प्रेमळ पाहुणा

निरोप द्याया कुणा पाहुण्या आलिं सर्व धांवून,

परी कुणीशी दिसे न म्हणुनी मनीं मुशाफिर खिन्न.

वृध्दांचा, बाळांचा घेउनि निरोप जों वळणार,

सहजच गेली अतिथीची त्या दारावरती नजर.

दारामागुनि पहात होते डोळे निश्चल दोन,

जरा खुले, परि क्षणांत झालें दुःखित त्याचें वदन.

"दोन दिवस राहिला परी या लळा लागला अमुचा !"

पिता वदे त्या दारामागिल डोळ्यांच्या धनिनीचा !


कवी - अनंत काणेकर
कवितासंग्रह - चांदरात
- १ जानेवारी १९२७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा