मैत्री-चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मैत्री-चारोळ्या लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मैत्री म्हंटली की 
आठवतं ते बालपणं 
आणि मैत्रीतून मिळालेलं 
ते खरंखुरं शहाणपण.
मैत्री म्हणजे 
रखरखत्या उन्हात मायेची सावली 
सुखाच्या दवात भिजून 
चिंब चिंब नाहली

क्षणिक मैत्री

कधीतरी तू हि समजून सांग मनाला
मैत्री कधीच क्षणिक नसते,
क्षणिक असतो तो भास अपुल्यांचा
शेवटी,जसे आलो एकले,तसे एकलेच जायचे असते...
मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे
मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं
दैवाची साथ तर मिळेलच
सोबत हवीये आता मैत्रीची
हसणे रडवणे होतच राहील
गरज आहे आता सोज्वळ मैत्रीच्या खांद्याची !