तळमळ

मी सुखात घालू हात कुणाच्या गळां ?
राहिलो इथे : पण नाही लागला कुणाचा लळा.

मज एकहि नाही कुणी सखासोबती :
ममतेविण हिंडत आहे हे जीवजात भोवती.

वंचनाच दिसते इथे सदा सारखी;
हे स्नेहशून्य जग: येथे कोठची जिवाची सखी ?

हे वरुन आहे असे, तसे अंतर:
हे उदास जीवा, नाही, बघ, इथे कुणी सुंदर !

विक्राळ घोर अंधार जरी कोंदला
पळ एकच झळकत आली : लोपली वरच चंचला.

पोसून ध्येयशून्यता उथळ अंतरी
शून्यातच वाहत जाते ही मानवता नाचरी.

माझा पण आता पुरा जीव भागला:
मज करमत नाही येथे , ने मला दूर, वादळा!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा