ये जरा जवळ, राजसे गऽ !

ये जरा जवळ, राजसे गऽ !
ये जरा जवळ, राजसे गऽ !

मी तुझा सजण सावळा
अन तुझी चांदणी कळा
चल, फिरु बरोबर, असे गऽ !

घे चंद्रकळा काजळी
हास तू फुलांआगळी
कर खरे जुने भरवसे, गऽ !

आणली तुला, मंजुळा
लाल बुंद चोळी, तिला –
बिलवरी, नितळ आरसे, गऽ !

करतील तुला सावली
हलत्या गर्द जांभळी
चमकतील मग कवडसे, गऽ !

कोवळे ह्र्दय हरघडी
फडफडून घेते उडी
हळुवार पखरु जसे, गऽ !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

सगळे बदलतात पण मित्र नाही

परीक्षेच्या RESULT नंतर:

जर चांगले गुण मिळून पास झाला तर…

शिक्षक: मी शिकवलंय म्हणून
आई: सगळी देवाची कृपा
बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स मिळणारच ...
मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू आणि...

जर नापास झाला तर….

शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही
आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय
बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर बसवून ठेवलंस .
पण मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू खरंच....

सगळे बदलतात पण मित्र नाही.

आयुष्य खूप सुंदर आहे

आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते………
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा……


कवी - कुसूमाग्रज

आयुष्य खूप सुंदर आहे

आयुष्य खूप सुंदर आहे
पण त्याला जगता आलं पाहिजे
फुल खुंटन्याआधी त्यालाही मन आहे
हे जाणता आलं पाहिजे

दुःखाची बेरीज सगळेच करतात
पण दुःखात ही हसता आलं पाहिजे
सुखात ही सगळेच हसतात
पण दुसर्याच सुखही आपलंच मानता आलं पाहिजे

जीवनाच्या वाटेवर खूप माणस मिळतात
माणसात माणूस शोधता आलं पाहिजे
अनेक नाती जोडता जोडता जीवनभर
मैत्रीचं, प्रेमाचं अतूट नात जपता आलं पाहिजे


कवी - गणेश पावले

सखू

चढविते गळा कोवळा
जशी कोकिळा;
हरिणीस सखूचा लळा
कि पडते गळा ऽऽऽऽ जी !

कवळाच नूर लुसलुसू;
नजर देखणी;
खुलविते निरागस हसू
नितळ चांदणी ऽऽऽऽ जी !

हलताच हात : वाजते
गोठबांगडी;
लावून जीव नेसते
कि हिरवी चिडी ऽऽऽऽ जी !

लेऊन रुपेरी, निका
गोफ अन सरी,
पाहते ऊर सारखा
पोर लाजरी ऽऽऽऽ जी !

लडिवाळ हिंचे बोलणे;
चाल नाचरी;
फडफडून राघू म्हणे :
‘सखू साजरी ऽऽऽऽ जी !’


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

जगातील काही नमुने असलेली लोकं

१. जे बस मधे चायना मोबाईलवर मोठ्याने गाणी लावतात.

२. जे फ़ेसबुकवर स्वता:च्या पोस्टला स्वता:च लाईक करतात.

३. जे स्वत:च्या एका मेल आयडिवरुन दुसर्यामेल आयडिवर स्वत:च मेल पाठवतात. आणि

४. मराठी जे महाराष्ट्रात राहुन मराठी लोकांशी हिंदीत बोलतात.
भारताचा असा कोणता क्रिकेटर आहे की, जो इंग्लंडविरुद्ध आपल्या पहिल्याच सामन्यात कर्णधार होता तसेच त्याने त्याच मॅचमध्ये शंभर धावा केल्या व शेवटच्या बॉलवर षटकार लावला...?
.
.
.
.
.
.
.
.
खाजवा डोकं!
.
.
.
.
.
येते का?
.
.
.
.
.
अरे किती सोप्प आहे..
.
.
.
.
लगानमधील आमिर खान

बायको हरवली

चंप्या एकदा पोस्टात जातो....
चंप्या : माझी बायको हरवली आहे ....
पोस्टमन : मग पोलीस स्टेशनला जा ना इथे काय करताय ???
.
.
.
.
.
.
चंप्या : साला इतकी खुशी झालीये की कुठं जाऊ ते पण कॆळत नाहीये....
 

मोटकरी

ही मोठ भरे भरभरा ;
चढे करकरा जी !
विहिरीत बघा वाकुनी
जरा धाकूनी जी !
पाण्यात लई भोवरे
फेस गरगरे जी !

अजून काम राहिलंऽ – करा !
कसून कंबर कसा जरा
थुइथुइ फिरे हा झरा
लावणी करा जी !

चौफेर बहरला मळा
खुले नवकळा, जी !
काळीत दिसे हिवरा
गहू हरबरा, जी !
लवलवति कसे नाचरे,
ओंबिचे तुरे, जी !

वरून सांजकाळ साजरा
हसे: आता चला चला घरा ;
पन धनीन है माहिरा ;
जीव घाबरा, जी !

कुठवरी धरू तर असा
तुझा भरवसा, जी !
कोवळा चढे मोकळा
राघूचा गळा, जी !
राहिला कुठे तर दूर
सखूचा नूर, जी !

सदाकदा मनास लागणी,
–हसे, बघा, वरून चांदणी,
बांधून बैल लावणी
म्हणा लावणी, जी !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

उन्मनी

बाहेर गहन अंधार फार दाटला ;
पण घरात ही पुनवेची शशिकलाच तू हासली ;
बाहेर माघमासात वाळला मळा;
पण घरात हसते माझ्या तू सुंदर चाफेकळी

बाहेर मुकी झालीत रानपाखरे
पण आत म्हणत आहे हे कोवळे प्रीतीगीत तू ;
मिटवून नयन तिमिरातच निजली घरे
पण घरात हारोंहारी लावियलेस हे दीप तू

नाहीच जरी ही मूळी ढगाळी निशा
सदनात तुझ्या भुवयांचे हे इंद्रधनू नाचते
का उगाच माझ्या नुरांत चढते नशा?
तू तुझ्या मदिर नयनांनी नुसतेच जरी पाहते.

भलतीच, गडे, भरविलीस तू उन्मनी
हे अनंत जीवनधागे गुंतले तुझ्या लोचनी !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

मी आले लडिवाळ

“नांव सांग तव काय आणखी अंतरातला भाव,
वनांतरी शिरकांव कशाला? दूर राहिला गांव”

“मी नारीची जात आणखी धनवंताची नात:
कुळशील अन जात सोडली, जाऊ कशी नगरांत?”

“उबाळ वाटे बात : घालशी अस्मानाला हात
मिळेल का रानांत, साजणी, जिवाजिवाची जात!”

“नागिण मी बेभान : चालले कुठे तरी हे गांन?
उतावीळ हैराण धावते, कुठे केतकीपान?”

“कुणीकडे फिरणार : अशी तू कोमल आहे नार;
मंजुळवाणी फार बोलशी वीणेवरची तार!”

“वाट अशी खडकाळ, सख्या रे, रात अशी अवकाळ :
मी आले लडिवाळ, सख्या, तू कर माझा प्रतिपाळ!

करू नको नाराज, उदारा, कळे न का आवाज?
भूल पडे का आज जीवाला; जुनाच आहे साज”

“अधीर उडतो ऊर सारखा, मनी उठे काहूर :
हा मैनेचा सूर वाटतो अन चंद्राचा नूर”

“उदास कासावीस हिंडते – उदास कासावीस :
ओळखले नाहीस काय रे, अरे तीच मी – तीच!

वाट अशी खडकाळ, सख्या रे, रात अशी अवकाळ :
मी आले लडिवाळ, सख्या, तू कर माझा प्रतिपाळ!”


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ
एक आजारी पती रुग्णालयात उपचार घेत असतो.

औषधाच्या जास्त मात्रेमुळे त्याला गाढ झोप लागते.

अचानक झोपेतून जागा होऊन तो म्हणतो, “मी कुठे आहे? स्वर्गात तर नाही ना?”

तेवढ्यात बाजूला बसलेली बायको म्हणते, “नाही ओ. मी अजून आहे तुमच्याबरोबर.”

किशोरी

कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?

कलशाशी कुजबुजले कंकण
‘किणकिण किणकिण रुणझुण रुणझुण’
कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?

चरणगतीत तुझ्या चंचलता
मधुर-रहस्य-भरित आतुरता
कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?

गहन-गूढ-मधुभाव-संगिनी
गहन-तिमिरगत चारुरूपिणी
कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?

अंधारावर झाली भवती
तरलित पदसादांची भरती
कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?

स्वप्नतरल ह्रदयातच या पण
का केलेस सताल पदार्पण
कुठे चाललीस तू, किशोरी, कुठे चाललीस तू?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

व्यवसाय वाढवायचा मार्ग !

तरुण : नमस्कार अबक कॉम्प्यूटर्स ?
पलिकडून : हो, अबक कॉम्प्यूटर्स. बोला काय झालं ?
तरुण : माझा प्रिंटर खराब झाला आहे. तुम्ही दुरुस्त कराल काय ?
फोन : हो, आम्ही करतो. दुरुस्तीचे आम्ही ३०० रुपये घेतो पण तुम्ही अस करा सोबत दिलेल पुस्तक वाचून तो तुम्हीच दुरुस्त करायचा प्रयत्न करा, नाही झाला तर आम्ही करुच.
तरुण : काहो अस केल्याने तुमचा मालक तुम्हाला काढून टाकेल ना कामावरुन. तुम्ही त्याचा धंदा कमी का करता ?
फोन : नाही तस नाही. हे मालकांचच सांगण आहे. तस केल्याने आम्हाला दुरुस्तीचे जास्त पैसे मिळतात.

कधी व्हायचे मीलन?

कुठवर पाहू आता वरी आकाश चांदण्याचे जाले,
आकाश काळे काळे?

काय पाहू आता खाली भूमी प्रस्तर पाषाणी
सागराचे पाणी पाणी?

आसमंत हासे खेळे : भासे निरार्थ पसारा :
जीव झाला वारावारा

सापडेना वाट कोठे : हारवले देहभान
उदासले माळरान

भावनेच्या परागांनी लिहियेली गूढ गाणी
अंतराच्या पानोपानी

आता भागले हे डोळे : भवताली काळी रात :
कुठे पाहू अंधारात?

काय नाही दयामाया? माझे जाळसी जीवन :
कधी व्हायचे मीलन?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ
अजित आणि अमित एकदा Bike वरुन जात होते, आणि समोरुन शांतपणे सरळ जात असलेल्या Premier Padmini चालवत असलेल्या माणसाने अचानक उजवीकडे वळण घेतले,

कुठलाही सिग्नल न देता !!! आणि हे दोघे जाऊन त्याच्यावर धडकले, कुणाला काही लागल नाही पण...

अजित आणि अमित : काय रे,वळवताना सिग्नल देता येत नाही का !!!

तो : काय राव तुम्ही !! अख्खी गाडी वळताना तुम्हाला दिसली नाही ,मग सिग्नल कसा दिसला असता !!!

अजित आणि अमित याव्रर अगदी निरुत्तर झालो..

अनुभव

नन्या : अरे बन्या माझा बॉस रोज रोज मला त्याच्या घरापर्यंत माझ्या स्कूटरवर लिफ्ट मागतो रे. मला कंटाळा आला आहे याचा. काय करु सांगना.

बन्या : तो गाडीवर बसुन काही बोलतो का ?

नन्या : हो , माझ्या चालवण्याच कौतुक करत असतो.

बन्या : त्याने कौतुक केल्यावर त्याला सांग तु रस्ता पार करताना काय करतोस. तो परत लिफ्ट मागणार नाही.

नन्या : काय सांगु ?

बन्या : त्याला सांग रस्ता पार करतांना तु डोळे बंद केलेले असतात व लोकांनी ते बघितले असते म्हणुन अपघात होत नाही. यात तुझे कौशल्य नाही.

या रामपहारी

तू हळूच येतो, चंद्रा माझ्या मागंऽ !
भयभीत अशी मी कुणीच नाही जागं

हे पाठीमागं तुझंच हसरं बिंब
अन समोर माझी पिशी साउली लांब

या समोर गायी उभ्या गावकोसात
हे ढवळे ढवळे ढग वरले हसतात

या रामपहारी गारच आहे वारा
वर कलला हारा : पाझरते जलधारा

मी अधीर झाले : घरी निघाले जाया
ही गारठली रे, कोमल माझी काया!

हे माघामधलं हीव : थरकते अंग
हुरहुर वाटते कुणीच नाही संग

पण हसतो का तू मनात आले पाप?
मी नवती नारी : बघ सुटला थरकाप

अन नकोस हासू चंद्रा माझ्या मागं
भयभीत अशी मी कुणीच नाही जागं


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

डोक्यावर दाढी

गिराईक : केस कापायचे आणि दाढी करायचे किती पैसे?

नावी : केस कापायचे १५ रुपये, आणि दाढी करायचे ७ रुपये.

गिराईक : मग अस करा माझ्या डोक्यावर दाढी करा.

गरगरा फिरे भिंगरी

गरगरा फिरे भिंगरी – जशी – गरगरा फिरे भिंगरी !

लय गोड सखूचा गळा :
मैनाच म्हणू का तिला?
अंगावर नवती कळा
उरावर उडवीत आली सरी.

सारखी करी हुरहुरा
हाणते सखू पाखरा
सावरून पदरा जरा
मळाभर फिरते ही साजरी

ये पिसाटवारा पुरा !
अन् घाबरली सुंदरा
ये माघारी झरझरा
मिळाली संगत मोटेवरी

‘ये जवळ हरिण-पाडसा!’
लावला सूर मी असा;
अन साथ करित राजसा
सरकली जवळ जरा नाचरी

घेतला सखूचा मुका
(हं – कुणास सांगू नका!)
हलताच जराशी मका
उडाली वाऱ्यावर बावरी

गरगरा फिरे भिंगरी – जशी – गरगरा फिरे भिंगरी !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तंत्रज्ञानाची प्रगती

वडिलांचा मुलाला ई-मेल.
बेटा तु कसा आहेस ?
मी व तुझी आई छान आहोत. आम्हाला तुझी फार आठवण येते.
चल तुझा कॉम्प्युटर बंद कर आणि जेवायला ये !

अपमृत्यू

होते चढते जीवन : झाली पण माती
आता ममतेच्या तुटल्या कोमल ताती
आता मरणाचा पडला निर्दय फासा
अतृप्तच गेली नवसंसारपिपासा

डोळे मिटलेले, पडली मान पहा ही
आहे उघडे तोंड, तरी बोलत नाही
छाती फुगलेली दिसते उंच जराशी
निर्जीव तरी हे धरले हात उराशी

अद्याप गताशाच जणू झाकत आहे
अद्याप उसासाच जणू टाकत आहे


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कर्तबगारी

शत्रुंची दाणादाण उडवल्यावर मेजर बहद्दूरसिंगांनी संताला विचारले, "या लढाईत तू काय कर्तबगारी दाखवलीस?"

"सर", संता म्हणाला, "मी शत्रूच्या एका सैनिकाचा पायच कापला."

"पायाऎवजी तू त्याच मुंडकच उडवायला पाहिजे होतस." मेजर साहेब म्हणाले.

संता म्हणाला, "सर मुंडक आधिच कुणीतरी उडवल होतं...."

रानराणी

तू पूस डोळ्यातले पूरपाणी
रानराणी !

निमिषभर रहा तू
त्वरित परत जा तू
राहील चित्तातल्या गूढ पानी
ही कहाणी

करुण हृदयगाने
भर नंतर राने
दुरात येतील ते सूर कानी
दीनवाणी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

सुंदरता

सुंदरतेचे मोहक दारुण
घडले दर्शन ओझरतेही
तर मग पुढते हे जग बुडते
एकच उरते ओढ अशी ही

क्षण बघतो जो कुणी बिचारा
चिन्मय तारा त्या गगनाची
तो वा-यागत जातो वाहत
छेडत छेडत तार मनाची

नभमुकुरांवर दुरांत दिसते
बिंबच नुसते हिचे जुगारी
उठतातच तर मग सिंधूवर
व्यथित अनावर लहरी लहरी

तिमिरामध्ये नीलारुण घन
मुकेच नर्तन ही करताना
मलय निरंतर करतो हुरहुर
सोडत वरवर श्वास पहा ना!

हे श्रावणघन-गर्जित सारे
वादळवारे, विद्युतरेषा -
ती मिळण्याची विश्वमनाची
कैक दिनांची व्यथित दुराशा


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

अकलेच्या गोळ्या

एक दारुडा बारमध्ये आपल्या हातातल्या करड्या रंगाच्या तिन गोळ्यांडे एकटक पाहत बसला होता. तेवढ्यात तिथे संतासिंग आला. संताने त्या दारुड्याला विचारले, '' या कशाच्या गोळ्या आहेत?''

दारुड्याने उत्तर दिले, '' अकलेच्या गोळ्या ... या गोळ्या खाल्याने माणसाची अक्कल वाढते''

'' असं आहे का? ... मग मला एक दे की'' संताने त्याच्या हातातली एक गोळी घेवून खाल्ली आणि वरुन पटकन पाणी पीले.

थोड्या वेळाने संता म्हणाला, '' मी एक गोळी खाल्ली आहे खरी .. पण मला तर काही फरक वाटत नाही आहे''

'' तुला कदाचित अजुन गोळ्या घ्याव्या लागतील... तेव्हा कुठे फरक पडेल'' दारुडा म्हणाला.

म्हणून संताने अजून एक गोळी घेवून वरुन पाणी पिवून गिळली.

थोड्या वेळाने संताने त्या दारुड्याच्या हातातली तिसरी गोळी घेतली आणि तो त्या गोळीकडे निरखून पाहू लागला. त्याने त्या गोळीचा बारीक तूकडा तोडून तो हळू हळू चघळून त्याची चव बघू लागला.

अचानक त्या गोळीचा तूकडा तोंडातून थूकून टाकत संता म्हणाला, '' काबे... याची चव तर म्हशीच्या शेणासारखी लागत आहे''

तो दारुडा म्हणाला, '' बघ... आता कशी तूझी अक्कल वाढत आहे''

मनोगत

चंद्र बुडत असताना ये तू
वर असताना मोहक तारे
जग निजले असताना ये तू
दाट धुके पडल्यावर सारे

नाजुक वाहत, ही तरुराजी
विचलित करतो कोमल वारा
स्पर्शित कर हनु तशीच माझी
पुलकित कर हा देहच सारा

मग लगबग हे उघडत लोचन
थरकत थोडी स्पर्शसुखाने
मी पाहिनच नीट तुला पण
किंचित लाजत चकित मुखाने

शांत निरामय जग असताना
तरुपर्णांची कुजबुज ऐकत
त्याहूनहि पण हळूच, साजणा,
सांग तुझे तू मधुर मनोगत!

चंद्र बुडत असताना ये तू
वर असताना मोहक तारे
जग निजले असताना ये तू
दाट धुके पडल्यावर सारे


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

यौवनयात्रा

अशी हटाची अशी तटाची
उजाड भाषा हवी कशाला?
स्वप्नांचे नव गेंद गुलाबी
अजून फुलती तुझ्या उशाला

अशीच असते यौवनयात्रा
शूल व्यथांचे उरी वहावे
जळत्या जखमांवरी स्मितांचे
गुलाबपाणी शिंपित जावे

जखमा द्याव्या जखमा घ्याव्या
पण रामायण कशास त्याचे?
अटळ मुलाखत जर अग्नीशी
कशास कीर्तन रोज धुराचे?

उदयाद्रीवर लक्ष उद्याची
पहाट मंथर तेवत आहे
तुझ्याचसाठी लाख रवींचे
गर्भ सुखाने साहत आहे!


कवी - कुसुमाग्रज

साठीचा गजल

सारे तिचेच होते, सारे तिच्याचसाठी;
हे चंद्र, सूर्य, तारे होते तिच्याच पाठी.

आम्हीहि त्यात होतो---खोटे कशास बोला---
त्याचीच ही कपाळी बारीक एक आठी!

उगवायची उषा ती अमुची तिच्याच नेत्री
अन मावळावयाची संध्या तिच्याच ओठी.

दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून,
नेसायचे मुमुक्षू इस्त्री करुन छाटी!

जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारूतिला
तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी!

प्रत्यक्ष भेटली का? नव्हती तशी जरूरी;
स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी.

हसतोस काय बाबा, तू बाविशीत बुढ्ढा,
त्यांना विचार ज्यांची उद्या असेल साठी!


कवि - विंदा करंदीकर

दरवाजा आणि किल्ली.

एकदा एका मनोरुग्णालयात डॉक्टर आठ रुग्णांची परिक्षा घेणार होते. ज्यामुळे त्यांना तेथुन सुटका होणार होती.
डॉक्टरांनी त्या खोलीच्या एका भिंतीवर खडूने दरवाजा काढला व त्या आठ जणांना सांगितले ते दार उघडा व खोलीच्या बाहेर पडा.
सात जणांनी उठुन त्या दाराने बाहेर जायचा खुप प्रयत्न केला पण एक जण आपल्या जागेवरच बसुन राहिला.
डॉक्टरांनी त्याला न उठण्याचे कारण विचारले असता तो म्हणाला, " मी त्या दाराच्या कुलूपाची किल्ली घेउन बसलो आहे."

फुला रे

उघड उघड पाकळी, फुला रे
उघड उघड पाकळी

आंतल्या आंत कोवळे
मधुजीवन कां कोंडले?
बाहेर हवा मोकळी, फुला रे

तमसंकुल सरली निशा
नीलारुण हंसली उषा:
चौफेर विभा फांकली, फुला रे

मलयानिल उदयांतला
बघ शोधत फिरतो तुला
कां मृदुल तनू झांकली, फुला रे

कीं रहस्य हृदयांतले
आंतल्या आंत ठेवले?
ही तुझी कल्पना खुळी, फुला रे


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ
एकदा राजा आणि राणीत ठरते की यापुढे मोबाईलने नाही तर कबुतरामार्फतच संदेश पाठवायचा.
तर एके दिवशी राणी कबुतराच्या पायाला चिठ्ठी न लावताच कबुतर उडवते.
ते कबुतर राजाकडे जाते.
कबुतराकडे काही नाही हे पाहून राजा चिडतो आणि राणीला तडक फोन लावतो आणि विचारतो हे काय ?
:
:
:
:
:
:
राणी म्हणते," हा मिस्सड कॉल होता !"

कदाचित

फिरेल चंचलतेने जेव्हा
ती सगळे विस्मरुन चिंतन,
स्वैरपणाच्या सुखांत माझी
नाही सय व्हायची तिला पण

ती फिरताना चाफ्याखाली
पटपट त्याचा फुलेल सुमगुण
माझ्या अंतर्गत प्रेमाची
नाही सय व्हायची तिला पण

ती फिरताना चाफ्याखाली
दवबिंदूचे घडेल सिंचन
माझ्या अविरत अश्रुजलाची
नाही सय व्हायची तिला पण

बघेल ती मुख इंद्रधनुचे
सुरेल ऐकत कोकिलकूजन
त्या माझ्या गत मधुगीताची
नाही सय व्हायची तिला पण

विशाल विस्मित नयनांनी ती
बघेल आकाशाचे अंगण
असीम माझ्या गत आशेची
नाही सय व्हायची तिला पण

अमेल ती घनतमांत एकटी
स्वैरपणाने फिरत वनोवन
तिच्या नि माझ्या एकांताची
नाही सय व्हायची तिला पण

तमांतल्या तरुशाखांमध्ये
ती असतांना उभी न्यहाळत
तिला, उसाशागत वा-याने
सय माझी होईल कदाचित


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ
सांताला एका पॅकिंग कंपनीत नोकरी लागली.
सांताने लौकरच एक चांगला कर्मचारी म्हणुन नाव कमावलं. त्यामुळे सांता व त्याचे वरिष्ठ अधिकारी फार खूष होते.
एकदा एक कर्मचारी ज्याच्याकडे ड्ब्यांवर वरची बाजू लक्षात येण्या साठी "This side UP" चा शिक्का लावायचे काम होते तो रजेवर होता, त्यामुळे सांताला ते काम देण्यात आले.
सांता फार मन लावून काम करित होता. पण बराच वेळ लागल्यामुळे त्याचा बॉस बघायला गेला.
सांताला त्याने वेळ लागल्याबद्दल विचारले.
सांता म्हणाल," सर, मी डब्याच्या वरच्याच नाही तर खालच्या बाजूला पण तो शिक्का लावला आहे त्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही."

झोप !

प्राध्यापक वर्गात: मुलांनो तुम्हाला फार अभ्यास करायचा आहे. आता परिक्षा जवळ य़ेत आहेत. पण तुम्ही रोज कमितकमी ७ तास झोप घेतलीच पाहिजे.
बाळू: सर हे कसं शक्य आहे ? कॉलेज तर फक्त सहाच तास असते नां ?

पिसाट मन

मन पिसाट माझे अडले रे,
थांब जरासा !

वनगान रान गुणगुणले;
दूरात दिवे मिणमिणले;
मधुजाल तमाने विणले रे,
थांब जरासा !

ही खाली हिरवळ ओली;
कुजबुजून बोलू बोली;
तिमिराची मोजू खोली रे,
थांब जरासा !

नुसतेच असे हे फिरणे
नुसतेच दिवस हे भरणे
नुसतेच नको हुरहुरणे रे,
थांब जरासा !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

नरक ते नरक फ्री कॉल

मुशर्रफ़ : यमराज मी पाकिस्तान फोन करु शकतो का?

यमराज : ठीक आहे.

फोन करुन झाल्यावर.

मुशर्रफ़ : किती पैसे झाले.

यमराज : काहीही नाही

मुशर्रफ़ : का?

यमराज : कारण, नरक ते नरक कॉल फ्री आहे.

समाधि


या दूरच्या दूर ओसाड जागी
किडे पाखरांवीण नाही कुणी
हा भूमिकाभाग आहे अभागी
इथे एक आहे समाधी जुनी

विध्वंसली काळहस्तांमुळे ही
हिला या, पहा, जागजागी फटा
माती, खडे आणि आहेत काही
हिच्याभोवती भंगलेल्या विटा!

आहे जरी लेख हा, छेद गेला -
जुन्या अक्षरांतील रेघांमधून
दुर्वांकुरे अन तरु खुंटलेला
निघाला थरांतील भेगामधून

कोठून ताजी फुले, बाभळींनी -
हिला वाहिले फक्त काटेकुटे
ही भंगलेली शलाका पुराणी
कुणाचे तरी नाव आहे इथे

रानांतला, ऊन, मंदावलेला,
उदासीन वारा इथे वाहतो
फांदीतला कावळा कावलेला
भुकेलाच येथे-तिथे पाहतो!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

हार !

ऑपरेशन आधि रुग्णाला सर्व तयारी सोबत टेबलवर एक हारही दिसतो.
त्यामुळे तो काहिसा उत्सुक होऊन डॉक्टरला विचारतो, " डॉक्टर, बाकी तयारी मी समजू शकतो पण हा हार कशासाठी ?"
डॉक्टर : हे बघा हे माझं पहिलच ऑपरेशन आहे. समजा ते यशस्वी झालं तर हा हार माझ्यासाठी नाही झाल तर तो............. तुमच्यासाठी."

अजून

घरदिव्यांत मंद तरी
बघ, अजून जळते वात
उजाळल्या दिशा, सजणा
न कळताच सरली रात!

झडता झडेना या
लोचनातली पण धुंद
सर्व रात्र भर निजला
जिवलगा, कळीत सुगंधी!

निवळले, तरी दिसतो
पुसट एक हा तारा
बघ, पहाटचा सुटला
मधुर उल्हसित वारा!

फुगवते पिसारा अन
फिरफिरुन डोकावते -
वळचणीतली चिमणी
बघ, हळूच चिवचिवते!

जवळपास वाटेने
सुभग चालली कोणी
वाजते तिच्या भरल्या
घागरीतले पाणी

उगिच हासते माझे
ललित अंतरंग, सख्या!
उमलत्या फुलांमधले
हालले पराग, सख्या!

झोप तू, मिठीमधला
अलग हा करु दे हात
उलगडू कशी पण ही
तलम रेशमाची गाठ?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

त्रस्त !

एकदा स्वर्गाच्या दारात प्रवेश घेणार्‍यांची रांग लागली होती.
बायकांना अर्थातच स्वर्गात सरळ प्रवेश होता व पुरुषांना रांगेत उभे राहुन परिक्षा दिल्यावर प्रवेश मिळायचा.
पुरुषांची रांग दोन प्रकारची होती.
एका रांगेत असे पुरुष होते जे जिवंतपणी त्यांच्या बायकोच्या धाकात होते तर दुसर्‍या रांगेत जे आपल्या बायकोच्या धाकात नव्हते.
धाकात असणार्‍यांची संख्या प्रचंड होती तर धाकात नसणार्‍या लोकांच्या रांगेत फक्त एकच माणूस ऊभा होता.
सर्व जण त्याच्याकडे आश्चर्याने बघत होते व त्याच कौतुकही करत होते.
शेवटी एकाने त्याला त्याच्या हिमतीच कौतुक करत यातील गुपीत विचारले.
तेंव्हा तो म्हणाला, " अरे गुपीत काही नाही, माझ्या बायकोने सांगीतल म्हणुन मी येथे उभा आहे."

झेब्रा क्रॉसिंग

संता रस्ता क्रॉस करताना एकसारखा झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांवर नाचत होता.

ट्रॅफिक हवालदार : अरे ए.. काय करतोयंस? असा उड्या का मारतोयस?

संता : अहो हवालदार साहेब, मी केव्हापासून प्रयत्न करतोय. पण हा मोठा पियानो काही वाजतच नाहीये

पुर्ण नाव..

शाळेचा पहीला दिवस असतो..

शिक्षक : अरे तु उठ.. तुझ नाव सांग..

पहिला विद्यार्थी : नरु

शिक्षक : अरे अस नाही म्हणायच, "नारायण" अस पुर्ण म्हणायच..

शिक्शक (दुसऱ्या विद्यार्थ्याला) : बाळ, आता तु तुज नाव सांग बघु..

दुसरा विद्यार्थी : "रामायण" !!!

२ अर्थ

शाळेत मराठीचा क्लास चालू होता.

बाई : हे बघा मुलांनो , मराठी मध्ये प्रत्येक वाक्याचे २ अर्थ काढता येतात!!

दिघ्या : बाई काढून दाखवा ना !!!!!

बाई ( लाजुन ) : खाली बस वेडया ! तुझ्या या वाक्याचे देखील २ अर्थ निघतात!

फोनच बील

फोनच बील फार जास्त आल्यावर श्री. देसाईंनी सकाळी नाश्त्याला सगळे बसले असताना विषय काढला की फोनच बील एवढ कां ? मी तर सगळे फोन ऑफिस मध्ये असतांनाच करतो. एवढ मोठ बील मला परवडत नाही.
सौ. देसाई : मी पण सगळे फोन माझ्या कार्यालयातुनच करते.
देसाईंचा मुलगा : मी घरुन कधिच फोन करित नाही. कंपनीने मला वेगळा फोन दिला आहे. मी तोच वापरतो.
देसाईंची मोलकरिण : त्यात काय बिघडलं ? आपण सगळेच आपल्या कामाच्या ठिकाणचेच फोन वापरतोनां ?

कापूस आहे का?

डॉक्टर कडे फोन ची बेल वाजते पलीकडचा माणूस : डॉक्टर साहेब, कापूस आहे का?
डॉक्टर : हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.
परत १० मी. फोन येतो.
पलीकडचा माणूस : डॉक्टर साहेब, कापूस आहे का?
डॉक्टर : हो आहे की.
पलीकडुन: थोडा काढा आणि खीशात ठेवा.
अस ३ ते ४ वेळा झाल्यावर डॉक्टर फ़ार चिडतो.. मनात म्हणतो आता येवू देत फोन बघतोच त्याच्याकडे.
१० मी. पुन्हा बेल वाजते…
पलीकडचा माणूस : डॉक्टर साहेब, कापूस आहे का?
डॉक्टर : जोरात ओरडतो.. नाहीये का?
पलीकडचा माणूस : आहो मग चिडता कशाला खिशातला काढा की।

अक्षरगणेश












आता सुटला धीर!

आता सुटला धीर,
सख्या बघ
आता सुटला धीर!

कुठवर लपवू
ह्र्दयामधला
हा रुतलेला तीर ?

हासत वरवर
रोधू कुठवर
हे नयनांचे नीर ?

भ्रामक, अपुरे
शब्द दुहेरी
वाढवतात फिकीर

जीवन अथवा
मरण मिळू दे :
शिणले ह्र्दयशरीर

काय खरे ते
नीट कळू दे
तू केलास उशीर


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

"मी रोज जगते आहे......"

पुन्हा चालले ती वाट, सोबतीस घाव उरात
मी रोज जगते आहे, एकाकी बस शून्यात !

सांगू कसे कुणाला, आधार ना मज कुणाचा
वेलीवरल्या कळीचा, त्या वेलीस भार झाला
मग आस का मी ठेवू कुणाची या जगात
मी रोज जगते आहे, एकाकी बस शून्यात !

स्वरात माझ्या दडली एक आर्त हाक होती
जाऊन ओठांनजीक अबोलच ती परतून येई
आवाज तिचा तो घुमतो मनातल्या मनात
मी रोज जगते आहे, एकाकी बस शून्यात !

नयनांत आसवांची रोज रात उतरत आहे
रात निजून अंधारी मज रोज जागवत आहे
टिपूस एक उजेड मी शोधते त्या तिमिरात
मी रोज जगते आहे, एकाकी बस शून्यात !

जख्म होई मनाला तरीही का ते शांत होते
दखल घ्याया त्याची कुणी जवळी त्या नव्हते
माझ्यापरी एकांताची सवय जडली या मनास
मी रोज जगते आहे, एकाकी बस शून्यात !


कवियत्री - प्रीत 

***जेष्ठा गौरी ***


माहेरवाशिणी ज्या दिवसाची आतुरतेने वर्षभर वाट पहात असतात, तो दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा.
जेव्हा लक्ष्मीला माहेरपणाचं सुख अनुभवावसं वाटतं तेव्हा ती गौर म्हणून येते, अशी कहाणी सांगितली जाते.

माहेर ही गोष्टच मुळात स्त्रिला अतिशय जवळची आहे. त्यामुळेच गौरींच्या आगमनाची तयारी देखील घरोघरी अगदी पारंपारीक पद्धतीने करतात.

ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते, अनुराधा नक्षत्रावर पूजन तर मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं जाते. काही घरांत गौरींनाच ‘महालक्ष्मी’ असे म्हटले जाते. ज्येष्ठ नक्षत्रावर ही पूजा होते म्हणून ‘ज्येष्ठ गौरी’ असेही म्हणतात. महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा-कनिष्ठा, सखी-पार्वती अशा जोडीने त्या घरात आणल्या जातात. खड्याच्या गौरी, मुखवट्याच्या गौरी( शाडू, माती तसेच पितळी मुखवटे), तेरड्याच्या गौरी मोठ्या सजावटीसह घरोघरी बसवतात.

काही लोकांकडे परंपरेप्रमाणे पाणवठ्यावर जाऊन पाच खडे मुक्याने( तोंडात पाणी भरुन) आणून पूजन करतात तर काही ठिकाणी पाच मडक्यांची उतरंड किंवा भात मोजण्याचं माप घेतात. त्यावर गौरीचे मुखवटे बसवतात. हे दोन मुखवटे म्हणजे पार्वती व तिची सखी. काही लोकांकडे तेरड्याची गौर असते.

एक गौर तांदूळ भरलेल्या तांब्यावर, दुसरी गहू
भरलेल्या तांब्यावर तर काही घरांमध्ये सुपात बसवतात. तेरड्याची रोपे मुळासकट आणली जातात
कारण ही मुळे म्हणजे गौरीची पावले समजली जातात.

काही घरात नवसाने बोललेले गौरींचे बाळ देखील मांडतात. आणताना पावलांच्या रांगोळ्या, हळदी-कुंकूवा च्या सड्यावरुन वाजत-गाजत आणतात.

"गौरायी आली सोन्या-मोत्याच्या पावलांनी" असे म्हणतात.
स्त्रीचं मन नेहमी स्वत:च्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी,
आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव
असते त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते.

अशा ह्या महालक्ष्मीला, वैभवलक्ष्मीला, वेळप्रसंगी दुर्गामाता म्हणून अवतरणार्या आणि गृहलक्ष्मीला कोटी कोटी प्रणाम.

म्हणूं दे, ह्रदया

म्हणू दे, ह्र्दया,
अदय नीतीचे
नियम रीतीचे
विषम प्रीतीचे गीत;

गहन मनिषेने
जतन केलेल्या
पण न घडलेल्या
मधुर मिलनाचे गीत;

बिभव-दैन्याच्या
अशुभ कलहाचे,
व्यथित ह्र्दयाचे,
विकल विरहाचे गीत;

करुण तपलेल्या
नयनसलिलाने,
ह्र्दयरुधिराने
सतत भिजणारे गीत;

विगत आशेच्या
विकट भासांनी
कढत श्वासांनी
सतत सुकणारे गीत

म्हणूं दे, ह्रदया
म्हणूं दे, ह्रदया


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

"जीवना सांग मला रे...."

जीवना सांग मला रे, काय तू दिले आहेस
आजही का पावसात मन हे कोरडे आहे !

नावाखाली सुखाच्या, कोरी उमेद का दिली
रस्ता काटेरी त्यासवे दुतर्फा बाभळीची दरी !

नभ दावून स्वप्नांचे, पंख दिलेस तू शोभेचे
सांग कशी घेऊ भरारी पंखच माझे तोकडे !

फाटकीच झोळी माझी ना उरले त्यात काही
लावून ठिगळे तिला, जपले क्षण मी काही !

खुंटीला अडकवली होती हक्काची ती झोळी
न राहवून तिलाही पावसात तू वाहून नेली !

उपकार एक करून जा ओंजळ ही घेऊन जा
उगा का ठेवशी मागे हातावरल्या तुटक रेषा !


कवियत्री - प्रीत

माझी गाणी

-१-
ओळख, रे जीवा, आता देव-देवा
मग देह-भावा-संगे नाचू

माझा देव सखा सर्वत्र सारखा
कोणाला पारखा नाही नाही

बाहेर अंतरी उभा खाली-वरी
आहे घरीदारी खरोखर

विश्वाचे मंदिर, विश्वच ईश्वर,
सगुण सुंदर निर्गुणही

आता ओळखले : विश्वच हासले
नाग म्हणे, झाले समाधान

-२-
एकाचाच सूर एकतारीवर
मधुर मधुर वाजवावा

माझा योगा-याग आळवावा राग
डोलवावा नादरंगी

मंद मंद चाली वागीश्वरी आली
आता दुणावली कोवळीक

तन्मात्रांचे पांच नानाविध नाच
झाला सर्वांचाच एकमेळ

मन हळुवार झाले एककार
विविध विकार दुरावले


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

रंकाची राणी

आनंदी, स्वच्छंदी गंधर्ववाणी
प्रीतीच्या दोघांनी नांदावे रानी;
लंघावे मोठाले नाले;
झेलावे झाडांचे पाले;
हौशीने गुंफाव्या पुष्पांच्या माळा:
आता, गऽ, लोकांचा कंटाळा आला!

हौशीने सोसावे दोघांनी धोके
हौशीने घ्यावे, गऽ, वेलींचे झोके!
दोघेही दोघांचे चाकर
वेळेला लाभावी भाकर
प्रीतीने प्राशावे ओढ्याचे पाणी
हसावी आनंदी रंकाची राणी

दुर्वांचे गालिचे विश्रांतीसाठी
भोताली रानाची चंदेरी शांती;
देवाची विश्वासू माया:
कोठेही टेकावी काया;
निद्रेने झाकावा जिवात्म सारा;
अंगाला लागावा रानाचा वारा


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

आता

अंतरीच्या गूढ गर्भी एकदा जे वाटले गऽ!
एकदा जे वाटले ते, प्रेम आता आटले गऽ!

दूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मी तू :
रंगले आभाळ पूर्वी : तेच आता फाटले गऽ!

चांदण्या रात्रीत मागे हिंडलो एकत्र दोघे :
चंद्रिकेने थाटले जे ते तमाने दाटले गऽ!

एकदा जी दो थडीने वाहिली होती, सखे त्या
जान्हवीचे शुद्ध पाणी संशयाने बाटले गऽ!

एकदा ज्यांतून मागे सूर संवादी निघाले
वंचनेने तोडले ते, स्नेहतंतू आतले गऽ!

शेवटी मंदावलेल्या वादळी वा-याप्रमाणे
राहणे झाले दिवाणे, गीत गाणे कोठले गऽ!

यातना दुःखांतली अन चेतना गेली सुखाची
झाकल्या नेत्रात आता अश्रुबिंदू गोठले गऽ!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

गणपती बाप्पा मोरया

जीवनकथा

चुकीच ही झाली
नको पण रागवू आता:
अनेक ठिगळांनी
पुरी कर ही जीवनकथा

नको दोष लावू:
मनोदौर्बल्यच हे माझे
नको अंत पाहू :
माझे झाक दैन्य जे जे

उप-या जगताला
करु दे विचार समतेचा
विकलित ह्र्दयाला
भरवसा तुझ्याच ममतेचा

खडतर वाट अती:
काटे फार दाटले, रे!
जागोजाग किती
माझे वस्त्र फाटले, रे!

हताश हाताने
कसे या छिद्रांना लपवू?
उघड्या लाजेने
कसे या जगामधे मिरवू?

चुकी जरी झाली
नको पण रागावू आता:
अनेक ठिगळांनी
पुरी कर ही जीवनकथा


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

"तो काळा मेघ...."

डोळ्यांच्या कक्षात मावेना
आकाशीचा हा मेघ सावळा
मिठी मारुनी चढवुनी गेला
निळ्या आभाळा रंग काळा !

पिउनी निळाई आकाशाची
भरून घेई गाठोडी थेंबांची
क्षितिजावरती करून जाई
क्षणात उधळण सप्तरंगांची !

एका गावाहून दुसऱ्या गावा
सैरसपाटा करी मंद गतीने
पाहता सरस कुणा त्याहुनी
धुवूनी टाकतसे रूप तयाचे !

व्यापून उरला नभास साऱ्या
परि म्हणवितसे प्रत्येकाचा
उरी मेघाच्या असे दडलेला
पाऊस कैकांना सुखावणारा !

घडली क्षणाची भेट तयाची
ओघळला बनुनी पुसट रेघ
इवल्याश्या थेंबांत समेटला
विशालकाय तो काळा मेघ !


कवियत्री - प्रीत

"बहर पावसाचा...."

हा बहार पावसाचा यंदा काय सोबत घेऊन आला
जे नव्हते कधी माझे त्याची आठव बनुनी आला !

धुक्यात होते माखले जे स्वप्न होते मी पहिले
सरताच धुके ते स्वप्न होते नयनांतुनी वाहिले !

सुसाट वाऱ्यासंगे होते मी सैरभैर बेभान धावले
फेऱ्यात वादळवाऱ्याच्या नामोनिशाण न उरले !

नकोच भिजणे आताशा कोरडेपणाच वाटे माझा
बरसले अश्रू इतके की भासती डोळे दोन खाचा !

आपुलकीचे शब्द सारे होते त्या थेंबापरी क्षणिक
सरता बहर पावसाचा, होती काही क्षणांतच लुप्त !


कवियत्री - प्रीत

दैवाने दिले आणि कर्माने नेले

मंग्या : मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले, तुला कधी स्पर्श देखील नाही केला

तरीही जर तू दुस-या मुलाशी लग्न केले तर मी काय समजायचे ?.
.
.
.
.
.
चिंगी : दैवाने दिले आणि कर्माने नेले..

आजोबांची शिंक !

नातू : आजोबा तुम्ही कित्ती जोरात शिंकता. पण तुम्ही तोंडावर हात ठेवणे शिकलात हे बघून छान वाटले.

आजोबा : काय करु बेटा. तोंडावर हात ठेवला नाही तर माझी कवळी तोंडातुन बाहेर पडते ना !!!

हिरवा बदक

एकदा एका प्राथमिक शाळेत चित्रकलेचा तास होता.
शिक्षीकेने मुलांना छत्री धरलेल्या बदकाचे चित्र रंगवायला दिले.
मुलांना सांगितल की बदकाला पिवळा रंग द्या व त्याच्या छत्रिला निळा रंग द्या.
छोट्या संजयने मात्र बदकाला हिरवा रंग दिला व त्याच्या छत्रिला लाल.
शिक्षीकेने त्याला विचारले अरे तु हिरवा बदक किती वेळा बघितलाय ?
त्यावर छोटा संजय म्हणाला बाई छत्री धरलेला बदक बघितला तितक्याच वेळा.
स्टार बझार मध्ये प्रचंड गर्दी असते..

झंप्या दोन सुंदर मुलींना म्हणतो .. " तुम्ही माझ्याशी ५ मिनिटे गप्पा मारू शकता का ?

त्या मुली म्हणतात..." म्हणजे कशासाठी ?"
...
झंप्या : अहो माझी बायको हरवलीय.. आणि मी कोणत्याही मुलीबरोबर बोलायला लागलो कि ती ५ मिनिटात असेल तिथून माझ्या समोर येईल....

पैसा कमावण्याचा सोपा मार्ग

पहिला भिकारी : अरे , मी एक पुस्तक लिहिल आहे.

दुसरा : काय नाव आहे त्याच ?

पहिला : सहज पैसा कमावण्याचे सोपे १००१ मार्ग.
चा सोपा
दुसरा : तर तु भिक का मागतोस ?

पहिला : तो सर्वात सोपा मार्ग आहे.

देवाची सुधारणा

बाळ : आजोबा, तुम्हाला कोणी बनवल ?
आजोबा : बाळा देवाने.
बाळ : कधी ?
आजोबा : बरेच वर्षे झालीत.
बाळ : आणि मला कोणी बनवल ?
आजोबा : तुला पण देवानेच बनवल, तीन वर्षांपुर्वी.
बाळ दोघांचेही चेहरे बघत : इतक्या वर्षात देवाने आपल्यात बरीच सुधारणा केली ना ?
एकदा एका खिसेकापूला कोर्टात हजर करण्यात आले.
न्यायाधीशांनी त्याला सहा महिने जेल किंवा दोन हजार रुपये दंड ठोठावला. तेंव्हा खिसेकापू चोराचा वकिल म्हणाला, "साहेब, माझ्या अशिलाला दंड भरायचा आहे, पण त्याच्याकडे फक्त एक हजार रुपयेच आहेत. तुमची परवानगी असेल तर तो या गर्दीत दहा मिनीटे फिरुन अजुन एक हजार रुपये आणु शकेल."
प्रेयसी प्रियकराच्या छातीवर डोके ठेवून,

"जानू,किती कठीण आहे रे तुझे ह्रदय"

...प्रियकर-"प्रिये,ते माझे ह्रदय नसून खिशात ठेवलेली चुन्याची डबी आहे.
तुमचा एक मित्र सरदार आहे.
बर.
त्याला शनिवारी हसवायचे आहे.
तुम्ही काय कराल.
.
.
.
.
.
.
.
.
.
विचार करा
.
.
.
.
.
त्याला मंगळवारी जोक सांगा !!!!!
सुरेश : नरेश, समजा तुझ्याकडे पाच घरे आहेत. त्यातल मला एक देशिल कां ?
नरेश : हो, देईन ना .
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच पॅंट्स आहेत त्यातली मला एक देशिल कां ?
नरेश : हो. का नाही.
सुरेश : समजा तुझ्याकडे पाच हजार रुपये आहेत. मला एक हजार देशिल ?
नरेश : नाही.
सुरेश : का नाही ?
नरेश : माझ्याकडे खरच आहेत !!!
झंप्या अन चम्प्या शाळेत उशीरा येतात ....

शिक्षक: काय रे चम्प्या उशीर का झाला तुला ?

चम्प्या: गुरुजी काल रात्री स्वप्नात मी अमेरिकेला गेलेलो..तिथून यायला
...उशीर झाला ..

शिक्षक: आणि झंप्या तुला का रे उशीर झाला ??

झंप्या: सर, मी चम्प्याला आणायला एअरपोर्ट वर गेलेलो ..

नदीकिनारी

नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी, ग !

अवतीभवती नव्हते कोणी
नाचत होत्या राजसवाणी
निळ्या जळावर सोनसळीच्या नवथर लहरी, ग

दुसरे तिसरे नव्हते कोणी;
तुझेच हसले डोळे दोन्ही:
अवखळ बिजली भरली माझ्या उरात सारी, ग !

जरा निळ्या अन्‌ जरा काजळी
ढगात होती सांज पांगली:
ढवळी ढवळी वर बगळ्यांची संथ भरारी, ग !

सळसळली ग, हिरवी साडी;
तिनेच केली तुझी चहाडी:
फडफडल्या पदराच्या पिवळ्या लाल किनारी, ग !

वहात होते पिसाट वारे;
तशात मी उडविले फवारे:
खुलून दिसली तुझ्या उराची नवी थरारी, ग !

कुजबुजली भवताली राने;
रात्र म्हणाली चंचल गाणे:
गुडघाभर पाण्यात दिवाणे दोन फरारी, ग !

नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी, ग !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

।। संकटनाशनगणेशस्तोत्रम् ।।

श्रीगणेशाय नम: । नारद उवाच ।

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायु:कामार्थसिद्धये ।।१ ।।

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।।
तृतीयं कृष्णपिङ्ाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ।।२ ।।

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।।३ ।।

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।।४ ।।

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर: ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ।।५ ।।

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।६ ।।

जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।७ ।।

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।८ ।।

इति श्री नारदपुराणे संकटविनाशनं श्रीगणपतिस्तोत्रं संपूर्णम् ।

आज जाऊ दूर रानी

प्रीत ही आली भराला : वेळ ही सौंदर्यशाली
आज जाऊ दूर रांनी : साजणा रे, सांज झाली!

आजपावेतो जगाचे पाश होते प्राक्तनी हे :
स्वैरता घेतील आता अंतरे संकोचलेली

मी अशी माळीन भोळी : सारखी घालीन माळा :
लाघवाने पुष्पमाळा गुंफणारा तूच माळी

ये, उभ्या विश्वास निंदू : प्रीतितालानेच हिंडू
ही निशा गुंफिल आता चांदण्यांची शुभ्र जाळी

गालिचे आहेत जेथे कोवळ्या दुर्वांकुरांचे ,
ये तिथे, लाजून वाचू अंतरांचे लेख गाली

वित्त, विद्या, मान सारे तुच्छतेने, ये, झुगारु :
व्यवहारी या जगाचा कायदा हा जीव जाळी.

कायदा येथील : ये, करू वेडाच सौदा :
प्रेम दे, अन प्रेम घे अन यौवनाची ही नव्हाळी.


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

एक वेळी

एकटा मी, अन होती एकली तू
का गळ्याची आण होती घेतली तू
फार वर्षांनी तुझ्या भेटीस आलो
का कपाळाला अढी ही घातली तू?

कालमानानेच आता लोपले का
मागचे सारे जुने आतुर हेतू
संपला सारा जरी आता जिव्हाळा
यापुढे साधेसुधे सौजन्य दे तू

एक वेळी वाटली होती जिवाला
चांदणी विस्तीर्ण अंधारातली तू


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

वचन

वसंत आपल्या मित्राकडे जाऊन हळू आवाजात म्हणाला, तुला एखादी गोष्ट विचारली तर ती तू कुणालाही सांगणार नाहीस असं वचन देशील?

‘हो हो. हे घे वचन. तुझं बोलणं मी कुणालाही सांगणार नाही.’

‘मला शंभर रुपये उसने पाहिजेत.’

‘ तू अजिबात काळजी करु नकोस. तू शंभर रुपये माझ्याकडे मागितलसे ही गुप्त गोष्ट कुणालाही सांगणार नाही. अरे, मित्रांनी एकमेकांसाठी एवढंही करायला नको का?

आणि पैशाचं काय’?

‘पैशाचं कुठं काय??

मी ही गोष्ट कुणाला बोलणार नाही, एवढंच वचन दिलंय मी तुला. माझ्याकडे पैसे नाहीतंच.’

पन्नास हजाराचे बक्षीस

एक्सप्रेस हायवे वरून एक गाडी भरधाव वेगात चालली होती. इन्स्पेक्टरांनी तिचा पाठलाग करून तिला थांबवली.

तेंव्हा ती गाडी चालवणाऱ्या टपोरीने विचारले,"काय साहेब, काय मिष्टिक झाली का ?"
इन्स्पेक्टर म्हणाले,"नाही. नाही. त्याचं काय आहे, आम्ही सुरक्षा सप्ताह पाळत आहोत आणि काळजीपूर्वक गाडी चालवणाऱ्यांना बक्षीस देत आहोत.
तुम्हाला पन्नास हजार रुपयांचं बक्षीस मिळालं आहे.
पण मला सांगा इतक्या पैशाचं तुम्ही करणार तरी काय?"

टपोरी म्हणाला,"पयल्यांदा एक लर्निंग लायसन घेईन म्हणतोय."
त्याच्या बाजूला एक बारबालाटाईप मुलगी बसली होती. ती म्हणाली,

"ओ इनिसपेक्टर, याच्याकडे लक्ष देऊ नका. तो पिऊन टाईट झाला ना मग काय पण अनापशनाप बडबडतो."

या बोलण्याने मागच्या सीटवर झोपलेल्या एकाची झोपमोड झाली. पोलिसांना बघून तो ओरडला, "बोंबला. पोलिसांनी पकडलं. तरी मी सांगत होतो चोरीची गाडी एक्सप्रेस हाय वे वरून नका काढू."

त्याच्या शेजारी बसलेला अर्धवट झोपेत म्हणाला, "काय कटकट आहे. झोपायला पण देत नाय. पोलिस आले तर काय झालं? त्यांनी अजून डिकी खोलायला सांगितली आहे का?डेड बॉडी बघत नाय तोपर्यंत काय वांधा आहे? झोप तू."

ये शेवटी तरी तूं

हे भागलेत डोळे, नाही उसंत जीवा
वेडा अमीर माझा, बाई कुठे बघावा!

चिंतून लौकिकाशी
संकोचले जराशी
होऊनी तो उदासी गेला उडून रावा

सारेच हासले गऽ
आला असेल राग
हा धुंद फुंद नाग डोलून का फिरावा ?

भारी अधीर तूही
केली कशास घाई ?
नाही तुला मनाई येते तुझ्याच गावा

माझी झुरे नवाई,
माया तुला न काही
वेडीपिशी कशीही घेते तुझ्याच नावा

का रे मनांत किंतू
आता, सख्या परंतू
–ये शेवटी तरी तू सोडून भेदभावा


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

त्याला नाही कदर

माथी झाला सुरु
पिंगा काळा निळा;
एकाएकी अस्मानाची न्यारी झाली कळा

आता जाऊ कसं :
वै-यावाणी असं -
उराशिराला झोंबत आलं वारं येडं पिसं

ओला झाला पदर
साडी चोळी सदर
दगा दिला या दुस्मनानं त्याला नाही कदर


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

पावसाळा

चिंब झाली पावसाने भोवती रानोवनें
वर्षती येथे सखीची पावसाळी लोचनें.

नाचती पर्णांमधूनी स्वैर थेंबांच्या सरी,
तेवि वस्त्रांतूनी हीची मुक्तमाला नाचरी.

हालते आहे कळीची पाकळी अन पाकळी
चुंबनाधीरा घरी ही नाचरी ओष्ठावली.

स्वच्छ माझ्या अंगणीची केळ हाले राजसा;
रंग हिचा गौर आहे केळपानाचा जसा.

हा जलाचा पाट दावी थाट वीजेचा असा
आसवांचा पूर येथे अंतराचा आरसा

दूरश्या शेतांत कोणी चालविली लावणी
आणी येथे आत झाली भावनेची पेरणी

यायचें येवो कधीही धान्य शेतीचें घरी
हे बघा, आधीच आले पीक प्रीतीचे घरी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तुला किनी गऽ

अशी कुठेही नको बसू
‘मळा कुणाचा?’ नको पुसू
नको नाचवू तुझा रुपेरी गोफ असा हा तसू तसू
गऽ नको हसू !

अशी कुठेही नको शिरु;
अशी धिटाई नको करु;
मला गव्हाळी, तुला नव्हाळी, तु-यातु-यांना नको धरु,
गऽ नको फिरु !

नको फिरु या वनोवनी
तुझ्या अशा या नवेपणी
तुला किनी गऽ सखू, असावा नव्या शिणेचा कुणी धनी !
(मी जसा किनी !)


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

सांज हासली !

सांज हासली,सजणे, सांज हासली !

वाद हा जरा
थांबवू पुरा
विसावली परस्परात ऊनसावली!

संपवूचना
वेगळेपणा
विभक्त पाखरे पुन्हा निडात भेटली!

भोवती मुके
दाटले धुके
घरात एक मी नि, सखे, तूच एकली !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

हे जीवन

चिरदाहक चिंतनात चढते – चढते जीवन झुलले, रे!
कसले जीवन, आता नुसते – नुसते मरणच उरले, रे!

झडली पाने पुष्पे पहिली :
काट्यांची खाईच राहिली :
जीर्ण, गलित पर्णातच फुलते – फुलते गुलाब पुरले, रे!

वीज हरवली : उरले वादळ,
दिवाच विझला : उरले काजळ,
हताश ह्रदयामधून पुरते – पुरते तिमिरच भरले, रे!

शून्य मनाने बसलो वाचित
तिमिरामधले निर्दय संचित
संवेदन नसताही नुसते – नुसते मन हुरहुरले, रे!

कसले जीवन, आता नुसते – नुसते मरणच उरले, रे!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

तुटू दे !

जीवावर बांधव सारे उठलेत – उठू दे !
संबंध दिखाऊ सारे तुटलेत – तुटू दे !

उद्दाम, अघोरी, स्वार्थी, घनघोर जगाला
पाहून उदासी डोळे मिटलेत – मिटू दे !

व्याकुळ, करंट्या, माझ्या गततेज जिवाला
पाहून पुराणे प्रेमी विटलेत – विटू दे !

आघात किती सोसू मी दिनरात मुक्याने :
हा ऊरच आवेगाने फुटणार – फुटू दे !

हे जीवन : याची यांना पण किंमत नाही :
हे रक्त तुझे : लोकांची पण भ्रांत फुटू दे !

अद्याप किती, रे जीवा फिकीरीत पडू मी
हा बद्ध भुकेला आत्मा सुटणार – सुटू दे !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

चुकलेले कोकरु

दोष कुणाचा, तूच पहा, न कळतच घडल्या चुका :
वाट शोध शोधली : शेवटी थकून बसलो मुका.
ऐल कळेना, पैल दिसेना : बघ, सापडलो इथे
गहन घोर तिमिरांत एकला बन-ओसाडीमधे.

कुणीच नाही काय नेणत्या पतिताला आसरा?
कुठेच नाही दिसत, अरेरे, बुडत्याला कासरा!
घरट्याखाली पडले इवले बिनपंखी पाखरु;
हुरहुर बघते कळपामधले चुकलेले कोकरु

तळमळलो, व्याकुळलो, आणिक सभोवार देखले;
हाक घातली : पुन्हा पुन्हा पण पडसादच ऐकले
जिवास होता तुझा भरवसा : फोल ठरविलास ना!
उमेद खचली, आणि तनूची निमालीच चेतना

मायमाऊली, नकोस हयगय गरिबाविषयी करु!
चुकलो असलो तरी शेवटी तुझेच मी लेकरु


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

प्रेमपीठ

तू कलावती कमला, आणि सांब शंकर मी
वैभवे हवीत तुला, अन असा दिगंबर मी
अन असून तू जुलुमी पाहिजे तुला समता
आडवू नको, सजणे, भाळलो तुझ्यावर मी

प्रेमळास आवडली का कधी तरी समता
गऽ, परस्परांमधला भेद हीच सुंदरता
मी जरी चुका करतो राग तू नको मानू
गऽ, चुकीशिवाय कुठे वाढते खरी ममता!

दूर ती जरी इवली चंद्रकोर चंदेरी
गर्द या वनांत तरी धुंदफुंद अंधेरी
ती चकाकती सगळी दूर राहिली दुनिया
या तमामध्ये वसवू प्रेमपीठ शृंगेरी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

किती

आली अनंतरंगी सारी वसंत-सेना
या श्रांत शांत झोपी गेल्या परंतू मैना
आता कशी घुमावी लावण्यगीतिका ही?
आला वसंत : माझी झाली परंतू दैना!

माझ्या खुळ्या मना, रे, हा व्यर्थ सर्व दंगा!
चित्रे नको चितारू, अस्पष्ट शब्दरंगा!
कोठे सरस्वती? ही मनु कशी त्रिवेणी?
अव्यक्त राहिली का ही आरुणी अनंगा?

आता कशी पुराणी भाषा कशी धरावी?
निःशब्द जीवनाला वाचा कधी फुटावी?
सांगा, कधी निघावे हृद्बंध, विश्वदेवा?
टाकू किती उसासे? आशा किती धरावी?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

खरी प्रीती

हासावी विधुसंगती विधुकला
होते तसे जीवन
मी होता नवरत्न हार रचला
गुंफुन आकाशकण
डोळ्यांना भलतीच भूल पडली
अन धुंद आली मना
मोहाच्या पटलात एक गमली
तू मूर्त देवांगना
प्रीती मागितली खरी, पण खरी प्रीती मिळली कुणा?

आता मात्र पुरा प्रकाश पडला
सारेच हे वेगळे
आहे माळ उभा भकास पिवळा
लोपून गेले मळे
जावा भास जुना म्हणून फिरलो
तो होत नाही कमी
सारे जीवन डावलून बसलो
येऊन खेड्यांत मी
प्रीतीच्या मुलुखांतली मग पुन्हा आता नको बातमी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ
गुरुजी : बंडू, दोनमधून दोन घालवले तर किती शिल्लक राहिले.
बंड्या  : मी समजलो नाही सर.
गुरुजी : असं समज, तुझं जेवणाचं ताट वाढलं आहे. त्यात दोन चपात्या आहेत. दोन्ही चपात्या तू खाऊन टाकल्या, तर ताटात काय उरलं?
बंड्या  : थोडी भाजी आणि थोडे वरण.

"च्या..याला नेम चुकला..."

एकदा एक मुलगा जंगलात बेचकी नी नेमधरून पक्षी उडवत असतो. तर त्याचा नेम लागत नाही आणि तो बोलतो,
"च्या..याला नेम चुकला.."
तर तिथे बसलेला एक साधू त्याला बोलतो की,
"बेटा असा नाही बोलायचा,हे अप्शब्द आहेत, लहान मुलांनी असा नाही वागायचे".
त्यानंतर परत तो मुलगा नेम लावतो आणि त्याचा नेम चुकतो आणि तो परत बोलतो,
"च्या..याला नेम चुकला.."..
हे तो साधू परत ऐकतो आणि परत त्याला तेच समजवतो... तरीही तो मुलगा ऐकत नाही आणि तिसररयांदा सुद्धा परत तसेच करतो,
"च्या..याला नेम चुकला.."
आता तो साधू भडकतो आणि त्या मुलाला शाप देतो.."
होईल आणि आकाशातुन एक वीज येऊन तुझ्या अंगावर पडेल."
साधू महाराजांनी बोल्या प्रमाणे आकाशात विजांचा कडकडाट होतो आणि एक वीज येऊन त्या मुलाच्या ऐवजी चुकुन त्या साधू वर पडते...
त्याच बरोबर आकाशातुन एक आवाज़ येतो ..
.
.
"च्या..याला नेम चुकला..."
आई - हे देवा मुलगा दे... ... ...
बाप: हे देवा मुलगी दे... ... ... ...
वारंवार हे ऐकून देव क्रोधीत झाले आणि म्हणाले... ... ... ... 'शांत बसा, कन्फ्यूज करू नका ...नाही तर असे आउटपुट देईल की तुम्ही आयुष्यभर   रडत राहाल आणि तो टाळ्या वाजवत राहील...

‘फक्त दुचाकी वाहनाकरिता पार्किंग’

संता रस्त्याच्या कडेला कारचे चाक काढत होता, एवढय़ात बंता तेथे आला-
बंता : काय रे, गाडीचं चाक का काढतो आहेस?
संता : फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा मला मदत का करत नाहीस? आणखी एक चाक काढायचं बाकी आहे. समोरचा बोर्ड बघ.
बंताने समोर बोर्डाकडे बघितले त्यावर लिहिले होते- ‘फक्त दुचाकी वाहनाकरिता पार्किंग’

पिपाणी आणि ड्रम

‘‘हॅलो! कोण?’’
‘‘मी गोंविदराव बारमुते, तुमचा शेजारी’’
‘‘हं, बोला’’
 ‘‘आहो बोला काय? तुमच्या चिरंजीवाना तुम्ही पिपाणी आणून दिलीत. दिवसभर फुंकत बसतो. कान किटले ना अगदी, त्याला एखादी वेळ ठरवून द्या ना!’’
‘‘नाही दिली तर काय करणार’’
‘‘काय करणार? मी माझ्या बंडूला ड्रम आणून देईन’’