झाडे सत्तेवर आली की

माणसे
निरपराध झाडांवर प्राणांतिक हल्ले करतात
त्यांचे हात्पाय तोडून त्यांना
बेमुर्वतखोरपणे
उघ्ड्यावर रचून ठेवतात...
माणसांच्या राज्यात हे असेच चालायचे

उद्या झाडे सत्तेवर आली की तीही
तोड्लेल्या माणसांची हाडे
अशीच उघ्ड्यावर रचून ठ्वतील;
व्रुक्षकुळातील कुणी मेला तर
माणसांच सर्पण म्हणून उपयोगही करतील
फिरून माणसांचे राज्य येण्यापूर्वी
खुनाच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्याची कला
झाडेही आत्मसात करतील...
फक्त एकदा
त्यांचे राज्य आले पाहिजे


कवी - द.बा.धामणस्कर
कवितासंग्रह -प्राक्तनाचे संदर्भ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा