अध्यात्म

अध्यातमशास्त्र म्हणती तरि ते कशाला ?

त्याचे प्रयोजन कळे नच जाणत्याला!

हे शास्त्र काय ? न दिसे उपयोग त्याचा-

हा तो विकल्प दिसतो कविकल्पनेचा !

जे का विचार करिते जड भौतिकाचा

ते मात्र शास्त्र म्हणणे अविचार साचा !

जे दे अचेतन अणुप्रति चेतनेते

ते नित्य तत्त्व कळणे अनिवार्य होते !

ते तत्त्व निर्णय करी जड शोधनाने,

संशोधिला सकलही व्यवहार त्याने,

अध्यात्म मानस तथा व्यवहारसार

एकत्र यात मजला दिसतो विचार.

यानेच शुद्धतर हा व्यवहार केला

यानेच व्यापकपणा दिधला तुम्हाला.

पूर्वेतिहास पढता पटते मनाला

देइल वैभव पुन्हा नवभारताला !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा