाऊ कधीच मित्र बनू शकणार नाही .

15. घरी जर तिने किंवा तिच्या आईने जर आपल्या आवडतीचा पदार्थ बनवलेला असेल तर ती नक्कीच डब्यात घेवून येते .

16. चतुर्थीच्या दिवशी ती तुम्हाला फक्त दगडूशेठ हलवाई गणपती किंवा तळ्यातला गणपतीच्या इथे भेटायला बोलावेल .

17. आपण तिच्याबरोबर एकदा तरी तुळशी बाग ला गेलेलो असणार पण ती आपल्याबरोबर कधीही तुळशी बाग ला यायला राजी होत नाही .

18. ति एम.जी.रोड पेक्षा लक्ष्मी रोड जवळ यायला तयार होते .

19. मुली वापर करतात ते काही खास शब्द :
__ १.ईश….
___२.वात्रटच आहे मेला .
____३.आता हि कोण बया?
____४.चल ना रें .
____५.गेलास उडत .
____६.नाहीतच मुळी .
____७.माझी आई रागावेल रें .
____८.आता हा काय नवीन अवतार?
____९.येडा झालायस कि काय?
____१०.त्या जोशी काकू सांगत होत्या .
____११.काय हे वेंधलाच आहेस
____१२.माझ्या भावाला कि नाही
____१३.माझ्या त्या मैत्रिणीकडे ना हे आहे ,ते आहे …..
____१४.आईशपथ

अशी आहे आमची पुणेरी गर्लफ्रेंड चि वैशिष्ठे

एका मराठमोळ्या बाईची दैनंदिन संभाषणं…

दुधवाल्यासोबत- क्या भैय्या… आज कल आप दुध में बहोत पाणी ‘मिसळ’ रहे हो.. ये दुध की चाय एकदम ‘पाणचट’ बनती है फिर हमारे ये सुबह सुबह ‘खेकसते’ है मेरे पे …

भाजीवाल्यासोबत-
बाई- कैसे दिया भाजी..
भाजीवाला- जी ये आलू १२ रु., बैंगन १६ रु. और शिमला मिर्च १० रु. पाव…
बाई- सोळा रु. के वांगे !! क्या भैय्या.. रोजके ‘गिऱ्हाईक’ होकेभी जास्ती भाव लागते.. तुमसे तो वो ‘कोपरेवाले’ भैय्या सस्ता देते.. चलो.. पावशेर ‘ढोबळी’ मिरची और आतपाव आलं-लसून दो…

रिक्षावाल्यासोबत-
रिक्षावाला- हां madam .. ये आ गया आपका विठ्ठलनगर..
बाई- अरे नई नई यहा नई.. वो आगे वो ‘चिंचेका’ झाड दिखता है ना वहासें ‘उजवीकडे वळके’ थोडा आगे…
रिक्षावाला- अरे madam .. २० रु. मै यहा तक ही आता…
बाई- क्या आदमी हो… अरे कुछ ‘माणुसकी’ है की नही… थोडा आगे छोडोंगे तो क्या ‘झीझेंगा’ क्या तुम्हारा रिक्षा..

शेजारच्या हिंदी भाषी बाईसोबत-
बाई २- अरे भाभीजी आप मुझे वो मुंगफली की चटणी बनाना सिखाने वाले थे… मेरे बेटेको बहोत पसंद है…
बाई- अरे ‘वैणी’ एकदम ‘सोपी’ है… पेहले शेंगदाणे लेके उसका एकदम बारीक ‘कुट’ करनेका और फिर उसमे जीरा, आलं-लसून और तिखट डालके उसको ठीकसे ढवळ लेनेका… और झणझणीत चटणी तैय्यार………. !

चाललो

चाललो तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो 
 मी बीज सावल्यांचे पेरीत चाललो 

वैराण माळ उघडा बेचैन तळमळे 
 मी दान आसवांचे फेकीत चाललो 

आव्हेरुनी फुलांची अनिवार आर्जवे 
 काटेकुटे विखारी वेचित चाललो 
 
दाही दिशांत वेडा वैशाख मातला 
मी बाण चंदनाचे पेरीत चाललो 

ये कोरड्या गळ्यात हा सूर कोठला 
मी तार वेदनेची छेडित चाललो 


 कवी - सुधीर मोघे

मरवा

पुस्तकांतली खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे;
पिसाहुनि सुकुमार कांहिसे
देतां घेतां त्यांत थरारे.

मेजावरचे वजन छानसे
म्हणुन दिला नाजूक शिंपला;
देतां घेतां उमटे कांही
मिना तयाचा त्यावर जडला.

असेच कांही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा;
देतां घेतां त्यातं मिसळला
गंध मनांतिल त्याहुन हिरवा.


कवियत्री - इंदिरा संत

भाषा

अर्थ शब्दांचे कसे "नाही" म्हणावे
जे तुझे आहे कसे "नाही" म्हणावे
मी तुझ्यापाशी न आलो मागण्याला
लाभले जे ते कसे "नाही" म्हणावे
संपुनी गेला जरी सहवास अपुला
श्वास दरवळते कसे "नाही" म्हणावे
कोवळीशी भेट त्या कवळ्या क्षणांची
तन कवळले ते कसे "नाही" म्हणावे

कालची भाषा जरी वरवर समजली
खोलवर घुसले कसे "नाही" म्हणावे
गात आहे मी मनोमन गीत नामा
दाटले सारे कसे "नाही" म्हणावे

आता माझ standard वाढु लागलय..

आता माझ standard वाढु लागलय...
एक रुपयाचा विचार करणार मन
आता हजार रुपयेही उडवु लागलय
छोट्या दुकानात घुटमळणार् पाऊल
आता ए.सी शोरूम कडे वळु लागलय्....
कारण
आता माझ standard वाढु लागलय...

पाणीपुरीचा आस्वाद घेणार मन
आता McDonald's चा pizza खाऊ लागलय्
कसाटा खाण्याऱ्या जीभेवर हल्ली
महागड Ice-cream विरघळु लागलय....
कारण
आता माझ standard वाढु लागलय...

"वन रूम kitchen"मध्ये राहणार मन
आता प्रशस्त flatसाठी धडपडु लागलय्
लोकलच्या गर्दित धक्का खाता खाता
आता Mercedes-Benz मधुन स्वारी करु लागलय्....
कारण
आता माझ standard वाढु लागलय...

जे मिळेल त्यात समाधान् मानणार मन
आता थोडं choosy बनु लागलय
स्वप्नात बघितलेल्या दुनियेला खऱ्याआर्थाने
आता प्रत्यक्षाच स्वरुप् येऊ लागलाय्....
कारण
आता माझ standard वाढु लागलय...

तसं तर् गरीबी आणि श्रीमंतीने
समानतेनेच घरी पाणी भरलय..
पण श्रीमंतिपेक्षा गरिबीमुळे जीवनाला
कसं जगायच हे कळलयं...
म्हनुणच ....
कदाचित मनाप्रमाणे अंगातलही बळ वाढलय....
कारण .....
आता माझ standard वाढु लागलय.

स्मशानयात्रा

येथे कुणीच नाही माझ्यापरी दिवाणे
मी गीत गात आहे येथे गुन्ह्याप्रमाणे

दे जीवना मला तू आता नवी निराशा
हे दुःख नेहमीचे झाले जुनेपुराणे!

तेव्हा मला फ़ुलांचा कोठे निरोप आला?
माझे वसंत होते सारे उदासवाणे

सांगू नकोस की, मी तेव्हा जिवंत होतो
तेव्हा जिवंत होते माझे मरुन जाणे

साधीसुधी न होती माझी स्मशानयात्रा..
आली तुझी निमित्ते! आले तुझे बहाणे!


गज़लकार - सुरेश भट

त्याचं-तिचं आज break-up झालंय...

त्याचं-तिचं आज break-up झालंय... काय म्हणता..?
अहो खरंच,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

तुझ्याशिवाय जगणं अन्
मरणंहि नाही,
असलं काहिसं
दोघंहि म्हणायची,,
नको-नको असतांनाही
एकमेकांना तरी बरंच झेललंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

प्रेमाचे भास असतील कदाचित सारे
गोंडस अशा या नात्यातलं
प्रेम पूर्णपणे उतू गेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

खरं प्रेम lifetime असतं,
आज आहे अन् उद्या नाही
असं त्यात कधीच नसतं,,
एकमेकांच्या विश्वासाचं
फूलपाखरू कधीच उडून गेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

तो म्हणतो ती अशीच आहे,
ती म्हणते तोही तसाच आहे,,
सारं काहि असं-तसंच असेल
तर सोबतीचा तुमचा आग्रह का आहे..?
दोघांचं मन एकमेकांसाठी
यापुर्वीच आत्महत्या करून मेलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

काय वाटलं असेल कुणास ठावुक
पण मनाच्या मृत्यूनंतरच्या
अंत्यसंस्काराचं काम मात्र
दोघांनीही यथासांग केलंय,
त्याचं-तिचं आज break-up झालंय...

ती-तिचा नवरा
तो अन् त्याची बायको
चौघांमध्येही तो मात्र तिची
उगाच अशी छेड़ काढणार,
पण गैरसमज नको हं...
कारण, त्याचं-तिचं आज नाही
ब-याच वर्षांपूर्वी break-up झालंय...

सोबतीला चंद्र देते

सोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देते
तू जिथे जाशील तेथे मी तुला विश्वास देते

चांदण्यांच्या पावलांनी मी तुझ्या स्वप्नात आले
या निळ्या बेहोष रात्री मी तुझ्याशी एक झाले
मीलनाला साक्ष होते ते तुला मी श्वास देते

संचिताचे सूर माझ्या एकदा छेडून घे तू
घाल ती वेडी मिठी अन्‌ एकदा वेढून घे तू
जन्मती हे सूर जेथे ते तुला आभास देते

तू कुठेही जा, सुखी हो, चंद्र माझा साथ आहे
गीत माझे घेउनी जा, प्राण माझा त्यात आहे
तृप्तिला हेवा जिचा ती लोचनांची प्यास देते


गीत - मंगेश पाडगावकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर - लता मंगेशकर
मुलगा : आई, तुझा जन्म कुठे झाला ?
आई : पंढरपुरलां
मुलगा : बाबांचां?
आई : नागपुरला .
मुलगा : माझा आणि ताईचा ?
आई : तुझा पुण्याला , ताईचा ठाण्याला .
मुलगा : मग आपण सगळे एकञ कसे आलो ?