सामाजिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बायको पाहिजे कशी

बायको पाहिजे कशी तर म्हणतात..
जशी कपा खाली बशी..
आणि डोक्या खाली उशी..

"तिला समजू नका हो तुमचा नौकर..
जीन जीवन भर कराव तुमची चाकर.".
"पुरुषाच्या मना येव्हडे कसे कळेना..
आणि बरोबर जागेवर लक्ष्य त्याचे वळेना.".
"मग ती कशी पण असो..चालेल.."

अहो कस चालेल..काळी असली तर..
नाही हो देखणी असायला हवी..
आणि हातात लेखणी असायला हवी..
नुसती लेखणी चालणार कशी..
कपा खाली लागत नाही का बशी..

"आता काय नौकरी वाली चालणार.".
मग घरात भाकरी कोण घालणार ..
अहो पाहिजे तर कशी..?

जशी कपा खाली बशी..
आणि डोक्या खाली उशी.
असावी ती दहावी पास..
आणि दिसायला पण खूपच खास..

"आधी बघा किती झालाय तुमच वय..
तुम्हा बघूनच वाटेल हो तिला भय.".

वाटूद्याना हो तुमच काय जातंय..
आणि तुमच्या बापच कोण खातंय

"अहो तिचे माय-बाप ऐकून काय म्हणतील..
आणि लोक पण तुम्हा जोड्याने हाणतील"

मग नौकरी वाला म्हणून सांगा ..
बघा कश्या लागतील माझ्या पुढे रांगा.

"थोडी तर वातुद्याहो हो तुम्हाला लाज..
एव्हडा कसा सुटला हो माज."
"दिसायली असली तरी खूपच साजूक..
तीच मन खूप असतंय हो नाजूक.".

मग मला काय करायचंय ..
 फक्त माझ पोट भरायचंय ..
मग नाजूक असो व लहान..
ठेवा म्हणा माझ्या कडे गहान...

"पैश्या चा दाखवून हो नाद..
आयुष्य करू नका तीच बरबाद.."
"वयाला शोभेल अशी बघा..
मग नेसवा तिला झगा
ती पण दिसेल लहान..
आणि लोक पण म्हणतील महान.."

न्हाय न्हाय न्हाय..
मला बायको पाहिजे अशी .
जशी कपा खाली बशी
आणि डोक्या खाली उशी..

"मग काढून टाका तुमची मिशी..
आणि हाकत बस म्हशी"
"तुम्ही म्हणता बायको जशी..
आता  मिळणार नाही तशी..
आता पोरी लय भारी शिकल्यात..
आणि तुमच जग त्या जिंकल्यात..
तुमचा नाद सोडा खुळा
आणि चांगल्या रस्त्यावर वळा"
राहील नुसताच खुळा कप..
मग संन्याश्या सारख करा जप.."


कवी - बळीराम भोसले

आभाळाची आम्ही लेकरे

आभाळाची आम्ही लेकरे,
काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा
धर्म वेगळा नाही

श्रमगंगेच्या तीरावरती
कष्टकर्‍यांची आमुची वसती
नाव वेगळे नाही आम्हा
गाव वेगळा नाही

इमान आम्हा एकच ठावे
घाम गाळुनी काम करावे
कर्म वेगळे नाही आम्हा
मार्ग वेगळा नाही

माणुसकीचे अभंग नाते
आम्हीच आमुचे भाग्याविधाते
पंथ वेगळा नाही आम्हा
संत वेगळा नाही

कोटि कोटि हे बळकट बाहू
जगन्नाथ-रथ ओढुन नेऊ
श्वास वेगळा नाही आम्हा
ध्यास वेगळा नाही


कवी - वसंत बापट

अखेर कमाई

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.

ज्योतिबा म्हणाले ,शेवटी मी झालो
फ़क्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले ,
मी फ़क्त मराठ्यांचा.

आंबेडकर म्हणाले ,
मी फ़क्त बौद्धांचा.
टिळक उद्गारले ,
मी तर फ़क्त
चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले ,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र
फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

कवी - कुसुमाग्रज
चुकिच्या उत्तरांची ती गणिते मांडतो आम्ही!
उत्तरांसाठी आभासी उगाच भांडतो आम्ही!

जीवन घडीचा डाव, जो उधळणार आहे,
जात धर्म प्रांता साठी हे रक्त सांडतो आम्ही!

नीती अनिती नियम कायदे ते कुणासाठी?
स्वार्थासाठी सगळे ते,खुंटीस टांगतो आम्ही!

हा जन्म जसा सत्ता नी संपत्ती साठीच आहे,
खुर्चीसाठी कुणाच्याही पायाशी रांगतो आम्ही!

ठकलो अनेक वेळा गिळले अपमान किती!
पड्लो जरी उताणे,नाक वरती सांगतो आम्ही!

आम्हाला साला वेळ कुठे आहे???

अण्णाना काय काम आहे 
धंध्याने तर ते समाज सेवक 
आम्हाला साला कुठे वेळ आहे??? 

पगार वाढ डोक्यावर टांगली आहे 
टार्गेट्स पूर्ण करायला आमची डोकी बांधली आहेत 
 आम्हाला साला कुठे वेळ आहे??? 

 घरचे हफ्ते ३ वर्षात उडवायचे आहेत 
चार चाकी घेऊन दारात मिरवायाचे आहे 
 आम्हाला साला वेळ कुठे आहे???

 सोन्याचे भाव गगनाला पोचले आहेत 
सध्या रेशनाचे भाव बघून डोके उठले आहे 
 आम्हाला साला वेळ कुठे आहे???

 सगळेच गांधी झालेत तर मग गांधीना महत्व कसे येणार 
 अण्णान सोबत धावलो तर आमची पुढची पिढी श्रीमंत कशी होणार???
 माफ करा अण्णा, तुम्ही चुकताय माझ्यासारख्या नॅतद्रष्टा साठी भिकारड आयुष्य जगताय