थांब थांब, बाले आतां

थांब, थांब बाले आतां, ठेव दिलरुब्याला !

सूरसागराच्या लाटा बुडविती जिवाला !

विश्व शांत, रजनी शांत, चांदणेंहि फुललें शांत,

शांतिचेंच घुमतें का हें गीत दिलरुब्यांत ?

दिव्य तुझ्या संगीताची साथ आणि त्यांत !

देहभान सुटलें आतां, ठेव दिलरुब्याला !

ह्रुदयाच्या तारा माझ्या होति एकतान !

एकसुरीं लागुनि गेलें सृष्टिंचेंहि गान !

जीव उडे दिव्यीं करुनी नादमय विमान !

धराखर्ग मिळुनी गेलीं सूर सागराला !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- २४ ऑक्टोबर १९२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा