संताचे लग्न झाल्यानंतर त्याला अवघ्यात तीन
महिन्यानंतर मुलगा होतो...
संता - तीन महिन्यात मुलगा कसा झाला?
बायको - तुमच्या लग्नाला किती काळ झाला?
संता - तीन महिने
बायको - माझ्या लग्नाला किती झाले?
संता - तीन महिने
बायको - आणि मुलगा किती महिन्यांनंतर
झाला?
संता - तीन महिने
बायको - तर एकूण किती महिने झाले?
संता - ओ तेरी... खरेच नऊ महिन्यानंतर
मुलगा झाला. बघ वेळ कसा जातो समजतच नाही.
दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात..
पहिला: जाऊ दे यार चल आत्महत्या करू…….
.
दुसरा: येडा झाला का भावड्या तू..?
.
.
.
.
.
.
पुढच्या जन्मी परत बालवाडी पासून स्टार्ट करावं लागंल.

स्त्रीचा कान

डॉक्टरांनी एका माणसाला प्लास्टिक सर्जरी करून नवीन कान बसवला...
.
.
पेशंट: डॉक्टर तुम्ही मूर्खआहात का??
तुम्ही मला एका स्त्रीचा कान बसवलाय...!!
.
.
डॉक्टर: दोन्ही मध्ये काही फरक नाही...
ऐकू तर येतंय ना...
.
.
पेशंट: फरक आहे...
मला ऐकू तर येतंय पण काही कळत नाहीये...

आई...

दिवसभर कितीही दंगा केला
तरी मला थोपटल्याशिवाय आई कधी झोपली नाही
घरापासुन दूर आता म्हणूनच कदाचित
शांत झोप कधी लागली नाही

कुणी विचारतं ..
"तुला घरी जावसं वाटत नाही?"
कसं सांगू त्यांना, घरातून निघताना
आईला मारलेली मिठी सोडवत नाही

आई, तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठि डबा करायचा नसतो
तरीहि तू सहा वाजताच उठतेस

तुझ्या हातचा चहा
तुझ्या हातची पोळी
तुझ्या हातची माझी नावडती भाजीही खायला
आता जीभ आसुसली

घरापासून दूर ...
आई जग खूप वेगळं आहे
तुझ्या सावलीत अगदी बिंनधास्त होते
आता रणरणंत ऊन आहे

तू आपल्या पिलांसाठी
सगळं केलंस ...
एक दिवस पिलं म्हणाली, "आई आता आम्हाला जायचंय" ...
आणि तू त्यांना जाऊ दिलंस

पावसाच्या मनातलं.......

पावसाच्या मनातलं मला काही कळत नाही..
तो बरसतोय अन तिची आठवण काही सरत नाही..

त्याला म्हटलं, टळ की लेका,त्रास का देतोस
तुझी रिमझिम तिची चाहूल काही विसरू देत नाही

तो वाफ़ाळता कप, त्या खिडकीतल्या गप्पा
ते ओलेचिंब भिजणे,डोळ्यांना काही हसू देत नाही

म्हणतो आता जादू बघ, अन हसला गडगडाटी
दारावर टकटक झालं अन पाहतॊ तर ती उभी होती
हसली खुदकन अन ओलेतीच येउन बिलगली
आणि ओढतच मला पावसात घेउन गेली

हं, खरंच पावसाचं मला काही कळत नाही
तो सरलाय आता पण तो क्षण काही सरत नाही
तो बरसतोय अन तिची आठवण काही सरत नाही..

व्यथा

खर सांगू , आज काल मी काहीच लिहित नाही
भावनांचा शब्दांशी मेळच जुळत नाही

काहूर आहे मनात अनेक प्रश्नांचे
एकाही प्रश्नाला माझ्या
उत्तरच मिळत नाही

परिस्थिती बदललीय ,
मलाही कळतंय
पण कळलेले सगळेच
अंगी वळत नाही .

आठवांच्या सरींनी
अंग चिंब भिजते
तरीही वास्तव भोवताली जळते
कधी वेळे आधी कधी वेळे नंतर

उमलत्या कळ्या, फुललेली फुले
कुणाला आवडत नाहीत ?
खुडून टाकलेल्या फुलांना मात्र
कुणीच माळत नाही

म्हणूनच आज काल मी काहीच लिहित नाही
म्हणूनच आज काल मी काहीच बोलत नाही


कवी - रसप( रणजीत पराडकर )

माणसं

खोक्यांसारखी माणसं
एकावर एक रचलेली
गंज चढलेले मेंदू
आणि अक्कल पुसलेली

मेंढरांसारखी माणसं
मागे-मागे चालणारी
कंटाळवाणी मंदगती
पडणाऱ्यावर पडणारी..

बगळयांसारखी माणसं
ध्यान लावून बसलेली
दिसतात स्थितप्रज्ञ
मोडता घालण्या टपलेली

गेंड़यांसारखी माणसं
निगरगट्ट बनलेली
सोयर ना सूतक काही
मस्तवाल फुललेली

माणसासारखी माणसं
नावापुरती उरलेली
चिमणीच्या जातीसारखी
दुर्मीळ होत चाललेली.....


कवी - रसप( रणजीत पराडकर )

वाईट असते

एक आयुर्वेदिक गझलमाफीचा साक्षीदार
॥ ॐ धन्वंतरये नमः ॥

मध्यरात्री जागणे वाईट असते
अन दुपारी झोपणे वाईट असते

सारखे रागावणे वाईट असते
सारखे वैतागणे वाईट असते

दूध अन फळ मिसळणे वाईट असते
फ्रीजचे पाणी पिणे वाईट असते

चिप्सपिझ्झे चापणे वाईट असते
कोकपेप्सी ढोसणे वाईट असते

दूध घेणे टाळणे वाईट असते
अन चहाकॉफी पिणे वाईट असते

प्रौढ स्त्रीला सेवणे वाईट असते
अन स्वतःशी खेळणे वाईट असते

यौवनाने माजणे वाईट असते
वृद्धपण नाकारणे वाईट असते

सप्तधातू बिघडणे वाईट असते
दोषतिन्ही बिनसणे वाईट असते

आळसाने लोळणे वाईट असते
नित्यकर्मे टाळणे वाईट असते

देह शाश्वत समजणे वाईट असते
आत्मबुद्धी विसरणे वाईट असते

जेव्हा कधी......

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील
तुला माझी आठवण होईल
तुझ्याही डोळयांत तेव्हा
माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल

आठवणी जेव्हा माझ्या
तुला एकांतात कवटाळतील
तुझ्याही नजरा तेव्हा
माझ्या शोधात सैरावैरा पळतील

जेव्हा त्याला प्रेमाने बघशील
तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा-या तुझ्या नजरेत
तेव्हा फक्त मी असेन...

तेव्हा तुला माझे शब्द पटतील
तुझ्याही नजरेत तेव्हा...
माझ्यासाठी अश्रू दाटतील....

माझ्यासाठी रडणारे ते अश्रू
तेव्हा तुझ्यावरच हसतील
कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना
ते ओठ तेव्हा माझे नसतील...!!!

एक प्रश्न...?

एक दिवस मी तिज विचारले
माझ्या संगे येशील का?

माझ्या सुंदर स्वप्न नगरीत
भरभरुन साथ देशील का?

एका माझ्या हाकेवर धावत तु येशील का?
वाटले कधी एकटे तर कवेत मज घेशील का?

मोठया तुझ्या या मनात थोडीशी जागा देशील का?
न सांगताच माझ्या भावना तु समजुन घेशील का?

रस्त्यावर चालताना प्रेमळ सावली देशील का?
भरलेल्या मनाचे अश्रु ओंझळीत तु घेशील का?

गेला कधी तोल तर हळुच सहारा देशील का?
लागली कधी भुक तर प्रेमळ घास भरवशील का?

जीवनाच्या अंधारात प्रकाश तु होशील का?
प्रकाशाने त्या जीवन तेजोमय करशील का?

चुकलो कुठे प्रेमाने धपाटा मज देशील का?
सतत येणा-या वाद्ळांना लढायला मला लावशील का?

ह्या प्रश्नाची उत्तरे मज कधी मिळतील का
अनुत्तरीत प्रश्नांची तुच उत्तरं होशील का?

सरते शेवटी एकच वचन मज देशील का?
माझ्या जाण्याच्या घडीला दोन अश्रु ढाळशील का?

तु निघुन गेलीस

तु निघुन गेलीस
कळलेच नाही जाताना
जगच बदलेल माझे
कळले नाही तुझ्याकडे बघून हसताना........

रडू नकोस उगीच
चांगले नाही ते जाताना
माझे रडणे राहूनच गेले
तुला सगळे समजावताना............
आभाळं भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही
उगीचच कारण नसताना...........

अजूनही जातो त्याच बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना............

झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना............

माहीत नाही पुन्हा कधी भेटु
वेगळ्या रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना............

विषय शोधावे लागतील आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील का गं
पुन्हा एकत्र असताना..................

शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग तु
सोडुनच जायचे असताना.............

सोन्यासारखा संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना......

कधीतरी अशीच.....!

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...

कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...

कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...

कधीतरी असा एक दिवस येइल,
प्रेमापोटी मझ्या तू परत येशील...
पण तेंव्हा या प्रेमाला अर्थ नसेल,
कारण तेंव्हा मी या जगीच नसेन...

कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...

माझे गांव, माझे जग...!

जातोच आहेस गावाकडे
तर वेशीवरच्या संह्याद्रीला सांग नमस्कार माझा,
म्हणांव, तु ढाल होऊन उभा आहेस तीथे
म्हणूनच लढतोय इथे मावळा तुझा...

वेशीवरनं एस टी आत वळेल,
अलगद, अदखळत माझ्या गावात घुसेल,
माझे गांव, माझे जग
साऱ्या डोळ्यांनी टीपून घे,
कण कण साचवून शीदोरी बांधून घेऊन ये...

जातोच आहेस गावाकडे
तर माझ्या घरीही जाऊन ये,
दारात माज़े मुके जनावर असेल माझी वाट बघत,
थोपट त्याला प्रेमाने अन
येतोय म्हणून सांगून ये..

घरी माझी आई असेल,
तीला म्हणांव काळजी घे..
साचलीच माझी आठवण डोळ्यांत तीच्या,
तर ती माया थेंबभर घेउन ये.

थोरला भाऊही भेटेल माझा,
काही बोलू नकोस, वाकून नमस्कार कर,
त्याच्या पायाखालची चीमुट्भर धूळ घेऊन ये,
येवढं माझं काम कर....

जातोच आहेस गावाकडे
तर लवकरच परतून ये,
दूर इथे मी हळवा व्याकूळ,
गावाकडचे सुख तेवढे घेउन ये.

ज्या ज्या वयात जे जे करायचं

ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

लहानपणी ... फुलपाखरांच्या मागं धावायचं
तरुण वयात 'पाखरांच्या' मागं धावायचं
प्रौढ वयात कुटुंबासाठी धाव धाव धावायचं
म्हातारपणी देवाचं नाव घेत गप पडून रहायचं...
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

लहानपणी ऊन वारा पावसामधे मनमुराद बागडायचं
तरुणपणी प्रत्येक श्वासात मोगरा घेऊन जगायचं
प्रौढ वयात आपल्या भोवती नंदनवन फुलवायचं
म्हातारपणी त्याच बागेत निव्रुत्त मनानं रमायचं
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

लहानपणी खेळातलं भांडण जिथल्या तिथं मिटवायचं
तरुणपणी मोर्चे न्यायचे, आंदोलनसुद्धा करायचं
प्रौढ झाल्यावर आपल्या सगळ्या तक्रारींची मुळं शोधत रहायचं
उतारवयात सार्या मुळांना गीतेत बुडवून टाकायचं
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

तरीही काही गोष्टी प्रत्येक वयात जमायला हव्यात
पहिल्या पावसाच्या पहिल्या धारा अंगावरती झेलायला हव्यात
वार्यासोबत पिसासारखं हलकं होता यायला हवं
गडगडणार्या मेघासारखं बोलकं होता व्हायला हवं
अंधाराच्या गर्भामध्ये ज्योत ठेवता यायला हवी
एकटं खूप वाटतं तेंव्हा गाणी म्हणता यायला हवी
कुठ्ल्याही वयात आपला आनंद आपणच शोधत रहायचं...

तरीही...
ज्या ज्या वयात जे जे करायचं
त्या त्या वयात ते ते करायचं !

जुन्या पाऊलखुणा

शब्दांचा वाटु लागतो आधार तेव्हा ,
मनात उठु लागतात भावनांचे काहूर जेव्हा,

नाही ऐकत जेव्हा हे सूर अंर्त् मनाचे ,
भावनांची छटा सहजच ऊधळते रंग इंद्रधनुष्याचे,

स्वच्छंद करावा विहार नात्यांच्या स्वैर आकाशात ,
खुशाल सांगावे गुपित मनातले पक्षांच्या कानात ,

क्षितीजापलिकडे झेप घ्यायची जर असेल जिद्द ,
उतरतील कागदावर गौरव इतिहासाचे शब्द ,

जगात सगळंच सहज,सरल आणि सुंदर असतं ,
आणि नसलं तर तसं घडवावं लागतं ,

जरी रोज बुद्धिशी भांडतोस तू मना ,
तरी परत शोधत फिरतोस त्याच जुन्या पाऊलखुणा....!!!!


कवयित्री - स्वाती

लहरी तो बेभान वारा

सखे, तुझ्या आठवणीचा
लहरी बेभान वारा
सडा सुखाचा दुज्या
अंगणात पाडुनी गेला....

सखे, तुझी नी माझी आता
फ़क्त स्वप्नातच भेट घडते
हे गुपित आपलं कुठुनतरी
कळलय वाटतं त्याला
तसं त्याचं नी माझ
आधीच पटत नव्ह्ते
म्हणुन कदाचीत हा
आजची रात्र जागवुनी गेला............

सखे, का गं नेहमीच हा
वारा असा वेगात सुटतो
अंधा-या रात्रीस चमकता
तारा जसा नभात तुटतो
अगदी तसाच बघ हा
स्वप्न माझं तोडुनी गेला ............

सखे, आज तु माझी
नाहीस तरी माझ्या
मनात तुझ्या प्रेमाचा दिवा
अजुनही तसाच तेवत राहतो
माझं तुझ्यावरचं प्रेम जणु काही
पहावत नाहीये त्याला
तु सोडुनी जात होतिस
तेव्हा मी रडलो नव्हतो
म्हणुन कदाचीत आज हा
मला रडवुनी गेला............
सखे, तो तेवता दिवा आज हा
वारा विझवुनी गेला............

सगळीच गणितं चुकली आहेत......

सगळीच गणितं चुकली आहेत......
आता जीवनाची चक्रे थांबली आहेत,
आयुष्याचा प्रवासच जणू थबकला आहे
माहीत आहे की तु येणार नाहीस,
तरीसुध्दा वेडे मन हे तुझ्याच वाटेला डोळे लाऊन बसले आहे

पहाटेचा उत्साह आता राहीला नाही,
संध्याकाळ म्हणावी तशी रम्य होत नाही
सगळं कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतयं
कळत असुनही मन पुन्हा पुन्हा तिकडेच धावतयं

सकाळची गुलाबी थंडी, संध्याकाळची सोनेरी किरणे,
पक्षांची किलबिल आणि पावसातला गारवा
सगळं काही कुठेतरी हरवलं आहे,
निर्सगही जणु माझ्याबरोबर तिलाच शोधत आहे

माझे कुठं चुकले आता काहीच कळत नाही,
अनुत्तरीत प्रश्नाची उत्तरं शोधुनही सापडत नाहीत
म्हणुन पुन्हा नव्याने सगळी गणितं तपासत आहे ,
पण छे आता सगळीच गणितं चुकली आहेत....

गुलाल

माझी भकास शिल्पे शोधीत काल होता;
तो देखण्या व्यथेचा ऐनेमहाल होता.

स्वस्तात फार ज्याने विकले मला अवेळी;
तो गौर कातडीचा कोणी दलाल होता.

आयुष्य आज माझे देते मला शिवी ही-
श्रीमंत आसवांचा तू रे हमाल होता.

जिकून हारलो मी सारेच डाव तेथे;
निद्रिस्त प्राक्तनाचा जेथे निकाल होता.

ठेवून काळजाला शिंक्यावरी घरी अन्
मग सांत्वनास माझ्या आला रुमाल होता.

सौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे;
कोण्यातरी मढ्याचा तोही गुलाल होता.


गझलकार - डॉ.श्रीकृष्ण राऊत
संग्रह - गुलाल आणि इतर गझला

वरात

तसा न चंद्र राहिला, तशी न रात राहिली
अजूनही तशीच तू तनामनात राहिली

अजून आठवे मला सुरेख तीळ सावळा
अमीट खूण ती तुझी सखे उरात राहिली

शहारते पुन्हा पुन्हा गळ्यात गीत ते तुझे
मधुर चोरटी मिठी तुझी स्वरात राहिली

कधी कधी हवेत ह्या तुझाच स्पर्श जाणवे
फिरून सावली तुझी जशी घरात राहिली

पुसून लोचने जिथे तुझा निरोप घेतला
अजून ती मनात ह्या तुझी वरात राहिली


गझलकार - डॉ. श्रीकृष्ण राऊत
संग्रह - 'गुलाल आणि इतर गझला'

दुकान

दोह्यात जीव नाही, गझलेत जान नाही;
शायर जगात दुसरा माझ्या समान नाही.

चोरून रोज खातो उर्दू मधील लोणी;
सायीवरी मराठी माझे इमान नाही.

गेली हयात सारी वाया तुझी गड्या रे;
तू एक वाचलेला माझा दिवान नाही.

आश्चर्य हे मला की झाली न ‘अहम’बाधा;
माझ्याशिवाय आता कोणी महान नाही!

तू देणगी दिली ना जाहीर वा छुपीही;
वेड्या तुला कधीही मिळणार मान नाही.

त्यांचा बुडेल धंदा विकती न जे स्वत:ला;
तोट्यात चालणारे माझे दुकान नाही.


गझलकार - डॉ. श्रीकृष्ण राऊत

पहारा

तुला पाहिजे तसे वाग तू
भल्या बुऱ्याला लाव आग तू

उगाच खोटी भीड कशाला
हक्क आपला तिला माग तू

कुठे अचानक गायब झाले
त्या सत्याचा काढ माग तू

जमेल जेथे मैत्र जिवाचे
तिथे फुलांची लाव बाग तू

मनात नाही त्याच्या काही
नकोस त्याचा धरू राग तू

अजून नाही रात्र संपली
सक्त पहारा देत जाग तू


कवी - डॉ. श्रीकृष्ण राऊत

शुभेच्छा

हा प्रश्न एकदाचा लावा धसास राजे
टांगून ठेवलेले त्याला कशास राजे

छातीवरील जागी कोटात छान दिसती
फेकू नका फुलांना घेऊन वास राजे

सांगू किती नवाई ह्या धूर्त कावळ्यांची
ताटामधून नेती काढून घास राजे

सेतू तसा नवा, पण हा कोसळेल केव्हा
याचा अचूक पक्का बांधा कयास राजे

जेवण नसेल तर मग सांगा खुशाल चुटके
जनता सभेत बसली आहे उदास राजे

दुष्काळग्रस्त गावे देतात ह्या शुभेच्छा
होवो सदा सुखाचा तुमचा प्रवास राजे


गज़लकार - डॉ.श्रीकृष्ण राऊत

जगावेगळे विश्व कवीचे

जगावेगळे विश्व कवीचे
अक्षरांसवे खोड्या करता -
चिमटे काढी वा गुदगुल्या
सराईतपण हाती येता !

जे ना दिसते कधी रवीला -
म्हणे नेमके कवीस दिसते
पाताळातुन थेट अंबरी -
कवी - भरारी चालू असते !

बालपणी वा जरठपणी ,
खरडावी लेखणी वाटते !
परी लेखणी हाती असता
कवीमनीं का खंत दाटते !

जुळवू कैसे यमकाला मी !
व्याकरणाला मनात भीता ,
गण - वृत्ता मी कसे ओळखू -
काव्य - प्रसूती वाढवि चिंता !

अ - रसिका पहिले वंदावे -
कवितेचे ते बोट धरावे ,
टीकाकारा मुळी न भ्यावे
स्वानंदास्तव मस्त लिहावे !!


कवी - विदेश

मित्रासाठी काय पण..!

मंग्या : काय झालं भावा?

दिनू : क्या बताउं यार मै उस के बिना नही रहे
सकता... :'(

मंग्या : हात्तिच्या... एवढंच ना भावा. फक्त
पाच मिनटं थांब...
.
.
.
.
.
पाच मिनिटानी मंग्या धावत आला.

मंग्या : हे घे भावा. अख्खा उसाचा दांडका.. :p

मित्रासाठी काय पण..!

पैसे परत

झंप्या पॅराशूटच दुकान काढतो....

गिऱ्हाईक : कस चालत हे?
हऱ्या : अगदी सोप्प ! याला घेऊन विमानातून
उडी मारायची आणि हे लाल बटन दाबायच...मग
तुम्ही हळूहळू तरंगत जमिनीवर उतरणार......
गिऱ्हाईक : आणि समजा पॅराशूट उघडलच
नाही तर......

झंप्या : पैसे परत

आई भवानी तुझ्या कृपेने

आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्‍ताला
अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये ....

गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

उधं उधं उधं उधं उधं

गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ
हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ
धगधगत्या ज्वालेतून आली तूच जगन्माता
भक्‍ती दाटून येते आई नाव तुझे घेता
आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी
आज गोंधळाला ये ....

गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये

उधं उधं उधं उधं उधं

अग सौख्यभरीला माणिकमोती मंडप आकाशाचा
हात जोडुनि करुणा भाकितो उद्धार कर नावाचा
अधर्म निर्दाळुनी धर्म हा आई तूच रक्षिला
महिषासुर-मर्दिनी पुन्हा हा दैत्य इथे मातला

आज आम्हावरी संकट भारी धावत ये लौकरी
अंबे गोंधळाला ये

गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये
गोंधळ मांडला ग अंबे गोंधळला ये

अंबाबाईचा ..... उधं उधं उधं उधं उधं
बोल भवानी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं
सप्‍तशृंगी मातेचा ..... उधं उधं उधं उधं उधं


गीत     -     अजय-अतुल
संगीत  -     अजय-अतुल
स्वर     -     अजय गोगावले
चित्रपट -    सावरखेड एक गाव (२००४)

आई उदे ग अंबाबाई

आई उदे ग अंबे उदे, उदे

आई उदे ग अंबाबाई !
उदे उदे ग अंबाबाई

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई

तुळजापूरची तुकाई आई ..... गोंधळा ये
कोल्हापूरची लक्षुमी आई ..... गोंधळा ये
मातापूरची रेणुका आई ..... गोंधळा ये
आंबेजोगाई जोगेश्वरी ..... गोंधळा ये

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई

आईची मूर्ति स्वयंभु वरी शोभली, सिंहावरी साजरी
सिंहावरी साजरी, हिर्‍यांचा किरिट घातला शिरी
चंडमुंड महिशासूर आईनं धरून रगडला पायी
आई उदे ग अंबे उदे, उदे

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई

आला नवरात्राचा महिना, आळवावा आईचा महिमा
आळवावा आईचा महिमा, त्याला काय सांगावी उपमा ?
अहो येळ साधुनी खेळ मांडिला आशिर्वाद दे आई
आई उदे ग अंबाबाई

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई

शिवछत्रपतींची शिवाई..... गोंधळा ये
शाहुराजश्रींची अंबाई..... गोंधळा ये
विदर्भनिवासिनी चंडी आई..... गोंधळा ये
महाराष्ट्र कुलस्वामिनी आई..... गोंधळा ये

गुणगान लेकरू गाई
आई उदे ग अंबाबाई



गीत      -     जगदीश खेबूडकर
संगीत   -      राम कदम
स्वर      -     राम कदम
चित्रपट -    आई उदे ग अंबाबाई (१९७१)

कर आता गाई गाई

कर आता गाई गाई
तुला गाते मी अंगाई
आज माझ्या बाहुलीची
झोप कुणी नेली बाई ?

बोळक्यांची उतरंडी
लुटुपुटीची चूल
आवरले आहे बाई
आता कुठे घरकुल !

काम सारे उरकता
थकला ग माझा जीव
नको छळू तूही राणी
येऊ दे ना जरा कीव ?

नीज नीज लडिवाळे
नको रडू, देते झोका
उभा बागुल दाराशी
सांग त्यास बोलावू का ?




गीतकर  -     शांता शेळके
संगीत    -     श्रीनिवास खळे
स्वर       -     सुषमा श्रेष्ठ

सागरा प्राण तळमळला !

ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ! ||धृo||

भूमातेच्या चरणतला तूंज धूंता, मी नित्य पाहिला होता ;
मज वदलासी अन्य देशिं चल जाउं; सृष्टिची विविधता पाहू .
तैं जननी हृद् विरहशंकितहि झालें, परि तुवां वचन तिज दिधलें,
'मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टिं वाहीन. त्वरि तया परत आणीन !'
विश्वसलों या तव वचनीं, मी, जगदनुभवयोगें बनुनी,मी,
तव अधिक शक्त ऊद्धरली मी, "येईन त्वरें" कथुनि सोडिलें तिजला,
सागरा, प्राण तळमळला ! || १ ||

शुक पंजरिं वा हरीण शिरावा पाशीं, ही फसगत झाली तैशी !
भूविरह कसा सतत साहुं यापुढतीं, दश दिशा तमोमय होती,
गुणसुमनें मी वेंचियली या भावें, कीं, तिनें सुगंधा घ्यावें !
जरि उद्धरणीं व्यय न तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा.
ती आम्रवृक्ष-वत्सलता, रे, नव कुसुमयुता त्या सुलता, रे,
तो बालगुलाबहि आतां, रे, फुलबाग मला, हाय! पारखा झाला!
सागरा, प्राण तळमळला ! || २ ||

नभिं नक्षत्रें बहुत, एक परि प्यारा- मज भरतभूमिचा तारा.
प्रासाद ईथें भव्य; परी मज भारी- आईची झोपडी प्यारी.
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा- वनवास तिच्या जरी वनिंचा.
भुलविणें व्यर्थ हें आता, रे, बहु जिवलग गमते चित्ता, रे,
तुज सरित्पते, जी सरिता रे, तद्विरहाची शपथ घालतो तुजला
सागरा, प्राण तळमळला || ३ ||

या फेनमिषें हंससि,निर्दया,कैसा,कां वचन भंगिसी ऐसा ?
त्वस्वामित्वा सांप्रति जी मिरवीते, भिऊनि कां आंग्लभूमीतें,
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी ? मज विवासनाते नेसी ?
जरि आग्लभूमि भयभीता, रे, अबला न माझि ही माता, रे,
कथिल हें अगस्तिस आतां,रे, जो आंचमनी एक क्षणी तुज प्याला,
सागरा, प्राण तळमळला || ४ ||


कवी      -     स्वा. विनायक दामोदर सावरकर
संगीत   -     पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर      -     लता मंगेशकर,  उषा मंगेशकर,  मीना मंगेशकर
                    पं. हृदयनाथ मंगेशकर

हंस व नळराजा

न सोडी हा ऩळ भूमि पाळ माते...।
असे जाणोनी हन्स वदे त्याते....।।
हन्स हिन्सा नच घडो तुझ्या हाते..।
सोड राया जाईन स्वस्थळाते...।। १।।

जाग जागी आहेत वीर कोटी..।
भले झुन्जारही शक्ति जया मोठी....।।
तया माराया धैर्य धरी पोटी..।
पाखरू हे मारणे बुद्धि खोटी....।।२।।.।

वधुनि माझी हे कनक रूप काया..।
कटक मुकुटादिक भूषणे कराया..।।
कशी आशा उपजली तुला राया..।
काय नाही तूजला दया माया...।।३।।

म्हातारी उडता न येचि तिजला, माता मदिया अशी।
कान्ता काय वदू नव प्रसवती, साता दिसाची तशी ।।
पाता त्या उभयास मी मज विधी घातास योजितसे..।
हातासाजी न्रुपा तुझ्या गवसलो. आता करावे कसे....।।४।।

सदय ह्रदय याचे भूप हा ताप हारी,।
म्हणुनी परिसता मी होय येथे विहारी..।।
मजही वध कराया पातकी पातला जो..।
वरूनि पति असा ही भूमि कैसी न लाजो..।।५।।

येणे परी परिसता अती दीन वाचा..।
हेलावला नळ पयोधि दया रसाचा.।।
सोडी म्हणे, विहर जा अथवा फिराया..।
राहे यथा निज मनोरथ हन्स राया..।।६।।

सुटुनि खग पळाला, बैसला शाल शाखे..।
क्षणभरि निज देही मुक्ति विश्रान्ति चाखे..।।
स्वजन तव तयाचे भोवताली मिळाले...।
कवळिती निज बन्धु बाष्प बिन्दु गळाले...।।७।।

निसावा घे काही, उडुनि लवलाही परतला...।
न्रुपाळाच्या स्कन्धि बसुनि मणिबन्धि उतरला...।।
म्हणे हन्स, क्षोणी पतिस तुज कोणी सम नसे...।
दयेचा हा ठेवा तुज जवळी देवा वसतसे...।।८।।

ऐक राया तू थोर दया सिन्धु..।
नीति सागरही तूचि दीन बन्धु..।।
निखन्दोनी बोलिलो नको निन्दु...।
तुझे ऐसे उपकार जया वन्दु....।।९।।

हन्स मिळणे हे कठिण मयी लोकी...।
सोनियाचा तो नवल हे विलोकी..।।
तशा मजलाही सोडिले तुवा की..।
तुझा ऐसा उपकार मी न झाकी...।।१०।।

किति रावे असतील तुझ्या धामी...।
किति कोकिळ ही सारिका तसा मी..।।
चित्त लागियले तूझिया लगामी...।
न्रुपा योजी मज आपुलिया धामी...।।११।।

हे पाखरू मजसी येईल काय कामा ।
ऐसे न्रुपा न वद पूरित लोक कामा ।।
मोले उणे व्यजन ते धरिता पुढारी ।
छाया करी तपन दीप्तिस ही निवारी।।१२।।

दुबळी माझी झोळी

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

हवास तितका पाडी पाऊस देवा वेळोवेळी
चोचीपुरता देवो दाणा माय माउली काळी

एक वीतिच्या वितेस पुरते तळ हाताची थाळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

महाल गाद्या नकोत नाथा माथ्यावर दे छाया
गरजेपुरती देई वसने जतन कराया काया

गोठविणारा नको कडाका नको उन्हाची होळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

होते तितुके देई याहुन हट्ट नसे गा माझा
सौख्य देई वा दुःख ईश्वरा रंक करी वा राजा

अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाची पाळी
देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी


कवी       -     ग. दि. माडगूळकर
संगीत    -     सुधीर फडके
स्वर       -     सुधीर फडके
चित्रपट   -    प्रपंच (१९६१)
राग        -    मिश्र पिलू

मृग

माउलीच्या दुग्धापरी
आले मृगाचे तुषार,
भुकेजल्या तान्ह्यासम
तोंड पसरी शिवार

तुकोबाच्या अभंगाला
मंद चिपळ्याची साथ,
भरारतो रानवारा
तसा झाडाझुडूपांत

पिऊनिया रानवारा
खोंड धांवे वारेमाप,
येतां मातीचा सुगंध
स्तब्ध झाले आपोआप

अवखळ बाळापरी
पक्षी खेळती मातींत,
उभारल्या पंखावरी
थेंब टपोरे झेलीत

धारा वर्षतां वरुन
बैल वशिंड हालवी,
अवेळीच फुटे पान्हा
गाय वत्साला बोलवी


कवी - ग. दि. माडगुळकर

उगवले नारायण

उगवले नारायण, उगवले गगनांत
प्रभा सोनीयाची फांके उन्हें आली अंगणात ll १ll

उन्हें आली अंगणात, उन्हें आली ओटीवर
सोनपावलांनी देवा, उजळले माझे घर ll २ll

उजळले माझे घर, झळाळले ग, कळस
डुलुं लागे आनंदाने वृंदावनींची तुळस ll ३ll

वृंदावनींची तुळस, दिसे हिरवी अंजिरी
वारियाच्या झुळुकिने हंसे मंजिरी मंजिरी ll ४ll

हंसे मंजिरी मंजिरी, प्राजक्ताच्या पावलाशीं
सडा फुलांचा घालतो, मोती-पोवळ्याच्या राशी ll ५ll

मोती-पोवळ्याच्या राशी, वैभवाला नाही अंत
सुख वेचितें संसारी, माउली मी भाग्यवंत ll ६ll


कवयित्री - बहिणाबाई चौधरी

जरा अस्मान झुकले

ज़रा अस्मान झुकले
शुभ्र तारकांचे झेले
क्षितिजाचे रंग रेखा
संथ पाण्यात न्हालेले
रान मुकाट झालेले
पक्षी पंखात मिटले
हळु चाहूल घेताना
पाणी दाण्डात हासले

ज़रा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले ...
ज़रा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले
उस मळयाच्या गर्दीत
डोळे पाऊल चुकले

अशी लाखकलि बोर
अंगभर चंद्रकोर
उस मळयाच्या गर्दीत
थोड़े सांडले केशर !


कवी - ना. धो. महानोर

रुद्रास आवाहन

डुमडुमत डमरू ये, खणखणत शूल ये,
शंख फुंकत ये, येई रुद्रा!
प्रलयघनभैरवा, करीत कर्कश खा
क्रूर विक्राळ घे क्रुध्द मुद्रा !

कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ, उधळ गिरी जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां !

पाड सिंहासने दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनी मत्त नृप खालती,
मुकुट रंकास दे, करटी भूपाप्रती,
झाड खटखट तुझें खड़ग क्षुद्रां !

जळ तडागं सडे, बुडबुडे, तडतडे
"शांति ही!" बापुडे बडबडति जन-कीडे !
धडधडा फोड तट! रुद्र ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा !

पूर्वी नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयीं अन्य गृहीं दरवडे पाडिले,
बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले
दे जयांचें तयां वीरभद्रा!


कवी - भा. रा. तांबे

झाशीची राणी

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रृ ll

तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll

घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करित ती वार,
गोर्‍यांची कोंडी फोडीत, पाडीत वीर इथे आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजली,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll

मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll


कवी - भा. रा. तांबे
जाति - महाकाली
स्थळ - लष्कर-ग्वाल्हेर
साल - १९२९

लतांनो सांगू का तुम्हां !

लतांनो सांगू का तुम्हां, उद्या श्रीराम येणार!
वनाला सर्व ह्या आता, खरा आनंद होणार

तुम्हा कोठूनीया ठावा, कसा श्रीराम तो आहे
सुखशांती झरा तेथे, सदाचा वाहतो आहे
उद्या पाहाल डोळ्यांनी, सुखाचा पूर्ण आराम
मुखे लागाल भुकाया, जय श्रीराम श्रीराम

बघूनी नाथ हर्षाने, मला उन्माद येईल
नका आणू मनामाजी, चुकोनी दोष होतील
लतांनो ध्याल ना पुष्पे, झर्‍यांनो ध्याल ना पाणी
पहा ही अर्पीली कैसी, फळे या घोर वृक्षांनी

नव्हे कोठून ही उष्ठी, जरासी सावलेली ही
कडू कच्ची फळे रामा, कशी देईन गं बाई
उद्या श्रीराम येऊ दे, तुम्हांला मीच दावीन
फळे ही त्यास अर्पुनी, सुखे त्या पायी लोळेन
जय श्रीराम श्रीराम, जय श्रीराम श्रीराम


कवी - वा. गो. मायदेव

गाइ घरा आल्या

गाइ घरा आल्या । घणघण घंटानाद
कुणीकडे घालू साद । गोविंदा रे? ।। १ ।।

गाइ घरा आल्या । धूळ झाली चहूंकडे
घनश्याम कोणीकडे । माझा गेला? ।। २।।

गाइ घरा आल्या । वासरे हंबरती ।।
कुणीकडे बालमूर्ती । कृष्ण माझा? ।।३।।

गाइ घरा आल्या । ब्रह्मानंद वासरांना
काय करू माझा कान्हा । चुकला का? ।।४।।

गाइ घरा आल्या । घोटाळती पाडसांशी हाय! नाही हृषीकेशी । माझ्यापाशी ।।५।।
गाइ घरा आल्या । पाडसास हुंगीतात
माझा मात्र यदुनाथ । दुरावला! ।।६।।

गाइ घरा आल्या । आंवरेना मुळी पान्हा
राहणार भुका तान्हा । वासुदेव ।।७।।

गाइ घरा आल्या । दूध वाहे झुरूझुरू
माझ्या जीवा हुरूहूरू । मुकुंदाची ।।८।।

गाइ घरा आल्या । दूधवाट राहियेली
कुणी माझा वनमाळी । गुंतवीला ।।९।।

गाइ घरा आल्या । झाली बाई कातरवेळ
आजुनी का घननीळ । ये ना घरा? ।।१०।।

गाइ घरा आल्या । लावियेली सांजवात
बाळा दामोदरा रात । झाली न का?    ।।११।।

गाइ घरा आल्या । पाल चूकचूक करी ।
राख अंबे माझा हरी । असे तेथे ।।१२।।


कवी - वा. गो. मायदेव

थोर तुझे उपकार

थोर तुझे उपकार
ㅤㅤㅤㅤㅤㅤआई, थोर तुझे उपकार॥ध्रु॥
वदत विनोदें, हांसत सोडी
ㅤㅤㅤㅤㅤㅤकोण दुधाची धार॥१॥
नीज न आली तर गीत म्हणे
ㅤㅤㅤㅤㅤㅤप्रेम जिचे अनिवार॥२॥
येई दुखणें तेंव्हा मजला
ㅤㅤㅤㅤㅤㅤकोण करी उपचार॥३॥
कोण कडेवर घेउनि फिरवी
ㅤㅤㅤㅤㅤㅤचित्तीं लोभ अपार॥४॥
बाळक दुर्बळ होतों तेंव्हा
ㅤㅤㅤㅤㅤㅤरक्षण केलें फार॥५॥
त्वांचि शिकविलें वाढविलें त्वां
ㅤㅤㅤㅤㅤㅤआहे मजवर भार॥६॥
स्मरण तुझ्या या दृढ ममतेचें
ㅤㅤㅤㅤㅤㅤहोतें वारंवार॥७॥
नित्य करावें साह्य तुला मी
ㅤㅤㅤㅤㅤㅤहा माझा अधिकार॥८॥


कवी - भास्कर दामोदर पाळंदे

मीच का?

मी या जगांत भरल्या, दु:खास का पुसावे?
अनमोल आसवांना, ऐसेच का वहावे?

राधा न मी न मीरा, ना ती अनारकलि मी
का मीच विष प्यावे? बेड्यांत जोखडावे?

नजरांत खोट त्यांच्या, शापीत भाव सारे
सौंदर्य मीच माझे, मग शाप का म्हणावे?

सारेच ओळखीचे, दिसले ठसे हजारो
मीही तशीच का त्या, वाटेवरून जावे?

धर्मासही न चुकले, जर वागणे अधर्मी
ते पाश संस्कृतीचे मग मीच का जपावे?

भाळी कधीच माझ्या, रेखा न पाहिल्या मी
मग जे घडून गेले, संचीत का म्हणावे?

सृष्टीस निर्मिताना, ना 'तो' मुहूर्त पाही
माझ्या मनांत का मी, पंचांग बाळगावे?

ते सावलीत जाती, टाळूनिया उन्हाला
तेजोनिधीस, माझ्या मी सावलीत घ्यावे

मिळेल का अशी प्रियसी?

कधी कधी वाटत
माझं ही कुणी असाव
मीठी मध्ये तिच्या
तासन तास बसाव

पावसात एकत्र फिराव
नदीकाठी बसाव
तिच्या सहवासात
स्वताला विसराव

सुख दुखात तिच्या
अस सामील व्हाव
की रुततील काटे तिच्या पायाला
आणि लागतील माझ्या काळजाला घाव

तिच्यावर इतक प्रेम कराव
की जगातल सगळ सुख तिला द्याव
तिच्या डोळ्यात आपल
प्रेमाच जग पहाव

मिळेल का अशी प्रियसी
नेहमी शोधात फिराव...
मिळेल अशी कोणी तरी
या आशेवर जगत रहाव...!!!!

काय मिळत मोठ होवून..?

आईच्या अन्गाई गीताने लागणारी झोप,
आता लागते झोपीच्या गोळ्या खावून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

बाबान्नी बोट धरून शिकवलेले चालणे,
आता चालावे लागते काठीचा आधार घेवून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

आईने तेलाचा मारा करून वाढवीलेले केस,
आता ते ही लवकरच जातात डोक सोडून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

मित्रान सोबत रात्रन-दिवस असायच्या गप्पा,
आता फ़क्त-"हाय! कसा आहेस..?" ते ही फ़ोने वरून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

शाळेत सरांच्या रागवण्यातही असायची एक मज्जा,
आता फ़क्त संताप -चिडचिड बॉसच्या बॉसीन्ग वरून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

सारेच जगतात लहानपणीच्या आठवणिन्च्या जगात,
आनि जगतात-"आय मीस माय टीन-एज" म्हणुन..,
काय माहित काय मिळत मोठ होवून............

ह्र्दयात नकार होते

तिलाच द्याव मन हेच विचार होते
तीच्या निशब्द ह्र्दयात नकार होते.

ती दोष देउन जरी नियतीस गेली
माझे तिच्याहुन नशीब सुमार होते.

कर्जात बूडुन पुर्ण जगलो असाच
आयुष्य जणु नुसतेच उधार होते.

तिला अर्थ समझला हसण्याचा जेव्हां
आले गळुन नयनात तुषार होते.

अश्या अनेक ह्रदयात निवास तीचा
माझेच ते ह्र्दय जणू चुकार होते.

काळोख तो सहज नशेत तोल गेला
झाली सकाळ तर तेच गटार होते.

आता कुठे लपवु ओघळत्या अश्रुंना
माझे अश्रुच गळण्यात हुशार होते.

आभारी आहे

तु दिलेल्या दुःखांसाठी मी आभारी आहे
कीचांळत्या जखमांसाठी मी आभारी आहे.

कुठे होता खिशात रुमाल माझ्या कधी
तु दिलेल्या आसवांसाठी मी आभारी आहे.

कुणाचा हा प्रवास कधी पुर्ण झाला आजवर
तुझ्या त्या चार पावलांसाठी मी अभारी आहे.

आज रात्र जाते चादंण्या मोजण्यात माझी
कधी तु दिलेल्या स्वप्नांसाठी मी आभारी आहे.

आजवर किनाराच माझ्या नशीबात होता
तुझ्या त्या सागर लाटांसाठी मी आभारी आहे.

आयुष्य तुझे रंग पाहण्यात गेले माझे
तु बदलेल्या रगांसाठी मी आभारी आहे.

काल तो रस्ता ही म्हणाला सांग तिला
तु दिलेल्या वळणांसाठी मी आभारी आहे.

अगंण कानात कुजबुजुन गेल रात्री, म्हणे
न तुटणा-या गुलाबांसाठी मी आभारी आहे.

मी शब्दांचा सौदागर म्हणून जगलो सदा पण
तु दिलेल्या त्या शब्दांसाठी मी आभारी आहे.

आज हा निवंडूग ह्या शब्दात लोळतो सदा
तु दिलेल्या ह्या छदांसाठी मी आभारी आहे.

जयोऽस्तुते

जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,
स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,
यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे ||धृ||

राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू, नीतिसंपदांची,
स्वतंत्रते भगवती श्रीमती, राज्ञी तू त्यांची,
परवशतेच्या नभात तुची, आकाशी होशी,
स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखशी ||१||

गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गालीं,
स्वतंत्रते भगवती, तूच ती विलसतसे लाली,
तू सूर्याचे तेज, उदधिचे गांभीर्यही तूची,
स्वतंत्रते भगवती, अन्यथा ग्रहण नष्ट तेचि ।।२।।

मोक्षमुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती, योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती, सर्व जन सहचारी होते ।।३।।


हे अधमरक्तरंजिते, हे अधमरक्तरंजिते, सुजनपूजिते,
श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते!
तुजसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण,
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण,
श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! श्री स्वतंत्रते! ||४||

जयोऽस्तुते जयोऽस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे,
स्वतंत्रते, भगवती, त्वामहम्,
यशोऽयुतां वंदे, यशोऽयुताम् वंदे


कवि - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

चिमणा राजा

गृहराज्यावर गाजवि सत्ता राजा चिमणा एक
जन्मजात हा! नको कराया यास कुणीं अभिषेक! ।।१।।

कटि आईची मृदुल आपुलें सिंहासन बनवून
मधुर बोबड्या अस्फुट वचनीं सोडि हुकूम तिथून ।।२।।

बसावयाला सुंदर घोडा त्यास असे काठीचा
परि आवडता अधिक त्याहुनी ताईच्या पाठीचा! ।।३।।

त्या घोड्यावर डौलें बैसे, चाबुक नाजुक हातीं
सहल करोनी देखरेखही ठेवी राज्यावरतीं ।।४।।

राजदंड जड राजे दुसरे वागविती स्वकरांत
मनें दुज्यांची मुठींत परि हा ठेवितसे दिनरात! ।।५।।

मृदुल करांची मिठी सोडवूं येइ न मल्लांनाही
अमोघ याची शक्ति यापरी, उपमा कसली नाहीं ।।६।।

पराभवाचें लक्षण दिसतां रुदनास्त्रा सोडीत
प्रबल शत्रुही मग त्यायोगें सहजचि होई चीत!।। ७।।


कवी - दामोदर अच्युत कारे

ऐकव तव मधु बोल

ऐकव तव मधु बोल, कोकिळे,
ऐकव तव मधु बोल ॥ध्रु॥

नकोत मजला मैना, राघू,
साळुंकी, चंडोल
नकोत मजला विविध सुरांचे
कृत्रिम हे हिंदोल ॥१॥

एक तुझा स्वर आर्त खरोखर
वाटे मज बिनमोल,
वसंत नाहीं अजुन संपला,
कां झालीस अबोल? ॥२॥

सुखें वसंतासंगें जा मग
पहावया भूगोल,
गा शेवटचा बोल लपुनहि
पर्णांमाजीं खोल ॥३॥

पाहिन नंतर वाट वर्षभर
दाबुनि चित्त विलोल
नको करूं पण आस एवढी
जातां जातां फोल! ॥४॥


कवी - माधव जुलियन

पावसाच्या धारा

पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा

रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागोजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ

झळके सतेज, ढगांवर वीज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज

झोंबे अंगा वारे, काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें

हर्षलासे फार, नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार

झाडांचिया तळी, डोईवरी मारा
रानातील गुरे शोधिती निवारा

नदीलाही पूर, लोटला अपार
फोफावत धावे जणू नागीणच थोर

झाडांची पालवी, चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें रंगदार छबी

थांबला ओझर, उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश

किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें पक्षीजात खुले

धरणी हासली, सुस्नात जाहली
वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली


कवयित्री - शांता शेळके

प्रेमस्वरूप आई

प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधु आई !
बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?

तू माय, लेकरू मी; तू गाय, वासरू मी;
ताटातुटी जहाली, आता कसे करू मी ?

गेली दुरी यशोदा टाकूनि येथ कान्हा,
अन्‌ राहिला कधीचा तान्हा तिचा भुका ना?

तान्ह्यास दूर ठेवी - पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे;

नैष्ठुर्य त्या सतीचे तू दाविलेस माते,
अक्षय्य हृत्प्रभूचे सामीष्य साधण्याते.

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.

चित्ती तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका.

विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही,
आईविणे परी मी हा पोरकाच राही.

सारे मिळे परंतू आई पुन्हा न भेटे,
तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे.

आई तुझ्या वियोगे ब्रम्हांड आठवे गे !
कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे.

किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोंती,
अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती !

ही भूक पोरक्याची होई न शांत आई
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांही

वाटे इथूनि जावे, तूझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे !

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके,
देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके ?

घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी !


गीतकार -  माधव ज्यूलिअन
गायक    -  गजाननराव वाटवे
संगीत    -  जी. एन्. जोशी

पतंग उडवूं चला

पतंग उडवूं चला
गडयांनो, पतंग उडवूं चला
रंग ढगांवर मावळतीचा
लाल पिंवळ्सर किती मजेचा
झुळझुळ वारा नदीकांठचा
बाजुस डोंगरमळा.

करु चला सुरवात बरोबर
सोडा सोडा रीळ भराभर
पंतग चढवा हे वार्‍यावर
ढगांस भेटायला.

मउ वाळुंत पाय रोवुनी
देउं झटका दोरा ओढुनी
पतंग जातील वर वर चढुनी
पंख नको त्यांजला.

जशीं पाखंरें आभाळांत
पंख पसरुनी तरंगतात
दिसतील तैसे पतंग रंगीत
खेळ किती चांगला !

सूर्य डोंगराआड लपेल
काळा बुरखा जग घेईल
खेळ तोंवरी हा चालेल
मजेदार आपुला.


कवी - अ.ज्ञा. पुराणिक

घननिळ

घननिळ सागराचा घननाद येतो कानी,
घुमती दिशा दिशांत लहरीमधील गाणी,

चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत,
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत,

आकाश तेज भारे माडावरी स्थिरावे,
भटकी चुकार होडी लाडात संथ धावे,

वाळूत स्तब्द झाला रेखाकृती किनारा,
जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा,

जलधी बरोबरीचे आभासमान नाते,
त्याची न त्यास धरती संकेत फक्त खोटे,

सानिध्य सागराचे आकाश पांघराया,
परी साथ ना कोणाची अस्तीत्व सावराया


कवी - विद्याधर करंदीकर

कादरखां

[ मुंबईत झालेल्या हिंदू -पठाणांच्या दंग्यात गारद झालेल्या एका पठाण विरास उद्देशून सदरहू 'विलापिका' रचिली आहे ]

हा कोण इथे पडलेला ! 'कादरखां काबुलवाला' ! धृ.

धिप्पाड देह हा अडवा ! पसरला सहा अन् फूट !
पालथे पलिकडे पडले ! विक्राळ खिळ्यांचे बूट !
चुणिदार चोळणा आतां ! फाटून होय चिरगूट !
बैसला पठाणी बडगा ! बाजूला दूर निमूट !

चिखलांत बुडाले कल्ले !
त्यां ओढिति चिल्लें-पिल्लें !
खिसमीस खिशांतिल उरलें
कुणी मारि तयावर डल्ला ! 'कादरखां काबुलवाला' !.....।।१।।

अफगाण दर्‍यांतिल आतां ! डुरकाळ्या फोडिति शेर !
बुरख्यांतुनि कंदाहारी ! उठलासे हाहा:कार !
तो शर्बत पीतां-पीतां ! दचकेल मधेंच अमीर !
'क्या हुवा!' ओरडुनि ऐसें ! बडवतात सगळे ऊर !

ते हेरतचे अक्रोड
ते बदाम-पिस्ते गोड
रडरडुनी होती रोड
अल्बुखार अंबुनि गेला ! 'कादरखां काबुलवाला' !....।।२।।

तो हिंग काबुली आतां ! विकणार यापुढें कोण ?
व्याजास्तव बसुनी दारीं ! गरिबांचा घेइल प्राण ?
खाणार कोण यापुढतीं ! तीं कलिंगडें कोरून?
सजवी नूर नयनांचा ! कीं सुरमा घालुनि कोण ?

रस्त्यावर मांडुनि खाटा
हुक्क्यासह मारिल बाता-
हिंडेल कोण वा आतां
घालून चमेलीमाळा ? ! 'कादरखां काबुलवाला' ! .....।।३।।

करुं नका गलबला अगदीं ! झोंपला असे हा वीर !
जन्मांत असा पहिल्यानें ! पहुडला शांत गंभीर !
राहणें जितें जर, मागें ! व्हा दोन पावलें दूर !
हा बसेल मानगुटीला ! ना तरी होउनी पीर !

जा पळा-पंचनाम्याला
तो आला डगलेवाला,--
अडकवील कीं साक्षीला,
मग म्हणाल "पुरता भंवला ! 'कादरखां काबुलवाला' !....।।४।।


कवी - केशवकुमार
कवितासंग्रह - झेंडूचीं फुलें

कशासाठी पोटासाठी

कशासाठी पोटासाठी
खंडाळ्याच्या घाटासाठी

चला खेळू आगगाडी,
झोका उंच कोण काढी?
बाळू, नीट कडी धर
झोका चाले खाली वर
ऐका कुकुक्‌ शिट्टी झाली
बोगद्यात गाडी आली
खडखड भकभक
अंधारात लखलख
इंजिनाची पहा खोडी
बोगद्यात धूर सोडी
नका भिऊ थोड्यासाठी
लागे कुत्रे भित्यापाठी

उजेड तो दूर कसा
इवलासा कवडसा
नागफणी डावीकडे
कोकण ते तळी पडे
पाठमोरी आता गाडी
वाट मुंबईची काढी
खोल दरी उल्लासाची
दोन डोक्यांचा राजमाची
पडे खळाळत पाणी
फेसाळल्या दुधावाणी
आता जरा वाटे दाटी
थंड वारा वरघाटी

डावलून माथेरान
धावे गाडी सुटे भान
तारखांब हे वेगात
मागे मागे धावतात
तार खाली वर डोले
तिच्यावर दोन होले
झाडी फिरे मंडलात
रूळ संगे धावतात
आली मुंबई या जाऊ
राणीचा तो बाग पाहू
गर्दी झगमग हाटी-
कशासाठी? पोटासाठी !


कवी - माधव ज्यूलियन

झाल्या तिन्हीसांजा

अजुनी कसे येती ना, परधान्या राजा
किरकिरती रातकिडे, झाल्या तिन्हीसांजा ll ध्रु.ll

उशिर होई काढाया गाईंच्या धारा
शालु हिरा कालवडी देती हुंकारा
टवकारिती कान जरी वाजे दरवाजा ll१ll

वाट तरी सरळ कुठें पांदितिल सारी
त्यांतुनी तर आज रात्र अंधारी भारी
आणि बैल कसल्याही बुजती आवाजा ll२ll

'जेवणार मी पुढ्यात' घाली मधु रुंजी
झोपेने पेंगुळली तरी न नीजे मंजी
आणि किती करती आंत-बाहेरी ये-जा ll३ll

निवल्यावर हुरडयाच्या उसळीस न गोडी
लवकर कां सोडिती न मोट तरी थोडी
अधिकाधिक खाली-वर होई जीव माझा ll४ll

गुरगुरला जो पिसाळ काल जरा कांही
म्हणती त्या मेल्याला काळिज कीं नाही
परि पाठीराखी ती आहे अष्टभुजा ll५ll


कवी - यशवंत

मामाच्या गावाला जाऊया

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया,
मामाच्या गावाला जाऊया

मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुनी घेऊया

मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया

मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामन खाऊया

मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया


गीत      -    ग. दि. माडगूळकर
संगीत   -    वसंत पवार
स्वर      -    आशा भोसले
चित्रपट  -    तू सुखी रहा (१९६३)
राग       -    भैरवी

आला क्षण!

गडबड घाई जगात चाले,
आळस डुलक्या देतो; पण
गंभीरपणे घड्याळ बोले-
'आला क्षण-गेला क्षण!'

घड्याळास या घाई नाही,
विसावाही तो नाही; पण
त्याचे म्हणणे ध्यानी घेई-
'आला क्षण-गेला क्षण!'

कर्तव्या जे तत्पर त्यांचे
दृढ नियमीत व्हावयास मन,
घड्याळ बोले अपुल्या वाचे-
'आला क्षण-गेला क्षण!'

कर्तव्याला विमुख आळशी
त्यांच्या हृदयी हाणित घण,
काळ-ऐक! गातो अपुल्याशी-
'आला क्षण-गेला क्षण!'

लवाजम्याचे हत्ती झुलती
लक्ष त्यांकडे देतो कोण,
मित रव जर हे सावध करिती-
'आला क्षण-गेला क्षण!'


कवी -  केशवसुत

मामाची गाडी

माझ्या मामाची रंगीत गाडी हो
तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो

कशी दौडत दौडत येई हो
मला आजोळी घेऊन जाई हो
नाही बिकट घाट,
सारी सपाट वाट,
मऊ गालीचे ठायी ठायी हो

शीळ घालून मंजूळ वाणी हो
पाजी बैलांना ओहोळ पाणी हो
गळा खुळखुळ घुंगुर माळा हो
गाई किलबील विहंग मेळा हो
बाजरीच्या शेतात,
करी सळसळ वात,
कशी घुमली अंबेराई हो

कोण कानोसा घेऊन पाही हो
कोण लगबग धावून येई हो
गहिवरून धरून पोटी हो
माझे आजोबा चुंबन घेती हो
लेक एकुलती,
नातू एकुलता,
किती कौतुक कौतुक होई हो

कवी - ग. ह. पाटील

फुलपाखरे

धरू नका ही बरे
फुलावर उडती फुलपाखरे

मजे मजेचे रंग तयांचे
संध्याकाळी जसे ढगांचे
ऊन कोवळे त्यावर नाचे
सकाळचे हासरे
फुलांवर उडती फुलपाखरे॥

हात लावता पंख फाटतील
दोरा बांधून पायही तुटतील
घरी कशी मग सांगा जातील
दूर तयांची घरे
फुलांवर उडती फुलपाखरे॥

काल पाकळ्या रात्री निजल्या
सकाळ होता सगळ्या उठल्या
आणि त्याच का उडू लागल्या
पंख फुटुनी गोजिरे
फुलांवर उडती फुलपाखरे॥


कवी - अ. ज्ञा. पुराणिक

आव्हान

छळून घ्या संकटानो,
संधी पुन्हा मिळणार नाही,
कर्पुराचा देह माझा
जळून पुन्हा जळणार नाही.

साहेन मी आनंदाने तुमचे वर्मी घाव
असाच नेईन किनार्‍याशी चुकलेली नाव
मार्ग बिकट आला तरी मागे मी वळणार नाही ll १ ll

निराश मी होणार नाही, झुंजता तुमच्या सवे
मनी माझ्या जागतील आकांक्षांचे लाख दिवे
वेदना झाल्या तरीही अश्रू मी गाळणार नाही ll २ ll

आव्हान माझे तुम्हांला चालून या माझ्यावरी
धैर्याची कट्यार माझी पाजळेन तुमच्यावरी
संकटानो सावधान गाफील मी असणार नाही ll ३ ll


कवी - अशोक थोरात

डराव डराव!

डराव डराव! डराव डराव!
का ओरडता उगाच राव?

पत्ता तुमचा नव्ह्ता काल
कोठुनी आला? सांगा नाव
धो धो पाउस पडला फार
तुडुंब भरला पहा तलाव
सुरू जाहली अमुची नाव
आणिक तुमची डराव डराव!

बटबटीत डोळ्यांचे ध्यान
विचित्र तुमचे दिसते राव!
सांगा तुमच्या मनात काय?
ही घ्या छत्री, ही घ्या नाव
जा गाठा जा अपुला गाव
आणि थांबवा डराव डराव!


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आभाळाची आम्ही लेकरे

आभाळाची आम्ही लेकरे,
काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा
धर्म वेगळा नाही

श्रमगंगेच्या तीरावरती
कष्टकर्‍यांची आमुची वसती
नाव वेगळे नाही आम्हा
गाव वेगळा नाही

इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
कर्म वेगळे नाही आम्हा
मार्ग वेगळा नाही

माणुसकीचे अभंग नाते
आम्हीच आमुचे भाग्याविधाते
पंथ वेगळा नाही आम्हा
संत वेगळा नाही

कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ-रथ ओढुन नेऊ
श्वास वेगळा नाही आम्हा
ध्यास वेगळा नाही


कवी - वसंत बापट

या बाइ या

या बाइ या,
बघा बघा कशि माझि बसलि बया.

ऐकु न येते,
हळुहळु अशि माझि छबि बोलते.

डोळे फिर्वीते,
टुलु टुलु कशि माझि सोनि बघते.

बघा बघा ते,
गुलुगुलु गालातच कशि हसते.

मला वाटते,
इला बाइ सारे काहि सारे कळते.

सदा खेळते,
कधि हट्ट धरुनि न मागे भलते.

शहाणि कशी,
साडिचोळि नवि ठेवि जशिच्या तशी.


गीत    -   दत्तात्रय कोंडो घाटे
संगीत -   वसंत देसाई
स्वर    -   साधना सरगम
'मी ५ मिनिटात तय्यार होते....' असे एखाद्या मुलीने म्हणणे
.
.
.
.
आणि
.
.
.
.
.
'मी ५ मिनिटात तेथे पोहचतो....' असे एखाद्या मुलाने म्हणणे.....

एकाच नाण्याच्या दोन बाजू

स्टफ्ड मेथी टिक्कि

साहित्यः
१. उकडुन / मॅश केलेले बटाटे - २ मध्यम
२. हिरव्या मिरच्या - २
३. बारिक चीरलेली मेथि - १ वाटि
४. पेरभर आलं
५. मुठभर कोथिंबीर
६. कॉर्न फ्लोअर - १ ते २ चमचे आवश्य्कतेनुसार
७. चवीनुसार मीठ
८. तेल - शॅलो फ्राय करण्यासाठि

स्टफिंगसाठि:
१. मक्याचे दाणे - १/२ वाटि (उकडुन भरडसर वाटणे)
२. किसलेले चीज - १/२ वाटि (आपापल्या आवडिप्रमाणे; मी चेडार चीज वापरलय)
३. चवीनुसार मीठ (चीज मधे कितपत आहे त्या प्रमाणात)
४. हिरवी मिरची - १ बारिक चिरुन (तिखट हवं असल्यास)

कृती:
१. मिक्सर मधे आलं, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट पाणि न घालता करुन घ्या
२. एका कढईत १ चमचा तेल टाकुन बारिक चीरलेली मेथि परतुन घ्या. मेथिला पाणि सुटेल म्हणुन कोरडि होईस्त परतत रहा. मेथि जर कडु असेल तर चिरायच्या आधि मेथिला थोडं मीठ लावुन बाजुला ठेवा. एक ५-१० मि. दोन्हि हातांनि घट्ट पिळुन घ्या. पाण्याबरोबर मेथिचा कडवटपणा निघुन जाईल.
३. आता एका बाउल मधे मॅश केलेले बटाटे, आलं-मिरची-कोथिंबिर पेस्ट, परतलेलि मेथि, चवीनुसार मीठ टाकुन एकजीव करुन घ्या
४. गरजेप्रमाणे कॉर्न फ्लोअर टाकुन घट्ट्सर मळा
५. स्टफिंगसाठिचं सर्व साहित्य एकत्र करा
६. आता बटाटयाच्या मीश्रणाची पारि करावी व कॉर्न/चीजचं मिश्रण भरुन पारि बंद करावी
७. टिक्कि सारखा गोल आकार देउन तव्यावर दोन्हि बाजुनी शॅलो फ्राय करावी. बाजु उलटताना काळजी घ्या नाहितर टिक्कि फुटुन मिश्रण बाहेर येईल
८. गरमागरम टिक्कि आवडत्या सॉस / पुदिना चटणिसोबत सर्व करावी

टिपा:

१. जर टिक्कि प्रकार नको असेल तर सर्व साहित्य एकत्र करावे व लिंबाएवढे गोळे करुन तेलात डिप फ्राय करावे.
२. तरिहि वरच्या प्रकारात जास्त तेलकट नको असेल तर थोडया तेलात आप्पेपात्रात फ्राय करावे पण मेथिचं कोटींग असल्यामुळे आतुन शिजल्याचा नक्कि अंदाज येत नाहि आणि सतत परतावे / उलटावे लागतात नाहितर मेथि लवकर जळते

कसं असावं

(शिरीष कणेकर ह्यांचा 'सामना' मधील लेख)

राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं .

शूर असावं तर राणा प्रतापसारखं.

स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं.

देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं.

कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं .

हुशार असावं तर बिरबलासारखं .

धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं.

करिअर करावी तर लता मंगेशकरसारखी.

सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं.

सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख.

राजकीय पक्ष बदलावेत तर सुब्रमन्यम स्वामीसारखं.

बेसूर गाव तर अलिशा चिनॉयसारखं.

समस्त लोकांना उल्लू बनवावं तर ललित मोदीसारखं.

अष्टपैलू लेखक असावं तर जयवंत दळवीसारखं.


नियतीला पराभूत करावे तर कर्णासारखं.

देशाला ललामभूत ह्वाव तर बिल गेट्ससारखं.

निरलस सेवार्थी ह्वाव तर डॉ.तात्यासाहेब लहानेसारखं.

शब्दांचे बुडबुडे फोडावेत तर कॉंग्रेससारखं.

राष्ट्रभाषेचे धिंडवडे काढावेत तर ममता बनेर्जीसारखे.

लग्न न करता नुसतच बिनधास्त बरोबर रहाव तर बिपाशा बसूसारखं .

लग्नाशिवाय झालेली मुलगी खुल्लम खुल्ला वाढवावी तर नीना गुप्तासारखी.

खमक्या असावं तर लालू प्रसादसारखं.

लफडेबाज असावं तर टायगर वूड्ससारखं.

लग्न करावीत तर एलिझाबेथ टेलरसारखी.

उद्योगपती ह्वाव तर टाटासारखं.

सहकुटुंब यशस्वी ह्वाव तर अमिताभ बच्चनसारखं.

अनाकलनीय लिहाव तर ते ग्रेससारखं.

व्यंगचित्रे काढावीत तर ती आर.के.लक्ष्मणसारखी.

बाराच्या भावात जाव तर राजेश खन्नासारखं .

गझल गावी तर मेहंदी हसनसारखी.

घर असावं तर मुकेश अंबानीसारखं.

बायको असावी तर अभिषेक बच्चनसारखी.

चालीचा चोर असावं तर अन्नू मलिकसारखं.

भ्रष्टाचारी असावं तर इंडियन मेडिकल कौन्सिलचा अध्यक्ष केतन देसाईसारखं.

बोलबच्चन असावं तर अरुण जेटलीसारखं.

प्रेमवीर असावं तर शोऐब मलिकसारखं.

निर्ल्लज कामांध असावं तर किचकासारखं किंवा शायनी आहुजासारखं.

प्रेक्षक नाहीत हे कळून सुद्धा सिनेमे काढावेत तर देव आनंदसारखं.

बाईने रूपवान व 'ग्रेसफुल' असावं तर गायत्री देवीसारखं.

बाईन कस नसाव तर राखी सावंतसारखं .

निर्विष विनोद करावा तर पु.ल.देशपांडेसारखा.

लग्न करून सुखी ह्वाव तर माधुरी दीक्षितसारखं.

लग्न करून दुखी ह्वाव तर अदनान सामीसारखं.

दुसरी बायको करायची तर हेमा मालीनिसारखी.

त्रेचाळीस वय झाल तरी देवाच्या नावावर सोडलेल्या बोकडासारखं बकऱ्यांच्या

मागे उंडरत फिरायचं तर सलमान खानसारखं.

बाबा आदमच्या जमान्यात लिहलेल्या एका कादंबरीच्या जीवावर मिशीला तूप लावून फिरायचं तर भालचंद्र नेमाडेसारखं.

बाबा आदमच्या जमान्यात काढलेल्या एका चित्रपटाच्या जीवावर आजही टेचात फिरायचं तर रामदास फुटाणेसारखं.

आनंदात व उत्साहात जगायचं तर यशवंत देवांसारखं.

रडत आणि कटकट करीत जगायचं तर माझ्यासारखं.

एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

दोघांच्याही मनात होतं,
दोघांनाही ते ठाऊक होतं
कुनी कधी काही बोललेच नाही…..
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

जाण्या-येण्याच्या वेळाही एक,
ठरुनच गेल्या होत्या बहुतेक
वाटा दोहोंच्या जुळल्याच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

नजर भिरभिरते,एकमेंका शोधते;
दृष्टा-दृष्ट झाल्यास मनी सुखावते
नजरेपलिकडे काही घडलेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

नसेना का घडले मिलन परि…
आजन्म फुलतिल प्रेमांकुर ऊरी
नियतीचे कोडे कळ्लेच नाही
एक अबोल प्रेम फुललेच नाही !!

राहिले जरी हे प्रेम अव्यक्त
मनी न उरली बोच हि फक्त
जगणे…..वाटणार ओझे नाही
ज़रि……. हे अबोल प्रेम फुललेच नाही !!
रजनीकांतचा जन्म ३० फेब्रुवारी रोजी झाला..
.
.
.
त्यानंतर फेब्रुवारी महिन्याने ती तारीख कोणालाही दिली नाही.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तरी मक्या ३१ फेब्रुवारीलाच झाला.काय कराव कार्ट ऐकतच नाही.

तुझी आठवण

कुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ... ॥१॥

आठवण तुझी नसानसांना धक्का देउन जाते,
मन कधी प्रेमाचे कधी विरहाचे गीत गाते,
रोजच्यासारखीच आठवण तुझी नवीन वाटून आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥२॥

वारा तुझा स्पर्श बनून जवळ येतो माझ्या,
क्षणात करतो आपल्या सा-या जुन्या आठवनी ताज्या,
वा-यालाही घेउन श्वासावाटे काळजापर्यंत गेली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥

घुसळून टाकलं मनं तिने जसं जमेल तसं,
मलाच सुचेना तिला आता बाहेर काढू कसं,
याच विचारात दिवस गेला, संध्याकाळही झाली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥


संध्याकाळी वाटलं थोडं बरं वाटेल आता,
मित्रांबरोबर बसून थोड्या टाकू म्हटलं टापा,
चौपाटीवर गेल्यावर ती सांज डोळ्यापुढे आली,
स्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥

किती पाहशील अंत आता, परतून ये लवकर,
तुलाही ऐकू येत असेल माझ्या मनामधली घरघर,
जाणवतय मला तुझीही अवस्था माझ्यासारखीच झाली,
माझ्या आठवणीने, तुझी सुद्धा पापणी ओली केली ...॥४॥

मराठीतून बोल…

इंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल
मराठी मानसा आता तरी तू
मराठीतून बोल…

इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास
पण
मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास…

प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की
पोरगी समजते हेंबाड्या
अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या…

माय
झाली मॉम आणि बाप झाला आता डयाड
रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली
मॅड…

भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका
मराठी
माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका…

मराठी इसरत चालल शाळेतले
शिक्षण
मराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण…

ज्ञानोबा
तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे
असतो गुडी पाडवा…

सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी
मराठीतूनच
बोला सारे मराठी रक्षणासाठी…!!!

कुणा काही देता देता

कधी रिकाम्या हातात
भरली सुरई यावी
डोळे मिटून चालता
स्वप्नगुंफा गवसावी

शून्य शून्य नजरेला
क्षितीजाचा रंग यावा
पावसाच्या थेंबातून
रुपगंधी अर्थ यावा

कधी काही ओलांडता
पाया रुतावी हिर्वळ
कुणा काही देता देता
पुन्हा भरावी ओंजळ


कवी - वासंती मुझुमदार

ऊन होऊनी पसर

 ऊन होऊनी पसर जगावर
हिरमुसलें तॄणपान फुलू दे
थव्यास मुकले फूलपाखरु
चुकलेपण आपुले भुलू दे

दव जे जमले नयनी माझ्या
जिथल्या तेथे ते उजळू दे
त्यात गवसले मन हे माझे
विकासत्या गगनी वितळू दे

वारा होऊनी विहर जगावर
दडलाअडला गंध उलू दे
ज्याला त्याला अपुल्यामधल्या
गूढ सुखाचा थांग कळू दे

कवी - बा. भ. बोरकर

रुपकळा

प्रति एक झाडामाडा
त्याची त्याची रुपकळा
प्रति एक पाना फुला
त्याचा त्याचा तोंडवळा

असो पाखरु मासोळी
जीव जिवार मुंगळी
प्रत्येकाची तेवठेव
काही आगळी वेगळी

असो ढग असो नग
त्याची अद्भुत रेखणी
जी जी उगवे चांदणी
तिच्या परिने देखणी

उठे फुटे जी जी लाट
तिचा अपूर्वच घाट
फुटे मिटे जी जी वाट
तिचा अद्वितीय घाट

भेटे जे जे त्यात भरे
अशी लावण्याची जत्रा
भाग्य केवढे, आपुली
चाले यातुनच यात्रा


कवी  -  बा.भ.बोरकर

स्पर्श

फुलल्या लाख कळ्या
स्पर्शसुगंधा घन अंधारी फुटल्या ग उकळ्या

ध्वनिकंपित तनुच्या शततंत्री
बंदी मन रतीमोहमंत्री
लय लागुनिया नाचु लागल्या स्वप्नीच्या पुतळ्या

धूप जळे तिमिराचा पवनी
विनिद्रनयना व्याकुळ अवनी
पिकुनी लावल्या नक्षत्रांच्या द्राक्ष लता पिवळ्या

भुई वाळुची संगमरवरी
तीवर काळ्या फेनिल लहरी
व्यथेतुनी सुख मंथित ग्रंथित झाल्या मधुर निळ्या

सुटल्या अवचित जटिल समस्या
फुटला रव स्मरकुटिल रहस्या
जननांतरिच्या स्मृतिच्या ज्योती पाजळल्या सगळ्या

द्रवली नयने, स्रवली हृदये
दो चंद्राच्या संगम-उदये
दुणी पौर्णिमा, रसा न सीमा, उसळ्यांवर उसळ्या


कवी - बा. भ. बोरकर

माझे घर

तृप्त स्वतंत्र गोव्यात केव्हातरी केव्हातरी
फेसाळल्या लाटांपाशी सिंधुसरितेच्या तीरी।
बांधीन मी छोटेसेच लाल चिरेबंदी घर
गार विलायती वेल चढवीन भिंतीवर॥

मागे विहीर काठाची वर प्राजक्ताचे खोड
गर्द हिरवे न्हाणीशी नीरफणसाचे झाड।
केळबनाच्या कडेला स्वच्छ छोटासाच गोठा
त्यात सवत्स कपिला ओल्या चार्‍याचा नि साठा॥

फुलपाखरांच्यासाठी पुढे फुलझाडे चार।
आंबा एकादा कलमी यावी म्हणुनिया खार।
गारव्याच्यासाठी काही गार नाजूक पोफळी
नागमोडी त्यांच्यावर पानवेल मिरवेल॥

वर पश्चिमेला गच्ची अभ्यासिका पूर्वेकडे
शेजारच्या माडावर पाहीन मी सोनसडे।
कानी समुद्राची गाज पुढे ग्रंथ स्वर्णाक्षरी
पारव्यांची कुजबुज खिडकीच्या गजांवरी॥

असा पहाटेला घेत हुक्क्या चहाची लज्जत
लिहीन मी भावगीते तेथे घुमत घुमत।
आणि येता थोडा शीण बसुनिया गच्चीवर
रेखाटीन भोवतीचे चित्र एखादे सुंदर॥

जाळी फेकणारे कोळी, त्यांच्या मासळीच्या होड्या
खपणारे वावराडी, त्यांच्या विसाव्याच्या विड्या।
कधी काजळता क्रूस कधी उजळ घुमट
बांगड्यांशी खेळणारा कधी ओलेतीचा घट॥

आणि मग सेवीन मी जाईजुईचा गे भात
पोईतल्या मासळीचा स्वाद घेत साथ साथ।
वेताचिया खाटेवर थोडा बागेत दुपारी
झोपेन मी घोळवीत तुझी अमली सुपारी॥

आणि सूर्यास्तास माझा रंगी घेऊन शिकारा
तुझ्यासंगे जाईन मी इंद्रचंद्राच्या माहेरा।
कुणी भविष्याचा कवी आम्हा ऐकवील गाणी
ऐकेन ती समाधाने डोळा घेऊनीया पाणी॥

थंडीवार्‍यात पश्मिनी शाल स्कंधी घालशील
काठी उद्याचा तो कवी प्रेमे मला सांभाळील।
घरी येताच नातरे आनंदाने म्हणतील
सांगा गोष्ट किंवा म्हणा नवे गाणे॥

रचुनिया सांगेन मी त्यांना गाण्यातच कथा
जेणे जाणवेल त्यांना उद्या दुसर्‍याची व्यथा।
मग रेलून गच्चीत टक लावीन आकाशी
दाट काळोखातही मी चिंब भिजेन प्रकाशी॥

असे माझे गोड घर केव्हातरी केव्हातरी
अक्षरांच्या वाटेनेच उतरेल भुईवरी॥


कवी  - बा. भ. बोरकर

उत्तररात्र ओलांडून

उत्तररात्र ओलांडून खुळे चांदणे घरात आले
गाढ झोपेत मूल मूल दवामधले फूल झाले

आई त्यांची हिरवी वेल पान्पान आळसलेली
स्वप्नपत्री खुडत असताना मोतीचूर पावसात न्हाली

सोनदिवीचे पाचही डोळे जागून झाले मंद मंद
गार झोंबरा वारा आला घरात ओतीत धुंद गंध

मीच तेव्हढा जागा झालो गगनभर पांगली वीज
अकस्मात नागीण कशी प्राण चाटून गेली वीज

अंधारातल्या पारिमीता संपून उजळ झाली शुद्ध
शिळ्यापाक्या सुखाखाली उपासपोटी दिसला बुद्ध

खिडकीमधून उडत आले बोलले कोवळे पिंपळपान
" पावस-पाण्यात पिकली पुनव चल लवकर वेचून आण "

वेडे पाय चालू लगले तोच जूनी आठवण झाली
उंबरठ्यापाशी कपाळभर दरदरून हूम आली

तसाच फिरुन वारें कसा जागवले मी सारे घर
त्याच्या संगे वेचली पुनव चूर होऊन रात्रभर

रोज चांदणे घरांत येते फुलतो संसार पिंपळ कसा
कवडसासा अजून बुद्ध बसून आहे उघडून पसा


कवी - बा. भ. बोरकर

जपानी रमलाची रात्र

तुझे विजेचे चांदपाखरू दीप-राग गात
रचीत होते शयनमहाली निळी चांदरात

रतीरत कुक्कुट साकुंडीवर आरोहूनी माड
चोच खुपसुनी फुलवीत होता पंखांचे झाड

अद्भुत पंख्यासम भिंतीवर आंदोलुनी छाया
लावित होत्या ताप जगाचा नकळत विसराया

धूप ऊसासत होता कोनि रजताच्या पात्री
विचित्र रेशिमचित्रे होती रसावली गात्री

तुझा पियानो यक्ष जळातील होता निजलेला
मनात गुंफित स्पर्श-सुखांच्या स्वप्नांचा झेला

अन् म्युसेची कवने होती माझ्या हातात
प्रतिचरणाला करित होती धूम्रवेल साथ

जळत ऊसासत होते त्यासह अंतरात काही
होता चिमणा श्वान लोकरी घोटाळत पायी

तोच वाजल्या तुझ्या सपाता सळसळला घोळ
आलीस मिरवीत जाळीमधुनी नागिणीचा डौल

करांतुनी तव खिदळत आले स्तनाकार पेले
जळता गंधक पांच उकळता याही रंगलेले

अभिष्ट चिंतुनी आम्ही त्यांचे भिडवियले काठ
सुरेहुनी तु गडे भाजिले ओठांनी ओठ

स्पर्शे तुझिया आणि पियानो थरारला सारा
मज सम त्याच्या कानशिलाच्या झणाणल्या तारा

गंधर्वांच्या दुहिता जमल्या करित पुष्पवृष्टी
हृदय मदाचे मोहळ झाले जडावली दृष्टी

पोहू लागले तुझ्या रेशमी अलकातील मासे
हवा जाहली जड पा-यासम अंगातील वासे

आणि तरंगत डुलु लागली नौकेसम शेज
तो कांतितुन तुझ्या निथळले फेनाचे तेज

नखे लाखिया दात मोतिया वैडूर्यी नेत्र
अवयव गमले चपल चिवट की मयवनीचे वेत्र

कात सोडिल्या नागिणिचे ते नवयौवन होते
विळख्याविळख्यातुनि आलापित ज्वालांची गीते

गरळ तनुतील गोठुन झाले अंतरात गोड
कळले का मज जडते देवा नरकाची ओढ

डोळे बांधुन खेळत होते जीवन मायावी
अंधपणातच वितळत होते भूत आणि भावी

तुझ्या जपानी भाषालिपिसम अगम्य सुन्दरता
असुनि हाती उरली दुर्लभ आली ना हाता

आजही तुज शोधता कधी ती रमलाची रात्र
पाठितुनि जंबिया मधाचा घाली काळजात!


कवी - बा.भ.बोरकर

निळा

एक हिंवटीचा निळा, एक धुवटीचा निळा,
दूर डोंगरांचा एक जरा त्यांच्याहून निळा,
मोरपिसाच्या डोळ्याचा एक मखमाली निळा,
इंद्रनिळांतला एक गोड राजबिंड निळा,
विसावल्या सागराचा एक ओलसर निळा,
आकाशाच्या घुमटाचा एक गोलसर निळा...

असे नानागुणी निळे किती सांगू त्यांचे लळे?
ज्यांच्यामुळे नित्य नवे गडे तुझे माझे डोळे :
जेथे उगवे मावळे त्यांचा लावण्यसोहळा
असा कालिंदीच्या काठी एक इंदीवरनिळा :
होऊ आपणही निळ्या, करू त्याशी अंगसंग :
निळ्या झाल्या त्यांच्यासंगे रंग खेळतो श्रीरंग.


कवी - बा. भ. बोरकर

लावण्य रेखा

देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे
गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे
तेच डोळे देखणे जे कोंडिते सार्‍या नभा
वोळती दुःख जगाच्या सांडिती चंद्रप्रभा

देखणे ते ओठ जे की ओविती मुक्ताफळे
आणि ज्यांच्या लाघवाने सत्य होते कोवळे
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळ्वंटतूनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती
देखणे ते स्कंध ज्या ये सूळ नेता स्वेच्छया
लाभला आदेश प्राणी निश्चये पाळावया

देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्‍यासारखे
देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा


कवी - बा.भ.बोरकर

पाणीच पाणी

तृप्त पाणी तुष्ट पाणी कोंडलेले रुष्ट पाणी
वाकडे नाल्यानद्यांचे वेगवेडे पुष्ट पाणी
बावडीचे खोल काळे पारदर्शी मग्न पाणी
कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी
उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी
सागराच्या मस्तकीचे आंधळे विक्राळ पाणी
पावली घोटाळणारे लाडके तांबूस पाणी
साळीच्या काट्यांप्रमाणे टोचरे पाऊस पाणी
पाणीयाच्या उत्सवी या मातले पाणीच पाणी
आणि त्यांच्या प्रत्ययाने मीही पाणी मीही पाणी


कवी - बा. भ. बोरकर

पिपांत मेले ओल्या उंदिर

पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;
ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.
गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;
दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे,
काचेचे पण;
मधाळ पोळें
ओठांवरती जमलें तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!


कवी - बा.सी.मर्ढेकर

ह्या गंगेमधि गगन वितळले

ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा
अर्ध्या हाकेवरी उतरला बुद्धगयेचा पिवळा वारा

विटाळलेली मने उघडती झापड-दारे आपोआप
अन् चिखली ये बिचकत श्वास, जणु पाप्याचा पश्चात्ताप

सुरांत भरली टिटवीच्या कुणि, मृत्युंजयता भोळी भगवी
आणि अचानक शिवली गेली, ध्रुवाध्रुवांतील काही कडवी

अजाणत्याच्या आकांक्षांतील शंख-शिंपले येऊन वरती
उघड्या रंध्रांमध्ये अनामिक गगनगंध हा ठेवून घेती

इथेतिथेचे फुटले खापर, ढासळली अन् जरा 'अहम्'ता
उभ्या जगावर चढली अडवी, तव मायेची कमान आता

ह्या गंगेमधि गगन वितळले, शुभाशुभाचा फिटे किनारा
असशील जेथे तिथे रहा तू, हा इथला मज पुरे फवारा


कवी - बा.सी.मर्ढेकर

झोपली गं खुळी बाळे

झोपली गं खुळी बाळे
झोप अंगाईला आली
जड झाली शांततेची
पापणी ह्या रित्या वेळी

चैत्र बघतो वाकून
निळ्या नभांतून खाली
आणि वाऱयाच्या धमन्या
धुकल्या गं अंतराळी

शब्द अर्थाआधी यावा
हे तो ईश्वराचे देणें
पेंगणाऱ्या प्रयासाला
उभ्या संसाराचे लेणे

चैत्र चालला चाटून
वेड्या सपाट पृथ्वीला
आणि कोठेतरी दूर
खुजा तारा काळा झाला

आता भ्यांवे कोणी कोणा
भले होवो होणाऱ्याचे
तिरीमिरीत चिंचोळ्या
काय हाकारावे वेचे

चैत्र चढे आकाशात
नीट नक्षत्र पावली
आणि निळ्या वायूतून
वाट कापी विश्ववाली

वेड्याविद्र्या नि वाकड्या
मनाआड मने किती
चाळणीत चाळणी अन
विचारांत तरी माती

चैत्रबाप्पा उद्या या हो
घेऊनीया वैशाखाला
आंबोणीच्या मागे का गं
तुझा माझा चंद्र गेला?

आंबोणीच्या मागे का गं
अवेळी का चंद्र गेला?


कवी - बा.सी.मर्ढेकर

ह्या दु:खाच्या कढईची गा

ह्या दु:खाच्या कढईची गा
अशीच देवा घडण असू दे;
जळून गेल्या लोखंडातहि
जळण्याची, पण पुन्हा ठसू दे
कणखर शक्ती, ताकद जळकट

मोलाची पण मलूल भक्ति
जशि कुंतीच्या लिहिली भाळी,
खिळे पाडुनि तिचे जरा ह्या
कढईच्या दे कुट्ट कपाळी
ठोकुनि पक्के, काळे, बळकट

फुटेल उकळी, जमेल फेस,
उडून जाइल जीवन-वाफ;
तरि सांध्यांतुन कढईच्या ह्या
फक्त बसावा थोडा कैफ
तव नामाचा भेसुर धुरकट.


कवी  - बा.सी.मर्ढेकर

रात्रही का वैऱ्याचीच, घालशील गा जन्माला!

ओठांवर आली पूजा, भरे मनांत कापरें
ओल्या पापांची वाळून, झालीं वातड खापरें
पापांतून पापाकडे , जाई पाप्याचा विचार
आणि पुण्याचीं किरणें, लोळतात भुईवर
माथीं घेतलें गा ऊन, कटींखांदीं काळेंबेरें
तुझ्या आवडीचा क्षण, डोळ्यांतून मागे फिरे
गढूळला तोही क्षण, मतलबाच्या मातीने
कैसें पोसावे त्यांवर, आर्द्र स्वप्नांना स्वातीने
घडय़ाळांत आता फक्त, एक मिनिट बाराला
रात्रही का वैऱ्याचीच, घालशील गा जन्माला!



कवी  - बा.सी.मर्ढेकर

दवांत आलीस भल्या पहाटे

दवांत आलीस भल्या पहाटी
शुक्राच्या तोऱ्यात एकदा,
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
तरल पावलांमधली शोभा

अडलिस आणिक पुढे जराशी
पुढे जराशी हसलिस; - मागे
वळुनि पाहणे विसरलीस का?
विसरलीस का हिरवे धागे?

लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा,
सुंदरतेचा कसा इशारा;
डोळ्यांमधल्या डाळिंबांचा
सांग धरावा कैसा पारा!

अनोळख्याने ओळख कैशी
गतजन्मीची द्यावी सांग;
कोमल ओल्या आठवणींची
एथल्याच जर बुजली रांग!

तळहाताच्या नाजुक रेषा
कुणि वाचाव्या, कुणी पुसाव्या;
तांबुस निर्मल नखांवरी अन
शुभ्र चांदण्या कुणी गोंदाव्या!

दवांत आलिस भल्या पहाटी
अभ्राच्या शोभेत एकदा;
जवळुनि गेलिस पेरित अपुल्या
मंद पावलांमधल्या गंधा.


कवी - बा सी मर्ढेकर

भंगु दे काठिन्य माझे

भंगु दे काठिन्य माझे
आम्ल जाउ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे

धैर्य दे अन नम्रता दे
पाहण्या जे जे पहाणे
वाकू दे बुध्दीस माझ्या
तप्त पोलादाप्रमाणे

जाऊ दे 'कार्पण्य' 'मी' चे
दे धरु सर्वांस पोटी
भावनेला येऊ देगा
शास्त्र काट्याची कसोटी


कवी - बा.सी.मर्ढेकर

पोरसवदा होतीस

पोरसवदा होतीस
काल-परवापावेतो
होता पायातही वारा
काल-परवापावेतो.

आज टपोरले पोट
जैसी मोगरीची कळी
पडे कुशीतून पायी
छोट्या जीवाची साखळी.

पोरसवदा होतीस
काल-परवापावेतो
थांब उद्याचे माऊली
तीर्थ पायांचे घेतो.


कवी - बा.सी.मर्ढेकर

जशि धोब्याची मऊ इस्तरी

जशि धोब्याची मऊ इस्तरी
तलम फिरावी सुतावरूनी
फाल्गुनातली चन्द्रकोर तशि
मलिन मनाच्या धाग्यांवरुनी

शिणेल धोबी यदाकदाचित,
पडेल खाली चन्द्रकोर अन्
सुरकुतलेल्या मनोवृत्तिंना
पुनश्च कोठे भट्टी भगवन्


कवी - बा.सी.मर्ढेकर

पितात सारे गोड हिवाळा

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्‍या नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्‍या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा


कवी - बा. सी. मर्ढेकर

गणपत वाणी

गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;

मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भूवयी,
भिरकावुनि ती तशीच द्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.

गिर्‍हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;

स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.

गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.

काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.

काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!


कवी - बा. सी. मर्ढेकर

आला आषाढ-श्रावण

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी.

काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत.

चाळीचाळीतून चिंब
ओंली चिरगुटे झाली;
ओल्या कौलारकौलारीं
मेघ हुंगतात लाली.

ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची
रान दाखवितें नक्षी.

ओशाळला येथे यम
वीज ओशाळली थोडी;
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी.

मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण
निवतात दिशा-पंथ.

आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षा‌ऋतू तरी.


कवी - बा. सी. मर्ढेकर

बा. सी. मर्ढेकर

बाळ सीताराम मर्ढेकर (जन्म-डिसेंबर १, १९०९ मृत्यू- मार्च २०, १९५६) हे युगप्रवर्तक कवी; त्यांना मराठी नवकवितेचे जनक म्हटले जाते. 

त्यांचा जन्म खानदेश जिल्ह्यातील फैजापूर येथे झाला. मर्ढेकरांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील मर्ढे या गावचे. मूळ आडनाव गोसावी असले तरी गावाच्या नावावरून मर्ढेकर हे आडनाव रूढ झाले. मर्ढेकरांचे प्राथमिक शिक्षण बहाद्दरपूर येथे तर माध्यमिक शिक्षण फैजपूर सावदे येथे झाले. तसेच धुळ्याच्या गरूड हायस्कूल- मध्येही त्यांचे शिक्षण झाले.

बा.सी. मर्ढेकरांचे मूळ नाव ‘रमेश’ होते. घरी त्यांना ‘बाळ’ या नावाने संबोधले जात असे; त्यामुळे तेच नाव पुढे सर्वतोमुखी झाले. शाळेत असताना मर्ढेकरांनी त्यामुळेच ‘रमेश-बाळ’ या टोपणनावाने लेखन केले.

बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे.

‘शिशिरागम’ हा मर्ढेकरांचा पहिला कवितासंग्रह १९३९ साली प्रकाशित झाला. त्यानंतर ‘कांही कविता’ (१९४७), ‘आणखी काही कविता’ (१९५१) हे त्यांचे काव्यसंग्रह निघाले. या तिन्ही संग्रहांतील एकूण १२६ कविता व कवितासंग्रहांत समाविष्ट न झालेल्या सहा कविता, अशा एकूण १३२ कविता मर्ढेकरांच्या नावावर आहेत.


मर्ढेकरांच्या ‘कांही कविता’ या संग्रहातील नवकवितांवर अश्‍लीलतेचा आरोप ठेवून त्यांच्यावर खटला भरण्यात आला (१९४८). तो त्या काळात खूपच गाजला. मर्ढेकरांनी त्याला मोठ्या धैर्याने तोंड दिले व त्यातून ते निर्दोष ठरले. परंतु या खटल्याचा मानसिक त्रास मर्ढेकरांना खूप झाला. त्याचा परिणाम मर्ढेकरांच्या सर्जनशीलतेवरही झाला. १९४८ ते १९५६ या काळात त्यामुळेच मर्ढेकरांच्या प्रतिभेचा पूर्वीचा बहर पाहायला मिळत नाही.

मर्ढेकर यांना १९५६ चा साहित्य अकादमी पुरस्कार "सौंदर्य आणि साहित्य" साठी प्रदान करण्यात आला.

मर्ढेकरांचे प्रकाशित साहित्य असे : 
कवितासंग्रह −शिशिरागम(१९३९), काही कविता (१९४७), आणखी काही कविता (१९५१) 
कांदबऱ्‍या− रात्रीचा दिवस (१९४२), तांबडी माती (१९४३), पाणी (१९४८) 
नाटक−नटश्रेष्ठ (१९४४) 
संगीतिका−कर्ण (१९४४), संगम (१९४५), औक्षण (१९४६), बदकांचे गुपित (१९४७) 
समीक्षात्मक आणि सौंदर्याशास्त्रीय−आर्ट्‌स अँड मॅन (१९३७), वाङ्मयीन महात्मता (१९४१), टू लेक्चर्स ऑन ॲन इंस्थेटिक ऑफ लिटरेचर (१९४१), सौंदर्या आणि साहित्य (१९५५). 

जन्म

नाही कोणी का कुणाचा । बाप-लेक, मामा-भाचा,
मग अर्थ काय बेंबीचा । विश्वचक्री? ॥

आई गोंजारते मुला । कासया हा बाप-लळा,
बाईलप्रीतीच्याही कळा । कशास्तव? ॥

येतें ऊर कां भरून । जाती आतडीं तुटून,
कुणी कुणाचा लागून । नाही जर? ॥

कैसा बांधला देखावा । जननमरणांतून देवा,
कुशीकुशींत गिलावा । रक्तमांसीं? ॥

का हें बांधकाम सुंदर । फक्त नश्वरतेचेंच मखर
अथवा दर्शनी महाद्वार । मिथ्यत्वाचें? ॥

मग कोठे रे इमारत । जिचें शिल्पकाम अद्भुत,
जींत चिरंतनाचा पूत । वावरें की? ॥

जरी कुठे ऐसें धाम । ज्याच्या पायऱ्याही अनुपम
आणि चुना-विटा परम । चिरस्थायी ॥

तरी मग रोकडा सवाल । कोरिसी हाडांचा महाल,
ठेविशी त्यांत हरिचा लाल । नाशवंत ॥

वास्तुशास्त्र कां बिलोरी । योजिशी येथेच मुरारी,
घडसी वस्तीला भाडेकरी। बिलोरीच?


कवी - बा. सी. मर्ढेकर

अस्थाई

अस्थाईवर स्थायिक झालों,
चुकून गेला पहा अंतरा
ओरडून का अता लागणे
ढिल्या गळ्यावर पंचम गहिरा!

नशेत झुकला निशापती अन्
अस्मानाच्या कलल्या तारा;
अंधारावर विझून गेला
रात्रीचा या वीज-पिसारा

क्लिन्न मनोगत मोटारींचें
कुशींत शिरले काळोखाच्या;
नालबंद अन् घोड्याची ये
टाप समेवर जिवंततेच्या.

शांत जगाच्या घामावरला
उडून काळा गेला वास;
बेटाबेटांतुनी मनांच्या
जराच हलला श्वासोच्छ्वास.

अस्थाईवर पुन्हा परतलों,
चुकून गेला पहा अंतरा;
ढिल्या गळ्यावर षड्ज बांधणें
अता खालचा परंतु हसरा.


कवी - बा.सी.मर्ढेकर

सकाळी उठोनी

सकाळी उठोनी | चहा-काँफी घ्यावी,
तशीच गाठावी| विज-गाड़ी||

दाती तृण घ्यावे | हुजूर म्हणून;
दुपारी भोजन| हेची सार्थ ||

संध्याकाळ होता | भूक लागे तरी,
पोराबाळांवरी | ओकू नये||

निद्रेच्या खोपटी | काळजीची बिळे,
होणार वाटोळे| होईल ते||

कुणाच्या पायाचा | काही असो गुण;
आपुली आपण| बिडी प्यावी||

जिथे निघे धूर| तेथे आहे अग्नी;
आम्ही जमद्ग्नी | प्रेतरुपी||


कवी - बा. सी. मर्ढेकर.

एक प्रेयसी पाहिजे

एक प्रेयसी पाहिजे, पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत, भिजायला लावणारी.

एक प्रेयसी पाहिजे, फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत, झाडांमागे लपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात, अलगद येऊन बसणारी.

एक प्रेयसी पाहिजे, कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र, अप्रतिम सुंदर असणारी.

एक प्रेयसी पाहिजे, जिवलग मैत्रीण असणारी;
आमच्या नाजुक नात्याला, हळुवारपणे जपणारी.

एक प्रेयसी पाहिजे, माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच, माझ्यावर प्रेम करणारी.

एक प्रेयसी पाहीजे, प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या, तन्मयतेने साथ देणारी.

एक प्रेयसी पाहीजे........ मिळेल का अशी?

माझं आपलं असं प्रेम !!!!

चंद्र सुर्य आणून देईन,
पदरात घालीन लक्ष तारे !
बांधून ठेवीन तुझ्या दारी,
तुझ्या केसांशी खेळते वारे !!!

असं मी मुळीसुद्धा म्हणणार नाही
उगाचं भाव खाण्यासाठी मी खोटं बोलणार नाही...

माझं आपलं सरळसोट सांगण
"माझं तुझ्यावर प्रेम आहे !"
अगदीच 'हीर - रांझा' नसलं तरी
थोडं थोडसं सेम आहे !!!

पेट्रोल जाळत फ़िरणं तुझ्यापाठी
मला अजिबात जमणार नाही,
शायनिंगसाठी पैसा उधळणं
मला अजिबात झेपणार नाही.

तरीसुध्दा मार हाक मनापासुन कधी !
उभा असेन तुझ्यासमोर तुझ्यासुद्धा आधी !!!
कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे !
हां ! 'जॉन - बिपाशा' सारखं नाही
माझं आपलं माझ्यासारखं प्रेम आहे !!!!

आणखी एक खरं सांगतो,
तुझं माझ्यावर आणि
माझं तुझ्यावर प्रेम असलं तरी !
'केवळ' सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी
बघत राहीन इतर पोरी !!

पण हे अगदी नक्की त्या कितीही सुंदर असल्या
आणि कितीही मोहक हसल्या तरी,
तुझ्याचं खळीवर पागल होतो,
तुझ्याचं बटांवर पागल आहे आणि
तुझ्याचं डोळ्यात आकाश बघेन !!

कधीच नाही म्हटंल की...

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
कदाचीत माझ्या नजरेतला भाव तुला कधी कळलाच नाही म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
माझ्या डोळ्यातुन ओघळणारा अश्रू तु कधीच टिपला नाहीस म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
भोवतालच्या मित्र-मैत्रिणींच्या गर्दीत मला कधी पाहीलच नाहीस म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
आपल्या ह्रदयाच्या रेशीमगाठी कधी जुळल्याच नाहीत म्हणुन

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन
कारण मनातल्या भावना कधी ओठांपर्यंत पोहचल्याच नाहीत म्हणुन

पण आता मी बोलणार आहे
ह्रदयाचे सर्व बंध उलघडणार आहे
कारण मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुन...

तिला कळतच नाही...

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही

तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
क्षुब्ध होऊन

चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण ते शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत

मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो

पण फुलं तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणंच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही

मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं

काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहीसुद्धा मागत नाही

ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याचीच भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यासाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं

कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात
माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील

शोधतोय

आयुष्याच्या या वाटेवर
मी माझी वाट शोधतोय,

वाहणारे अश्रु येतात जिथुन
मी तो पाट शोधतोय..

मला व्यापलं आहे जीवनाने
अन,मी माझी जागा शोधतोय,

नात्यांच्या या रेशिम बंधातुन
मी माझा धागा शोधतोय...

मनात जे भरुन आहेत कधीचे
मी त्या श्वासांना शोधतोय,

जगण्याची जे उर्मी देतात
मी त्या ध्यासांना शोधतोय....

खरं सांगायचं तर मी
माझ्या हरवलेल्या स्वप्नांना शोधतोय.......

जाता जाता एवढं कर

नवं पाखरू

स्क्रीनवरच्या नजरा आधी गर्रकन फिरतात...
टवकारले जातात कान... आणि भलेभलेही हरतात...

इश्यूत घुसलेल्या विश्वामित्रांचीही तपश्चर्या होते भंग...
पांढर्‍या केसांवर चढतो गुपचुप गोदरेज हेअर डायचा काळा रंग..

विवाहित टीम लीडलाही हलकेच स्वतःच्या बायकोचा पडतो विसर..
छप्पर उडालेल्या मॅनेजर्सवरही तिच्याच यौवनाचा असर..

टीममधल्या सगळ्यांशीच मग हळूहळू तिची ओळख होते..
"च्यायला कसली भारीय" म्हणत चर्चा भलतंच वळण घेते..

एके दिवशी इनबॉक्समध्ये फाटकन् मेल येऊन पडतो..
लग्नपत्रिका पाहून तिची ओठांपाशीच घास अडतो..

प्रोजेक्टमधलं नवं पाखरू भर्रकन कधीच उडून जातं..
छप्पर उडालेलं बावळट ध्यान मग गुपचुप घरचा डबा खातं..

द्रांक्षांना मग आंबट म्हणत शोधली जाते नवी शिकार..
नवं पाखरू यायचा अवकाश.. प्रोजेक्टमध्ये पारधी आहेत चिक्कार..


कवी - संदेश कुडतरकर
रामभाऊ मेडिकलच्या दुकानात जातो.
रामभाऊ (दुकानदाराला) : एक विषाची बाटली द्या...
दुकानदार - प्रिस्क्रिप्शनशिवाय विष देता येत नाही.
रामभाऊ :( दुकानदाराला लग्नाची पत्रिका दाखवत) हे घ्या.
दुकानदार : बास कर मित्रा.....रडवशील का!
 
बाटली मोठी देऊ का छोटी???
"हा शर्ट किमती दिसतोय?"
"तो माझा नाही !"

"पॅन्ट पण छान आहे ..!"
"तीही माझी नाही ..!!"

"मग तुझे काय आहे..?"



.
.
.
.
.
.
.
.
.
"लौन्ड्री ...!!!"

इम्पोटेड अतिरेकी

गंपू ला त्याची आई एकदा खूप मारते, खूप म्हणजे खूप...
.
नंतर गंपू बाबांकडे जातो आणि विचारतो...
.
गंपू : बाबा, तुम्ही पाकिस्तानात गेला आहात का कधी ?
.
बाबा : नाही, रे.... पण का काय झाल????
.
.
गंपू : मग तुम्ही हा अतिरेकी कसा आणला...

देवाचा मोबाईल

किती करू मी तुझा धावा
तुझा मोबाईल नंबर दे रे देवा
नाही माणस कलीयुगी खरी
येता जाता चालती कुरबुरी
मुखी राम बगल मे छुरी
नाही कळत त्यांचा कावा||१||

अवतरलास तू द्वापारी
खूण होती तुझी बासरी
पण जमाना आला नवा
आता नाही चालणार तुझा पावा
तुझा मोबाईल नंबर दे रे देवा||२||

चारी युगात तुझा बोलबाला
फार नाही मागायचं मला
घाई गर्दीत शोधू कुठे तुला
आहे एकच उपाय ठावा
तुझा मोबाईल नंबर दे रे देवा|||३||


कवियत्री - प्रभा मुळे

वीज येते आणिक जाते


वीज येते आणिक जाते ..!!
येताना सर्व वास्तू उजळिते,
आणि जाताना मिट्ट काळोख करते !
गावागावांना ती अशी छळते,
आणि काही शहरांच्या कुशीत शिरते !

कोणाच्या राजकारणाने ती झळाळते?
येणे जाणे कधी न सरणे,
विद्यार्थ्यांच्या ऐन परीक्षेत गुल होणे,
पिकाला पाणी देताना ती नसणे,
कारखाने व गिरण्यांची गोची करणे,

रात्री रस्त्यावरून चालताना तिचे जाणे,
तरुणांचे उगीचच तरुणींपाशी अडखळणे !
येताना ती कसली रीत,
गुणगुणते ती जाण्याचे गीत !
जाते कधीमधी आणि फिरून ये,

येण्यासाठीच दुरु नये !
तिच्या असण्याने तिची उधपट्टी करणे,
ती नसल्याने डोळ्यात असावे येणे !
प्रेमात येते तर कधी निघून जाते,
आणि जाण्याने तिच्या सबुरी संपवीते !
विज येते आणिक जाते......!!!


कवी - जगदीश पटवर्धन

ती येते आणिक जाते

ती येते आणिक जाते
येताना कधि कळ्या आणिते
अन्‌ जाताना फुले मागते
येणे-जाणे, देणे-घेणे
असते गाणे जे न कधी ती म्हणते

येताना कधि अशी लाजते
तर जाताना ती लाजविते:
कळते काही उगीच तेही
नकळत पाही काहीबाही,
अर्थावाचुन असते ’नाही’, ’हो’, ही म्हणते

येतानाची कसली रीत:
गुणगुणते ती संध्यागीत,
जाताना कधि फिरून येत,
जाण्यासाठिच दुरुन येत,
विचित्र येते, विरून जाते जी सलते

कळ्याफुलांच्या मागे येते
कोमट सायंचेहरा घेते
उदी उदासी पानी भरते
"मी येऊ रे ?" ऐकू येते
मध्यरात्रभर तेच तेच प्रतिध्वनि ते


कवी /गीतकार : आरती प्रभू
गायक : महेंद्र कपूर
संगीत : हृदयनाथ मंगेशकर

ये रे घना

ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना

फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको नको म्हणताना, मनमोर भर राना

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना


गीतकार - आरती प्रभू
कवितासंग्रह - दिवेलागण 
गायक - आशा भोसले
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर

आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर

                     मराठी साहित्यविश्वाला `नक्षत्रांचे देणे' देणारे प्रतिभासंपन्न कवी!


वेंगुर्ला तालुक्यातील ‘बागलांची राई’ या ठिकाणी चिं. त्र्यं. खानोलकर यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. एस.एस.सी. पर्यंतच शिक्षण होऊ शकले. ते बुद्धीने अत्यंत तल्लख पण थोड्या विक्षिप्त स्वभावाचे होते. कोकणात नित्यनेमाने चवीने चघळल्या जाणार्‍या भुताखेतांच्या कथा, एकूणच कोकणातील निसर्ग, गूढरम्यता, माणसांच्या मनाचा कसून शोध यांकडे त्यांचे लिखाण जास्त झुके.
साधारणपणे १९५० मध्ये त्यांनी लेखनास सुरुवात केली. सत्यकथेच्या १९५४ च्या फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘शून्य शृंगारते’ या कवितेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. नंतर विंदा करंदीकर व पाडगावकरांच्या ओळखीने मुंबईला १९५९ साली ते आले. आकाशवाणीवर र्स्टों आर्टिस्ट म्हणून ते नोकरीस लागले. पण काही कारणांमुळे १९६१ मध्ये त्यांना नोकरी सोडावी लागली.

खानोलकर हे अतिशय प्रतिभासंपन्न लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार होते. त्यांच्या लेखनाचा झपाटा दांडगा होता. त्यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाचा काळ लक्षात घेतला, तर त्यांच्या लेखनाचा वेग किती प्रचंड होता हे सहज लक्षात येईल. तरीही त्यांच्या लेखनातील वेधकता व गुणवत्ता वादातीत आहे.

घरचे दारिद्रय, आप्तस्वकीयांचा मृत्यू, उपेक्षा, त्यांच्या स्वभावामुळे होत जाणारे गैरसमज, घरची -दारची आजारपणे, नियतीने कधी कधी केलेली कुतरओढ या सगळ्या पसार्‍यात अडकूनही खानोलकरांच्या लिखाणात कधी खंड पडला नाही. त्यांच्या सगळ्याच यशस्वी लेखनाला एक प्रकारचा पारलौकिकाचा संजीवक स्पर्श झालेला आढळतो.

काही लेखन करायचे असले की, खानोलकर जणू कसल्यातरी भावसमाधीत जात आणि एका विलक्षण अवस्थेत देहभान विसरून लिहीत राहत, झपाटल्यासारखे... आणि ती भावसमाधी उतरली, की त्यांचे लेखन थांबे. मग त्या अवस्थेत जे काही लेखन होई, ते स्वयंभू, स्वयंपूर्ण अशी अनुभूती देणारे असे.

त्यांच्या कवितेने सौंदर्यवादी जाणिवेकडून अस्तित्ववादी जाणिवेकडे केलेली प्रगल्भ वाटचाल, त्यांच्या कथांमधून प्रकट झालेले जीवनाच्या शोकात्मतेचे विविधरूपी आकार, माणूस व विश्व यांच्यातील अनेकविध ताण, काम, प्रेम, द्वेष, हिंसा, सूड, निष्ठा, मत्सर इ. वृत्तीप्रवृत्तींनी भरलेले त्यांच्या कादंबरीमधले गुंतागुंतीचे जग - या सार्‍यांमुळे खानोलकरांचे लेखन वाचकांना व समीक्षकांना गूढ आव्हान देत राहते. विश्वाच्या अफाट पसार्‍यात आणि नियतीच्या निर्विकार दृष्टीसमोर माणूस अगदी नगण्य, शून्य आहे, हा बोध त्यांच्या सर्वच लेखनातून येतो.

अनाकलनीय, अतर्क्य दैवी शक्ती, पापपुण्याच्या संकल्पना, धार्मिक श्रद्धा, माणसाला कोणत्याही पातळीवर नेऊ शकणारी काम प्रेरणा, निसर्गाचे कोमल तसेच उग्रकठोर रूप, वासनांचे विखारी फुत्कार ही सूत्रे खानोलकरांच्या आशयबंधातून फिरून फिरून वेगवेगळे आकार घेताना दिसतात. या आशय सूत्रांची सामर्थ्याने व सहज अभिव्यक्ती करू शकणारी प्रतिमांकित भाषाशैली हे त्यांना लाभलेले वरदानच होते.

त्यांचा ‘जोगवा’ हा पहिला काव्यसंग्रह १९५९ साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर १९६२ मध्ये ‘दिवेलागण’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दोन्ही काव्यसंग्रहांमध्ये त्यांच्या व्याकूळ, दु:खविव्हल अवस्थेतल्या कविता जास्त आढळतात. स्मृतिजन्य व्याकुळता हा त्यांच्या पूर्वार्धातील निर्मितीचा ठळकपणे जाणवणारा विशेष वाटतो. इतर समकालीन कवींप्रमाणे तपशीलवार प्रेयसी चित्रण त्यांच्या कवितेत येत नाही. प्रेयसीचे वर्णन करता करताच त्यांना दु:खाची जाणीव इतक्या तीव्रतेने होते, की पुढची कविता त्या अनामिक दु:खाचा अविष्कार होते.

जराच फिरली किनखाबीची सुई, जुईचा उसवित शेला,
आणि ठणकला गतस्मृतीचा , काळोखाने कापूर पेला -

अशी त्यांची वेदना अधिकाधिक तीव्र होत जाते.

त्यामानाने १९७५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘नक्षत्रांचे देणे’ या काव्यसंग्रहात ते जास्त प्रसन्न वाटतात. आपल्या वेदनाकोशातून बाहेर आल्यासारखे वाटतात. यातील कविता संवादात्मक व नाट्यनिष्ठ आहेत. यातली एक नितांत सुंदर कविता-‘आड येते रीत’.
    ‘नाही कशी म्हणू तुला पहाटमाणगी,  परि घालायचे आहे तुळशीस पाणी
    नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, परि सारे हलक्याने आड येते रीत...

या कवितेमधे पती-पत्नीमधील सूचक शृंगार हळुवारपणे व्यक्त झालेला आहे. यातील शृंगारभाव उत्कट असला तरी त्यातील कलात्मक संयम त्यांच्या परिपक्व प्रतिभेची साक्ष देतो.

आरती प्रभूंच्या संपूर्ण कवितेला सतत निसर्गाची पार्श्वभूमी लाभलेली आढळते. नेमके आणि नीटस शब्द हे त्यांच्या निसर्गकवितेचे वैशिष्ट्य.
    हिरव्याशा गवतात हळदिवी फुले, हलकेच केसरात दूध भरु आले,
    उभ्या उभ्या शेतांमधे सर कोसळली, केवड्याची सोनकडा गंधे ओथंबली ..
अशा सुंदर रंग-गंध भरल्या शब्दांनी, प्रतिमांनी त्यांची निसर्गकविता नटलेली आहे.

कोणताही लेखक हा कवितेमधे आत्मप्रकटीकरण करतो. कादंबरीमधे मात्र लेखक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने आत्मप्रकटीकरण करण्याची संधी घेतो. म्हणून तर त्यांना गद्यलेखनाकडे वळावे लागले. माणसामधील व समाजामधील विकृतीचे चित्रण जे कवितेला कदाचित पेलले नसते, ते त्यांनी कादंबरी, नाटक व कथांमधून मांडले. त्यांनी उसवलेल्या माणसांचे विश्र्व आणि त्यांच्या आदिम वासना, प्रेरणांचा शोध आपल्या जाज्वल्य लेखणीद्वारे घेतला.

१९६६ मधे ‘एक शून्य बाजीराव’ हे नाटक रंगभूमीवर आले. झाडे नग्न झाली, पाठमोरी या कथांमुळे ते लेखक म्हणूनही प्रतिष्ठित झाले. त्यांच्या चानी, कोंडूरा या कादंबरींवर चित्रपटही निघाले.

नियतीने त्यांना पुरे जीवन जगू दिले नाही. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षीच त्यांची प्राणज्योत मालवली, अन्यथा मराठी साहित्यात आणखी काही मोलाची भर त्यांनी निश्चितपणे घातली असती.

खानोलकरांची प्रतिमांकित भाषा ही मराठी वाङ्‌मयाला मिळालेली एक अमोल देणगी आहे. अशा प्रकारची गद्य काव्यसदृश भाषा मराठी कादंबरी, नाटकांमधून दुर्मीळ होत चालली आहे. त्यांच्या यशस्वीतेचे रहस्य आणि लौकिक अपयशाची कारणे पुन: पुन्हा शोधावी असे आव्हान ज्यांच्या कलाकृतींनी वारंवार समीक्षकांपुढे ठेवले अशा अनोख्या प्रवृत्तीचा कलावंत म्हणून खानोलकर वेगळे व महत्त्वाचे ठरतात.

केशवसुत-कृष्णाजी केशव दामले

मराठी कवितेच्या प्रांतात ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे म्हणत; आशय, अभिव्यक्ती अन् काव्यविचार यात आमूलाग्र परिवर्तन घडवत; आधुनिक मराठी कवितेचे सुंदर लेणे खोदणारे युगप्रवर्तक कवी!
आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून केशवसुतांचे नाव घेतले जाते. त्यापूर्वी अध्यात्मात अडकून पडलेल्या, पौराणिक कथा -आख्यानांत रंगून जाणार्‍या मराठी कवितेला त्यांनीच प्रथम सर्वसामान्य माणसांच्या जगात आणले. चाकोरीबद्ध कवितेला स्वच्छंद, मुक्त रूप दिले. सर्वसामान्य माणसांची सु्खदु:खे, भावभावना, वासना-विकार यांना कवितेत मानाचे, जिव्हाळ्याचे स्थान दिले; कवितेला वास्तवतेचे भान दिले.

इंग्रजीतील रोमँटिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन या दोन गोष्टी केशवसुतांनी प्रथम मराठीत आणल्या. कविप्रतिभा ही एक स्वतंत्र, चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही व कसलेही आदेश देऊ नयेत असे ते आग्रहाने सांगत. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत रूढ केला.

त्यांच्या एकूण फक्त १३५ कविताच आज उपलब्ध आहेत. पण त्यातून त्यांनी तोपर्यंत मराठीत कधीही न हाताळले गेलेले विषय- व्यक्तिगत स्नेहसंबंध, स्त्रीपुरुषांमधील प्रेमभावना, कवी व कवित्व, सामाजिक बंडखोरी, उदारमतवाद, मानवतावाद, राष्ट्रीय भावना, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, निसर्ग हे विषय- हाताळलेले दिसतात.  ही स्वच्छंदतावादी मनोवृत्ती काव्यातून प्रथमत:च व्यक्त होत असल्याने त्यांच्या कविता संख्येने कमी असल्या, तरीही क्रांतिकारक व प्रवर्तक ठरल्या. आज (वर उल्लेख केलेल्या) अनेक विषयांशी संबंधित कवितांचे प्रवाह मराठी साहित्यात दिसतात. या सर्व प्रवाहांचा मूळ स्रोत म्हणजे केशवसुतांची कविता होय.

आम्ही कोण?, नवा शिपाई, तुतारी, सतारीचे बोल, झपुर्झा, हरपले श्रेय, मूर्तिभंजन, गोफण या काही त्यांच्या उल्लेखनीय कविता. त्यातही   त्यांची तुतारी ही कविता क्रांतिकारक ठरली. या कवितेच्या नावावरून तेव्हा तुतारी मंडळ स्थापन झाले होते. गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकर यांसारखे नावाजलेले कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत.

त्यांच्या कवितांमधून सामाजिक दु:ख, अन्याय, विषमता, अंधश्रद्धा हे विषय जसे आले, तसेच त्यांच्या कवितांमध्ये प्रेमभावनेचा प्रांजळ व नितळ अविष्कारही आलेला दिसतो. उदा. आपल्या पतीचे कुशल विचारणार्‍या पत्नीला ते म्हणतात ;

करा अपुल्या तू पहा चाचपून, उरा अपुलिया पहा तपासून
प्रकृती माझीही तिथे तुज कळेल, विकृती माझी तुज तिथे आढळेल.   

किंवा

आपल्या घराची, पत्नीची आठवण काढताना ते म्हणतात;
श्वासांनी लिहिली विराम दिसती ज्यांमाजि बाष्पीय ते, प्रीतीचे बरवे समर्थन असे संस्पृत्य ज्यांमाजि ते,
कांतेची असली मला पवन हा पत्रे आता देतसे, डोळे झाकुनि वाचिता त्वरित ती सम्मूढ मी होतसे.

अशा प्रकारे प्रेमाचे विशिष्ट तत्त्वज्ञानही त्यांनी फार सूक्ष्म रीतीने व मराठीत तर प्रथमच आपल्या कवितेतून मांडले.

काव्यविषयक दृष्टीकोन, कवितेचा आशय, तिचा अविष्कार या सार्‍याच बाबतीत क्रांती घडवणार्‍या , कवितेलाच आपले जीवनसर्वस्व मानणार्‍या या कलावंताला अवघ्या ३९ व्या वर्षी मृत्यूने गाठले हे मराठी साहित्याचे आणि महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

त्या काळात राजकीय क्षेत्रात लोकमान्य टिळक; सामाजिक क्षेत्रात आगरकर ज्या तर्‍हेने भूमिका पार पाडत होते, तशीच भूमिका मराठी कवितेच्या क्षेत्रात केशवसुत यांनी यशस्वीपणे पार पाडली, असे निश्चितपणे म्हणता येईल.