तुमच्या प्रेमाची हवी मला जोड

का हो चालवीली माझी छळणूक

काय माझी चूक झाली सांगा ?

तुमच्यासाठी मी फुलविली फुले

भांडार हे खुले तुम्हासाठी

तुम्हाला मिळावे सुखसमाधान

कष्ट रात्रंदिन करीत मी

जीवनरसाचा भरून मी प्याला

दिला तो ओठाला लावा तुम्ही

तुमच्या प्रेमाची हवी मला जोड

नका हिरमोड करू माझा


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

नाही मज आशा उद्याच्या जगाची

का रे दाखवीसी पुन्हा तेच स्वप्न

कराया उद्विग्न चित्त माझे !

मृगजळाचे ते दावून आभास

का रे खोटी आस निर्मितोस ?

घेत न कधी जे वास्तवाचे रूप

वाटे न हुरूप त्याचेविशी

माझे सुखदुःख राहो ते माझेच

विश्व माझे हेच माझ्यापाशी

नाही मज आशा उद्याच्या जगाची

कालचीच ज्याची गती आज


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या
प्रवाहाबरोबर तर सगळेच जातात, खरी मर्दानगी, खरं धैर्य लागतं प्रवाहाच्या उलट दिशेने जायला.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नेमकं हेच मला ट्रॅफिक हवालदाराला सांगायचं होतं पण येड्याने पावती फाडली.

आप्पा महाराज

नाम जपता जपता

'जे जे रामकृस्न हरी'

आप्पा महाराज गेले

गेले आज देवाघरी

जसा पुत्रू 'रामदास'

आन सून 'सीतामाई'

तसा लोकावरी जीव

मनीं दुजाभाव नहीं

उभ्या गांवाचे कैवारी

खरे रामाचे पुजारी

आप्पा महाराज गेले

सोडीसनी देवाघरी

आंसू लोकाचे गयाले

जशा पावसाच्या सरी

आप्पा महाराज गेले

गेले आज देवाघरीं

आप्पाजींची दयामाया

किती पार नहीं त्याले

तुम्ही इचारा इचारा

'बावजीच्या समाधीले

तुकाराम, मुक्ता जना'

मरीसनी रे जगले

आतां कसं म्हनू तरी

आप्पा महाराज मेले?

किती भजन किर्तन

रामनामाची लहेर

केलं रामाचं मंदीर

संत लोकाचं माहेर

राम लक्षूमन सीता

बसवले रे मंदीरीं

त्याले सोन्याचा कयस

जागा संगमरवरी

दरसाल दहा दिसा

येतो उच्छावाले भर

वाहनावर्‍हे बशीसनी

येती दहा अवतार

दाही सरता वहनं

आली एकादशी मोठी

मंग सवारला रथ

झाली गांवामंधी दाटी

चार फोडले नारय

अरे, चार्‍ही चाकावरी

सर्व्या मयांतले फुलं

चढवले रथावरी

रस्त्यावर शीपडल्या

लाखो पान्याच्या घागरी

रथ चाले घडाघडा

लागे चाकाले मोगरी

सर्व्या बजाराचे केये

माझ्या रथाची वानगी

घरोघरीं ऐपतींत

मिये पैशाची कानगी

लोक आले दर्सनाले

लोक झुंड्यावर झुंड्या

रथापुढती चालल्या

किती भजनाच्या दिंड्या

ज्यांनीं केली कार्तीकीले

'जयगांवाची' पंढरी

आप्पा महाराज गेले

गेले म्हनूं कस तरी?


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

अनंत काणेकर


चांदरात


सांत्वन

शरीर हे गेले रोगांनी गांजून

काळीज जळून काळजीने

जीव करमाया निसर्गी जाईन

गुण मी गाईन प्रभुजीचे

घरी आईबाप, लहान भावंडे

वात्सल्याचे धडे देतात की

जिवलग माझा मित्र भेट देतो

जीव माझा होतो उल्हसित

काही नाही माझ्या सांत्वनाला उणे

म्हणून हे जिणे कंठितो मी


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

समयीच्या शुभ्र कळ्या

समयीच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते
केसातच फुललेली जाई पायाशी पडते

भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागेपुढे
मागेमागे राहीलेले माझे माहेर बापुडे

साचणार्‍या आसवांना पेंग येते चांदणीची
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची

थोडी फुले माळून ये, डोळा पाणी लावून ये
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये

हासशील हास मला, मला हासू ही सोसेना
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का जुना


कवी - आरती प्रभू

गंध

हिरव्याशा गवतात
हळदिवी फुलें,
हलकेंच केसरात
दूध भरूं आले.

उभ्या उभ्या शेतांमधें
सर कोसळली,
केवड्याची सोनफडा
गंधें ओथंबली.

बकुळीच्या आसपास
गंधवती माती,
उस्कटून रानपक्षी
काही शोधिताती.


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - जोगवा

जोगवा

गंध

गोपाळगाणी


नक्षत्रांचें देणें

१. कविता
२. सरणार्थ
३. जाग आली
४. आधार
५. मुंग्यांची रांग
६. ही दोन बकरीचिं पोरें
७. दोन पोक्त पानं
८. संध्याकाळ
९. गवत असते गार हिरवें
१०. मनमोर हिचा
११. फिरो घाणा निरंतर
१२. एक वळसा
१३. पात वाकली भारान
१४. गुच्छ फुलांचे निरिच्छ
१५. भ्रमिष्ट
१६. लुटारू
१७. टप्पोर गजरा
१८. डहाळी
१९. पेरलेल्या दाण्यादाण्यांत
२०. अर्पण करतां येतंय तुला
२१. गाडा
२२. अर्थ
२३. कसा ?
२४. खार
२५. गाणें
२६. वाफ
२७. निस्तब्ध
२८. अर्थ
२९. उदासी
३०. चाहूल
३१. विळखे
३२. गाण्याच्या वेळा
३३. क्षमा केली म्हण न
३४. असो आच इंद्रियांत
३५. कहाणी
३६. सर
३७. गर्व
३८. असा एक  … अशी एक
३९. दूर दिवा
४०. सर्व ठिकाणी
४१. निसर्गचित्र
४२. भविष्य
४३. तुटलेला कडा
४४. सर्सर सर्सरवाजे
४५. ब्रह्मार्पण
४६. भूल
४७. श्रद्धांजली
४८. पुनश्र्य
४९. कुत्रा
५०. बभ्रा
५१. विरंगुळा
५२. कुणाच्या खांद्यावर
५३. रावबाच्या लेकीवरील दोन कविता
५४. राजाराणी
५५. एकत्र गाठू तळ
५६. कृष्ण
५७. आजची तारीख
५८. थोडे चोर थोडे साव
५९. ओंजळ
६०. भुतें
६१. दिवे
६२. वळण
६३.  सर्वत्र काय ?
६४. झाड
६५. तुं
६६. नको
६७. रत्न
६८. लव लव करी पातं
६९. कुठल्या कवितेसाठी
७०. तिसराच कुणी
७१. दुःख ना आनंदही
७२. पारवे
७३. सूर्यास्त
७४. विष
७५. सांजतारा
७६. दाद द्या
७७. अंतरिक्षाचा इषारा
७८. काय मां घ्यावे
७९. कां उदासी
८०. रंग
८१. निष्प्रेम
८२. कां असे येतां
८३. सूचना
८४. मृत्यूंत कोणी हासे
८५. ऊनओल्या
८६. तुं कुणाला मी म्हणू
८७. प्रीत फिरुनी मागते
८८. नवी….जुनी
८९. लकेरताना
९०. दोन मी
९१. जाईन दूर गावा
९२. कल्लोळ अन भ्रमंती
९३. पावरी
९४. टाहो
९५. सांगेल राख माझी
९६. सप्रेम द्या

आखजी

आखजीचा आखजीचा
मोलाचा सन देखा जी
निंबावरी निंबावरी
बांधला छान झोका जी
माझा झोका माझा झोका

चालला भिरभिरी जी
माझा झोका माझा झोका
खेयतो वार्‍यावरी जी
गेला झोका गेला झोका

चालला माहेराले जी
आला झोका आला झोका
पलट सासराले जी
माझा झोका माझा झोका

जीवाची भूक सरे जी
भूक सरे भूक सरे
वार्‍यानं पोट भरे जी
आला वारा आला वारा

वार्‍यानं जीव झुले जी
जीव झुले जीव झुले
झाडाची डांग हाले जी
डांग हाले डांग हाले

नजर नहीं ठरे जी
झाली आता झाली आतां
धरती खालेवर्‍हे जी
आंगनांत आंगनांत

खेयती पोरीसोरी जी
झाल्या दंग झाल्या दंग
गाऊनी नानापरी जी
झाला सुरू झाला सुरू

पहिला माझा पिंगा जी
फुगड्यांचा फुगड्यांचा

चालला धांगडधिंगा जी
दारोदारीं दारोदारीं
खेयाची एक घाई जी
घरोघरी घरोघरीं

मांडल्या गवराई जी
गवराई गवराई
सजव सजवल्या जी
संगातीनी संगातीनी

बोलव बोलवल्या जी
बोलवल्या बोलवल्या
टिपर्‍या झाल्या सुरूं जी
टिपर्‍याचे टिपर्‍याचे

नादवले घुंगरू जी
कीती खेय कीती खेय
सांगूं मी काय काय जी
खेयीसनी खेयीसनी

आंबले हातपाय जी
चार दीस चार दीस
इसावल्या घरांत जी
आहे पुढें आहे पुढें

शेतीची मशागत जी
सन सरे आस उरे
आखजी गेली व्हय जी

सांग सई सांग सई,
आखजी आतां कही जी?


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

तिलगूळ

देणे घेणे इथे कुणी हो कुणाला ?

गुणांनी गुणांला गुणायचे !

अधिकाची पेठ इथे उण्यातून

इथे कडूतून गोडपना

पिकल्या शेताचे सुरू इथे खेळ

मापणार खूळे मापोते ते !

अवघ्या भावांचा झाला इथे काला

अवघ्यांचा धाला जीव इथे

तरी हा एवढा घ्यावा तिलगूळ

हवे तर खूळ म्हणा माझे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

बळ

दुबळ्याचे बळ माझे ते कितीक !

तरी कवतुक झाले किती !

दरिद्र्याचे घरी लुटिले भांडार

देउन कुबेर-मोठेपना

अज्ञानाचा बुक्का लावून कपाळा

ज्ञानाचा सोहळा केला तुम्ही

वाळवंटी तुम्ही पिकविला मळा

माझी किती कळा जाणे मीच !

जड झाले भारी भलाईचे ओझे

कसे रीण माझे फिटणार?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

नाहीतर उरी फुटशील !

चिमुकल्या अरे गोजिर्‍या पाखरा,

झाला का पिंजरा नकोसा हा ?

का रे थरथर असा कापतोस?

का रे पाहतोस दीनवाणे ?

छळ होतो तुझा ठाऊक हे मला

परी तुझा गळा थांबला का?

कधीतरी तुझी होणार सुटका

निःश्वास असा का सोडितोस ?

गाऊ ह्रदय मोकळे तू करी

नाहीतर उरी फुटशील !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

जिद्दी कोंबडी

चम्प्याने एकदा कोंबडी विकत घेतली..

आणि तिला एका पिंजर्यात बंद केलं..

पण कोंबडी तर जिद्दी होती..लगेच मागच्या बाजूने निघून गेली..

चम्प्याने तिला पकडला आणि परत पिंजर्यात टाकलं..

पण कोंबडी तर जिद्दी..परत मागच्या बाजूने निखून गेली..

चम्प्याला आला राग..त्याने त्या कोंबडीला पकडलं आणि कापून खाऊन टाकलं..

पण कोंबडी तर जिद्दी होती........

चुल्हा पेटता पेटेना !

घरीं दाटला धुक्कय

कसा हाटतां हाटेना

माझे डोये झाले लाल

चुल्हा पेटतां पेटेना

चुल्हा किती फुका फुका

लागल्या रे घरामंधी

अवघ्याले भुका भुका

आतां सांपडेना हातीं

कुठे फूकनी बी मेली

कुठे पट्टवकरीन-

'नूरी, पयीसन गेली.

आतां गेल्या सरीसनी

पेटीमंधल्या आक्काड्या

सर्व्या गेल्या बयीसनी

घरामधल्या संकाड्या

पेट पेट धुक्कयेला,

किती घेसी माझा जीव

आरे इस्तवाच्या धन्या !

कसं आलं तुले हींव !

तशी खांबाशी फूकनी

सांपडली सांपडली

फुकी-फुकीसनी आग

पाखडली पाखडली !

आरे फूकनी फूकतां

इस्तो वाजे तडतड

तव्हां धगला धगला

चुल्हा कसा धडधड

मंग टाकला उसासा

थोडा घेतला इसावा

एकदांचा आदयला

झट चुल्ह्यावर तावा

आतां रांधते भाकर

चुल्ह्यावर ताजी ताजी

मांघे शिजे वजेवजे

मांगचुल्हीवर भाजी

खूप रांधल्या भाकरी

दुल्ळी गेली भरीसनी

मंग हात धोईसनी

इस्त्यावर पडे पानी

इस्त्यावर पडे पानी

आली वाफ हात लासे

तव्हां उचलता तावा

कसा खदखदा हांसे !


कवियत्री - बहीणाबाई चौधरी

कुर्‍हाडीच्या दांड्या

कुर्‍हाडीच्या दांड्या, सांभाळ सांभाळ

का रे होसी काळ गोतास तू ?

किती झाले ठार, किती जायबंद

तुझे भाईबंद शस्त्रे तुझ्या !

वृथा तुझी प्रौढी, गर्व-अहंगण्ड

उदंड तू दण्ड भोगशील !

देत मी इषारा, सावध सावध !!

नको आत्मवध करू ऐसा !

उलटेल शस्त्र उफाळून थंड

त्यात शतखंड होशील तू !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

उमर खय्यामा

उमर खय्यामा, गाऊन रुबाया

होशी कविवर्या अमर तू

जगाच्या फुलाचा घेतला आस्वाद

लुटिला आनंद तूच खरा !

जीवन-मद्याचा पेला काठोकाठ

भरून आकंठ प्यालास तू

तूच ठरविले वेडे शहाण्यांना

वेडा तू शहाणा ठरलास !

तुझे ते काव्यात्म, प्रसन्न सदय

विशाल ह्रदय देशील का?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी

’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.

चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई

शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’

ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’

आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे

गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला

येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे

कवी - यशवंत

दर्शन

१. हे चित्र
२.
३. असा पाउस पडत असतांना
९. दर्शन
१०. सनई
पालखीचे भोई


मैफल

एक झुरळ
रेडिओत गेले;
गवयी होऊन
बाहेर आले.
                         एक उंदीर
                        तबल्यात दडला;
                        तबलजी होऊन
                         बाहेर पडला.
त्या दोघांचे
गाणे झाले
तिकीट काढून
मांजर आले!


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - अजबखाना

अजबखाना

१. राणीची बाग

स्वेदगंगा


जातक

अन्त्य 

१.
२. वेड्याचे प्रेमगीत
३. असेल जेव्हा फुलवयाचें 
४. फकिरी गाणे
५.
६.
७.
८.
९.
१०. दंतकथा


मध्य (गझल)

अर्धीच रात्र वेडी
साठीचा  गझल

निर्वाणीचे गझल 

परार्ध 

मृद्‌गंध

१. कसा मी कळेना !
२. हे माडांनो !
३. तेंच ते
४. शाप
५. पुन्हा एकदां
६. हीच दैना
७.
८.
९.
१०.
११. 
१२.

विंदा करंदीकर

गोविंद विनायक करंदीकर उर्फ 'विंदा करंदीकर'(जन्मः २३ ऑगस्ट १९१८ - मृत्यूः १४ मार्च २०१०) हे मराठीतील ख्यातनाम कवी, लेखक व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि.स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले.




काव्यसंग्रह
स्वेदगंगा    इ.स. १९४९   
मृद्‌गंध    इ.स. १९५४
धृपद    इ.स. १९५९        
जातक    इ.स. १९६८
विरूपिका    इ.स. १९८१        
अष्टदर्शने    इ.स. २००३


संकलित काव्यसंग्रह
संहिता (इ.स. १९७५) (संपादन - मंगेश पाडगावकर)
आदिमाया (इ.स. १९९०) (संपादन - विजया राजाध्यक्ष)



 बालकविता संग्रह
राणीची बाग    इ.स. १९६१        
एकदा काय झाले    इ.स. १९६१
सशाचे कान    इ.स. १९६३        
एटू लोकांचा देश    इ.स. १९६३
परी ग परी    इ.स. १९६५        
अजबखाना    इ.स. १९७४
सर्कसवाला    इ.स. १९७५        
पिशीमावशी आणि तिची भुतावळ    इ.स. १९८१
अडम्‌ तडम्    इ.स. १९८५        
टॉप    इ.स. १९९३
सात एके सात    इ.स. १९९३        
बागुलबोवा    इ.स. १९९३





ललित निबंध
स्पर्शाची पालवी (इ.स. १९५८)
आकाशाचा अर्थ (इ.स. १९६५)
करंदीकरांचे समग्र लघुनिबंध (इ.स. १९९६)




समीक्षा
परंपरा आणि नवता (इ.स. १९६७)
उद्गार (इ.स. १९९६)


इंग्लिश समीक्षा
लिटरेचर अ‍ॅज अ व्हायटल आर्ट (इ.स. १९९१)
अ क्रिटिक ऑफ लिटररी व्हॅल्यूज (इ.स. १९९७)



अनुवाद
अ‍ॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र (इ.स. १९५७)
फाउस्ट (भाग १) (इ.स. १९६५)
राजा लिअर (इ.स. १९७४)




अर्वाचीनीकरण
संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचे अर्वाचीन मराठीत रूपांतर (इ.स. १९८१)





 



पुरस्कार आणि पदवी
सीनिअर फुलब्राइट फेलोशिप (१९६७-६८)
सोव्हिएट लॅण्ड नेहरू लिटररी पुरस्कार (१९७०)
कुमारन् आसन पुरस्कार (१९७०)
महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार (१९८५)
कवी कुसुमाग्रज पुरस्कार (१९८७)
कबीर सन्मान १९९१
जनस्थान पुरस्कार १९९३
कोणार्क सन्मान १९९३
साहित्य अकादमी महत्तम सदस्यता (१९९६)
महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार (१९९७)
भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार (१९९९)
डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार (२००२)
ज्ञानपीठ पुरस्कार (आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी दिलेला पुरस्कार) (इ.स. २००३)
केशवसुत पुरस्कार
विद्यापीठांच्या डी.लिट्‌स








विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार

महाराष्ट्र सरकार २०११सालापासून साहित्यिकांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार देते.
हा पुरस्कार मिळालेले साहित्यिक--
इ.स. २०११ : विजया राजाध्यक्ष
इ.स. २०१२ : के.ज. पुरोहित
इ.स. २०१३ : ना.धों. महानोर

जयराम बुवाचा मान

तुझ्या लाडक्या लेकाचा
देता मान तुले
जाऊं आतां सम्दे जनं
लोडगे खायाले

च्यारे पुंजापत्री हातीं
उदबत्ती कापुर
वहा हात जोडीसनी
जयराम् बोवावर

'आज आली तुझ्या दारीं
मांगन रे तुले
दे जयराम बोवा आतां
आऊक्ष लेकाले'

आतां सांगते मी ऐका
एका रे काहानी
काय अवगत घडली या
पुन्यात्री ठिकानीं

"बारा वरसाचा मुंजा
वाटसरू कोनी
टिस लागीसनी गेला
पेयालेज पानी

त्याले सोंबर दीसली
येहेर मयांत
तांब्या शिकाई घेतली
टाकली गयांत

मंग वडांग कुदीसनी
येहरीजोय आला
तव्हां तितक्यांत कोनी
कोनी खकारला

जोय वडाच्या खालती
कोनी आवलिया
तढी व्हता देवध्यानीं
जयराम बोवा

म्हनें जयराम बोवा
'कोन तूं पोरगा
अरे, पानी पेयाआंधी
खाई घे लोडगा'

व्हत मुंजाबी भुकेला
बोवा पुढें आला
हातीं घेतला लोडगा
खायाले लागला

मंग खाऊन लोडगा
वाटली हुशारी
गेला पेयासाठीं पानी
आला येहरीवरी

त्यानं सोडली शिकायी
नित्तय पान्यांत
घेये भरीसनी तांब्या
घटाघट पेत

तव्हां पानी पेतां पेतां
वडाच्या खालुन
गेला सर्पटत साप
मुंजाच्या बाजुनं

तसा पाहे जयराम बोवा
डोये रोखीसन
आतां लागीन लागीन
मुंज्याले रे पान

पेत होता मुंजा पानी
पेयांत मगन
तो कशाले देईन
आठे तठे ध्यान ?

तसा उठे जयराम बोवा
तीराच्या सारखा
देला सापावर पाय-
सापावर देखा

साप चेंदता चेंदता
साप उलटला
आन् मुंजाच्या वाटचा
बोवाले डसला

तव्हां पयाला पयाला
मुंजा घाबरत
पडे जयराम बोवा
लह्यर्‍याज देत

गेली गेली रे बातनी
आवघ्या गांवाले
आला तठे 'हीराबाबू'
साप उतार्‍याले

गेला जयरामबोवा मरी
उपेग काय रे
काय चालीन मंतर
सापाले उतारे ?

अरे, उलटला मंतर
हीराबाबू वर्‍हे
गेलं चढीसनी ईख
सोताज लहरे

झडपला 'हीराबाबू'
गेला रे पयत
आन् मधींच पडला
सोंबरल्या शेतांत

मौत जयराम बोवाची
गेली नही हाटी
लोक आले रे पाह्याले
झाली तठी दाटी

देवमानूस शेवटे
देवाघरीं गेला
जिव धोक्यांत घातला
मुंजा वाचवला

देलं जयराम बोवानं
जीवाचं रे दान
आतां मुंजासाठीं लोक
देती त्याले मान

जारे 'बिढ्याच्या' वरते
'आसोद्याच्या' वाटे
तठी वडाच्या खालते
जयराम बोवा भेटे"


कवियत्री - बहीणाबाई चौधरी

राणीची बाग

स्वप्नात पाहिली राणीची बाग
हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग

हरणाबरोबर खेळत पत्ते
बसले होते दोन चित्ते

उंट होता वाचत कुराण
माकड होते सांगित पुराण

सिंह होता व्याख्यान देत
गाढव होते उतरुन घेत

जिराफ होता गात छान
मानेइतकीच लांब तान

कोल्हा होता दुकानदार
त्याच्या दुधात पाणी फार

मला पहाता म्हणती सारे
एक पिंजरा याला द्यारे

त्याबरोबर आली जाग
स्वप्नात पाहिली राणीची बाग


कवी - विंदा करंदीकर

बी


फुलांची ओंजळ

१. नांवात काय आहे?
२.  काविवंदन
३. प्रणयपत्रिका
४. वेडगाणे
५. प्रमिला
६. पिंगा
७. प्रणयप्रयाण
८. माझी कन्या
९. दीपज्योतीस
१०. वात्सल्य
११. चाफा
१२. निवेदन
१३. आशादेवी
१४. मनोहारिणी
१५. डंका
१६. मार्गप्रतीक्षा
१७. जादू
१८. तीव्र जाणीव
१९. ह्यात काय संशय ?
२०. पूर्ण कि अपूर्ण ?
२१. कमळा
२२. आम्ही
२३. गिरीगान
२४. तू देशी न तुझे
२५. विचारतरंग
२६. अनुकार
२७. नागेश
२८. चांदणी
२९. प्रभात पोवाडा
३०. क्षणभर
३१. भगवा झेंडा
३२. काव्यानंद
३३. बंडवाला
३४. बकुल
३५. बुलबुल
३६. एक संवाद
३७. यमदुतास
३८. फुलांची ओंजळ
३९. पिकले पान
४०. गाविलगड
४१. दोन 'मी'
४२. स्वैर गीत
४३. भारतीय जीवन
४४. अध्यात्म
४५. आठवण
४६. एक दृश्य
४७. प्रीति
४८. रूपमुग्धा
४९. प्रतिमाभंग

वैदू

मच्छाई यो शंकासूर मारुनी चार्‍ही वेद लाईये । ब्रह्मासी सुख केलीये ।

तुझ्या रूपाची थोरी काय वर्णू ये । बुरगुंडये माये बुरगुंडाये ॥ १ ॥

कच्छाई वो समुद्रमंथन केलीये । पाठन देउन महा मेरू तारियेले ।

दैत्यासी मारिलीये । देवासी रक्षिलीये । ऐसी तुझी थोरवी जग वाखाणिये ।

तुझे स्वरूपाची ऐकून बहु सुख पाविलिये । माये बुरगुंडाये ॥ २ ॥

वर्‍हाई वो पृथ्वी बुडिये । ते दाढे धरीये । विश्वजनासी तारिये ।

तुझे स्वरूपासी ब्रह्म वाखाणिये । न कळे तया सीमाई वो ॥ ३ ॥

नरसीमीयो प्रल्हादाकारणें । वैकुंठींहुनी प्रल्हाद रक्षिलीयो ।

तारिले भवभक्त तारिले प्रल्हादासी । हिरण्यकश्यपाकारणें आईयो ॥ ४ ॥

बळीराम दैत्य पृथ्वी माजलियो । त्या कारणें कैसी धावलीसे वामनरूप धरूनियो ।

तीन पाऊल पृथ्वी दान मागितलीयो । तिसरे पाउलीये बळी घालोनी पाताळीयो ।

तयाचे द्वारीं द्वारपाळ होउनी राहिलीयो । भक्तिकारणें देणें तुझी थोरी झालीयो । आईयो बुरगुंडे ॥ ५ ॥

परशरामाईयो । पित्याचे वचना धांवलीयो । रेणूकें मातेचें शीर उडविलीयो ।

पहा तिचें नवल केवळ थोरीयो । पित्याचे वचनें चौघे उठविलीयो । भक्तिभाव देखोनी निक्षेत्रीं पृथ्वी केलीयो ॥ ६ ॥

रामाईयो सीतकारणें रामें रावण वधिलीयो । देवगणा सोडून सुखी केलीयो । धन्य तुझी एक वृत्ती सकळ धर्म तारीयो ॥ ७ ॥

कृष्णाबाईयो । देवकी बंदीशाळे त्याकारणें धांवलीयो ।

धरून कृष्णलीला कंससामासी मारलीयो । भक्ति कुबजेची देखोनी तिसी भावें उद्धरलीयो ॥ ८ ॥

बोधाईयो भक्तिभाव देखुनी तिष्ठत भीमातिरींयो । पुंडलिकाकारणें सकळ जग उद्धरीलीयो ॥ ९ ॥

कलंकी अवतार धरुनी सकळ पृथ्वी बुडविलीयो । वटपत्रीं राहिलीयो ।

एका जनार्दनीं देखिलीयो । आई वैदीण प्रसन्न झालीयो । सकळ सुख देखिलीयो ॥ १० ॥


कवियत्री - बहीणाबाई चौधरी

त्याला इलाज नाही

धिक्कारिली तरीही सटवीस लाज नाही
श्रद्धा न पाठ सोडी त्याला इलाज नाही

देवातुनी जगाला ज्याने विमुक्त केले
त्यालाच देव करिती त्याला इलाज नाही

लढवून बांधवांना संहार साधणारा
गीता खुशाल सांगे त्याला इलाज नाही

तत्त्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेका
कथिती विरुद्ध गोष्टी त्याला इलाज नाही

ते भूत संशयाचे ग्रासून निश्चितीला
छळते भल्याभल्यांना त्याला इलाज नाही

विज्ञान ज्ञान देई निर्मी नवीन किमया
निर्मी न प्रेम शांती त्याला इलाज नाही

बुरख्यात संस्कृतीच्या आहे पशू दडून
प्रगटी अनेक रुपे त्याला इलाज नाही

असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी
अस्वस्थता टळेना त्याला इलाज नाही

ज्यांना अनेक छिद्रे असल्याच सर्व नावा
निर्दोष ना सुकाणू त्याला इलाज नाही

वृद्धापकाल येता जाणार तोल थोडा
श्रद्धा बनेल काठी त्याला इलाज नाही

                    
कवी - विंदा करंदीकर

हीच दैना

सडलेल्या पंखांनांही
उडण्याचा लागे ध्यास
हाच माझा थोर गुन्हा
हाच माझा रे हव्यास.

आकाशाची निळी भाषा
ऍकता न उरे पोच;
आणि गजांशी झुंजता
झिजे चोंच झिजे चोंच!

जाणिवेच्या पिंजर्‍यात
किंचाळत माझी मैना;
तरी मुके तिचे दु:ख,
हीच दैना हीच दैना.


कवी - विंदा करंदीकर
कवितासंग्रह - मृद्‌गंध

अर्धीच रात्र वेडी

अर्धीच रात्र वेडी अर्धी पुरी शहाणी
भोळ्या सदाफुलीची ही रोजची कहाणी

फुलले पुन्हा पुन्हा हा केला गुन्हा जगाचा
ना जाहले कुणाची पत्त्यामधील राणी

येता भरून आले जाता सरून गेले
नाही हिशेब केले येतील शाप कानी

आता न सांध्य तारा करणार रे पहारा
फुलणार नाही आता श्वासात मूढ गाणी

शापू तरी कशाला या बेगडी जगाला
मी कागदी फुलांनी भरतेच फुलदाणी


गीत – विं. दा. करंदीकर
कवितासंग्रह - जातक
संगीत – यशवंत देव
स्वर – पद्मजा फेणाणी-जोगळेकर

ऋणाईत

स्वत:वरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो..
माउलीची कूस बनून शब्दच मला जवळ घेतात ...
लाजिरवाणे असे जीणे अपमानाचे जगत जातो..
प्राण चुंबुन घुसमटलेले शब्दसखेच धीर देतात...

अंधारून येतात दिशा..चार भिंती एक छप्पर..
काळोखात बुडून जाते..झाडे खातात मुकाट मार..
चिक चिक माती रप रप पाय..ठणकणारी जखम जशी..
असे होते मन आणि शब्दच होतात सहप्रवासी..

प्रवासाच्या सुरुवातीला वळणवेड्या मार्गावरून मरण येते
कवेत घेउन माझ्या आधी शब्दच त्याचे स्वागत करतात
ऋणाईत मी शब्दांना सर्वस्वाने ओलीस जातो..
प्रारब्धाच्या प्रकाशधारात ऋणाईत गाणे गातो...


कवी - केशव तानाजी मेश्राम

ते देशासाठी लढले

ते अमर हुतात्मे झाले!
सोडिले सर्व घरदार
त्यागिला मधुर संसार
ज्योतीसम जीवन जगले
ते देशासाठी लढले !

तो तुरुंग, ते उपवास
ते साखळदंड तनूस
कुणी फासावरती चढले
ते देशासाठी लढले !

झगडली-झुंजली जनता
मग स्वतंत्र झाली माता
हिमशिखरी ध्वज फडफडले
ते देशासाठी लढले !

कितिकांनी दिले प्राणास
हा विसरु नका इतिहास....
पलित्याची ज्वाला झाले
ते देशासाठी लढले !

हा राष्टध्वज साक्षीला
करू आपण वंदन याला
जयगीत गाऊया अपुले
ते देशासाठी लढले !


कवी - वि. म. कुलकर्णी

पिंपळाचे पान

वसंतात गळतात पिंपळाची पाने,

रंग संपून हिरवा, पान पान होते जुने...

प्रेम वाटले पानाला... काही दिवस लोटले,

’जाळीदार’ पानामुळे बालमन आनंदले...

पुन्हा फुटेल पालवी - पिंपळाच्या फांदयांतून,

पान पुस्तकामधले पाहील हो डोकावून....

एका शहाण्या मुलाने एक पान उचलले,

आणि नव्या पुस्तकात हळू जपून ठेवले...

’जुन्या-नव्याचा हा खेळ’ कधीपासून चालला,

दोन्हींवर प्रेम करु - पाहू आपण सोहळा !


कवी - वि.म. कुलकर्णी

हरपलें श्रेय

( उदात्त बुद्धीला संसारांत राम नाही. अलीलिक असें जें कांहीं तिला
पाहिजे असतें, तें तिच्या हक्काचें असून देखील, त्याच्या प्राप्तीकरितां
तिला झुरत पडावें लागत नाहीं काय ? )

त्रिखंड हिंडुनि धुंडितसें,
“ परि हरपलें तें गवसे ! ॥ध्रु०॥
हेत्यें अजाण माहेरीं
तों खेळ खेळल्यें परोपरी
लटूपटीच्या घरदारीं
लटकीच जाहल्यें संसारी;
तेव्हांचें सुख तें आतां
खर्‍या घरींहि न ये हाता !

चुकचुकल्यापरि
वाटे अन्तरि,
होउनि बावरि

निज श्रेय मी पाहतसें,
न परि हरपलें तें गवसे !
प्राप्त जाहले तें तुजला
तूं मागितलें जें देवाला,
ज्याचें मोल तुवां दिधलें
तेंच तुझ्या पदरी पडलें ---
या वचनें चुकला सौदा
उमगुनि ह्र्दया दे खेदा !

दिलें हिरण्मय,
हातीं मृण्मय;
हा हतविनिमय

परत मला मम मिळे कसें ?
न परि हरपलें तें गवसे !
किरण झरोक्यांतुनी पडे,
अणूंसवें त्यांतून उडे
परोक्षविषयीं मन माझें
विसरुनियां अवघीं काजें;
हयगय त्यांची मज जाची
परि न मला पर्वा त्याची !
वेडी होउन
बसल्यें अनुदिन
एकच घेउन ---

मज माझें लाभेल कसें ?
न परि हरपलें तें गवसे !
जेथें ओढे वनराजी
वृत्ति रमे तेथें माझी;
कारण कांहीं साक्ष तिथें
मम त्या श्रेयाची पटते;
म्हणुनी विजनीं मी जात्यें,
स्वच्छन्दें त्या आळवित्यें.

स्वभाव दावुनि
परि तें झटदिनिं
जाई लोपुनि !

मग मी हांका मारितसे !
न परि हरपलें तें गवसे !
भीडभाड माझी फिटली,
जग म्हणतें कीं, ’ ही उठली !’
जनमर्यादा धरुनि कसें
अमर्याद तें मज गवसे ?
एक शब्द बोलेन जरी
सकलीं कुष्ठित करिन तरी !

अशी आगळी
परी बावळी
आहे दुबळी ;

कांकीं त्याविण सुचत नसे !
न परि हरपलें तें गवसे !
स्वपतिचितेवरि उडी सती
संसृतिविमुखीं घेई ती;
दीपशिखेवरि पतंग तो

प्रेमें प्राणाहुति देतो;
मी न करिन का तेंवि तधीं
माझें मज लाभेल जधीं !

मजपासोनी

हाय ! हिरोनी
नेलें कोणीं !---

म्हणुनि जीव पाखडीतसे
न परि हरपलें तें गवसे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- चिपळूण, २५ मे १९०५

केशवसुत


हरपलें श्रेय

स्तबक : १
१. गोष्टी घराकडील
२. नैऋत्येकडील वारा
३. आईकरितां शोक

४. दुर्मुखलेला


स्तबक : २
५. फुकट दवडलेला तास
६. कविता आणि कवी
७. कवितेचे प्रयोजन
८. काव्य कोणाचे ?
९. सृष्टी आणि कवी
१०. दूर कोठे एकला जाउनिया
११.  शब्दांनो! मागुते या!
१२. दिव्य ठिणगी
१३. सृष्टी, तत्व आणि दिव्य दृष्टी
१४. क्षणात  नाहीसे होणारे दिव्य भास
१५. चिन्हीकरण अर्थात भाव आणि मूर्ती यांचे लग्न
१६. प्रतिभा
१७. कवि
१८. आम्ही कोण?
१९. धुमकेतू आणि महाकवी
२०. फिर्याद
२१. रुष्ट सुन्दरीस


स्तबक : ३
२२. थकलेल्या भटकणाराचें गाणें
२३. जरी तू ह्या इथे
२४. प्रीति
२५. प्रयाण - गीत
२६. माझा अन्त
२७. फार दिवसांनी भेट
२८. प्रणय - कथन
२९. मनोहारिणी
३०. राजा शंतनु


स्तबक : ४
३१. मयूरासन आणि ताजमहाल
३२. चिरवियुक्ताचा उद्गार
३३. वियुक्ताचा उद्गार
३४. स्मरण आणि उत्कंठा                                


स्तबक : ५
३५. अढळ सौदर्य
३६. एक खेडे
३७. भृंग
३८. फुलांची पखरण
३९. पुष्पाप्रत
४०. पर्जन्याप्रात
४१. फुलपांखरू
४२. फुलातले गुण
४३. संध्याकाळ
४४. फूलपांखरू
४५. दिवाळी

स्तबक : ६
४६.अंत्यजाच्या मुलाचा पहिला प्रश्न
४७. मजुरावर उपासमारीची पाळी
४८. रूढी-सृष्टी-कलि(?)
४९. ‘पण लक्षांत कोण घेतो ?’ च्या कर्त्यास
५०. तुतारी
५१. स्फूर्ती
५२. मूर्तिभंजन
५३. नवा शिपाई
५४. निशाणाची प्रशंसा
५५. गोफण केली शान !
५६. गावी गेलेल्या मित्राची खोली लागलेली पाहून
५७. एका  भारतीयाचे उद्गार


स्तबक : ७      
५८. सिंहावलोकन
५९. निद्रामग्न मुलीस !
६०. रांगोळी घालताना पाहून
६१. दोन बाजी
६२. घुबड
६३. सतारीचे बोल
६४. वातचक्र
६५. दवाचे थेंब
६६. दिवस आणि रात्र
६७. घडयाळ
६८. विद्यार्थ्याप्रत
६९.पद्यापंक्ती
७०. स्फुट विचार 
७१. उत्तेजनाचे दोन शब्द

स्तबक : ८
७२. तत्वत: बघता नामावेगळा
७३. कोठे जातोस?
७४. स्वर्ग, पृथ्वी आणि मनुष्य
७५. कल्पकता
७६. स्वप्नामध्ये स्वप्न!
७७. आहे जीवित काय?
७८. झपूर्झा
७९. “कोणीकडून ? कोणीकडे ?”
८०. म्हातारी
८१. हरपलें श्रेय
८२. तुझे नाम मुखी

जिंकू किंवा मरू

माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सरू
जिंकू किंवा मरू

लढती सैनिक, लढू नागरिक
लढतिल महिला, लढतिल बालक
शर्थ लढ्याची करू, जिंकू किंवा मरू

देश आमुचा शिवरायाचा
झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू, जिंकू किंवा मरू

शस्‍त्राघाता शस्त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू, जिंकू किंवा मरू

हानी होवो कितीहि भयंकर
पिढ्या-पिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू, जिंकू किंवा मरू


गीत    -    ग. दि. माडगूळकर
संगीत    -    वसंत देसाई
स्वर    -    महेंद्र कपूर
चित्रपट    -    छोटा जवान

थोडं कन्फ्युजन

झंप्या: ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायस बुवा तू?

पंप्या: अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.

झंप्या: म्हणजे?

पंप्या: अरे मी रस्त्यावरून चाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं. मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.

झंप्या: हात्तिच्या…एवढंच ना.

पंप्या: हो रे…पण मग त्या सापाला मारण्यासाठी म्हणून मी जी काठी उचलली ना, तो खरा साप निघाला.

पाचोळा

आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवु द्या जगासी
सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येइ धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी




गीत    -    कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा
संगीत    -    वसंत प्रभू
स्वर    -    लता मंगेशकर

आता उठवू सारे रान

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण

किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल सारे रान

कोण आम्हा अडवील, कोण आम्हा रडवील
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण

शेतकऱ्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान

पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन्‌ कामकरी मांडणार हो ठाण


कवी - साने गुरुजी

कोणिकडे जादुगारिणि ?

कोणिकडे जादुगरिणि; आज सांग धावा ? ध्रु०

दडपित कां तरुणमनें चरण हा पडावा ?

आज खैर मज न दिसे बघुनि तुझ्या भावा,

ही गहिरी नजर जहर,

कवणावरि करिल कहर ?

तरुण कवण लक्षिशि जो चरणिं लोळवावा ? १


कवी - भा. रा. तांबे
जाति - परिलीना
राग - भैरवी
ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर
दिनांक - सप्टेंबर १९२९

शुभं भूयात्

आज नृपराज ये दिव्यनिधि घरिं खरा
आर्त हांकेसरशि येशि देवी घरा ||ध्रु||०

शून्य जग तुजविणें विभव सारें सुनें
उगवतां तूं फुटे जीवनाचा झरा ! १

येइं येईं म्हणुनि सोत्कंठ बहुजनीं
बाहिलें ती महा- लक्ष्मि आली घरा ! २

आज चिंतामणी पाहिला लोचनीं
परिस लाभे अहो भाग्य येईं करा. ३

देवि मांगल्य तूं सत्य तूं सौख्य तूं
काय आतां उणें धन्य झाली धरा. ४

आज झालों कृती धन्य ही संसृती
नव फळांहीं भरो तव मळा नृपवरा ! ५

दणदणो दुंदुभी देव गाउनि नभीं
अक्षता वर्षुनी प्रीति येवो भरा. ६


कवी - भा. रा. तांबे
जाति - रुद्र
ठिकाण - लष्कर- ग्वाल्हेर
दिनांक - १६ फेब्रुवारी १९४१

वायो, खुणव तीस

येतां तुझ्या दारिं मी वाट चालोनि
चालें पुढे, येथ थांबोनि थांबोनि. ।।ध्रु०।।

असशील तूं आंत घरकामधंद्यांत,
रेंगाळी कुणि दारिं, तुज भान कोठोनि ।।१।।

छुमछुम तुझे पाय स्रवतात नव राग,
कुणि भाग्यवंतास सुख आंत ऐकोनि ।।२।।

डोळे तुझे जेथ पडति घरामाजि
सौभाग्य अरुणास त्या ठायिं नाचोनि ।।३।।

मी मात्र या दारिं घोटाळिं आशाळ,
कीं ढुंकशिल काय येथोनि तेथोनि ।।४।।

चाले असें येथ हें रोजच्या रोज,
सांगेल तुज कोण दारीं उभे कोणि ।।५।।

मी टाकितों येथ काळीज हें फूल;
वायो ! खुणव तीस, ने वास वाहोनि ।।६।।


कवी - भा. रा. तांबे
जाति - किंकिणी
राग - बागेसरी कानडा
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ८ जानेवारी १९३६

आबाद

अजून सगळे नाटक आहे
डोळ्यांपुढून डोळ्यांवरून
अजून नाही कुणां काही
आपादमस्तक टाकीत चिरून

कुठे काही सलते, तेव्हा
खाजवाखाजव वरच्यावरून
कोण करतो झगझग साली
मर्मापर्यंत आत शिरून

जखम झाली तरी आपले
पाणी फक्त गालावरून
फार फार तर ओठापाशी
कंठापाशी जाते जिरून

कोण उगाच मरते तेव्हा
आरडाओरड होते दुरून
झिंदाबाद मुर्दाबाद
सर्व आबाद होते फिरून


कवी - वसंत बापट

साने गुरूजी

पत्री

पत्री समर्पण
हृदय मदीय तव सिंहासन होवो
मजवर कृपा करावी
एक किरण
माझी बुडत आज होडी
अति आनंद हृदयी भरला
मम जीवन हरिमय होऊ दे!
मजला तुझ्यावीण जगी नाही कोणी
तव अल्प हातून होई न सेवा
सदयहृदय तू प्रभु मम माता
दिसतात सुखी तात! सारेच लोक
देवा! धाव धाव धाव
दु:ख मला जे मला ठावे
नयनी मुळी नीरच नाही
वेल
जीवनतरू
मज माहेराला नेई
येतो का तो दुरून
पूजा मी करु रे कैशी?
कर्ममय पूजा
मजूर
श्रमाची महती
मन माझे सुंदर होवो
मी केवळ मरुनी जावे
असो तुला देवा! माझा सदा नमस्कार
प्रभो! काय सांगू तुला मी वदोनी
वेणु
मनमोहना
मनोमंदिर-राम
हृदयाकाशी मेघराशी
देवा! झुरतो तव हा दास
प्रभु! सतत मदंतर हासू दे
जागृत हो माझ्या रामा!
हे नाथ! येईन तव नित्य कामी
हे तात! दे हात करुणासमुद्रा
तुजवीण अधार मज कोणि नाही
काही कळेना, काही वळेना
आईचा मार
दिव्य आनंद
कैसे लावियले मी दार
हस रे माझ्या मुला!
झुरतो मी रात्रंदिवस
काय सांगू देवा, कोणा सांगू?
नमस्कार
गाडी धीरे धीरे हाक
आशानिराशा
ये रे मला तार
निराधार
दाखव मज अपुले चरण
येवो वसंतवारा
माझे ध्येय
तुझ्या हातातला
रडण्याचे ध्येय
द्विविध अनुभव
हे सुंदरा अनंता!
रडायाचा लागलासे देवा एक छंद
रामवेडा
आई, दार उघड
देवाजवळ
जीवननाथ
सुखामृताची मग नित्य धार
तुला देतो मी जमिन ही लिहून
आशा
सोन्याचा दिवस
प्रेम का करावे?
 प्रार्थना
 प्रसन्नता
 प्रकाश केव्हा भवनी भरेल?
 हृदयाचे बोल
 जीवनार्पण
 जीवनात माझ्या सदा राम गुंफिन
तुजसाठि जीव हा उरला
करुणाष्टक
जीवनबाग
भाग्याचे अश्रु
तळमळतो रे तुझा तान्हा
निर्वाणीचे सांगणे
कधि येशिल हृदयि रघुराया
का मजला देता प्रेम?
अश्रु
माझा देव
प्रभु मम हृदयि आज येणार!
फुलाची आत्मकथा
मयसभा राहिली भरुन
खरा धर्म
कशासाठी जगावे?
जीवनातील दिव्यता
मित्रांसाठी प्रार्थना 
संत
मेघासारखे जीवन
वंदन
मदीय त्या नमस्कृती
नवीन संन्यास
विपत्ति दे तीहि हवी विकासा
दु:ख आनंदरुप
प्रेमधर्म
परी बाळाला सकळ ती समान
ग्रंथमहिमा
गुढीपाडवा
नागपंचमी
दसरा
संक्रांत
लहान मित्राबद्दल!
लहानपणची आठवण
मृत्युमित्र
शांति कोण आणते?
गायीची करुण कहाणी
जीवनमित्रास!
कसे तरी मग जग दिसते?
प्रेमाचे गाणे
आत्मा ओत रे ओत
भारतमाता
मनमोहन मूर्ति तुझी माते
माझी एकच इच्छा
प्रभु! भारतिचे वैभव कोठे गेले?
स्वातंत्र्याचे अम्ही शिपाई!
देशभक्त किति ते मरती
भारतसेवा
जा रे पुढे व्हा रे पुढे!
बलसागर भारत होवो!
हा देश वैभवी न्यावा!
भूषण जगताला!
भारतजननी सुखखनि साजो
हृदय जणु तुम्हां ते नसे!
माझा महाराष्ट्र भाग्ये सजो
भारतमाता माझी लावण्याची खाण!
मरणही ये तरी वरिन मोदे
दिव्य मी स्वर्ग निर्मीन
देशासाठी मरु!
तेव्हा घडे उन्नती!
तुफान झालो!
प्रिय भारता सुंदरा!
दुबळी मम भारतमाता!
देशभक्ताची विनवणी!
मातृभूमिगान
गाऊ मी कसले गाणे?
स्वातंत्र्य
स्वातंत्र्यदेवीचे शुभ आगमन
स्वातंत्र्यानंदाचे गाणे
भारतास!
भारता ऊठ!
वंदे मातरम्!
भारतजननी तव शरणम्!
सुसंस्कृत कोण?
खरा हुतात्मा!
ऊठ झुगारुन देई बेडी
प्रभु-प्रार्थना!
राष्ट्राचे उद्यान
राष्ट्रपताका
प्रतीध्यान
झेंडागीत
नवयुवक
बाल-वृद्ध संवाद
एकच वेड
स्वातंत्र दिव्यदर्शन!
भारतातील मुले
महाराष्ट्रास!
राणा प्रताप
महात्माजींस
खरे सनातनी
सत्याग्रही (खंडकाव्य)
माझी पत्री

देवाची देणगी.

एकदा ब्रम्हदेव आपल्या सर्व दूतांना व कर्मचार्‍यांना एका बैठकित सांगत होते," हे बघा, आपल्याला काही चांगले निर्माण करायचे असेल तर तेथेच काहीतरी वाईट पण द्यावे. म्हणजे त्या क्षेत्रात संतुलन कायम रहाते. सर्व कामे अशी करायची कि कोठेही संतुलन बिघडता कामा नये.

थोडे थांबुन देव म्हणाले," कुणाला काही अडचण ? माझे म्हणणे कुणाला कळले नसेल तर विचारा मी माझ्या म्हणण्य़ाचे स्पष्टीकरण द्यायला तयार आहे."

काही वेळाने एक देवदूत ऊभा राहिला व देवाला म्हणाला,"देवा आपले म्हणणे कळले पण आपण एखादे उदाहरण द्याल का ?"

ब्रम्हदेव म्हणाले," हे बघा मी अमेरिकेला सर्व काही दिले आहे. तेथील लोकांना मी भरभरुन श्रीमंती दिली, मजा करायला बरिच ठिकाणे दिली पण त्यांना भितीही दिली.  त्यांना कायम भिती वाटत असते."
दूसरा देवदूत म्हणाला, " देवा अजुन एक उदाहरण द्याना."

ब्रम्हदेव म्हणाले," मी अफ्रिकेला निसर्गाचे दान भरभरुन दिले पण त्यासोबतच गरिबीही दिली."
तर तिसरा देवदूत म्हणाला," देवा तुम्ही म्हणता ते बरोबर नाही, आपण सर्वच ठिकाणी असे संतुलन सांभाळत नाही. आता बघाना भारताला निसर्गाचे दान दिले, समॄद्धि दिली, श्रीमंती दिली व कुठेच काही कमी दिसत नाही."

देव म्हणाले," होय तेथेही मी संतुलन कायम राखले आहे. त्यांना शेजारी मी पाकिस्तान दिलाय ना."

गाढव

एकदा एका शाळेतल्या व्रात्य मुलांनी शाळेत काहीतरी मस्ती करायची ठरवले.
बर्‍याच विचारांती त्यांनी तीन गाढव आणले व त्यांच्या पाठीवर १, २ व ४ हे क्रमांक घातले व त्यांना शाळेच्या मैदानात सोडून दिले.
मुख्याधापकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी शाळेतले सर्व कर्मचारी गाढव क्रमांक ३ शोधायला दिवसभर राबवले.

आरसे

चारी बाजूंना चार
वरती एक
आणि खालती एक
असे अभावाला कैद करू पाहणारे
आरसे.

"आम्ही आहोत, आम्ही आहोत"
असे ते आक्रोशले
पण अभाव त्यांच्या पुढून
अभाव त्यांच्या मागून
अभाव त्यांच्या भोवतालून
व अभाव त्यांच्यामधून
खदखदा हसला.

आरसे वेडे झाले.
आरसे भेदरले.
स्वतःच्या अस्तित्वाविषयी
त्यांना भ्रांत पडली.

आणि
आरशांनी आत्महत्या केली.


कवी - अरुण कोलटकर

श्रीकृष्णाचा पाळणा

बाळा जो जो रे, कुळभूषणा, । श्रीनंदनंदना ॥
निद्रा करिं बाळा, मनमोहना । परमानंदा कृष्णा ॥बाळा धृ.॥
जन्मुनि मथुरेत, यदुकुळीं । आलासी वनमाळी ॥
पाळणा लांबविला, गोकुळीं । धन्य केले गौळी ॥ बाळा जो.॥
बंदीशाळेत, अवतरूनी । द्वारे मोकलुनी ॥
जनकशृंखला, तोडोनी । यमुना दुभंगोनी ॥ बाळा जो. ॥
मार्गी नेताना, श्रीकृष्णा । मेघनिवारणा ॥
शेष धावला, तत्क्षणा । उंचावूनी फणा ॥ बाळा जो. ॥
यत्नजडित, पालख । झळके अमोलिक ॥
वरती पहुडले, कुलतिलक । वैकुंठनायक ॥ बाळा जो. ॥
हालवी यशोदा, सुंदरी । धरूनी ज्ञानदोरी ॥
पुष्पें वर्षिली, सुरवरी । गर्जती जयजयकारीं ॥ बाळा जो. ॥
विश्वव्यापका, यदुराया । निद्रा करिं बा सखया ॥
तुजवरिं कुरवंडी, करूनियां । सांडिन मी निज काया ॥ बाळा जो.॥
गर्ग येऊनि, सत्वर । सांगे जन्मांतर ॥
कृष्ण परब्रह्म, साचार । आठवा अवतार ॥ बाळा जो. ॥
विश्वव्यापी हा, बाळक । दुष्ट-दैत्यांतक ॥
प्रेमळ भक्तांचा, पालक । श्रीलक्ष्मीनायक ॥ बाळा जो. ॥
विष पाजाया, पूतना । येतां घेईल प्राणा ॥
शकटासुरासी, उताणा । पाडिल लाथें जाणा ॥ बाळा जो. ॥
उखळाला बांधिता, मातेनें । रांगतां श्रीकृष्ण ॥
यमलार्जुनांचे, उध्दरण । दावानलप्राशन ॥ बाळा जो. ॥
गोधन राखितां, अवलीळा । काळीया मर्दीला ॥
गाई गोपाळां, रक्षून । केलें वनभोजन ॥ बाळा जो. ॥
कालिंदीतीरी, जगदीश । वज्रवनितांशी रास ... ॥
खेळुनी मारिले, कंसास । मुष्टिक चाणूरास ॥ बाळा जो.॥
ऐशी चरित्रे, अपार । दावुनि भूमीवर ॥
पांडव रक्षिल, सत्वर । ब्रह्मानंदी स्थिर ॥ बाळा जो.॥

जुगलबंदी

एकदा जुगल हंसराज झाकीर हुसेन च्या कार्यक्रमाला जातो....तिकीट पण
काढतो..तरी त्याला तिथे आत सोडत नाहीत ... का ????
.....
.
कारण..
.
.
.
तिथे आत "जुगलबंदी" सुरु असते !!

लग्नाचं गाण

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या नथासाठी, मोडं खजिना.

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या डुलासाठी, मोडं खजिना.

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या पैंजनासाठी, मोडं खजिना.

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या बांगडीसाठी, मोडं खजिना.

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या लेणसाठी, मोडं खजिना.

गाडी गुलाबी, बैलं खिलारी,
भाऊ सजना, दादा सजना,
बहिणीच्या चोळीसाठी, मोडं खजिना.

जॅकरांडा

जॅकरांडा जॅकरांडा
वाट भरून घाट भरून
बागांमधून जागा धरून
इथे तिथे जिथे तिथे
वळणावरून फिरून फिरून
खूप खूप जॅकरांडा !

उन्हामधे कात टाकून
अंगणामधे न्हाऊन माखून
सावलीमध्ये जांभळी झोकून
रंगानेच अंग झाकून
उंच-नींच जॅकरांडा !
ओठी चित्रपंखा धरून
छत्रीखाली जॅकरांडा !


कोपर्‍यावरती खुणा करीत
आव्हान देत जॅकरांडा ..
पक्के शिक्के जॅकरांडा
डोळेभर जॅकरांडा
डोकेभर जॅकरांडा !

हाडांमधून घसरणार्‍या
नसाभर पसरणार्‍या
मणक्यांमधे मणीमणी
वरवर सरकणार्‍या
रंग-रस जॅकरांडा !

इथेतिथे जिथेतिथे उघड उघड जॅकरांडा !
फुफ्फुसांच्या कप्प्यांमधून लप्पेछप्पे जॅकरांडा !

जॅकरांडा जॅकरांडा जॅकरांडा जॅकरांडा !


कवी - वसंत बापट

केळी साठी नापास

बन्डु नापास होतो म्हणुन गुरुजी त्याच्या पालकांना बोलवितात.

गुरुजी : मी बन्डुला विचारले कि जर माझ्याजवळ ५ केळी आहेत आणि त्यातील मी ३ केळी खाल्ली तर खाली किती केळी राहिली ? तर २ केळी राहिली हे साधे त्याला सान्गता आले नाही.

बन्डुची आई : काय मास्तर, २ केळासाठी पोराला नापास केलं व्हय. उद्या २ डझन केळी पाठवुन देते, करुन टाका पोराला पास.

आठवणी

मनात आठवणी गर्दी करतात तेव्हा
ह्सतमुखानं त्यांना या म्हणावं;
ऊंची, मखमली, आसनं देऊन
प्रेमानं बसा म्हणावं;
स्थानापन्न झाल्या की हळूच विचारावं,
काय घेणार ?
त्याही बेट्या मिस्कील ;
निष्पाप बालपणाचा आव आणून विचारतील,
काय देणार ?
मोकळेपणानं उत्तर द्यावं
मागाल ते तुमचंच...
मग एक हळूच म्हणेल, डोळे द्या,
पुन्हा पुन्हा आमच्याकडे वळून पाहणारे --
दुसरी म्हणेल, हात द्या
न धरता आम्हाला पकडून ठेवणारे --
तिसरी म्हणेल, शब्द द्या,
इंद्रधनुष्यातले रंग आमच्यावर उधळणारे --

पण कुणाला काहीच देऊ नये;
शब्द तर मुळीच देऊ नयेत !
चवथी, पाचवी -- सगळ्या होतील पुढं;
पण मधभरल्या गळ्यानं नुसतंच हूं म्हणावं.
डोळे मिटून घ्यावेत
अन सगळ्यांना कुरवाळीत, कुरवाळीत
मनाच्या तळमहालात झोपवून टाकावं
-- पुन्हा कधीतरी अशीच गर्दी करण्यासाठी


कवियत्री - पद्मा गोळे

वाटा

हरवलेल्या वाटा....
चुकलेल्या वाटा....
रुळलेल्या वाटा....
पहिली धरते एक हात;
दुसरी धरते दुसरा;
पाय ओढून तिसरी म्हणते
आता इथेच पसरा !


कवियत्री - पद्मा गोळे

पोपट आणि ड्रायव्हर !

एकदा एक पोपट उडत जात असतांना एक ट्रकला धडकतो आणि बेशुद्ध पडतो.

त्या ट्रक ड्रायव्हरला त्याची दया येते.

तो त्या पोपटाला पकडतो, फार काळजीपूर्वक घरी आणतो व एका पिंजर्‍यात ठेवतो.

ट्रक ड्रायव्हरच्या उपचारांनी पोपटाला शुद्ध येते व स्वत:ला पिंजर्‍यात बघून तो घाबरतो व जोरात ओरडतो," अरे बापरे जेल. तो ट्रक ड्रायव्हर मेला की काय."

चार होत्या पक्षिणी त्या

चार होत्या पक्षिणी त्या रात्र होती वादळी
चार स्वप्ने बांधणारी एक होती साखळी

दोन होत्या त्यात हंसी राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती

शुभ्र पंखांतून त्यांच्या वीज होती साठली
ना कळे एकीस की माझी लियाकत कोठली

तोडुनी आंधी तुफाने चालल्या ती चालली
तीन होत्या दीपमाळा एक होती सावली

तोच आला तीर कोठुन जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली जात माझी कोकिळा

कोकिळेने काय केले? गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले

मी सुरांच्या अत्तराने रात्र सारी शिंपिली
साधनेवर वेदनेवर रागदारी ओतली

ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर्य झाले, त्यात सारे पावले



कवी - कुसुमाग्रज
(वीज म्हणाली धरतीला)

राष्ट्रपिता

एकदा देवाने माधवराव शिंद्यांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" माधवराव शिंदे म्हणाले, "एक". देवाने खूश होऊन त्यांना एक नवीकोरी मर्सिडीझ भेट म्हणून दिली.

नंतर देवाने विलासराव देशमुखांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" विलासराव म्हणाले, "तीन". देव थोडासा नाराज झाला आणि त्याने त्यांना एक होंडा सिटी भेट म्हणून दिली.

त्यानंतर देवाने लालूप्रसाद यादवांना विचारलं, "तुम्हाला मुलं किती?" लालू म्हणाले, "बारा". देव चिडला. त्याने लालूंना एक जुनीपुराणी स्कूटर दिली.

हे तिघे रस्त्यातून जात असताना काही वेळाने त्यांना गांधीजी चालत येताना दिसले. लालूंनी गांधीजींना विचारलं, "काय हो गांधीजी, देवाने तुम्हाला काही दिलं नाही वाटतं?"
गांधीजी म्हणाले, "ते राहू द्या. आधी मला सांगा की देवाला कोणी सांगितलं की मला 'राष्ट्रपिता' म्हणतात?"

हदग्याच्या एखाद्या पावसात

हदग्याच्या एखाद्या पावसात
उलगून जाते विस्मरण
आणि नादावल्या काळाचे अंगण पुन्हा दिसू लागते
पाय नाचू लागतात
जुनी हरवलेली गाणी मिळतात
आभाळाच्या हत्तीभोवती फेर धरण्याइतके
पुन्हा लहान होतो आपण
हातावर टेकवलेली खिरापत, तसे हसावे कुणी
आणि गोड व्हावा सरता दिवस
असे आपसूक मिळतात सुखाचे क्षण
सगळ्या भवतालावरचा बाळविश्वास
नकळत आपल्यात रुजून मोठा झालेला दिसतो पुन्हा
आणि करावासा वाटतो परत एकदा
आभाळाएवढ्या आयुष्याभोवती फेर धरत
आतबाहेर चिंब भिजण्याचा सचैल गुन्हा


कवियत्री - अरुणा ढेरे

आधार

जोवर फुलांच्या बागा फुलताहेत,
पहाडामागे वारा अडत नाही.
शब्दांपोटी सूर्योदयासारखा अर्थ आहे,
फळे नित्यनेमाने पिकत आहेत,
माणसाला उपकार आणि आणि त्याची
निर्व्याज परतफेड करता येत आहे,
एखाद्याची महायात्रा पाहून एखादा
सहजच नमस्कार करतो आहे
तोवर आम्हाला एकमेकांबरोबर
अबोला धरण्याचा अधिकार नाही.
आम्ही आमच्या पडजिभेइतकेच
सर्वार्थांनी एकमेकांचे आहोत.
कालच प्रत्येक क्षण उष्टावतो
तरी काल ताजा टवटवीत आहे.

ईश्वराने दिलेले हे अंग प्रत्येकजण
बारा दिवसाच्या अर्भकाइतक्याच
हळुवारपणे सर्व तर्‍हांनी धूत राहतो,
आपापल्या मापाचे पापपुण्य बेतून
सगळे आयुष्य कारणी लावतो.
म्हणून कधीतरीची प्रसन्नताही
मनाची उन्हे करते आणि सारा ताप
उन्हातला पाऊस होऊन टपटपतो.
धरेच्या पोटात पाणी आहे,
घशाखाली त्याची तहान आहे,
माणसाच्या पोटात आनंद आहे
म्हणूनच नेहमी भूक लागते,
इंद्रियांची वेल पसरत पसरत
झोपेचा गारेगार मोगरा फुलतो.

शेतकरी पिकाला जपत असतो
पहिलटकरणीसारखा, रात्रंदिवस
कायावाचामनाचा पावसाळा करुन
मातीच्या कणाकणातून झिरपतो,
अशा वेळी आकाशाच्या कोनन कोनाचा
स्पर्श त्याला झुळकाझुळकातून होतो,
हवेचेही कोनेकोपरे प्रत्यक्ष चाचपतो.
दाण्यादाण्यातील धारोष्ण दुधाची जाग
पाखरांच्या पिसापिसातून जाते,
थव्याथव्यांनी आनंद उतरतो,
शेतमळा डुलतो, वारा डुलतो,
शेताचा पिका पिका दरवळ
झुळझुळत्या झर्‍यासारखा
शेतकर्‍याच्या मनातून वाहतो,
सुईणीच्या मुखावरील कष्टासारखी
रसरसून लखाखते कोयतीची धार.

जीवनावर प्रेम करणारे सगळे जण
एकमेकांना नमस्कार करीत करीत
सुखदुःख वाटतात जिवाभावाने.
सर्वांना पोटाशी धरुन सर्वांवर
स्वत:च्या आयुष्याची सावली धरतात,
एखादा अनवाणी चालणारा विरक्‍त पाहून
सांगतात : सर्वांच्या पायतळी जमीन आहे.
एखाद्या मेलेल्या मित्राच्या स्मृतीवर
हलकेच कधीतरी अमोल क्षणांचा
एखादा ताटवा वाहून रात्रभर जागतात,
आणि मग कधीतरी झोपेतून उठून
स्वत:वरच आनंदाश्रू ढाळतात,
स्वत:लाच नमस्कार करतात.

सखीने सजणाल्या दिलेल्या गुलाबाच्या
गेंदाप्रमाणे, वचनाप्रमाणे प्रत्येकानेच
कधीतरी मन दिले - घेतलेले असतो;
सखी-सजणाच्या संकेतस्थलासारखेच
हे आयुष्यही एकमेकांचेच आहे.

या जगण्यात खोल बुडी मारुन आलेला
एखादा कोणी सर्वांना पोटाशी धरणारा
आणि ते पोटाशी धरले गेलेले सगळे -
दोघांनाही एकमेकांचाच आधार आहे


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें
रमेश : माझ्या प्रेयसीने अशी मागणी केली ज्यामुळे मी तिला सोडून दिले .
दिनेश : पण तिची मागणी तरी काय होती ?
.
.
.
... .
.
.
.
.

रमेश : लग्नाची !

निरोप

बाबा रे,

निरोपाचा सोहळा करण्याइतके
जवळ काही उरले तरी आहे का ?

कबूल की दिल्याघेतल्या गोष्टींना
मनाचा वास होता एकेकाळी धुंद
पण आता चिमूटभर कोरडी मातीच ना नुसती ?
एक फोन उचलला तरी मधल्या अंतरातून
तारेवर सरसरतेय निर्जन वाळवंटच लांबलचक किती !

असं बघ
ही माती आणि ही वाळूदेखील
ओली असती पुरेशी
तर पेरली असती रोपे हिरवी
उद्या घमघमतील अशी
निदान नुसतीच रंग उधळणारी, जशी गुलबशी

ते वृक्षारोपण आणि एखादे स्वप्नभरले नाजूक भाषण
एकमेकांसाठी एवढे तरी केलेच असते आपण.

म्हणून म्हणते,
हट्ट नको बाबा रे
आंदोळून गेले एकवार सुखाचे वारे
तथास्तु म्हण, एवढेच पुरे.


कवियत्री - अरूणा ढेरे

सकाळी उजाडता उजाडता

सकाळी उजाडता उजाडता उठले, पाहिलं
..... आणि कमालच!
एक वीट निखळलेली.
मी उचलून लावली ती जिथल्या तिथे.
पुन्हा चार दिवसांनी
पूर्वा लाल व्हायच्या आधीच उठले, पाहिलं,
तर अर्ध्याअधिक विटा उचकटून फेकलेल्या !
पुन्हा माझी कारागिरी!
पुन्हा काही दिवसांनी
मध्यरात्रीच जाग आली, पाहिलं :
थडगं पूर्ण उस्कटलेलं !
आणि उघडलेल्या शवपेटीत
मन चक्क डोळे चोळीत
उठून बसलेलं!
तसं रडतच होतं म्हणा. पण जिवंत?
अकल्पनीय!
म्हणजे थडगं बांधूनही मन...
याला निलाजरं म्हणायचं की असहाय्य !


कवयित्री - पद्मा गोळे

फुकटात केस कापुन

एक माणुस मुलाला घेऊन सलुन मध्ये गेला. स्वता:चे केस कापुन घेतल्यावर तो दुकानदाराला म्हणाला, "मी पंधरा मिनटात येतो. तो पर्यंत याचे केस मस्त कापुन ठेव."

दुकानदाराने मुलाचे केस कापुन ठेवले. दोन तास झाले तरी तो माणुस परत आला नाही. दुकानदार त्या मुलाला म्हणाला, "अरे बाळा, तुझ्या बरोबर जे गृहस्थ होते ते कुठे गेले? कोण होते ते तुझे ?"

मुलगा म्हणाला, "मला ते कुठे गेले हे माहीत नाही, आणि ते कोण होते हे सुद्धा माहित नाही. मला ते म्हणाला, चल तुला फुकटात केस कापुन देतो. बाकी मला काही माहित नाही."

CCTV चा फायदा

पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले...
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल रूमला आलेला पहिला फोन..:

.
.
.
.
"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना,
चितळे उघडले आहेत का...?"

निसर्ग

प्रेमळ पवित्र करी तुझा स्पर्श !

हास हास बाई कलिके एकदा

आपुल्या सुगंधा सोड सोड

लडिवाळपणे केल्या गुदगुल्या

परी काही केल्या हासेना ती

तिला फुलवाया हवा रविकर

वायूची लहर खेळकर

व्यर्थ हे करिती गाण्याचा आग्रह

नाही अनुग्रह देवा, तुझा

प्रेमळ पवित्र करी तुझा स्पर्श

गाईन सहर्ष वाडेकोडे


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

अजुनी चालतोचि वाट

अजुनी चालतोचि वाट! माळ हा सरेना
विश्रांतिस्थल केव्हा यायचे कळेना!

त्राण न देहात लेश, पाय टाकवेना,
गरगर शिर फिरत अजि होय पुरी दैना!

सुखकर संदेश अमित पोचविले कोणा,
भार वाहुनी परार्थ जाहलो दिवाणा!

काट्य़ांवरी घातलाची जीव तयासाठी,
हसवाया या केली किती आटाआटी!

हेच खास माझे घर म्हणुनी शीण केला,
उमगुनी मग चूक किती अश्रुसेक झाला;

दिन गेले, मास तसे वत्सरेही गेली,
निकट वाटते जीवनसंध्या ही आली!

कुठुनी निघालो, कोठे जायचे न ठावे,
मार्गातच काय सकळ आयु सरुनि जावे!

काय निरुद्देश सर्व जीवन मम होते
मरुसरितेपरी अवचित झरुनि जायचे ते?

पुरे! पुरे ही असली मुशाफरी आता,
या धुळीत दगडावर टेकलाच माथा


कवी - ए.पां.रेंदाळकर

दत्ताचा पाळणा

जो जो जो जो रे सुकुमारा । दत्तात्रया अवतारा ॥धृ॥

कमलासन विष्णू त्रिपुरारी । अत्रिमुनीचे घरी ।

सत्त्व हरु आले नवल परी । भ्रम दवडिला दुरी ॥१॥

प्रसन्न त्रिमूर्ति होऊनी । पुत्रत्वा पावुनि ।

हर्ष झालासे त्रिभुवनी । राहे ॠषिचे सदनी ॥२॥

पालख बांधविला सायासी । निर्गुण ऋषिचे वंशी ।

पुत्र जन्माला अविनाशी । अनसूयेचे कुशी ॥३॥

षट्दश नामासी आधार । दत्तात्रय अवतार ।

कृष्णदासासी सुख थोर । आनंद होतो फार ॥४॥

आनंदलोक

माझ्या आनंदलोकात
चंद्र मावळत नाही
दर्या अथांग प्रेमाचा
कधी वादळत नाही

माझ्या आनंदलोकात
केले वसंताने घर
आंब्या-आंब्याच्या फांदीला
फुटे कोकिळेचा स्वर

सात रंगांची मैफल
वाहे येथे हवेतून
येथे मरणही नाचे
मोरपिसारा होऊन.


कवी - कुसुमाग्रज

कोकिळा

कोकिळा जेव्हा सुरांचा
फ़ुलविते पंखा निळा
आम्र लेउनी पंख तेव्हा
होउ बघतो कोकिळा

कोकिळा जेव्हा स्वरांची
उघडिते अबदागिरी
जंगले शाहीर होती
शब्द होते मंजिरी

कोकिळा जेव्हा स्वरांची
काश्मिरे करते उभी
हो नदीची नृत्यशाला
रुमझुमे वारा नभी

कोकिळा जेव्हा स्वरांची
माळते सुमनावली
तेधवा वणवा म्हणे मी
चंदनाची सावली

कोकिळा घाली स्वरांचा
मोरपंखी फ़ुल्वरा
जांभळ्या डोही झपूर्झा
खेळती त्या आसरा

कोकिळा जेव्हा ढगांना
आर्ततेने बाहते
धूसरावर स्वप्न त्यांच्या
एक सुंदर वाहते

कोकिळा जेव्हा सुरांचे
गेंद गगनी फ़ेकते
अंचलावर पैठणीच्या
रात्र अत्तर ओतते

कोकिळा स्वरशिल्प असले
बांधता शून्यावरी
आसमंते होत सारी
क्षुब्ध आणिक बावरी

कोकिळा शिशिरात शिरुनी
बर्फ़ जेव्हा होतसे
या जगाला सर्व तेव्हा
जाग थोडी येतसे


कवी - कुसुमाग्रज

एकाकी

’तुझा’ आणि ’तुझ्यासाठी’
शब्द सारे खोटे,
खरी फ़क्त क्वचित कधी
बिलगणारी बोटे
बिलगणारी बोटे तीही
बिलगून सुद्धा दूर
खोल खोल भुयारात
कण्हणारे सूर.
दूरदूरच्या ओसाडीत
भटकणारे पाय
त्वचेमागील एकाकीपण
कधी सरते काय?


कवियत्री - शांता शेळके

पालखीचे भोई

पालखीचे भोई आम्ही पालखीचे भोई
पालखीत कोण? आम्हां पुसायाचे नाही!

घराण्याची रीत जुनी पीढीजात धंदा
पोटाबरोबर जगी जन्मा आला खांदा
खांद्याकडे बघूनीच सोयरीक होई ॥

काटंकुटं किडकाची लागे कधी वाट
कधी उतरण, कधी चढणीचा घाट
तरी पाय चालतात, कुरकुर नाही ॥

वाहणारा आला तेव्हा बसणारा आला
मागणारा आला तेव्हा देणाराही आला
देणाऱ्याचं ओझं काय न्यावयाचं नाही? ॥

बायलीचा पडे कधी खांद्यावरती हातं
कडे घेतलेलं पोर तिथं झोपी जातं
पालखीचा दांडा मग लई जड होई ॥


कवि - शंकर वैद्य
कवितासंग्रह - दर्शन

ती माणसेच होती..!

ती माणसेच होती..!
देहाविना जळाली..ती माणसेच होती..
पुन्हा फुलून आली..ती माणसेच होती..!!

गोळी समोर छाती देण्यात अर्थ नाही --'
...हे सांगुनी पळाली..ती माणसेच होती..!!

फासावरी खुन्यांना देवू नका परन्तू--
ज्यांची शिकार झाली..ती माणसेच होती..!!

माझा तुझ्या लढ्याशी संबंध काय येतो ?
...ऐसे मला म्हणाली..ती माणसेच होती..!!

चवचाल उंदरांना साऱ्या बिळात जागा..
जी पोरकी निघाली..ती माणसेच होती..!!

घनदाट पावसाचे केले तुफान वादे..
..अन कोरडी निघाली..ती माणसेच होती..!!

आता कुणाकुणाचे मांडू हिशेब बोला..?
जी आरशास भ्याली..ती माणसेच होती..!!
                                             

कवी - ज्ञानेश वाकुडकर

हा असा पाउस पडत असताना

हा असा पाउस पडत असताना
तुमच्यासारख्या अनोळखी तरूणीला विश्वासानं माझ्या छत्रीत यावंस वाटलं…. याचं बरं वाटलं..!!
ह्या अशा पावसाच्या वेळी कुणीतरी बरोबर हवंच…!

छत्री तशी छोटीच आहे, पण घेईल सामावून दोघांना..
समजूतीने चाललो तर…!
पुढं पाणी बरंच साचलेलं आहे, रस्ता चाचपीतच पावलं टाकायला हवीत.

शक्य असेल तर माझ्या हाताचा…
अं…खांद्याचा आधार घ्या,
म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर नीट चालत रहाल… न पडता.
शिवाय तुम्हाला पाहीजे तितकं तुम्ही मला दूरही ठेवू शकाल.

मी तुमच्याकडे न पाहताच चाललो आहे खरा…
पण मला कुठूनतरी केवड्याचा वास येतो आहे.
अं.. तुमचं नांव ‘केतकी’च आहे, असं मी धरून चाललो आहे.

तुमच्या बोटांतली अंगठी कळत्येय माझ्या खांद्याला;
लक्शं कसं सारखं तिथेच घोटाळतंय…

अरे..!
तुमच्या पोहचण्याचं ठिकाण तर मागेच गेलं.. तुम्ही बोलल्या कशा नाहीत?
अं…माझं काय..?!
अमूक एका ठिकाणी पोहचण्याचा उद्देश नव्हताच माझा.

पावसाचा जोर एकदम वाढलाय म्हणून तुमच्या हाताची पकड घट्ट झाल्यासारखी वाटत्येय.
पण घाबरू नका.. पुढचा रस्ता चांगला आहे!

एक पाहिलंत का?
तुम्ही अगदी नीट चालल्या आहात… माझ्याबरोबर..!
त्यामुळे….छत्री किती मोठी झाल्यासारखी वाटत्येय… नाही का..?!!


कवि - शंकर वैद्य
कवितासंग्रह - दर्शन

शेवटचे पान

आवर पद हे मत्त प्रवासी,

पहा जरा परतून प्रवासी, पहा जरा परतून्

घेत सुगंधाचा मागोसा

अलीपरी आलास विलासा

आणि फुलोरा लुटून जासी नव वेलीवरतून्

प्रवासी, पहा जरा परतून्

कलेकलेने चान्द खरोनी

आवस आली माझ्या गगनी

तोच उदेले दोन सुधाकर सुन्दर नयनातून्

प्रवासी, पहा जर परतून्

आणि चान्दणे सवे घेउनी

दुणावुनी तम जासी निघुनी

कशी साहुं रे धुन्द रात ही बाहेरून आतून्

प्रवासी, पहा जरा परतून्

क्षणभर येउन क्षणभर राहुन

क्षणभर हांसुन क्षणभर पाहुन

क्षणात जासी चार युगांचा घाव उरी घालून

प्रवासी, पहा जरा परतून्

वाळवण्टि तू एक पदाती

ना कुणि सोबत ना साङ्गाती

पायतळी पेटेल आग उद्दाम शिरावर ऊन्

प्रवासी, पहा जरा परतून्

परत पाखरा, खन्त कशाला

घालिन तनुची तुला दुशाला

उन्नत माझे ऊर उशाला घोष तुझा ज्यांतून्

प्रवासी, पहा जरा परतून्

जाणारच का-सुखात जा तर

बाग मोहरो तव वाटेवर

माग घेत तव चंद्र पुनेचा येवो गगनातून्

प्रवासी, पहा जरा परतून्

शेवटले जा पान मिटू दे

सुखेनैव यापुढे तुटू दे-

ह्रदयाचे रेशीम पदी तव बसलेले गुंतून

प्रवासी, पहा जरा परतून्


कवी - कुसुमाग्रज
ठिकाण - पुणे
सन - १९३८

प्रेमयोग

प्रेम कुणावरं करावं?....कुणावरही करावं
राधेच्या वत्सल स्तनावर करावं
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं
भीष्मद्रोणाच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं
दुर्योधन कर्णाच्या अभिमानी,अपराजित मरणांवर करावं
प्रेम कुणावरही करावं.....
सुदामा नावाच्या भटजीवर करावं
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं
बासरीतुन पाझरनार्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं
यमुनेचा डोह जहरुन टाकणार्या कालियाच्या फण्यावर करावं
प्रेम कुणावरही करावं
रुक्मीनिच्या लालस ऒठावरं करावं
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं
मोराच्या पिसार्यातील अद्भुत लावण्यावर करावं
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं
आणी
खङगाच्या पात्यावर कराव
प्रेम कुणावरही करावं
प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं
पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं
यशोदेच्या दुधावर....देवकीच्या आसवांवर करावं
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नागराच्या फाळावर करावं
कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावरं करावं
ज्याला तारायचं...त्याच्यावर तर करावंच ,
पण ज्याला मारायचं,त्याच्यावरही करावं
प्रेम कुणावरही करावं
प्रेम योगावर कराव..प्रेम भोगावर करावं
आणी त्याहुन अधिक त्यागावर करावं
प्रेम चारी पुरुषा्रथाची झींग देणा्रया जीवनाच्या द्रवावर करावं
आणी पारध्याच्या बाणांनी घायाळ होवुन
अरण्यात एकाकी पडणार्या स्वताच्या शवांवरही करावं
प्रेम कुणावरही करावं कारण,
प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणी...
भविष्यकाळातील त्याच्या अभ्युदयाची आशा ऎकमेव..............


कवी - कुसुमाग्रज
देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ऋण । आहे ते कां नेदिसी अझून ।

अवगलासी झोडपणें । परि मी जाण जीवें जिरों नेदी ॥१॥

कळों येईल रोकडें । उभा करीन संतांपुढें ।

तुझें काय एवढें भय आपुलें मागतां ॥२॥

आजीवरी होतों नेणता । तों तुज फावलें रे अनंता ।

कवडीचा तों आतां । पडों नेदीन फेर ॥३॥

ठेविला ये जीवनीं जीव । म्हणे तुकयाचा बांधव ।

माझा गळा तुझा पाव । एके ठायी बांधेन ॥४॥


- संत कान्होबा महाराज
भवजळ काया पंचतत्त्वमाया । भजन उभया पंढरीरावो ॥ १ ॥

तारक पंढरी प्रत्यक्ष भीमातीरीं । ब्रीदें चराचरीं बोले वेदु ॥ २ ॥

माया मोहजाळ ममता निखळ । सेवितां सकळ होय हरी ॥ ३ ॥

निवृत्तीचें फळ सकळ हा गोपाळ । तोडी मायाजाळ संकीर्तने ॥ ४ ॥


- संत निवृत्तीनाथ
चोखा चोखट निर्मळ । तया अंगी नाही मळ ॥१॥

चोखा सुखाचा सागर । चोखा भक्तिचा आगर ॥२॥

चोखा प्रेमाची माउली । चोखा कृपेची साउली ॥३॥

चोखा मनाचें मोहन । वंका घाली लोटांगण ॥४॥


- संत वंका/ संत बंका
सर्व हा गोपाळ भरियेला.
काढले कुटाळ वासना वरळ ।
सर्व हा गोपाळ भरियेला ।।१।।

गेले पै परते शरीर दिसे ।
नाशिवंत भूते दूरी केली ।।२।।

स्थावर जंगम स्थावरिला राम ।
सर्वगत शाम नि:संदेहे ।।३।।

सोपान निवटे परब्रह्म घोटे ।
प्रपंच सपाट निवाटियेला ।।४।।


- संत सोपानदेव

वासुदेव

टळोनि गेले प्रहर तीन । काय निजतां झांकोन लोचन ।
आलों मागावया दान । नका विन्मुख होऊं जाण गा ॥ १ ॥

रामकृष्ण वासुदेवा । जाणवितों सकल जिवा ।
द्या मज दान वासुदेवा । मागुता फेरा नाहीं या गांवा गा ॥ २ ॥

आलों दुरुनी सायास । द्याल दान मागायास ।
नका करूं माझी निरास । धर्मसार फळ संसारास गा ॥ ३ ॥

एक भाव देवाकारणें । फारसें नलगे देणें घेणें ।
करा एकचित्त रिघा शरण । हेंचि मागणें तुम्हांकारणें गा ॥ ४ ॥

नका पाहूं काळ वेळां । दान देई वासुदेवा ।
व्हां सावध झोपेला । सेना न्हावी चरणीं लागला गा ॥ ५ ॥




- संत सेनान्हावी
संपवून कामधाम यावें तुझियाजवळ

पापणीशीं झेपलेंलें जरा सारावें जावळ

आवराया बाळचाळे कवळावें दोही हातीं

रागारागावत गाल कुस्करावे भुक्या ओठीं

घ्यावें बळेंच कुशींत गात अंगाई लाडकी

काऊ चिऊंची धाडावी हट्टी झोपेला पालखी !

गंध पाकळींत रात सांजावल्या क्षितिजांत

तशी यावी नीज डोळां रेशमाच्या पावलांत

जड मिटतां पापणी घ्यावें ओढून उबेंत

मायकुशीला लाभावें शिंपपण भाग्यवंत !

मंगलाष्टक

दारी मंडप हा असे सजविला लावुनिया तोरणे
वाद्ये सुस्वर वाजती सुखवती आलाप आवर्तने
येती सर्व सुवासिनी प्रमुदिता लेउनिया भूषणे
आहे मंगल कार्य आज सदनी, "कुर्यात सदा मंगलम

कुणी टाकला डाका

कुणी टाकला डाका तर कोणी लुटलेले आहे
ह्या शहराचे शटर सारखे उचकटलेले आहे

नव्यानवेल्या विवाहितेचे कुंकू पुसल्यावाणी
कुणीतरी ह्या तिन्हिसांजेला विस्कटलेले आहे

इथे कुणीही कुरूप नाही वेडेविद्रे नाही
हे जग कसल्या सुंदरतेने बरबटलेले आहे

काय तुझ्याही दारी आला तो फिरता विक्रेता
शर्टापेक्षा कपाळ ज्याचे कळकटलेले आहे

नवीन दुनिया सापडेल पण सवाल इतका आहे
काय तुझे तारू तितकेसे भरकटलेले आहे

कुठे न माझा मागमूस मी कसा पोचलो इथवर
मला कोणत्या जनावराने फरफटलेले आहे


कवी - चित्तरंजन भट

दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?

दुःखाने कुठल्या समुद्र इतका हेलावतो सारखा ?
अश्रू का इतके पितो, खवळतो, खारावतो सारखा?

केव्हाचा खटल्यापरी गुदरतो आहेस तू जीवना ?
फिर्याद्यासम श्वासश्वास फिरतो, ठोठावतो सारखा

नाही ह्या दुनियेत मित्र अथवा वैरी मनासारखा
कोणी निर्दय एवढा न जपतो, जोजावतो सारखा

रक्ताने अमुच्या भिजून क्षितिजे तेजाळली येथली !
दर्पाने कसल्या प्रकाश इथला घोंघावतो सारखा ?

आभाळा, चमकून का निरखतो आहेस बाबा मला?
माझी झेप स्मरून मीच अजुनी भांबावतो सारखा !

भेटावा चकवा तसे दिवसही येतात भेटायला
आहे त्याच स्थळी अजून दुनिया, मी धावतो सारखा

"ये मागे परतून, खेळ अपुला मांडू नव्याने पुन्हा,"
माझ्यातील कुणी निरागस मला बोलावतो सारखा


कवी - चित्तरंजन भट

कोणत्या चिमटीत मी त्याला धरू ?

कोणत्या चिमटीत मी त्याला धरू ?
हिंडते मेंदूत जे फुलपाखरू

तू अता बघशील वाताहत खरी
लागले पाणी पुराचे ओसरू

गायही तेव्हाच पान्हा सोडते
लागते जेव्हा लुचाया वासरू

पटवती साऱ्या पुरातन ओळखी
कुठुन हे आले नवे माथेफिरू ?

खुळखुळाया लागले अश्रू किती !
केवढे लिहितोस तू गल्लाभरू

साठवू इतके सुगंधी सल कुठे ?
आठवू कोणास, कोणा विस्मरू ?

खूप नक्षीदार आहे शाल पण
एकमेकांनाच आता पांघरू

आपल्या दोघांमधे कोणी नको
ये मिठी नेसू, तिची वस्त्रे करू

पापण्यांनी चित्र आहे रेखले
रंग कुठले सांग ओठांनी भरू ?

ओठ, डोळे, केस, बाहू, हनुवटी
(हे करू की ते करू की ते करू)


कवी - चित्तरंजन भट

आनंदाने

हसता-हसता सरून जावे आनंदाने
मागे केवळ उरून जावे आनंदाने

डोळ्यांमधले सर्व चेहरे जिवंत व्हावे
अकस्मात घर भरून जावे आनंदाने

जिथे जिथे जाशील तू तुझ्या मागेमागे
बोट सुखाचे धरून जावे आनंदाने

पुन्हा मनाने अवखळ पोरासमान व्हावे
घरात यावे, घरून जावे आनंदाने

घरास जेव्हा पाय लावणे अशक्य व्हावे
नुसते दारावरून जावे आनंदाने

मिळालीच तर अशी देखणी व्यथा मिळावी
जिला पाहुनी झुरून जावे आनंदाने

सल कुठलाही जपून कोणा स्मरण्यापेक्षा
हेच बरे विस्मरून जावे आनंदाने

दोन घडींच्या भेटीसाठी यावे आणिक
जन्मासाठी ठरून जावे आनंदाने

जाण्याची घटका आली की अवतीभवती
जिवलग गोळा करून जावे आनंदाने


कवी - चित्तरंजन भट

शिल्प

जे सांगायचे
ते हवे कसे अगदी घट्ट
बांधेसूद्;
प्रत्येक शब्दाला एक प्रतिशब्द,
खुंट्या पिरगाळून
जागच्या जागी सुतंत्र
टांगलेला;
एकंदर ठाण कसे अगदी
वास्तुशिल्पित.
पण मध्येच
जे मधाचे पक्षी येऊन हलकारतात,
सळंग एखाद्या झाडाची सतारलेली
नक्षी वेल्हाळते,
वार्‍याची पताका चित्रावते,
त्याने सगळी आबोहवा वेगळून जाते
- मनासारखी.
शब्दांना
पटत नाही आपली पहिली ओळख.
ते बिथरतात
भलत्याच खुंट्या धरून बसतात्;
म्हणतात :
आम्हाला एक नवी भाषा
घालून द्या.
मी म्हणतो : हो, हो;
उगाच त्यांना चुचकारीत.


कवी -  पु.शि.रेगे

केव्हातरी मिटण्यासाठीच

केव्हातरी मिटण्यासाठीच
काळजामधला श्वास असतो
वाट केव्हा वैरीण झाली
तरी झाडे प्रेमळ होती
लाल जांभळे भेटून गेली
साथीत उरली निळी नाती
काळोखाच्या गुहेतदेखील
धडपडणारे किरण होते
पेटविलेल्या दीपालींना
वादळवारयात मरण होते
असणे आता असत असत
नसण्यापाशी अडले आहे
जिव्हाळ्याच्या चिता पेटवीत
बरेच चालणे घडले आहे
माथ्यावरचा आभाळबाबा
सवाल आता पुसत नाही
पृथ्वी झाली पावलापुरती
अल्याड पल्याड दिसत नाही


कवी - कुसुमाग्रज

आधार

चिंब चिंब भिजतो आहे
भिजता भिजता मातीमध्ये
पुन्हा एकदा रुजतो आहे
हिरवे कोवळे कोंब माती
माझ्या भोवती बांधते आहे
सरते पाश विरते नाते….
पुन्हा एकदा सांधते आहे

अहो माझे तारणहार
जांभळे मेघ धुवांधार
तेवढा पाऊस माघार घ्या
आकाशातल्या प्रवासाला
आता तरी आधार द्या
आधार म्हणजे
निराधार…



कवि -  कुसुमाग्रज
कवितासंग्रह - छंदोमयी

जखमांचं देणं

आकाशपण
हटता हटत नाही
मातीपण
मिटता मिटत नाही
आकाश मातीच्या
या संघर्षात
माझ्या जखमांचं देणं
फिटता फिटत नाही.



कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - छंदोमयी

सातवा

चमच्यांच्या स्टँडवर

सात चमचे होते

एक चमचा एक दिवशी

गहाळ झाला

उरलेल्या सहांच्या गळ्यातून

प्रथमच

अनावर हुंदका फुटला

‘ ती असती तर’ – ते उद्गारले,

तो हरवला नसता

मीही अनावरपणे

सातवा चमचा झालो

आणि त्याची रिकामी जागा घेउन

सहांच्या हुंदक्यात

सामील झालो – आणि

पुटपुटलो;

खरं आहे, मित्रांनो

ती असती तर

मी हरवलो नसतो.


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन

जोगीण

साद घालशील
तेव्हाच येईन
जितकं मागशील
तितकच देईन

दिल्यानंतर
देहावेगळ्या
सावलीसारखी
निघून जाईन.

तुझा मुगुट
मागणार नाही
सभेत नातं
सांगणार नाही

माझ्यामधल्या
तुझेपणात
जोगीण बनून
जगत राहीन.


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - छंदोमयी

वास्तव

परवाच्या पेपरात एक बातमी वाचली
बातमी:
कालच्या पावसात
झोपडपट्टीतील एक मूल
वाहून गेले ,
बुडून मेले.

बुडाले तर बुडू द्या
मूल बुडाले म्हणजे काही पाच तारयांचे ताजमहाल
किंवा ब्रेबोर्न स्टेडिअम नाही बुडाले

झोपडपट्टीतील एका उघड्या-नागड्या मूलाचे
असे मूल्य ते किती?
साधे गणित येत असेल तर करता येईल हिशेब
उत्तर अर्थात पैशातच
आणि हे मत तुमचे किंवा माझेच आहे असे नाही
त्याच्या आईचेही तेच असावे

कारण मुलाचे कलेवर मांडीवर घेउन
ती फोडीत बसली असता एक कर्कश हंबरडा
एक वार्ता वस्तीवर येऊन कोसळली.
यावेळी मात्र करुणामय मेघासारखी

वार्ता:
नाक्यावरचा गुदामवाला व्यापारी
कुजलेल्या धान्याची पोती
ओतीत सुटला आहे उकिरड्यावर

बाईने आपला हंबरडा घशातच आवरला अर्ध्यावर
मूलाचे कलेवर जमिनीवर टाकून ती उठली
आणी घरातल्या सगळ्या पिशव्या गोळा करुन
बेफाम धावत सुटली
उकिरड्याकडे वाहणारया यात्रेत सामील होण्यासाठी.


कवी - कुसूमाग्रज

शिळा

भावनांची कोवळीक
आज गोठुनिया गेली
माझ्या हृदयात तिची
थंडगार शिळा झाली

अंतरीचा घनश्याम
बसून त्या शिळेवरी
वाजवितो कधी कधी
जुन्या स्मृतींची बासरी

ऐकूनही संगीत ते
शिळा निश्चल राहते
शून्य दगडी डोळ्यांनी
संथ सभोती पाहते!


कवियत्री - शांता शेळके
सेवेकरी मुद्रा असों नये बाशी
पहाटेस नेमें कातरावी मिशी

फाइलीची फीत रक्ताहून लाल
बाइलेची प्रीत सेकंदांशीं तोल

नको उमटाया स्तनावर वळ
सलामांचे हात असावे निर्मळ

कानाच्या भोकाशीं फक्त लाव फोन
इमानी ठेवावी धडावर मान

अश्रूंनाही म्हण वाळणार घाम
घाल आंतडीचा उरास लगाम

हृदयास म्हण हालणारा पंप
लाळेच्या तारेशी सदा असो कंप

गळ्यांतली वांती गळ्यांत ठेवून
पिंकदाणीतले शब्द घे वेचून

थोरांनी टाकिल्या श्वासां लाव नाक
कण्यासही हवे किंचीतसे पोक

सहीस जाताना मालवावी छाती
भ्रांतींत ठेवाव्या डोळ्यांतल्या वाती

नको पाहूं दूर भ्रमातला प्रांत
तुझ्या पायांसाठी कचेरीची वाट


कवी - आरती प्रभू
- ०७ - ०६ - ६० 

तेव्हा

पहाटेच्या काळोखी फांद्यातून
अवेळी जागलेल्या कोणाएका
कोकिळेने
भ्रमिष्टपणे
दिली भिरकावून आकाशावर
कोठल्या स्वप्नाच्या स्पंजात रुतणारी
चौधारी
पल्लेदार स्वरावळ
नंतर सारं स्तब्ध….
संगमरवरी स्तंभाला टेकून
उभी राहिलेली व्याधाची चांदणी
किंचित हसली,
आणि रुपेरी वस्त्राचे हेम
अलगद उचलून
उतरायला लागली पहिली पायरी
क्षितिजाच्या तळाकडे…..
तेव्हा चारही वाजले नव्हते


कवी -  कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन

प्रवास

क्षितीजाचे तट फोडून धावे
अश्व सनातन मार्गावरती.
पायतळी चुरल्या काळाचा
चुरा पथावर उडतो भवती.

रवी-शशीचे परजीत पलिते
स्वार तयावर बसला आहे.
अश्व न जाणे स्वार न जाणे
प्रवास कुठला कसला आहे

कवी - कुसुमाग्रज

न्याय जिवंत झाला! (१९४१)

"मग तू देतोस की नाही तुझे शेत? मी म्हणून तुला इतकी किंमत देत आहे. अरे, आजूबाजूला आता सगळीकडे माझी जमीन! मध्ये तुझेच हे शेत आडवे येते. मी सांगतो ऐक. आढेवेढे नको घेऊस!" केशवचंद्र म्हणाले.
"माझी जमीन विकणार नाही. गावातली सगळी जमीन तुम्ही या ना त्या मार्गाने आपलीशी केलीत. आता माझ्या या सोन्यावाणी तुकड्यावरही तुमची गिधाडी दृष्टी आली. राग नका मानू दादा; परंतु खरे ते मी सांगतो. वाडवडिलांपासून चालत आलेली ही जमीन. ही का मी विकू? जमीन म्हणजे आई. आईला का कोणी विकतो? राहू द्या एवढी जमीन. पोटापुरे ती देते. मुलेबाळे तेथे येतात, खपतात, खेळतात. सत्तेची जमीन सोडू नये, दादा!" भीमा म्हणाला.
"भीमा, जमीन नाही ना देत?"
"कशी द्यायची?"
"द्यायची की नाही ते सांग!"
"नाही, त्रिवार नाही!"
"याद राख! तुझी ही मगरूर वृत्ती तुला मातीत मिळवल्याशिवाय राहणार नाही. माझी गिधाडी दृष्टी तुला भिकेला लावल्याशिवाय राहणार नाही!"
"देव काही मेला नाही, केशवबाबा!"
"जेथे सत्ता नि संपत्ती असते तेथे देव असतो, समजलास! देव माझ्या तिजोरीत आहे!"
"माझा देव सर्व जग व्यापून राहिलेला आहे!"
"बघतो तुला वाचवायला कोण देव येतो ते! हे तुझे शेत गेले समज आणि तुला पैही न मिळता. आज मी तुला तू मागशील ती किंमत द्यायला तयार झालो होतो; परंतु तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तू तरी काय करशील? ठीक तर!" असे धमकीचे भाषण करून केशवचंद्र निघून गेले.
शेतातील विहिरीच्या काठी भीमा बसला होता. त्याचे ते लहानसे शेत; परंतु खरेच सोने पिकवी. भीमाच्या वाडवडिलांच्या हातची तेथे झाडे होती. त्यानेही दोन-चार कलमे लावली होती. विहिरीच्या कडेला फुलझाडे होती. पलीकडे त्याचा लहानसा गोठा होता. भीमाचा शब्द ऐकताच गोठ्यातील गाय हंबरायची. खरोखरच त्या शेतावर भीमाचे जीव की प्राण प्रेम होते. ते विकणे त्याच्या जिवावर येत होते. केशवचंद्रांनी गावातील जवळजवळ सारी जमीन गिळंकृत केली होती. सावकारी पाशात सारे शेतकरी सापडले. पाचाचे दहा झाले, दहाचे शंभर झाले आणि मग ते देणे कधी फिटायचे? शेताचे मूळचे मालक मजूर झाले. अजून हा भीमाच काय तो तेथे स्वाभिमानाने आपल्या शेताचा मालक म्हणून नांदत होता. केशवचंद्रांना ते सहन होत नव्हते. गोडीगुलाबीने भीमा शेत विकतो का ते ते बघत होते; परंतु काही केल्या जमेना. आज सकाळी ती शेवटची बाचाबाची झाली. सावकार का ही जमीन लाटणार? या जमिनीचा मी मालक. उद्या मला येथे मजूर म्हणून का कामासाठी यावे लागेल? भीमा विहिरीच्या काठी बसून विचार करीत होता. त्याचे तोंड चिंतेने जरा काळवंडले.
इतक्यात त्याची वडील मुलगी भीमी लहान भावंडाला घेऊन आली.
"बाबा, आईने घरी बोलावले आहे." ती म्हणाली.
"कशाला ग, पोरी?"
"सावकार आला आहे घरी."
"काय म्हणतो तो?"
"आईला म्हणाला, 'हजार रुपये घ्या व शेत द्या!' आणि मला म्हणाला, 'तुझ्या बापाला काही कळत नाही.' बाबा, शेत का तुम्ही विकणार?"
"प्राण गेला तरी विकणार नाही. तुझी आई काय म्हणाली?"
"ती म्हणाली, 'त्यांना विचारा.' आणखी आई त्यांना म्हणाली, 'पैसे काय, आज आहेत उद्या नाहीत, जमीन कायमची सत्तेची. ती विकून कुठे जायचे?' "
"शहाणी आहे तुझी आई!"
भीमा मुलीबरोबर घरी आला. सावकार निघून गेला होता. बायकोने सारी बोलणी भीमाच्या कानावर घातली.
"साप आहे तो मेला! तो आपला सत्यानाश केल्यावाचून राहणार नाही!" तो म्हणाला.
"गावातील सारे शेतमालक मजूर झाले. त्यांच्या बाबतीत देव मेला, तसा आपल्या बाबतीतही मरायचा!"
"त्यांनी हिंमत सोडली म्हणून त्यांचा देव मेला! जो सत्यासाठी उभा राहतो त्याचा देव मरत नाही. समजलीस?"
काही दिवस गेले. केशवचंद्राने न्यायालयात फिर्याद केली. भीमाकडे असलेली जमीन वास्तविक आपली आहे. जुने कागदपत्र सापडले आहेत त्यावरून हे सिद्ध होत आहे, वगैरे त्याचे म्हणणे. न्यायाधीश केशवचंद्रांच्या मुठीतले. पैशाने कोण वश होत नाही! भीमाला न्यायालयात बोलावण्यात आले. केशवचंद्राने म्हातारे शेतकरी पैशाने विकत घेऊन साक्षीदार म्हणून आणले होते. त्याने आपली बाजू मांडण्यासाठी कायदेपंडितही आणला होता. भीमाची बाजू कोण मांडणार? तो न्यायाधीशास एवढेच म्हणाला,
"महाराज, देवाधर्माला स्मरून मी सांगतो की ही माझी जमीन आहे. वाडवडिलांपासून ही चालत आली आहे. सावकाराला बघवत नाही. हजार रुपये द्यायला तयार झाला होता..."
"हजार रुपये? थापा मार! त्या तुकड्याचे का कोणी हजार रुपये देईल?"
"देवाला माहीत आहे!"
"देव दूर आहे आभाळात. येथे तुम्ही आम्ही आहोत. कागदपत्रं काय सांगतात? हे म्हातारे शेतकरी साक्षीदार का खोटे सांगतात?" वकील म्हणाला.
न्यायाधीशाने भीमाची मालकी काढून घेतली. केशवचंद्राचीच जमीन आहे, असा त्याने निर्णय दिला. भीमा बाहेर येऊन आकाशाकडे हात करून म्हणाला,
"तुझ्या जगात देवा, का न्याय नाही?"
"न्याय आमच्या हातात असतो, भीमा. देवबीव सत्तेजवळ असतो, संपत्तीजवळ असतो." वकील कुऱ्याने म्हणाला.
भीमा दु:खाने घरी गेला. तो कपाळाला हात लावून बसला.
"काय लागला निकाल?" बायकोने विचारले.
"आपण चोर ठरलो नि चोर मालक ठरला. आपण उद्यापासून मजूर झालो." तो दु:खाने बोलला.
त्या गावातील सारे गोरगरीब केशवचंद्रांच्या नावे खडे फोडीत होते. परंतु करतात काय?
या प्रांताचा राजा दौऱ्यावर निघाला होता. केशवचंद्राने वशिला लावून राजा आपल्या गावी येईल असे केले. गाव शृंगारण्यात आला आणि एक सुंदर सभामंडप उभारण्यात आला. तेथे राजासाठी सिंहासन तयार करण्यात आले होते. राजाच्या सत्कारसमारंभासाठी आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील शेकडो मोठमोठी माणसे येणार होती. सरदार-जहागीरदार, सावकार, व्यापारी येणार होते. तेथे फक्त गरिबांना येण्यास बंदी होती. केशवचंद्राला गावातील लोकांची भीती वाटत होती. राजाच्या कानावर ते कागाळ्या घालतील, अशी त्याला शंका होती. म्हणून त्याने सर्वांना ताकीद दिली की, त्या दिवशी घराबाहेर फिरकू नका. राजा जाईपर्यंत आपापल्या झोपड्यांत बसून राहा.
सभामंडप भरून गेला होता. आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील साऱ्या संपत्तीचे तेथे जणू प्रदर्शन होते. नटूनथटून श्रीमंत मंडळी आली होती. आणि बारा वाजले. राजा आला वाटते? हां, हे बघा घोडेस्वार! आणि वाद्ये वाजू लागली. जयघोष कानावर आले. सारे शेतकरी भीतीने घरात बसून आहेत; परंतु भीमा कुठे आहे? गावाबाहेर एक जुने देवीचे मंदिर होते. त्या मंदिरात एक प्रचंड घंटा होती. गावात कोणी मेले, तर ती घंटा वाजविण्यात येई. भीमा आज त्या मंदिरात गेला आणि ती घंटा दाणदाण वाजवू लागला.
"कोण मेले?" म्हाताऱ्या गुरवाने विचारले.
"न्याय मेला." भीमा म्हणाला.
"खरेच, न्याय उरला नाही." देवीचा तो पुजारी म्हणाला.
घंटेचा आवाज ऐकून देवीच्या देवळाकडे शेतकरी येऊ लागले, 'कोण मेले' म्हणून विचारू लागले. 'न्याय मेला' असे जो तो उत्तर देऊ लागला.
"मोठ्याने घंटा वाजवा. न्याय मेला!" तरुण म्हणू लागले. एक थकला की दुसरा वाजवू लागे. तो थकला की तिसरा. सारा गाव दणाणून गेला.
तिकडे सभामंडपात राजाचा सत्कार होत होता. मानपत्र वाचले जात होते. परंतु त्या घंटेचा दाणदाण आवाज तेथे ऐकू येत होता आणि मानपत्र मात्र कोणालाच ऐकू जाईना.
"कसला हा आवाज?" राजाने विचारले.
"कोणी तरी मेले असावे. गावचा रिवाज आहे की, कोणी मेले तर घंटा वाजवायची." केशवचंद्र नम्रपणे म्हणाला.
"आमचे येणे म्हणजे अपशकुनच झाला म्हणावयाचा. कोण मेले, चौकशी तरी करा." राजा म्हणाला.
दोन घोडेस्वार चौकशीसाठी पाठवण्यात आले. देवीच्या देवळाजवळ अपार गर्दी होती.
"काय आहे भानगड? कोण मेले!" घोडेस्वारांनी विचारले.
"न्याय मेला!" लोक गर्जले.
ते घोडेस्वार आश्चर्य करीत आले. त्यांनी येऊन राजाला सांगितले, "महाराज, न्याय मेला!"
"मी जिवंत आहे तोवर न्याय कसा मरेल? चला, मला पाहू दे काय आहे भानगड ती!"
राजा रथातून निघाला, त्याबरोबर सारेच निघाले. कोणी घोड्यावरून, कोणी पायी निघाले. तिकडे भीमाने काय केले ते ऐका. तो लोकांना म्हणाला,
"आपण न्यायदेवाची एक प्रतिमा करून ती तिरडीवर ठेवू या. खांद्यावरून ती नेऊ या. 'न्याय मेला, हाय हाय; न्याय मेला, हाय हाय' असे दु;खाने म्हणू या!" सर्वांना ती कल्पना आवडली. एक तिरडी तयार झाली. तिच्यावर न्यायदेवतेची एक प्रतिमा निजवण्यात आली. खांद्यावर घेऊन लोक निघाले. 'न्यायदेव मेला, हाय हाय,' असे करीत ती प्रेतयात्रा निघाली.
तिकडून राजा हजारो शेटसावकारांसह, शेकडो सरदारजहागीरदारांसह येत होता आणि इकडून ती न्यायदेवाची प्रेतयात्रा येत होती. दोघांची वाटेत गाठ पडली. राजा रथातून खाली उतरला व तो शेतकऱ्यांकडे जाऊन म्हणाला,
"तुम्ही हे काय म्हणता? मी जिवंत असताना न्याय कसा मरेल?"
"या गावात तरी न्याय नाही!" भीमा म्हणाला.
"काय आहे तुमची तक्रार?" राजाने विचारले.
"महाराज, या गावचे शेतमालक आज मजूर झाले. ज्या केशवचंद्राने तुमचे स्वागत आज मांडले आहे, त्यानेच आमचे संसार धुळीला मिळविले. पाचाचे पन्नास केले नि साऱ्या जमिनी तो बळकावून बसला. महाराज, या गावातील सर्वांच्या जमिनी गेल्या तरी माझी उरली होती. केशवचंद्र म्हणे, 'हजार रुपये घे परंतु ती मला विकत दे!' मी जमीन विकायला तयार नव्हतो. तेव्हा खोटा खटला भरून माझ्याजवळून जमीन हिसकावून घेण्यात आली. न्यायाधीश पैशांचे मिंधे. वकील म्हणाला, 'देव आकाशात नसतो, पैशाजवळ असतो!' महाराज, खरेच का देव उरला नाही? न्याय उरला नाही? तुमच्याभोवती दागदागिन्यांनी सजलेली ही बडी मंडळी आहेत, आणि ही इकडची गरीब मंडळी पहा. या आयाबाया, ही आमची मुले. ना पोटभर खायला, ना धड ल्यायला. कसे जगावयाचे? श्रमणारे आम्ही. परंतु आम्हीच मरत आहोत. आम्ही सारे पिकवतो आणि हे खुशालचेंडू पळवतात. न्याय, कोठे आहे न्याय? वाडवडील म्हणत, 'जो नांगर चालवील तो खरा मालक.' परंतु आज गादीवर बसणारा मालक ठरला आणि आम्ही श्रमणारे चोर ठरलो, अन्नाला महाग झालो. महाराज, कोठे आहे न्याय? या केशवचंद्राने आम्हाला आज घरातून बाहेर पडू नका म्हणून बजावले. आम्ही तुमच्या कानांवर गोष्टी घालू अशी त्याला भीती वाटली; परंतु मला घंटेची आठवण झाली. न्याय मेला, तुम्हास कळवावे म्हणून आम्ही सारे घंटा वाजवीत बसलो."
"चला त्या मंडपात. मी सारी चौकशी करतो." राजा म्हणाला. सारी मंडळी सभामंडपात आली. एकीकडे श्रीमंत बसले. एकीकडे गरीब बसले. राजाने सारी चौकशी केली. केशवचंद्राचे गुन्हे सिद्ध झाले. तो पैसेखाऊ न्यायाधीश, तो वकील, सारे तेथे अपराधी म्हणून उभे राहिले.
"यांना कोणती शिक्षा देऊ? तोफेच्या तोंडी देऊ?" राजाने विचारले.
"त्यांना मारण्याची जरुरी नाही. ते आमच्यात राहोत. आमच्याबरोबर खपोत, श्रमाचे खावोत, त्यांची बुद्धी आमच्या कामी पावो, आमचा हिशोब ठेवोत. महाराज, या गावची जमीन साऱ्या गावाच्या मालकीची असे करा. सारे मिळून श्रमू. येथे स्वर्ग आणू. येथे नको कोणी उपाशी, नको कोणी चैन चालवणारा." भीमा म्हणाला.
"तुमचा प्रयोग यशस्वी करा. भरपूर पिकवा. नवीन नवीन उद्योग शिका. तुमचा गाव आदर्श करा. तुम्हाला छळणाऱ्यांवरही तुम्ही सूड घेऊ इच्छित नाही, ही केवढी उदारबुद्धी! मला राजालाही आज तुम्ही खरी दृष्टी दिलीत. सूडबुद्धीनं शेजारच्या राजाशी मी युद्ध करायच्या विचारात होतो; परंतु आता दुसऱ्या भल्या मार्गाने जाईन. शाबास तुमची! तुमचे समाधान झाले ना?" राजाने प्रेमाने विचारले.
"होय, महाराज!" लोक आनंदाने उद्गारले.
"मग आता काय घोषणा कराल?" राजाने विचारले.
"न्याय मेला होता, परंतु जिवंत झाला, अशी घोषणा करू." लोक म्हणाले.
राजा निघून गेला. केशवचंद्र व भीमा प्रेमाने एकमेकांस भेटले. तो गाव सुखी झाला, तसे आपण सारे होऊया.


लेखक - पांडुरंग सदाशिव साने

अनाम वीरा

अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात !

धगधगत्या समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी !

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !

जरी न गातिल भाट डफावर तुझे यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे, तुझे बलिदान !

काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !


गीत - कुसुमाग्रज
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
मी एक रात्रि त्या नक्षत्रांना पुसले
“परमेश्वर नाही घोकत मन मम बसले
परि तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी
का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले?

तो आहे किंवा नाही कुणा न लागे ठाव
प्रज्ञेची पडते जिथे पांगळी धाव
गवसे न किनारा, फिरे जरी दर्यात
शतशतकांमधुनी शिडे उभारून नाव!”

स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही
“तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही
उठतात तमावर त्याची पाऊलचिन्हे-
त्यांनाच पुससि तू, आहे की तो नाही!”


कवी - कुसुमाग्रज

निवास

खुप खुप वर्षांपूर्वी
आकाशाशी
माझा करार झाला
आणि आकाशगंगेतील
ती छोटी तारका,
निळ्या पारख्या प्रकाशाचा,
पिसारा फुलवणारी,
माझ्या मालकीची झाली
तेव्हापासून
पृथ्वीवर जेव्हा
ज्वालामुखीच्या उद्रेकांनी,
उसालेली उद्यानं
दग्ध होतात
किंवा कोकीळांची कूजनं
बाकीच्या प्रपातात,
गोठून पडतात,
तेव्हा
माझा निवास
त्या तारकेवर असतो,
व्यवहारापुरत
मी येथे
वावरत असलो तरी




कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन

अन्यथा

तत्त्वज्ञान त्याचे विवेचन करील
पण कविता त्याचा शोध लावते
कारण
तो आणि आपण
यांच्यातील संबंध
नाही मीमांसेचा,
तो आहे फक्त
काव्याचा
आणि म्हणूनच
बेबलच्या सनातन मनोर्‍यामधे
जेव्हा नेति – अस्तीचे वादंग
मीमांसक माजवीत असतात,
तेव्हा -
केवळ कवीसाठी
तो करतो स्वत:चा सारांश
इंद्रियसुंदर स्वरुपात
सृष्टीतून उतरतो खाली,
रहस्यदुर्गाच्या उग्र सावल्यांतून
पहारे चुकवीत बाहेर निसटणार्‍या
कलंदर राजपुत्रासारखा,
आणि
कवीच्या संवादी हातात घालून
रागदरीतील महत्तम स्वरासारखा
भ्रमण करतो
अस्तित्वाच्या सर्व हद्दीपर्यंत
- अन्यथा
तुकारामांचा अभंग
संभवलाच नसता



कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - मुक्तायन

गाभारा

दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्‍यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.

सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,

पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्‍या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्‍याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्‍याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.


कवी - कुसुमाग्रज