संशयाची हद्द झाली राव.....
.
.
.
नवऱ्याची बायपास सर्जरी झाल्यानंतर बायकोने सर्जनला एकच प्रश्न केला... .
.
.
.
यांच्या ❤हृदयात कोणी दुसरी🙆 होती का हो?!!! 😜😜😜😜😜😜

डॉक्टरसुद्धा अत्रंगी पोहोचलेला (पुण्याचा).....

म्हणाला.... "तीलाच तर बायपास केली आहे आता !!"
एकदा एका खटल्यात साक्ष देण्यासाठी
.
गावातल्या एका “बाई” ना बोलावले गेले.
.
बाई येऊन उभी राहिली कोर्टात.
.
दोन्ही बाजूंचे वकील पण बाईच्या गावचेच होते.
.
वकील बोलला, "बाई तूम्ही मला ओळखता का ?
.
”बाई बोलली, “हा बाबा, तू आमच्याच गावचा आहे ना..
.
ओळखते कि...
.
तुझा बाप तर बिचारा एकदम साधा सरळ देवमाणूस,
.
पण तू मात्र एक नंबरचा थापाड्या..
.
थापा मारून मारून साऱ्या गावाला गंडा घातलास.. ‘
.
खोटे साक्षीदार’ उभे करून करून केस जिकल्या..
.
सारा गाव वैतागलाय तुझ्यामुळं,
.
गाव सोड बायको सुद्धा तुझ्या थापांना वैतागून पळून गेली ना तुझी..
.
माहितीये मला सगळं..”
.
वकील सुन्न…. काय बोलणार..??
.
चला आपली तर गेलीच आहे आता दुसऱ्याची पण घालवू...
.
असा विचार करून दुसऱ्या वकिलाकडे इशारा करत विचारले,
.
"ताई तू यांना पण ओळखत असशील?"
.
दुसऱ्या वकिलाकडे निट पाहत ताईने बोलायला सुरुवात केली, “
.
अरे हां, हा तर त्या रामभाऊचा छोकरा ना ?
.
बापाने घरादारावर कर्ज काढून शहरात शिकायला पाठवला होता,
.
कालिजात कोणाच्या पोरीला डोळा मारला म्हणून मरुस्तोवर हाणला होता ना ?
.
आन चार वर्षाचं कालेज सातवर्ष करीत होता...
.
म्हणले, लई नाद याला पोरींचा,
.
तुह्या बायकोच्या बी नादी लागला होता ना ह्यो..?
.
”सगळ्या कोर्टात हशा माजला…
.
जज बोलला, "ऑर्डर ऑर्डर"
.
जजने दोन्ही वकिलांना बोलावून घेतले..
.
जज: आता जर तुमच्यापैकी कोणी ह्या बाईला विचारले...
.
कि,तुम्ही ह्या जज ला ओळखता का ?
.
तर मी दोघांना बुटानं मारीन...
1) औषधोप४
२) मानसोप४
3) प्रथमोप४

1) समोप४
2) पाहुण४
3) सदवि४
4) दूरवि४

1) सं४
2) वि४
3) आ४
4) प्र४
5) ला४

1) सदा४
2) समा४
3) शिष्टा४
4) भ्रष्टा४
5) अत्या४
6) सुवि४
7) उप४
8) अवि४
9) कुवि४
10) हिंसा४

'चार'ची गाथा… 
थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे !

चारची खरी बाजू ' चार ' दिशेत
आहे !

' चार ' खांबांशिवाय घर बांधता येत नाही.

' चार ' गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही.

' चार ' चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर ' चार ' बोटे उमटल्या शिवाय राहत नाहीत.

' चार ' शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली ' चार ' आवाज काढण्या सारखेच असते.

चौघे म्हणजे जणू ' चार ' वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात.

' चार 'चा 'वर्ग' केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो.

"चार"च्या 'वर्गा'स पुन्हा "चार"ने गुणले की जगातल्या सर्वात 'बुद्धि'मान खेळातले चौसष्ट घरांचे 'बळ' मिळते !

यांची टीका ही ' चौफेर ' असते.
यांचे फटके म्हणजे ' चौकार ' असतात !

चारचे सामर्थ्य  देवीच्या ' चार ' भुजांसारखे असते अन पावित्र गाईच्या ' चार ' पावलांसारखे असते...

ज्या विहिरींचे पाणी शेतकरी पिकाला पाजतो ती सुद्धा कमीत कमी ' चार ' परस खोल असावीच लागते.

' चार ' वाफे असल्याशिवाय मातीत बांध घालता येत नाहीत.

' चार ' पाकळ्या असल्याशिवाय फुलाला शोभा येत नाही !

जगातल्या ' चौघां 'चेही असेच असते.  यांनी ' चार ' शिव्या दिल्या शिवाय जगाला शहाणपण सुचत नाही.

अन ' चार ' गोष्टी हिताच्या सांगितल्याशिवाय सुख दुःखे उमजत नाहीत.

ज्या घरात आपण राहतो तेदेखील  ' चौसोपी ' असल्याशिवाय त्याला रुबाब येत नाही !

चौसोपी घराबाहेर ' चारचाकी ' असली की शान अधिक वाढते ! 

' चार 'चौघांना विचारल्याशिवाय खरे सत्य समजत नसते.

' चार ' लोकांपासून ' चार ' हात लांब राहिले तर खरे मित्रही कळत नाहीत !

युगे देखील " चार "झाली आहेत. कृत, त्रेता, द्वापार आणि कलीयुग ; यावरून ' चौघां 'चा महिमा जाणावा.

स्वर जरी सात असले तरी सामान्यतः बोलताना ' सारेगम ' कळले म्हणजे संगीत आले असं म्हटले जाते !

आपल्या जीवनाचे आधार देखील ' चार 'च आहेत - दोन हात अन दोन पाय !

वर्ण देखील ' चार ' आहेत.  ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य नि शूद्र.

लीप वर्ष देखील ' चार ' वर्षानी येते !

जमीन सुद्धा ' चौरस 'च शुभ समजली जाते.

माणूस हुशार झाला की त्याला ' चौकस ' बुद्धीचा समजलं जातं ...

चारोळीत देखील महाकाव्याचा अर्थ लिहिता येतो, चारोळे खाल्ले की तब्येत सुधारते !

' चार ' ढांगा चालले की मातीचा अंदाज येतो.

' चार ' कडवी वाचली की कवितेची गोडी लागते.

' चार ' संवाद ऐकले की नाटके पहावीशी वाटतात.

' चार ' घास खाल्ले की पोट भरल्यासारखे वाटते.

' चार ' घटका लवंडले की आराम मिळाल्या सारखे वाटते.

' चार ' वाती प्रज्वलित केल्या की मनातला अन घरातला अंधार दूर होतो.

' चार ' पुस्तके वाचल्याशिवाय ज्ञानाची ओढ लागत नाही.

मंगलकार्य साजरे करताना सनई बरोबर ' चौ 'घडे वाजल्याशिवाय रंगत कसली ती येत नाही !!

' चार ' वाईट जर एकत्र आले तर मात्र ती चांडाळ 'चौकडी' होते.

' चार ' चांगले लोक एकत्र आले तर मात्र इतिहास बदलतो.

इतकेच कशाला चितेवर ' चार ' लाकडे ठेवल्याशिवाय चिता पूर्ण होत नाही.

' चौघां 'च्या खांद्यावर गेल्याशिवाय जीवनातला प्रवास पूर्ण होत नाही.

आयुष्याच्या अंती मातीत चिरनिद्रा घेताना सुद्धा ' चार ' फुट खोल खांदावेच लागते , त्याशिवाय शीणलेल्या जीवाला खरा आराम मिळत नाही ! 

सरते शेवटी असं म्हणेन की जीवनात जीवाला जीव लावणारे
' चार ' मित्र असल्याशिवाय जीवनाचा अर्थ उमगणार नाही, उमजणार नाही !!
पेशंट -   डॉक्टरसाहेब गेल्या काही दिवसांपासून माझा उजवा गुडघा खूप दुखतोय

डॉक्टर -    वयानुसार असं होणारच

पेशंट -    पण माझा डावा गुडघाही त्याच वयाचा आहे

स्थळ- अर्थात पुणे.
आधार कार्ड काढून मिळेल".

असा बोर्ड वाचून गण्या हापिसात शिरला..

"सायेब...आधार कार्ड काढून पायजेलाय."

"हं...बसा."

"चला की सायेब."

"आं........

कुटं चला ?"

गटारीत पडलया आधार कारड..

काढून द्या की चला..
डाॅक्टरः तुमच्या पतीस विश्रांतीची गरज आहे. मी झोपेच्या गोळ्या लिहुन देतो.

पत्नी: किती वेळा देऊ.

डाॅक्टरः देऊ नका. तुम्ही घ्यायच्यात.
स्थळ :- अर्थातच पुणे
पण पाहूणा  सोलापूरचा


नवरा :- अगं, ऐकलस का?
घरी पाहुणे आलेत ना, त्यांना
जेवणाचे विचार जरा...


बायको :- भावजी, तुम्ही घरून
जेवून आलात की घरी गेल्यावर
जेवणार??

सोलापूरचा पाहुणा : - न्हाई मी हितचं जेवणार 😅

बायको: डबा घेऊनच आलाय काय?😆😆🤦‍♂

सोलापूरचा पाहुणा : - व्हय... भरून पण न्हेणार हाय...