lekh लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
lekh लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मी एक कावळा....

बुद्धीला कितीही ताण दिला, तरी बालपणातल्या सर्वात पहिल्या अनुभवाची आठवण म्हंटली की, मला ते वादळ आठवतं. झाडाच्या उंच शेंड्यावर आमचं घरटं होतं. सोसाट्याच्या वार्‍यात झाडाचा शेंडा जवळ-जवळ ५ ते ७ फुट झुकत होता. घरट्यात मी एकटाच होतो. घरट्याबाहेर पण त्याच फांदीला गच्च धरून आई बसली होती. फांदीच्या प्रत्येक हेलकाव्या सरशी, आता आपण एवढ्या उंचावरून पडणार या, भितीने मी अक्षरश: कोकलत होतो. मला आई-बाबांसारखं उडता येत नव्हतं. शेजारी बसलेली आई, सारखी पंखांनी तोल सावरत होती. ती घाबरलेली नव्हती. मधे मधे काव काव करून मला धीर देत होती. पण मला, घरट्याला, सोडून कुठे जात नव्हती. बाबा कुठे बाहेर गेले होते. आईला त्यांचीही काळजी वाटत नव्हती पण या वादळात त्यांनी जवळ असावं, अगदी घरात नाही तरी निदान समोरच्या इलेक्ट्रीकच्या तारांवर, नजरेसमोर असावं असं तीला वाटत होतं. संघ्याकाळी मित्रांसमवेत समोरच्या इलेक्ट्रीकच्या तारांवर गप्पा मारत बसणं हा माझ्या बाबांचा छंदच होता. पण आज ते (आणि त्यांचे मित्रही) कुठे दिसत नव्हते. मी तर जाम घाबरलो होतो. वार्‍याने फांदी झोका खाऊ लागली की मी डोळे बंद करून घ्यायचो आणि जिवाच्या आकांताने काऽऽव काऽऽव ओरडायचो. आई हसायची आणि सांगायची,'कांही होत नाही. घरट्यातल्या तारा गच्च धरून बस. घरटं कांही पडायचं नाही.' मी तसं करत होतो पण भिती जात नव्हती. किती वेळ त्यात गेला कळलं नाही. पण, बर्‍याच वेळाने वारा मंदावला, झाडाच्या शेंड्याचे झोके घेणं थांबलं. शेंडा हळूवार हलत राहीला. भिती दूर पळाली. मजा वाटू लागली. मी हसू लागलो. आई आता उडून गेली. बहूतेक ती बाबांना शोधायला बाहेर गेली असावी. आई आणि बाबा परतले तो पर्यंत मी झोपलो होतो. त्यांच्या बोलण्याने जागा झालो. बाबांनी त्यांच्या चोचीतून आणलेल्या अळ्या मला खाऊ घातल्या आणि पायात धरलेली एक मोठी अळी आईला दिली. आईने बाबांच्या अंगावर पिसांमध्ये अडकलेले कचर्‍याचे कण आपल्या चोचीने काढून टाकले. बाबा अळ्या छान छान आणायचे. पोपटी रंगाच्या अळ्या मला खूप खूप आवडायच्या. बाबा त्या जास्त आणायचे. पण बाबा तपकिरी रंगाच्या अळ्याही आणायचे. त्या चवीला एकदम बेकार असायच्या, मला मुळीच आवडायच्या नाहीत पण त्या खायला लागायच्या. त्याने पंखात ताकद येते असे आई सांगायची. मी कधी खायचे नाटक करून ती अळी थूंकून टाकली तर बाबा माझ्या डोक्यावर चोच मारायचे. खूप लागायचं. डोळ्यात पाणी यायचं. खाली टाकलेली अळी पुन्हा उचलून आई भरवायची.

पंखात पुरेशी ताकद आल्यानंतर एक दिवस माझ्या उडायला शिकण्याच्या काळ समीप आला. सुरुवातीला एक-एक फांदी खाली उतरत सर्वात खालच्या फांदीवर येऊन बसलो. तिथून बाबांनी पंखांची हालचाल दाखविली. मीही तशीच करून दाखवली. सकाळची प्रसन्न वेळ होती. मी खूप उत्साहात होतो. बालसुलभ वृत्तीने उगाचच काव-काव करीत होतो. नंतर बाबांनी हवेत एक भरारी मारून दाखवली. मनात उत्साह ओसंडून वाहात होता तरी धाडस होईना. मी जागच्या जागीच पंख फडफडवून काव-काव करीत राहीलो. बाबा फांदीवर माझ्या बाजूला सरकले. माझ्या पाठीवर चोच घासली. मला धीर आला. मग बाबांनी पुन्हा एक भरारी घेतली. यावेळी जरा साधी आणि छोटीशीच भरारी घेऊन माझ्या शेजारी येऊन बसले. मी प्रयत्न केला पण पाय फांदी सोडेनात. बाबांनी पाठीवर जोरात चोच मारली. मी काव-काव करीत फांदीवरून पडू लागलो. तेंव्हा तोल सावरण्यासाठी मी जोर-जोरात पंखांची हालचाल केली आणि मला आश्चर्य वाटलं मी हवेत तरंगू लागलो. थोडं पुढे जाऊन मी परत फिरलो आणि फांदी वर बाबांच्या शेजारी येऊन बसलो. बाबांनी पुन्हा पाठीवर चोच घासली. मला खूप बरं वाटलं. आई हसत होती. मला उडता येऊ लागलं. त्या दिवशी मी खूप उडलो. अगदी पंखं दुखे पर्यंत. वेगवेगळ्या झाडांवर वेगवेगळी फळं खायला मिळाली. आईने सांगितल्या प्रमाणे आमच्या झाडापासून जास्त दूर गेलो नाही. संध्याकाळी घरी परतलो तेंव्हा बाबा आईला अभिमानाने म्हणाले,' हा आता एक पूर्ण कावळा झाला. माझी चिंता मिटली.' आई हसली. तिने माझ्या पाठीवर चोच घासली. पंखांवर, मानेजवळ पिसांमध्ये अडकलेले कचर्‍याचे कण काढून टाकले. त्या रात्री मी छाती भरून श्वास घेतला आणि समाधानाने झोपलो.

मी, आई आणि बाबा आम्ही तिघेही बाहेर पडायचो. वेगवेगळ्या ठिकाणी जायचो, भरपूर खाऊन, पाणी वगैरे पिऊन घरी परतायचो. जर चांगले किडे, अळ्या, दाणे मिळवायचे असतील तर पहाटे जरा सूर्य उगवला की लगेच बाहेर पडावे लागे. उशीर झालाच तर अगदी उपाशी राहावे लागत नसे पण मग देवळासमोरच्या पिंपळावर बसून, येणारी जाणारी भक्त मंडळी लाह्या टाकत त्या खाव्या लागत. आई-बाबा भल्या पहाटे बाहेर पडत. पण आई लवकर परते. घरट्यातली घाण बाहेर फेकणं, सगळ्या तारा ओढून-ओढून विस्कटणारं घरटं पुन्हा घट्ट करणं, तारा कमी झाल्या असतील (कधी-कधी माझ्या धसमुसळेपणाने कांही तारा सुटून खाली पडायच्या) बाबांच्या मागे लागून त्यांना नवीन तारा आणायला लावणं, त्यांनी आणलेल्या तारा घरट्यात नीट बसवणं अशी तीची कामं चालायची. बाबा कधी-कधी रंगीत चिंध्याही आणायचे. आईला ते आवडायचं नाही. ती त्या चिंध्या घरट्या बाहेर फेकून द्यायची. कधी बाबांनी त्या टाकून दिलेल्या चिंध्या पुन्हा उचलून आणल्या तर नाईलाजाने घरट्यात ठेवायची. २-४ दिवसांनी बाबांच मन भरलं की तेच त्या चिंध्या उचलून बाहेर फेकून द्यायचे. पुन्हा कुठे नविन चिंधी मिळाली आणायचे उचलून.

घरट्यापासून दूर-दूर गेल्यावर घराकडे परतायची आमची एक युक्ती होती. आम्ही शहरात राहात होतो. प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे वास आम्हाला पाठ होते. त्या-त्या वासांचा मागोवा घेत आम्ही घरट्याकडे परतायचो. प्रत्येक गल्ली-बोळातून, घरांमधून, उकिरड्यावरुन, बेकरी, कसायांची दुकाने, फरसाणची दुकाने, देवळे, झोपडपट्या, गटारे, समुद्र, कोळीवस्ती इथून ठरावीक वास येत. थोड्या फार सरावने या सर्व वासांचा एक 'नकाशा' मेंदूत तयार होतो आणि मग अंधारातही आपलं घरटं कुठे आहे हे ओळखता येतं. माझ्या मित्राने ही ट्रिक मला शिकवली.

आमच्या घरट्यासमोर एक उंच इमारत आहे. त्याच्या ४थ्या मजल्यावर एक छोटी चिमुरडी राहायची. रोज सकाळी ती बाल्कनीत येऊन, आमच्या घरट्याकडे पाहून, कांही तरी खाऊ मला दाखवायची. मी त्या बाल्कनीत जाऊन तो खावा अशी तीची ईच्छा असायची. पण आईने सांगितलं होतं, माणसं लहान असू देत नाहीतर मोठी, त्यांच्या जवळ जायच नाही. मी तिच्याकडे बघून काव - काव करायचो, बाल्कनीच्या बाजूच्या खिडकीवर बसायचो पण बाल्कनीत गेलो नाही. एकदा तिच्या आईने तिला कांही तरी सांगितलं. तसं, बाल्कनीच्या कठड्यावर खाऊ ठेवून ती खोलीत गेली आणि आतून पाहू लागली. मी थोडावेळ वाट पाहीली आणि ती येत नाही असे पाहून झट्कन एक भरारी घेऊन गॅलरीत सावध विसावलो आणि ती बाहेर यायच्या आंत तो खाऊ उचलून आणला. तो केकचा तुकडा होता. मी फांदीवर बसून तो खाऊ लागलो. तीला खूप आनंद झाला. तीने टाळ्या वाजवून आईला दाखवले. आई नुसतीच हसली. तिला विशेष आनंद झालेला दिसला नाही.

पुढे कित्येक वर्ष तो आमचा एक खेळच होता. मला खाऊ दिल्याशिवाय ती कधीच शाळेत गेली नाही आणि तिने दिलेला खाऊ खाल्याशिवाय माझाही दिवस गोड व्हायचा नाही. मी मित्रांबरोबर उडायला जायचो. दूर एका ठीकाणी इलेक्ट्रीकच्या तारांवर आमची शाळा भरायची. आम्ही २५-३० तरूण कावळे होतो. तिथे आम्ही वेगवेगळे सूर मारणे, अर्ध्यातून झट्कन दिशा बदलून उडणे, अगदी जमीनी पर्यंत खाली सूर मारून जमीनीवर न उतरता समोरच्या उंच इमारतीच्या गच्चीच्या कठड्यावर बसणे, चोच दोन्ही बाजूनीं कठड्यावर घासून तिला धार लावणे, असे खेळ खेळायचो. कधी कंटाळा आला तर शहरातच असलेल्या झोपडपट्टीवर घिरट्या घालायचो. तिथे उकिरड्यावर छान-छान गोष्टी खायला मिळायच्या. तिथेच डुकरांची छोटी छोटी पिल्ले आपली दोरी सारखी शेपटी हलवत चरत असायची. त्यांच्या पाठीवर चोच मारली की ती व्रँक व्रँक असे ओरडायची. मजा यायची. एखादे मोठे डुक्कर किंवा कुत्रा आला तर आम्ही उडून जायचो.

अशी अनेक वर्ष गेली. ती समोरच्या इमारतीतली चवथ्या मजल्यावरची चिमुरडी आता चिमुरडी राहीली नव्हती. मोठी झाली होती. आता ती केक, बिस्किटं खायची नाही. पोळी-भाजी खायची. पोळीचे तुकडे गॅलरीच्या रेलींगवर ठेवायची. मी उचलून आणायचो. कधी कधी तिथेच बसून खायचो. मला केकची आठवण यायची. मला केक खूप आवडायचा. तसं बेकरीच्या मागे उकिरड्यावर कधी-कधी केकचे तुकडे मिळायचे, पण तिने खास माझ्या साठी ठेवलेल्या केकच्या तुकड्यांची चव त्याला नसायची. शिवाय उकिरड्यावर गाई, म्हशी, बकर्‍या हे शींगवाले प्राणी यायचे त्यांची भिती वाटायची. त्यावरून एक गंमत आठवली. आम्ही म्हशींच्या पाठीवर, त्यांचे शींग किंवा शेपटी पोहोचणार नाही अशा जागेवर, बसायचो. १०-१० मिनिटं आरामात त्यांच्या पाठीवर बसून कांही कष्ट न करता दूर-दूर जायचो. कंटाळा आला की म्हशीच्या पाठीवर हलकेच चोच मारायची की ती कातडी थरथरवायची, मजा यायची. असे एक दोन वेळा करून उडून जायचे. हा एक छंदच होता. फक्त कांही ठीकाणच्या मुलांना सांभाळायला लागायचं. ती मुलं दगड घेऊन नेमबाजी खेळायची. त्यांचा नेमही चांगला होता. एकदा मला एक दगड पाठीत बसला. दोन दिवस पाठ दुखत होती.  आईने पिवळ्या अळ्या खायला सांगितल्या. सांडपाण्याच्या डबक्याशेजारी उगवणार्‍या झुडपांच्या पिवळ्या फुलांमधे त्या सापडायच्या. दोन दिवसात पाठ बरी झाली.

मनुष्यप्राण्यांमध्ये आम्हा कावळ्यांसंबंधी कांही गैरसमज आहेत. त्यांना वाटतं आम्हा सर्वांनाच पाहूणे येणार असतील तर आधी कळतं आणि मग आंम्ही काव-काव करून त्यांना तसे कळवतो. पण प्रत्यक्षात आमच्यातल्या फक्त ठरावीक कावळ्यांनाच, त्यांना डोमकावळा म्हणतात, हे समजतं आणि ते त्या-त्या घराच्या खिडकीत बसून काव-काव करतात. तसेच, स्मशानात, नदीकाठी मृतात्म्यांचे पिंड खाणारे कावळेही वेगळे असतात. ते जरा राखाडी रंगाचे असतात. आमच्या सारखे गडद काळ्या रंगावर पोटाकडे पांढरट पिसं असणारे नसतात. मृतात्म्यांचे पिंड खाणं आमच्यात कमीपणाचे मानले जाते. किडे, मुंग्या, अळ्या, मेलेली जनावरे (ती पण दोन दिवसांपेक्षा जास्त जुनी नाही) आणि मनुष्यप्राणी खाईल ते सर्व, आम्ही खातो.

झाडावरचं आमचं घरटं माझ्या वडीलांनी बांधलं होतं. तसं आमचं घरटं इमारतीच्या मागच्या बाजूला एका झाडावर इतरांसमवेत होतं परंतु एकदा बाबांचं आणि त्या झाडावर राहाणार्‍या एका दाणग़ट डोमकावळ्याचं कडाक्याचं भांडण झालं. भयंकर चोचा-चोची झाली. मग इतर कावळे मधे पडून भांडण सोडवलं. हे नेहमीच होत राहाणार हे जाणून वडीलांनी इमारतीच्या पुढच्या बाजूस या झाडावर घरटं बांधलं. हे झाड जरा लवचीक आहे. वारा सुटला की इतर झाडांपेक्षा जास्त हेलकावे खातं. म्हणजे घरटं बांधून राहायला अयोग्यच म्हणायला पाहीजे. पण बाबांना झाडांचं ज्ञान चांगलं आहे. ते आईला म्हणाले, 'झाड कितीही हेलकावलं तरी मोडणार नाही. चिवट आहे.' त्यांना झाडाच्या शेंड्यावरची कोवळी पाने चावून कळत असे. ही कला खूप कावळ्यांकडे असते. बाबांनी मलाही ही कला थोडीफार शिकवली आहे. इमारतीच्या पुढे राहावयास आल्याने एक फायदा झाला. चवथ्या मजल्यावरच्या 'त्या' चिमुरडीशी मैत्री झाली.

आता ती खूपच मोठी झाली होती. हल्ली स्कूटरवर बसून कॉलेजात जाऊ लागली होती. अभ्यासामुळे की काय कोण जाणे जास्त दिसायची नाही. कधीतरी रविवारी (त्या दिवशी कॉलनीत इडलीवाला
सायकलवर बसून येतो) बाल्कनीत दिसायची. कधी पोळी (सकाळी लवकर असेल तर) नाहीतर जेवणाच्या वेळी कधी पित्झाचा नाही तर बर्गरचा तुकडा द्यायची. पण केक नाही. कसं सांगू तिला मला केक दे म्हणून?    

त्या दिवशी फार भयंकर घटना घडली. कॉलनीतल्या मुलांच्यापैकी कोणाचा तरी मित्र छर्‍याची बंदूक घेऊन आला होता. बाबा समोरच्या इलेक्ट्रीकच्या तारांवर त्यांच्या मित्रांसमवेत बसले होते. त्या माणसाने झाडलेल्या बंदूकीतली गोळी बाबांच्या छातीतून आरपार गेली. बाबा खाली कोसळले. कॉलनीतली सगळी मुलं भोवती जमा झाली. झाडांवर, इमारतीच्या गच्चीवर, इलेक्ट्रीकच्या तारांवर सगळीकडून कावळे जमा झाले. सर्वच जणं काव-काव करत होते. मुलांना नंतर वाईट वाटले. त्यांनी त्या बंदूक वाल्याला घालवून दिलं. कोणी बाबांच्या चोचीत पाणी घालायचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. शेवटी कॉलनीच्या बागेतच एका कोपर्‍यात खड्डा खणून बाबांना त्यात पुरलं. वर एक आंब्याचे झाड लावून त्यावर माती लोटली. माळ्याने झारीने पाणी ओतलं, मग सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या. मी आणि आई तिथेच उभ्या एका ट्रकच्या टपावर बसून हे सर्व पाहात होतो. त्यादिवशी रात्री आई पंखात चोच खूपसून रात्रभर रडत होती. मी आईच्या पाठीवरून चोच फिरवून तिचं सांत्वन करत राहीलो.

या सर्व घटनाक्रमात कॉलनीतल्या बहूतेक गॅलर्‍यांमधून माणसं खाली चाललेला प्रकार दु:खी अंत:करणाने पाहात होते. चवथ्या मजल्याच्या गॅलरीतून 'ती', तिची आई आणि तिचे बाबा पाहत होते. दुसर्‍या दिवशी माझी आई कुठे बाहेर पडली नाही. 'ती'ने गॅलरीत पोळीचे खूप तुकडे ठेवले होते. त्यातील कांही मी आईला आणून दिले. काही मी खाल्ले. बंदूकवाले, बेचकीवाली मुलं, नेमबाजी करणारी मुलं यांच्या पासून दूर राहा, त्यांचा खेळ होतो पण आपल्यासारख्या दुर्बलांचा जीव जातो, असं आईने पुन्हा एकदा मला बजावलं. आमचा दिनक्रम पुर्ववत होण्यास बराच वेळ लागला. पण नाईलाज होता. या काळात 'ती'च्या आईने रोज गॅलरीच्या कठड्यावर पोळीचे तुकडे ठेवले. आमच्या दोघांचेही जेवण व्हायचे. हळूहळू आई सकाळचे  किडे, दुकानाबाहेर टाकलेले जोंधळे, टिपायला जाऊ लागली. मी माझ्या मित्रांसमवेत दूरदूर उडायला जाऊ लागलो. उन्हाळ्यात हल्ली ठराविक घरांसमोरच वाळवणं दिसतात. राखणदारी करायला बसलेल्या लहान मुलाची किंवा मुलीची नजर चुकवून पापड पळवणं कांही कठीण जायचं नाही. कधी चांगल्यापैकी कडधान्यही मिळायची. रस्त्यात मरून पडलेले उंदीर, घुशी तर मिळतच परंतु ह्या झुडपातून त्या झुडपात पळताना मिळणारे जीवंत उंदीर पकडणे या सारखा मजेचा खेळ नाही. कधी-कधी माणसं त्यांनी घरात पिंजर्‍यात पकडलेले उंदीर उकिरड्यावर आणून टाकीत तेही कुठे लपण्याआधी पकडण्यासाठी टपून बसावे लागे.

एक दिवस 'ती' स्वत:च्या स्कूटरवरून नाही तर दूसर्‍या कुणा तरूणाच्या कार मधून घरी आली. कोण होता तो? रुबाबदार होता. बराच वेळ त्यांच्या घरी बसला होता. पुन्हा दोघेही बरोबरच बाहेर पडले. बाल्कनीतून तीच्या आईने आणि बाबांनी हात हलवून हसत हसत टाटा केला. ती त्याच्या गाडीत बसून कुठेतरी बाहेर गेली. मी गाडीच्या वरून थोडे अंतर उडत उडत गेलो. कॉलनी मागे पडल्यावर त्याने तीच्या खांद्यावरून हात टाकून तीला जवळ घेतलं, मी परत फिरलो. ती एवढी मोठी झाल्याचे मला कधी जाणवलेच नाही. विचार केला, मोठी कशी होणार नाही, ती काय 'चिमुरडीच' राहाणार आहे? मी सुद्धा मोठा झालोच होतो. माझंही एक गुपित होतच की. हल्ली मित्रांना तीन-तीन, चार-चार दिवस भेटायचो नाही. देवळासमोरच्या पिंपळावरच्या एका कावळीशी माझी मैत्री झाली होती. आम्ही दोघेच दूर-दूर उडायला एकत्र जायचो. डोंगरावर, कडेकपार्‍यात गप्पा मारत बसायचो. अंधार पडायच्या सुमारास परतायचो. आईलाही ती कावळी आवडली होती. शेवटी एके दिवशी ती आमच्या घरट्यात राहायला आली.

हल्ली केकचा तुकडा राहो दूर, पोळीचा तुकडाही मिळायचा नाही. 'ती' लग्न होऊन सासरी गेली आणि माझा पोळीच्या तुकड्यांचा रतिब तुटला. सुरुवातीला 'ती'ची आई खुप दु:खात होती. 'ती'च्या फोटोंचा अल्बम घेवून रडत बसायची. आम्ही दोघांनी ग़ॅलरीत बसून वाकून त्यांच्या घरात हे दृष्य अनेक वेळा पाहीलं होतं. वडील उघड उघड रडायचे नाहीत पण रात्री उशीरा पर्यंत गॅलरीत सिगरेट ओढत बसायचे. हिने कित्येक वेळा मला झोपेतून जागं करून दाखवलं होतं.
पुढे हळूहळू त्यांच दु:ख कमी झाल्या नंतर तीची आई पोळीचे तुकडे गॅलरीत ठेवू लागली. पण हल्ली माझं मन व्हायचं नाही ते तुकडे आणायला. त्या घरात 'ती' माझी जीवाभावाची मैत्रीण नव्हती. जिला मी ती 'चिमुरडी' असल्या पासून पाहीलं होतं. जिने स्वत:हून, प्रेमाने मला केकचा तुकडा दिला होता. मी तो खाल्यावर आनंदाने टाळ्या पिटल्या होत्या. आम्हा कावळ्यांना एवढे प्रेम कोण देतो? सगळे आम्हाला 'काळा' म्हणून हिणवतात, आमच्या आवाजाला 'कर्कश्य' म्हणतात. पिंडाला शिवणारा अशी सरसकट सर्वच कावळ्यांची संभावना करून फक्त अंत्यविधीला लागणारा म्हणून 'अशुभ' मानतात. पाहुणे येण्याची सूचना देणार्‍या कावळ्यांनाही देवदूत मानायचे सोडून 'काय करायचे आहेत पाहुणे या महागाईच्या काळात' असे म्हणून हातातली वस्तू फेकून मारून हाकलून त्यांचा अपमान करतात. अशा वस्तूस्थितीत 'ती' प्रेमाने पोळीचा तुकडा खाऊ घालायची.

आता 'ती' सासरी जाउनही बरेच महीने उलटून गेले होते. एक दिवस त्यांची गाडी कॉलनीत आली. गाडीतून तिचे आई-बाबा, नवरा आणि 'ती' खाली उतरले. 'ती' गाडीचा आधार घेऊन सावकाश उतरली. तीच्या आईच्या हातात 'ती'चं बाळ होतं. मी काव-काव करून जोरात हाक मारली. तीने चालता चालता सावकाश वळून माझ्या घरट्याकडे बघितलं. हसली. माझ्याकडे बोट दाखवून नवर्‍याला कांही तरी सांगितलं. त्याने हसून माझ्याकडे पाहीलं. माझी छाती अभिमानाने फुलून आली. ही कौतुकाने माझ्याकडे पाहात होती. आईने माझ्या पाठीवर आपली म्हातारी चोच घासली. तिच्या डोळ्यात पाणी आलं.

तिच्या घराच्या खिडकीवर जाऊन बसणं. आंत डोकाऊन पाहणं. तिच्या बाळाची आंघोळ, दुध पिणं, रडणं, झोपणं सर्व पाहाताना मला 'ती'चं कौतुक वाटायचं. पोळ्यांचा रतिब परत सुरु झाला होता. मी आनंदाने तुकडे गोळा करून आणायचो. ती असे पर्यंत हे चालत राहीलं. आता तीने स्वत:च केक खाणं बहुधा सोडून दिलं होतं. मी पोळ्यांच्या तुकड्यांवर समाधान मानत होतो.

त्यानंतर ३-४ वेळा ती राहायला आली होती. तीची मुलगी आता मोठी झाली होती. माझी पिल्लही मोठी होत होती. लवकरच त्यांना उडायला शिकवयचा दिवस जवळ येणार होता. 'ती' तीच्या मुलीला हात धरून चालायला शिकवत होती. आता मला 'ती'ची भिती वाटत नव्हती. 'ती' तीच्या मुलीला घेऊन बाल्कनीत यायची तेंव्हा कठड्यावर त्यांच्या पासून फक्त दोन हात दूर मी बसायचो. काव-काव करायचो. आज 'ती'ने बशीत कांही तरी खाऊ ठेवून मला हाक मारल्यावर मी लगेच गेलो. 'ती'च्या मुलीच्या हातात कांही तरी खाऊ होता. तोंड सगळं बरबटलं होतं. मी वास लगेच ओळखला. छाती भरून श्वास घेतला, बशीमधे माझ्यासाठी ........केकचा तुकडा होता.


- प्रभाकर पेठकर
सौ. -मनोगत

आयुष्यातील ८ मोल्यवान क्षण....!!!!


१)आपला पहिला पगार आपल्या आई वडिलांना देणे...!!!

२)आपल्या प्रेमाचा विचार डोळ्यात पाणी आणून करने...!!!

३)जुने फोटो बघून आठवणीत रमून हसणे...!!!

४)हसत खेळत आणि भावूक गप्पा मित्रासोबत मारणे...!!!

५)ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीचा हात प्रेमाने हातात घेवून चालणे...!!!!

६)जे आपली मनापासून काळजी करतात त्यांच्या कडून एक प्रेमळ मिठी मिळवणे...!!!

७)आपल्या पहिल्या मुलाच्या अथवा मुलीच्या कपाळावर चुंबन घेणे जेंव्हा त्याचा जन्म होतो...!!!

८)असाक्षण जेंव्हा कोणी तरी आपल्याला मिठीत घेते आणि आपल्याला अश्रू आवरत नाही....!!!!

हे सर्व मोल्यवान क्षण आयुष्यातून कधीच जावू नका देवू....!!!!

नेहमी सांभाळून ठेवा हृदयाच्या कोपऱ्यात कुठे तरी हे क्षण...

काचेची बरणी आणि २ कप चहा

(आयुष्यात जेव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी करावाशा वाटतात आणि दिवसाचे २४ तासही अपुरे पडतात तेव्हा काचेची बरणी आणि २ कप चहा आठवून पहा.)

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना कही वस्तू बरोबर आणाल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी कही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात पिंगपाँगचे बॊल भरु लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पूर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा बॊक्स घेऊन तो बरणीत रिकामा केला आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली का म्हणुन विचारले. मुलांनी एका आवाजात होकार भरला. सरांनी नंतर एका पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली. बरणी भरली. त्यांनी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारले. मुलांनी तबडतोब हो म्हटलं. मग सरांनी टेबलाखालून चहा भरलेले २ कप घेतले आणि तेही बरणीत रिकामे केले. वाळूमध्ये जी कही जागा होती ती चहाने पुर्ण भरून निघाली. विद्यार्थांमधे एकच हशा पिकला. तो संपताच सर म्हणाले,"आता ही जी बरणी आहे तिला तुमचे आयुष्य समजा.

पिंगपाँगचे बॊल ही महत्वाची गोष्ट आहे - देव, कुटुंब, मुलं, आरोग्य, मित्र आणि आवडीचे छंद - ह्या आशा गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सरं कही गेलं आणि ह्याच गोष्टी राहिल्या तरी तुमचं आयुष्य परिपुर्ण असेल. दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी, घर, कार. उरलेलं सारं म्हणजे वाळू - म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी." "आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर पिंगपाँगचे बॊल किंवा दगड खडे ह्यासाठी जागा उरणार नाही. तीच गोष्ट आपल्या आयुष्याची. तुम्ही आपला सारा वेळ आणि सारी शक्ती लहान सहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्वाच्या गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच रहाणार नाही. तेव्हा... आपल्या सुखासाठी म्हत्वचं काय आहे त्याकडे लक्श द्या." "आपल्या मुलाबाळांबरोबर खेळा. मेडिकल चेकअप करुन घेण्यासठी वेळ काढा. आपल्या जोडीदाराला घेउन बहेर जेवायला जा. घराची सफाई करायला आणि टाकऊ वस्तूंची विल्हेवाट लावायला तर नेहमी वेळ मिळत जाईल." "पिंगपाँगचे बॊलची काळजी आधी घ्या. त्याच गोष्टींना खरं महत्व आहे. प्रथम काय करायचं ते ठरवून ठेवा. बाकी सगळी वाळू आहे."

सरांचं बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं,"यात चहा म्हणजे काय?" सर हसले आणि म्हणाले,"बरं झाले तु विचारलेस. तुझ्या प्रश्नाचे उत्तर असे की आयुष्य कीतीही परिपुर्ण वाटले तरी मित्रांबरोबर १-२ कप चहा घेण्याइतकी जागा नेहमीच असते

श्रीगणेशास 'मंगलमूर्ती' का म्हणतात ?


पूर्वी अवंती नगरात भारद्वाज नावाचा वेदशास्त्रनिपुण ऋषी रहात होता. एके दिवशी क्षिप्रा नदीवर तो स्नानासाठी गेला असता जलक्रीडा करीत असलेल्या एका अप्सरेस पाहून तो कामातूर झाला आणि त्यांचे वीर्य पृथ्वीवर पडले. पृथ्वीने ते आपल्या उदरात धारण केले.
यथावकाश त्या रेतापासून पृथ्वीने एका जास्वंदी फुलाप्रमाणे तांबड्या त्याच्या पुत्रास जन्म दिला आणि त्याचे पालनपोषण केले. हा पुत्र कुमारवयात येताच त्याने आपल्या मातेस प्रश्न केला “माते, माझे शरीर इतर मानवांप्रमाणे असूनही माझ्या अंगाचा रंग इतका तांबडा कसा?” तेव्हा पृथ्वीने त्याला त्याचे जन्मवृत्त कथन केले. ते ऐकून त्याने पृथ्वीकडे पित्याजवळ राहण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा पृथ्वी त्याला भारद्वाजऋषीकडे घेऊन गेली. भारद्वाजऋषीने आपल्या या पुत्राचा (भूमीपुत्र) स्वीकार केला आणि त्याचे नाव, ‘भीम’ ठेवले. पुढे शुभदिवस पाहून त्याचे उपनयन करुन त्याला वेदशास्त्र शिकविले. तसेच श्रीगणेशाच्या मंत्राचा उपदेश करून जप करण्याची आज्ञा केली पित्याच्या आज्ञेवरून भीमाने नर्मदा नदीच्या काठी जाऊन तपश्चर्या सुरू केली.
नर्मदा नदीकाठी एक हजार वर्षे श्रीगणेशाच्या मंत्राचा जप केल्यावर गजानन माघ शुद्ध चतुर्थी दिवशी त्याला प्रसन्न झाला आणि भीमास गजाननाने साक्षात दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा भीमाने ‘मला स्वर्गामध्ये राहून अमृतप्राशन करण्याची इच्छा अहे. तसेच माझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध व्हावे आणि ज्या माघ शुद्ध चतुर्थीदिवशी तुम्ही मला प्रसन्न झालात. ती चतुर्थी सर्वांना कल्याणकारी होवो.’ असा वर मागितला.
भीमाचे हे बोलणे ऐकून गजाननाने ‘तुला देवांसह अमृतपान कराव्यास मिळेल. तुझे ‘मंगल’ असे नाव प्रसिद्ध होईल. तुझ्या नावावरूनच मला लोक ‘मंगलमूर्ती’ म्हणून ओळखतील. तुझा रंग अंगाराप्रमाणे लाल असल्याने चतुर्थीस ‘अंगारकी चतुर्थी’ असे म्हणतील. या चतुर्थीचे व्रत करणाऱ्यास एकवीस संकष्टीचे व्रत केल्याचे पुण्य मिळेल.’ असा वर भीमास दिला. अशा प्रकारचा वर देऊन गजानन गुप्त झाला असता मंगलाने त्या ठिकाणी उत्तम प्रकारचे देवालय बांधिले आणि त्यात सोंड व दहा हातांनी युक्त अशी गणपतीची सुंदर मूर्ती स्थापिली. त्या मूर्तीचे नाव मंगलमूर्ती असे ठेविले.
तेव्हापासून श्रीगणेशास लोक‘मंगलमूर्ती’ म्हणू लागले आणि मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी गणपती अंगारकास प्रसन्न झाले. म्हणून मंगळवारी येणाऱ्या ‘अंगारकी म्हणतात. 

।। श्री गणेश सम्पूर्ण पूजाविधी ।।


श्री गणेशाची पूजा करतांना अंत:करणात भाव असेल, तर पूजेचा अधिकाधिक लाभ होईल !
कोणत्याही देवतेच्या पूजेत देवतेचे आवाहन, स्थापना आणि प्रत्यक्ष पूजाविधी, या गोष्टी अंतर्भूत असतात. यासाठी देवतेला उपचार समर्पित करतांना त्या वेळी करायच्या कृती आणि म्हणायचे मंत्र यांचा अर्थ पूजकाला ज्ञात असल्यास त्याच्याकडून पूजाकर्म अधिक भावपूर्ण होते. त्यामुळे देवतेचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन पूजकांना (पूजा करणारा अन् त्याचे कुटुंबीय यांना) त्याचा लाभ होतो, म्हणजे पूजकावर त्या देवतेची कृपा होते. याच उद्देशाने श्री गणेश चतुर्थीच्या वेळी करावयाची पूजा, पूजेतील विधी आणि काही मंत्र अर्थासह येथे देत आहोत. अध्यात्मात `भाव तेथे देव' हे तत्त्व महत्त्वाचे आहे. देवतेची पूजा करतांना अंत:करणात भाव नसेल, तर पूजेचा तेवढा लाभ होणार नाही. म्हणून श्री गणेशाची पूजा करतांना `प्रत्यक्ष श्री गणेश पूजास्थळी आला आहे', या भावानेच सर्व उपचार करावेत.

१. पूजेची सिद्धता
१ अ. पूजेची सिद्धता (तयारी) करतांना स्तोत्रपठण किंवा नामजप कसा करावा ? : पूजेची सिद्धता करत असतांना स्तोत्रपठण किंवा नामजप करावा. नामजपाच्या तुलनेत स्तोत्रात सगुण तत्त्व जास्त असते; म्हणून स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि नामजप मनात करावा. नामजप मनातल्या मनात होत नसल्यास मोठ्याने करण्यास हरकत नाही.

१ आ. पूजासाहित्य : १. पिंजर (कुंकू) १०० ग्रॅम, २. हळद १०० ग्रॅम, ३. सिंदूर २५ ग्रॅम, ४. अष्टगंध ५० ग्रॅम, ५. रांगोळी पाव किलो, ६. अत्तर १ डबी, ७. यज्ञोपवीत (जानवी) २ नग, ८. उदबत्ती २५ नग, ९. कापूर २५ गॅ्रम, १०. वाती ५० नग, ११. कापसाची वस्त्रे ६ (७ मण्यांची), १२. अक्षता (अखंड तांदूळ) १०० ग्रॅम, १३. सुपार्‍या १५ नग, १४. नारळ ५ नग, १५. विड्याची २५ पाने, १६. तांदूळ १ किलो, १७. १ रुपयाची १० नाणी, १८. तिळाचे तेल १ लिटर, १९. शुद्ध तूप १०० ग्रॅम, २०. फुले १ किलो, २१. फुलांचे ३ हार, २२. तुळशी (२ पाने असलेली) २५ टिक्शा, २३. दोनशे दूर्वा, २४. बेलाची १५ पाने, २५. फळे (प्रत्येकी पाच प्रकारची) १० नग, २६. पत्री, २७. देवाची मूर्ती (गणपति) १, २८. चौरंग १ नग, २९. पाट ४ नग, ३०. कलश १ नग, ३१. ताम्हण ३ नग, ३२. घंटा १ नग, ३३. समई २ नग, ३४. निरांजने ४ नग, ३५. पंचपात्री १ नग, ३६. पळी १ नग, ३७. तबक (ताटे) ५ नग, ३८. वाट्या १५ नग, ३९. पातेली १ नग, ४०. आम्रपल्लव ५ टाळे, ४१. एकारती १ नग, ४२. पंचारती १ ाग, ४३. एक काडेपेटी, ४४. पराती १ नग, ४५. मोदक ३५ नग, ४६. करंज्या १५ नग, ४७. धूप १०० ग्रॅम, ४८. खण १, ४९. तोरणाचे (माटोळी) साहित्य, ५०. देव पुसण्यासाठी वस्त्र (कापड), ५१. पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर प्रत्येकी १ लहान वाटी)


१ इ. पूजास्थळाची शुद्धी आणि उपकरणांची जागृती करणे


१ इ १. पूजास्थळाची शुद्धी

अ. पूजाघर असलेल्या खोलीचा केर काढावा. शक्यतो पूजा करणार्‍या जिवानेच केर काढावा.
आ. केर काढल्यावर खोलीतील भूमीचा पृष्ठभाग मातीचा असल्यास ती शेणाने सारवावी. भूमीचा पृष्ठभाग मातीचा नसल्यास ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी.
इ. आंब्याच्या किंवा तुळशीच्या पानाने खोलीत गोमूत्र शिंपडावे. गोमूत्र उपलब्ध नसल्यास विभूतीच्या पाण्याचा वापर करावा. त्यानंतर खोलीत धूप दाखवावा.

१ इ २. उपकरणांची जागृती : देवपूजेची उपकरणे घासूनपुसून स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर त्यांच्यावर तुळशीचे पान किंवा दूर्वा यांनी जलप्रोक्षण करावे.

१ ई. रांगोळी काढणे
१. रांगोळी पुरुषांनी न काढता स्त्रियांनी काढावी.
२. रांगोळी शक्यतो मुख्य देवतेचे तत्त्व आकृष्ट करणारी असावी. तसेच एखाद्या विशिष्ट देवतेची पूजा करत असतांना तिच्या तत्त्वाशी संबंधित रांगोळी काढावी.
३. देवाच्या नावाची किंवा रूपाची रांगोळी न काढता स्वस्तिक किंवा बिंदू यांनी युक्‍त असलेली काढावी.
४. रांगोळी काढल्यावर तिच्यावर हळदी-कुंकू वहावे.

१ उ. शंखनाद करणे

१. शंखनाद करतांना उभे राहून मान वरच्या दिशेने करून आणि थोडी मागच्या बाजूला झुकवून मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्‍न करावा.
२. श्‍वास पूर्णत: छातीत भरून घ्यावा.
३. त्यानंतर शंखध्वनी करण्यास प्रारंभ करून ध्वनीची तीव्रता वाढवत न्यावी आणि शेवटपर्यंत तीव्र नाद करावा. शक्यतो शंख एका श्‍वासात वाजवावा.
४. शंखिणीचा नाद करू नये.

१ ऊ. देवपूजेला बसण्यासाठी आसन घेणे : सर्वसाधारण पूजकाने (३० टक्के पातळीपर्यंतच्या) आसन म्हणून लाकडी पाट घ्यावा. तो दोन फळया जोडून न बनवता अखंड असावा. त्याला लोखंडाचे खिळे मारलेले नसावेत. शक्यतो पाट रंगवलेला नसावा ३० ते ५० टक्के पातळीच्या पूजकाने रेशमी किंवा तत्सम आसन घ्यावे, तर ५० टक्क्यांपेक्षा जास्त पातळीच्या पूजकाने कोणतेही आसन घ्यावे. आसनाखाली रांगोळी काढावी. रेशमी वस्त्र वा तत्सम आसन घेतल्यास त्यांच्या सभोवती रांगोळी काढावी. बसण्यापूर्वी उभे राहून भूमी आणि देव यांना प्रार्थना करावी, `आसनाच्या ठायी आपला चैतन्यमय वास असू दे.'

१ ए. पूजासाहित्य आणि पूजास्थळ यांची अन् स्वत:ची शुद्धी : कलश आणि शंख यांतील थोडेसे पाणी पळीमध्ये एकत्र घ्यावे. `पुंडरीकाक्षाय नम: ।' हा नाममंत्र म्हणत तुळशीच्या पानाने ते पाणी पूजासाहित्यावर, आजूबाजूला आणि स्वत:च्या शरिरावर शिंपडावे. त्यानंतर तुळशीचे पान ताम्हनात सोडावे.

२. पूजेविषयी महत्त्वाच्या सूचना
२ अ. पूजेच्या प्रारंभी सोवळे किंवा पीतांबर किंवा धूतवस्त्र (धोतर) आणि उपरणे परिधान करावे.
२ आ. पूजा करतांना देवता आपल्यासमोर प्रत्यक्ष प्रगट झाली आहे, आसनस्थ झाली आहे आणि आपण अनन्य शरणागत भावाने करत असलेली पूजा देवता स्वीकारत आहे', असा भाव मनात ठेवावा अन् प्रत्येक उपचार देवाच्या चरणी अर्पण करावा.
२ इ. आदल्या दिवशी देवतांना अर्पण केलेली फुले आणि हार (निर्माल्य) काढून त्याचे विसर्जन करावे.
२ ई. ज्यांना पूजेतील श्लोक/मंत्र म्हणता येणार नाहीत, त्यांनी केवळ `आवाहयामि, समर्पयामि' असा उल्लेख असलेले नाममंत्र म्हणून देवतेला उपचार समर्पित करावे, उदा. श्री महागणपतये नम: । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।।


३. श्री गणेशाची षोडशोपचारपूजा

।। अथ पूजा प्रारंभ ।।
कुंकूमतिलक : पूजकाने (यजमानाने) प्रथम स्वत:ला कुंकूमतिलक लावावा.
आचमन : उजव्या हाताने आचमनाची मुद्रा करावी. नंतर डाव्या हाताने पळीभर पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर (मुद्रेच्या स्थितीतच) घ्यावे आणि प्रत्येक नावाच्या शेवटी `नम:' हा शब्द उच्चारून ते पाणी प्यावे. १. श्री केशवाय नम: । २. श्री नारायणाय नम: । ३. श्री माधवाय नम: । चौथे नाव उच्चारतांना `नम:' या शब्दाच्या वेळी उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडावे. ४. श्री गोविंदाय नम: । पूजकाने हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ हात जोडावे अन् शरणागतभावासह पुढील नावे उच्चारावीत. ५. श्री विष्णवे नम: । ६. श्री मधुसूदनाय नम: । ७. श्री त्रिविक्रमाय नम: । ८. श्री वामनाय नम: । ९. श्री श्रीधराय नम: । १०. श्री हृषीकेशाय नम: । ११. श्री पद्मनाभाय नम: । १२. श्री दामोदराय नम: । १३. श्री संकर्षणाय नम: । १४. श्री वासुदेवाय नम: । १५. श्री प्रद्मुम्नाय नम: । १६. श्री अनिरुद्धाय नम: । १७. श्री पुरुषोत्तमाय नम: । १८. श्री अधोक्षजाय नम: । १९. श्री नारसिंहाय नम: । २०. श्री अच्युताय नम: । २१. श्री जनार्दनाय नम: । २२. श्री उपेंद्राय नम: । २३. श्री हरये नम: । २४. श्री श्रीकृष्णाय नम: ।। पुन्हा आचमनाची कृती करून २४ नावे म्हणावीत. नंतर पंचपात्रीतील सर्व पाणी ताम्हणात ओतावे अन् दोन्ही हात पुसून छातीशी नमस्काराच्या मुद्रेत हात जोडावेत.

देवतास्मरण : श्रीमन्महागणाधिपतये नम: । इष्टदेवताभ्यो नम: । कुलदेवताभ्यो नम: । ग्रामदेवताभ्यो नम: । स्थानदेवताभ्यो नम: । वास्तुदेवताभ्यो नम: । आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नम: । सर्वेभ्यो देवेभ्यो नम: । सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम: । अविघ्नमस्तु ।।

देशकाल : पूजकाने स्वत:च्या दोन्ही डोळयांना पाणी लावून पुढील `देशकाल' म्हणावा. श्रीमद्‌भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे दंडकारण्ये देशे गोदावर्या: दक्षिणे तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने शालिवाहन शके व्यावहारिके अमुकनाम संवत्सरे, दक्षिणायने वर्षाऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे शुभयोगे शुभकरणे एवंगुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ पंचांग पाहून अमुक या शब्दाच्या ठिकाणी संवत्सर, वार आणि नक्षत्र यांचा उच्चार करावा. ज्यांना वरील देशकाल म्हणणे शक्य नसेल, त्यांनी पुढील श्लोक म्हणावा आणि नंतर संकल्प म्हणावा. `तिथिर्गुरुस्तथा वारं नक्षत्रं गुरुरेव च । योगश्च करणं चैव सर्वं गुरुमयं जगत् ।। संकल्प : उजव्या हातात अक्षता घेऊन संकल्प म्हणावा.
श्री महागणपतिपूजन : प्रथम पार्थिव मूर्तीच्या समोर किंवा उपलब्ध स्थानानुसार (जागेनुसार) ताह्मण अथवा केळीचे पान ठेवावे. त्यावर तांदूळाची रास घालावी. त्यावर श्रीफळ (नारळ) ठेवतांना त्याची शेंडी आपल्या दिशेने ठेवावी. नंतर चंदनादी उपचारांनी श्री महागणपतीचे पूजन करावे.

ध्यान : नमस्काराची मुद्रा करून हात छातीशी घ्यावे आणि श्री महागणपतीचे रूप डोळे मिटून मनात आठवावे आणि पुढील श्लोक म्हणावा. वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

अर्थ : वाईट मार्गाने जाणार्‍यांना सरळ मार्गावर आणणार्‍या, प्रचंड शरीर असलेल्या, कोटी सूर्यांचे तेज सामावलेल्या हे गणपतिदेवा, माझ्या कार्यांतील विघ्ने सदोदित तूच दूर कर. श्री महागणपतीला नमस्कार करून मी तुझे ध्यान करतो. श्री महागणपतये नम: । ध्यायामि ।।

आवाहन :
उजव्या हातात (मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता घेऊन `आवाहयामि' म्हणतांना श्रीफळरूपी महागणपतीच्या चरणी वहाव्यात.) `श्रीमहागणपतये नम: । महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्‍तिकं आवाहयामि ।।'

आसन : उजव्या हातात अक्षता घेऊन `समर्पयामि' म्हणतांना महागणपतीच्या चरणी वहाव्यात. श्री महागणपतये नम: । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।। चंदनादी उपचार : उजव्या हाताच्या अनामिकेने गंध (चंदन) घेऊन देवाला लावा. त्यानंतर पुढील नाममंत्र म्हणतांना `समर्पयामि' हा शब्द उच्चारतांना कंसात दिल्याप्रमाणे उपचार देवाच्या चरणी अर्पण करावेत. श्री महागणपतये नम: । चंदनं समर्पयामि ।। (गंध लावावे.) ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । हरिद्रां समर्पयामि ।। (हळद वहावी.) ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । कुंकुमं समर्पयामि ।। (कुंकू वहावे.) श्री महागणपतये नम: । ऋद्धिसिद्धिभ्यां नम: । सिंदूरं समर्पयामि ।। (सिंदूर वहावा.) श्री महागणपतये नम: । अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।। (अक्षता वहाव्यात.) श्री महागणपतये नम: । पुष्पं समर्पयामि ।। (फूल वहावे.) श्री महागणपतये नम: । दूर्वांकुरान् समर्पयामि ।। (दूर्वा वहाव्यात.) श्री महागणपतये नम: । धूपं समर्पयामि ।। (उदबत्ती ओवाळावी.) श्री महागणपतये नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.) उजव्या हातात दूर्वा घेऊन त्यावर पाणी घालावे. नंतर दूर्वांनी ते पाणी नैवेद्यावर प्रोक्षण करून (शिंपडून) दूर्वा हातातच धरून ठेवाव्यात आणि आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळयांवर (पाठभेद : डावा हात छातीवर) ठेवून नैवेद्य समर्पण करतांना पुढील मंत्र म्हणावे. प्राणाय नम: । अपानाय नम: । व्यानाय नम: । उदानाय नम: । समानाय नम: । ब्रह्मणे नम: ।।
(टीप - वेदोक्‍त पूजाविधीमध्ये `प्राणाय नम: ' या ठिकाणी `ॐ प्राणाय स्वाहा ।' अशा प्रकारे म्हणतात.) हातातील एक दूर्वा नैवेद्यावर आणि उर्वरित दूर्वाश्री गणपतीच्या चरणी वहाव्यात. हातावर पाणी घ्यावे अन् पुढील प्रत्येक मंत्र म्हणतांना ते पाणी ताम्हणात सोडावे. श्रीमहागणपतये नम: । नैवेद्यं समर्पयामि ।। मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।। (गंध-फूल वहावे.) करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।। नमस्काराची मुद्रा करून प्रार्थना करावी. कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि । विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि गणनायक ।।

अर्थ : हे गणनायका, तू माझ्यावर प्रसन्न हो. तसेच माझ्या कार्यातील सर्व विघ्ने दूर करून तूच माझे कार्य सिद्धीस ने. यानंतर पळीभर पाणी घ्यावे आणि `प्रीयताम्' हा शब्द म्हणतांना ते ताम्हणात सोडावे. अनेन कृतपूजनेन श्री महागणपति: प्रीयताम् ।

श्रीविष्णुस्मरण : दोन्ही हात पुसून नमस्काराच्या मुद्रेत छातीशी हात जोडावे. नंतर ९ वेळा `विष्णवे नमो' म्हणावे अन् शेवटी `विष्णवे नम: ।' असे म्हणावे.

कलशपूजन गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिंधुकावेरि जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।। कलशे गंगादितीर्थान्यावाहयामि ।। कलशदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।। कलशामध्ये गंध, अक्षता अन् फूल एकत्रित वहावे.

शंखपूजा शंखदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि ।। अर्थ : हे शंखदेवते, मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध-फूल समर्पित करतो.

घंटापूजा आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् । कुर्वे घंटारवं तत्र देवताह्वानलक्षणम् ।। अर्थ : देवतांनी यावे आणि राक्षसांनी निघून जावे, यासाठी देवता-आगमनसूचक असा नाद करणार्‍या घंटादेवतेला वंदन करून गंध-फूल समर्पित करतो. घंटायै नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।

दीपपूजा भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यय: ।आरोग्यं देहि पुत्रांश्च मतिं शांतिं प्रयच्छ मे ।। दीपदेवताभ्यो नम: । सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
अर्थ : हे दीपदेवते, तू ब्रह्मस्वरूप आहेस. सर्व ज्योतींचा अव्यय असा स्वामी आहेस. तू मला आरोग्य, पुत्रसौख्य, बुद्धी आणि शांती दे. मी तुला वंदन करून सर्व उपचारांसाठी गंध-फूल समर्पित करतो. (दीपदेवतेला हळदी-कुंकू वहाण्याची पद्धतही आहे.)

मंडपपूजन (माटोळीपूजन) : पुढील मंत्र म्हणतांना `समर्पयामि' या शब्दाच्या वेळी मंडपावर (माटोळीवर) गंध, अक्षता आणि फूल वहावे. मंडपदेवताभ्यो नम: । गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ।।
स्थलशुद्धी अपवित्र: पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा । य: स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर: शुचि: ।।
अर्थ : अपवित्र किंवा कोणत्याही अवस्थेतील मनुष्य पुंडरीकाक्षाच्या (विष्णूच्या) स्मरणाने अंतर्बाह्य शुद्ध होतो. पूजकाने या मंत्राने तुळशीपत्रावर पाणी घालून ते पाणी पूजासाहित्यावर आणि स्वत:वर प्रोक्षण करावे (शिंपडावे). नंतर तुळशीपत्र ताह्मणात सोडावे.

पार्थिव सिद्धिविनायकाच्या मूर्तीची पूजा

प्राणप्रतिष्ठा : पूजकाने स्वत:चा उजवा हात मूर्तीच्या हृदयाला लावून `या मूर्तीत सिद्धिविनायकाचे प्राण (तत्त्व) आकृष्ट होत आहे', असा भाव ठेवून पुढील मंत्र म्हणावेत. अस्य श्रीप्राणप्रतिष्ठामंत्रस्य ब्रह्माविष्णुमहेश्‍वरा ऋषय: ऋग्यजु:सामानि छंदांसि पराप्राण-शक्‍तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्‍ति: क्रों कीलकम् । अस्यां मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोग: ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य प्राणा इह प्राणा: ।।ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य जीव इह स्थित: ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य सर्वेन्द्रियाणि ।। ॐ आंह्रींक्रोंयंरंलंवंशंषंसंहं हंस: सोऽहम् । देवस्य वाङ्मन:चक्षु:श्रोत्रजिह्वाघ्राणप्राणा इहागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा ।।
(टीप - प्राणप्रतिष्ठेचे वरील मंत्र वेदोक्‍त आहेत.) अस्यै प्राणा: प्रतिष्ठन्तु अस्यै प्राणा: क्षरन्तु च । अस्यै देवत्वमर्चायै मामहेति च कश्चन ।। नंतर `परमात्मने नम: ।' असे १५ वेळा म्हणावे.

ध्यान : हात जोडून नमस्काराची मुद्रा करावी.
(टीप - हा मंत्र वेदोक्‍त आहे. ) एकदंतं शूर्पकर्णं गजवक्‍त्रं चतुर्भुजम् । पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । ध्यायामि ।।
अर्थ : ज्याच्या मुखकमलात एकच दात आहे, कान सुपासारखे मोठे रुंद आहेत, तोंड हत्तीचे आहे, चार हात आहेत, अशा प्रकारे हातांमध्ये अंकुश आणि पाश धारण करणार्‍या भगवान सिद्धिविनायकदेवाचे मी ध्यान (चिंतन) करतो.
१.आवाहन : उजव्या हातात अक्षता घेऊन `आवाहयामि' म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणी वहा. (अक्षता वहातांना मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून वहाव्यात.) आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्‍वर । अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थं गणनायक ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आवाहयामि ।।
अर्थ : हे विघ्नेशा, देवगणांनी पूजलेल्या, अनाथांच्या नाथा, सर्वज्ञ गणनायका मी पूजेसाठी तुझे आवाहन करतो.

२. आसन : उजव्या हातात अक्षता घेऊन `समर्पयामि' म्हणतांना देवांच्या चरणी वहा. विचित्ररत्‍नरचितं दिव्यास्तरणसंयुतम् । स्वर्णसिंहासनं चारु गृहाण सुरपूजित उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आसनार्थे अक्षतां समर्पयामि ।।

३. पाद्य : उजव्या हाताने पळीभर पाणी घ्या आणि `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा. सर्वतीर्थसमुद्‌भूतं पाद्यं गंधादिभिर्युतम् । विघ्नराज गृहाणेदंभगवन्भक्‍तवत्सल ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पाद्यं समर्पयामि ।।

४. अर्घ्य : डाव्या हाताने पळीभर पाणी घ्या. त्या पाण्यात गंध, फूल आणि अक्षता घाला. उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा. अर्घ्यं च फलसंयुक्‍तं गंधपुष्पाक्षतैर्युतम् । गणाध्यक्ष नमस्तेऽस्तु गृहाण करुणानिधे ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । अर्घ्यं समर्पयामि ।।

५.आचमन : डाव्या हातात पळीभर पाणी आणि उजव्या हातात दूर्वा घ्या. नंतर `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी आणि गणपती यांच्या चरणांवर प्रोक्षण करा. विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवन्दितम् । गंगोदकेन देवेश शीघ्रमाचमनं कुरु ।।
अर्थ : हे विनायका, देवांनीही अभिवादन केलेल्या देवेशा, या गंगेच्या पाण्याचा आचमनार्थ तू स्वीकार कर. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । आचमनीयं समर्पयामि ।।

६. स्नान : पळीभर पाणी घ्या. मग उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना ते पाणी महादेव, गौरी अन् सिद्धिविनायक यांच्या चरणांवर प्रोक्षण करा. गंगासरस्वतीरेवापयोष्णीयमुनाजलै: । स्नापितोऽसि मया देव तथा शांतिं कुरुष्व मे ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । स्नानं समर्पयामि ।।
अर्थ : गंगा, सरस्वती, रेवा, पयोष्णी आणि यमुना या नद्यांच्या पाण्याने मी तुला स्नान घालत आहे. हे देवा, मला शांती प्रदान कर.
६ अ. पंचामृत स्नान : पुढीलप्रमाणे दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचे स्नान घालावे. उजव्या हातात दूर्वा घेऊन `समर्पयामि' म्हणतांना महादेव, गौरी आणि सिद्धिविनायक यांच्या चरणांवर दूध प्रोक्षण करावे. नंतर शुद्धोदक प्रोक्षण करावे. अशा प्रकारे उर्वरित उपचारांनी देवाला स्नान घालावे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पयस्नानं समर्पयामि । तदन्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।। पुढील प्रत्येक स्नानानंतर शुद्धोदकाचा वरील मंत्र म्हणून देवांच्या चरणी पाणी प्रोक्षण करावे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दधिस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । घृतस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । मधुस्नानं समर्पयामि ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।।भक्‍त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने । त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्‍या देवेशा, मी अग्नीने संयुक्‍त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, हा भक्‍तीपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)
६ आ. अभिषेक : पंचपात्रामध्ये पाणी भरून घ्यावे आणि उजव्या हातात दूर्वा घ्याव्या. नंतर पळीतील पाणी देवावर प्रोक्षण करतांना श्रीगणपतिअथर्वशीर्ष किंवा संकटनाशनगणपति स्तोत्र म्हणावे.

७.वस्त्र : कापसाची वस्त्रे घ्या अन् `समर्पयामि' म्हणतांना ती देवतांच्या चरणी वहा. रक्‍तवस्त्रयुगं देव देवतार्हं सुमङ्गलम् । सर्वप्रद गृहाणेदं लंबोदर हरात्मज ।।
अर्थ : हे शिवसुता, लंबोदरा, देवतांसाठी सुयोग्य, सुमंगल आणि सर्व गोष्टी प्रदान करणार्‍या या लाल वस्त्रांच्या जोडीचा तू स्वीकार कर. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । कार्पासनिर्मितं वस्त्रं समर्पयामि ।।

८. यज्ञोपवीत : महादेव आणि सिद्धिविनायक यांना यज्ञोपवीत अर्पण करावे अन् देवीला अक्षता वहाव्यात. राजतं ब्रह्मसूत्रं च कांचनस्योत्तरीयकम् । विनायक नमस्तेऽस्तु गृहाण सुरवन्दित ।। उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । यज्ञोपवीतं समर्पयामि ।।
अर्थ : हे सुरगणपूजित विनायका, सुवर्णाचे उत्तरीय अन् रुप्याप्रमाणे लखलखित यज्ञोपवीताचा तू स्वीकार कर. उमायै नम: । उपवीतार्थे अक्षतान् समर्पयामि ।।

९. चंदन : देवांना अनामिकेने गंध लावावे. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरम् । विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम् । उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
अर्थ : हे देवश्रेष्ठा, अत्यंत मनोहर, भरपूर सुगंधाने पुष्ट असणार्‍या दिव्य अशा श्रीखंड चंदनाच्या लेपाचा तू स्वीकार कर. श्री उमायै नम: । हरिद्रां कुंकुमं समर्पयामि ।। (हळद-कुंकू वहावे.) श्री उमायै नम: । श्रीसिद्धिविनायकाय नम: । सिंदूरं समर्पयामि ।। (गौरी अन् सिद्धिविनायक यांना शेंदूर वहावा.)

१०. फुले-पत्री : उपलब्ध असलेली विविध प्रकारची फुले आणि पत्री अर्पण करावी.
अर्थ : हे प्रभो, मी पूजेसाठी आणलेल्या फुलांच्या माळा, तसेच चमेली आदी सुगंधित फुले आपण घ्यावी. तसेच शेवंती, बकुळ, चाफा, उंडीणकमळे, पुंनाग, जाई, कण्हेर, आंब्याचा मोहर, बेल, तुलसी चमेली आदी फुलांनी मी तुझी पूजा करतो. हे जगदीश्‍वरा, तू प्रसन्न हो. महादेव आणि गौरी यांना तुळस अन् बेलाचे पान वहावे. श्रीउमामहेश्‍वराभ्यां नम: । तुलसीपत्रं बिल्वपत्रं च समर्पयामि ।।
अंगपूजा : पुढील नावांनी श्री सिद्धिविनायकाच्या चरणी किंवा देवाच्या त्या त्या अवयवांवर उजव्या हाताने मध्यमा, अनामिका आणि अंगठा एकत्र करून) अक्षता वहाव्यात. श्री गणेशाय नम: । पादौ पूजयामि ।। (चरणांवर) श्री विघ्नराजाय नम: । जानुनी पूजयामि ।। (गुडघ्यांवर) श्री आखुवाहनाय नम: । ऊरू पूजयामि ।। (मांड्यांवर) श्री हेरंबाय नम: । कटिं पूजयामि ।। (कमरेवर) श्री कामारिसूनवे नम: । नाभिं पूजयामि ।। (बेंबीवर) श्री लंबोदराय नम: । उदरं पूजयामि ।। (पोटावर) श्री गौरीसुताय नम: । हृदयं पूजयामि ।। (छातीवर) श्री स्थूलकंठाय नम: । कंठं पूजयामि ।। (गळयावर) श्री स्कंदाग्रजाय नम: । स्कंधौ पूजयामि ।। (खांद्यांवर) श्री पाशहस्ताय नम: । हस्तौ पूजयामि ।। (हातावर) श्री गजवक्‍त्राय नम: । वक्‍त्रं पूजयामि ।। (मुखावर) श्री विघ्नहर्त्रे नम: । नेत्रे पूजयामि ।। (डोळयांवर) श्री सर्वेश्‍वराय नम: । शिर: पूजयामि ।। (मस्तकावर) श्री गणाधिपाय नम: । सर्वांगं पूजयामि ।। (सर्वांगावर) पत्रीपूजा : पुढील नावांनी देठ देवाकडे करून `समर्पयामि' असे म्हणतांना देवाच्या चरणी पत्री वहावी. श्री सुमुखाय नम: । मालतीपत्रं समर्पयामि ।। (चमेलीचे पान) श्री गणाधिपाय नम: । भृंगराजपत्रं समर्पयामि ।। (माका) श्री उमापुत्राय नम: । बिल्वपत्रं समर्पयामि ।। (बेल) श्री गजाननाय नम: । श्‍वेतदूर्वापत्रं समर्पयामि ।। (पांढर्‍या दूर्वा) श्री लंबोदराय नम: । बदरीपत्रं समर्पयामि ।। (बोर) श्री हरसूनवे नम: । धत्तूरपत्रं समर्पयामि ।। (धोतरा) श्री गजकर्णाय नम: । तुलसीपत्रं समर्पयामि ।। (तुळस) श्री गुहाग्रजाय नम: । अपामार्गपत्रं समर्पयामि ।। (आघाडा) श्री वक्रतुंडाय नम: । शमीपत्रं समर्पयामि ।। (शमी) श्री एकदंताय नम: । केतकीपत्रं समर्पयामि ।। (केवडा) श्री विकटाय नम: । करवीरपत्रं समर्पयामि ।। (कण्हेर) श्री विनायकाय नम: । अश्मंतकपत्रं समर्पयामि ।। (आपटा) श्री कपिलाय नम: । अर्कपत्रं समर्पयामि ।। (रुई) श्री भिन्नदंताय नम: । अर्जुनपत्रं समर्पयामि ।। (अर्जुनसादडा) श्री पत्‍नीयुताय नम: । विष्णुक्रांतापत्रं समर्पयामि ।। (गोकर्ण) श्री बटवेनम: । दाडिमीपत्रं समर्पयामि ।। (डाळिंब) श्री सुरेशाय नम: । देवदारूपत्रं समर्पयामि ।। (देवदार) श्री भालचंद्राय नम: । मरूबकपत्रं समर्पयामि ।। (मरवा) श्री हेरंबाय नम: । सिंदुवारपत्रं समर्पयामि ।। (निगडी / लिंगड) श्री शूर्पकर्णाय नम: । जातीपत्रं समर्पयामि ।। (जाई) श्री सर्वेश्‍वराय नम: । अगस्तिपत्रं समर्पयामि ।। (अगस्ति) यानंतर श्री सिद्धिविनायकाची १०८ नावे म्हणून एकेक दूर्वा अर्पण करावी.

११. धूप : उदबत्ती ओवाळावी. वनस्पतिरसोद्‌भूतो गंधाढ्यो गंध उत्तम: । आघ्रेय: सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : वनस्पतींच्या रसांतून उत्पन्न झालेला, पुष्कळ सुगंधाने युक्‍त असलेला, सर्व देवतांनी सुवास घेण्याजोगा असा हा धूप मी तुला दाखवत आहे. हे देवा, तू याचा स्वीकार कर. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । धूपं समर्पयामि ।।

१२. दीप
आज्यं च वर्तिसंयुक्‍तं वह्िनना योजितं मया । दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापह ।। भक्‍त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने । त्राहि मां निरयाद् घोराद् दीपोऽयं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे त्रिभुवनातील अंधार दूर करणार्‍या देवेशा, मी अग्नीने संयुक्‍त केलेली तुपाची वात तुला अर्पण करत आहे. हे परमात्मने, हा भक्‍तीपूर्वक अर्पण केलेल्या या दीपाचा तू स्वीकार कर. हे भगवंता, तूच मला घोर नरकातून सोडव. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । दीपं समर्पयामि ।। (निरांजन ओवाळावे.)

१३. नैवेद्य : उजव्या हातात तुळशीपत्र / बेलाचे पान / दूर्वा घेऊन त्याच्यावर पाणी घालावे. ते पाणी नैवेद्यावर शिंपडून तुळस हातातच धरावी. तुळशीसह पाण्याने नैवेद्याभोवती मंडल करावे. नंतर आपला डावा हात छातीवर ठेवावा (पाठभेद : आपल्या डाव्या हाताची बोटे दोन्ही डोळयांवर ठेवावी). तसेच आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी देवतेला त्या नैवेद्याचा गंध (नैवेद्य समर्पित करतांना) देतांना पुढील मंत्र म्हणावा. नैवेद्यं गृह्यतां देव भक्‍तिं मे ह्यचलां कुरु । ईप्सितं मे वरं देहि परत्र च परां गतिम् ।। शर्कराखंडखाद्यानि दधिक्षीरघृतानि च । आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यताम् ।।
अर्थ : हे भगवंता, या नैवेद्याचा स्वीकार करावा आणि माझी भक्‍ती अचल करावी. या लोकांत माझे अभीष्ट, ईप्सित पूर्ण करावे. तसेच परलोकात मला श्रेष्ठ गती प्राप्‍त व्हावी. खडीसाखर आदि खाद्यपदार्थ दही, दूध, तूप आदि भक्ष्य आणि भोज्य आहाररूप अशा नैवेद्याचा आपण स्वीकार करावा. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । पुरतस्थापितमधुरनैवेद्यं निवेदयामि ।। प्राणाय नम: । अपानाय नम: । व्यानाय नम: । उदानाय नम: । समानाय नम: । ब्रह्मणे नम: ।।
(टीप - वेदोक्‍त पूजाविधीमध्ये `प्राणाय नम: ।' या ठिकाणी `ॐ प्राणाय स्वाहा ।' असे म्हणण्यात येते.) पूजकाने हातातील दूर्वा श्री सिद्धिविनायकाच्या चरणी वहाव्या आणि उजव्या हातावर पाणी घेऊन पुढील प्रत्येक मंत्र म्हणून ते पाणी ताम्हणात सोडावे. नैवेद्यं समर्पयामि । मध्ये पानीयं समर्पयामि । उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।। फुलाला गंध लावून देवाला वहावे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।। यानंतर आरती करून कापूरारती करावी.

पाठभेद : शास्त्रात आरतीनंतर `नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प' हा क्रम सांगितला असला, तरी सध्या बर्‍याच ठिकाणी आरतीनंतर `मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार' या क्रमाने उपचार केले जातात.

१४. नमस्कार : नंतर पुढील श्लोक म्हणून देवाला पूर्ण शरणागत भावाने साष्टांग नमस्कार घालावा. नम: सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे । साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्‍नेन मया कृत: ।। नमोऽस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे ।। सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्‍वते सहस्रकोटीयुगधारिणे नम: ।।
अर्थ : सर्व जगाचा आधार आणि कारण असलेल्या, सर्वांचे हित करणार्‍या देवा, मी तुला साष्टांग प्रणाम करतो. सहस्र शरीरे, पाद (पाय), नेत्र, शिर, मांड्या आणि बाहू असलेल्या, सहस्र नावे असलेल्या, सहस्रकोटी युगांना धारण करणार्‍या, शाश्‍वत अन् अनंत अशा महापुरुषाला माझा नमस्कार असो. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । नमस्कारान् समर्पयामि ।।

१५. प्रदक्षिणा : नमस्काराच्या मुद्रेत छातीजवळ दोन्ही हात जोडावे आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने स्वत:च्या भोवती गोल फिरून पुढील मंत्र म्हणतांना प्रदक्षिणा घालावी. यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च । तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे ।। अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम् । तस्मात्कारुण्यभावेन रक्ष माम् परमेश्‍वर ।।
अर्थ : आतापर्यंत जन्मोजन्मी माझ्याकडून घडलेली पापे, मी तुला प्रदक्षिणा घालतांना पडत असलेल्या पावलागणिक नष्ट होत आहेत. हे देवा, तुझ्याविना मला कोणीही त्राता नाही, तूच माझा आधार आहेस. म्हणून हे भगवंता, करुणामय दृष्टीने माझे रक्षण कर, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकाय नम: । प्रदक्षिणां समर्पयामि ।। दूर्वायुग्मसमर्पण
(पाठभेद : काही ठिकाणी नैवेद्यानंतर दूर्वायुग्म वहातात.) दूर्वांचे देठ देवाकडे आणि अग्र आपल्याकडे करून पुढील प्रत्येक नावांनी दोन दूर्वा एकत्र करून देवाच्या चरणी वहाव्यात, उदा. श्री गणाधिपाय नम: । दूर्वायुग्मं समर्पयामि ।। याप्रमाणे प्रत्येक नाममंत्र उच्चारल्यावर `दूर्वायुग्मं समर्पयामि ।' असे म्हणावे. श्री गणाधिपाय नम: । श्री उमापुत्राय नम: । श्री अघनाशनाय नम: । श्री एकदंताय नम: । श्री इभवक्‍त्राय नम: । श्री मूषकवाहनाय नम: । श्री विनायकाय नम: । श्री ईशपुत्राय नम: । श्री सर्वसिद्धिप्रदायकाय नम: । श्री कुमारगुरवे नम: ।। नंतर पुढील श्लोक म्हणून देवाच्या चरणी एकविसावी दूर्वा वहावी. गणाधिप नमस्तेऽस्तु उमापुत्राघनाशन । एकदंतेभवक्‍त्रेति तथा मूषकवाहन ।। विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक । कुमारगुरवे तुभ्यं पूजयामि प्रयत्‍नत: ।। श्री सिद्धिविनायकाय नम: । दूर्वामेकां समर्पयामि ।।

१६. मंत्रपुष्प आणि प्रार्थना
कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्तत् ।।
अर्थ : हे देवा, पूजा करतांना माझ्याकडून काया-वाचा-मन-बुद्धीने काही चुका झाल्या असल्यास मला क्षमा करावी आणि पूजा परिपूर्ण करून घ्यावी. अनेन देशकालाद्यनुसारत: कृतपूजनेन उमामहेश्‍वरसहितश्रीसिद्धिविनायकदेवता प्रीयताम् ।। (हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडणे.) प्रीतो भवतु । तत्सद्ब्रह्माऽर्पणमस्तु ।।
पाठभेद : शास्त्रात `नमस्कार, प्रदक्षिणा आणि मंत्रपुष्प' हा क्रम सांगितला असला, तरी सध्या बर्‍याच ठिकाणी `मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार' या क्रमाने उपचार केले जातात.
मोदक वायनदान मंत्र : पुढील मंत्र म्हणून ब्राह्मणाला मोदकाचे वायनदान द्यावे. विनायक नमस्तुभ्यं सततं मोदकप्रिय । अविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। दशानां मोदकानां च दक्षिणाफलसंयुतम् । विप्राय तव तुष्ट्यर्थं वायनं प्रददाम्यहम् ।। यानंतर आचमन करून `विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नम: ।' असे म्हणावे.
मूर्तीविसर्जनाचा मंत्र : पुढील मंत्र मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी म्हणावा.यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ।।
अर्थ : पार्थिव (मातीच्या) मूर्तीची मी आजपर्यंत केलेली पूजा सर्व देवगणांनी स्वीकारावी आणि ईप्सित कार्याच्या सिद्धीसाठी अन् पुन्हा येण्यासाठी आता प्रस्थान करावे. श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवावी. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करावे.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ `गणेश पूजाविधी')

हरतालिका व्रत

गणेश चतुर्थींच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतियेला "हरतालिका` असे म्हणतात. या दिवशी गणपतीच्या आईची म्हणजे पार्वतीची पूजा हिंदू महिला करतात. हरतालिका या शब्दाची फोड "हरित` म्हणजे "हरण` करणे आणि "आलिका` म्हणजे "आलिच्या`-मैत्रिणीच्या असा आहे. मैत्रिणींच्या साह्याने पार्वतीने केलेले शंकराचे हरण, असा या शब्दाचा अर्थ आहे. हिंदू कुमारिका आपल्याला हवा असलेला, आपल्या मनासारखा सुरेख पती मिळावी म्हणून "हरतालिका` हे व्रत अत्यंत श्रद्धापूर्वक करतात. काही जणी हे व्रत कडक करतात. आपल्याकडे विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. विवाह झाल्यानंतर इच्छित पती मिळाल्यावर हे व्रत करण्याचा काय अर्थ आहे? पण एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी महिलांची श्रद्धा असते म्हणून त्याही हे व्रत आजन्म करतात.

हिमालयाचा राजा हिमवान याची पार्वती ही कन्या. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव "पार्वती` असे ठेवण्यात आले. तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी त्याला लागली होती. एकदा नारदमुनी हिमवानाकडे आले आणि त्याला म्हणाले, "हे पर्वतश्रेष्ठा ! तुझ्या या सुस्वरुप मुलीला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे. ते ऐकून हिमवानाला आनंद झाला. त्याने पार्वतीला ती बातमी सांगितली. पण पार्वतीने मनोमन कैलासराणा शंकराला पती म्हणून वरले होते. तसे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला झाले नाही. तिने आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला. "तुम्ही माझा दुसऱ्या कोणाबरोबरही विवाह करून दिला तर मी जीव देईन.`

पार्वती आपल्या मैत्रिणींसह अरण्यात निघून गेली. तिथे तिने घोर तपश्‍चर्या केली. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने खाऊन राहत होती. पुढे तिने तेही सोडून दिले. त्यामुळे तिला "अपर्णा` असे नाव पडले. तिच्या तपश्‍चर्येने भगवान श्रीशिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले. ती म्हणाली, "तुम्ही माझ्या तपश्‍चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझे पती व्हा.` शंकराने "तथास्तु` म्हटले व निघून गेले. पार्वतीचा शोध घेत हिमवान त्या अरण्यात आला. तिला त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्‍चर्येचे कारण विचारले. तेव्हा तिने आपला दृढ निश्‍चय आपल्या वडिलांना सांगितला. भगवान श्रीशंकरांनी दिलेला वरही सांगितला.

तिचा दृढनिश्‍चय, श्रद्धा पाहून हिमवानाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला. पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे, प्रेमामुळे शंकराला "पार्वतीपती` असे नामाभिधान पडले.

इच्छित पती शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या मैत्रिणींच्या साह्याने प्राप्त करून घेतली. पार्वतीने आपला वर कडक तपश्‍चर्येने मिळविला. त्याप्रमाणे मनाजोगता पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका, महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात. या दिवशी दिवसभर उपवास करतात. काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत.

रात्री १२ वाजता बेलाचे पान चाटून, काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून, तर कोणी खडीसाखर, केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. अर्थातच ज्यांना इतके कडक व्रत करता येत नाही. त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात.

या व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात. त्यात जाई, शेवंती, पारिजातक , तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. मनोभावे प्रार्थना करतात. "सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे`, अशी प्रार्थना करून आरती केली जाते.या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात.

गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थी हा दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. श्रीगणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जाते.त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती केली जाते. आरतीच्या शेवटी देवें म्हणतात व प्रसाद वाटतात.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुढाकारामुळे सुरू झालेला गणेशोत्सव गणेश चतुर्थीपासून पुढे दहा दिवस साजरा केला जातो. साधारणतः दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन केले जाते.


महत्व :

अध्यात्मशास्त्रदृष्ट्या प्रत्येक देवता म्हणजे विशिष्ट तत्त्व आहे.दर महिन्याच्या चतुर्थीला गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १०० पटीने कार्यरत असते,तर गणेशोत्सवामधील दीड दिवसांत ते १००० पटीहून अधिक कार्यरत असते.

संतांनी गौरवलेले दैवत श्री गणेश

संतशिरोमणी श्री ज्ञानेश्वरमाउलींनी ज्ञानेश्वरीच्या आरंभी
‘देवा तूचि गणेश, सकल मती प्रकाशु’,
असे म्हणून गणरायाला सविनय वंदिले आहे. संत एकनाथांनी भागवतटीकेत श्री गणेशाला
‘ओम् अनादि आद्या । वेद वेदान्त विद्या ।
वंद्य ही परमा वंद्या । स्वयंवेद्या श्री गणेशा ।।’
याप्रमाणे वंदन केले आहे.
संत नामदेवांनी
‘लंबरोदरा तुझे शुंडादुंड । करीतसे खंड दुश्चिन्हांचा ।।’,
असे म्हटले आहे.


प्रथम गणेशपूजन का करतात ?

गणपति दशदिशांचा स्वामी आहे. दशदिशा म्हणजे अष्टदिशा अधिक ऊध्र्व(वरची) आणि अधर(खालची) अशा दोन दिशा. इतर देवता त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत; म्हणून कोणतेही मंगलकार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतिपूजन करतात.


प्राणशक्ति वाढविणारा

मनुष्याच्या शरीरातील निरनिराळी कार्ये निरनिराळ्या शक्तींद्वारे होत असतात. त्या निरनिराळ्या शक्तींच्या मूलभूत शक्तीला प्राणशक्ति असे म्हणतात. गणपतीचा नामजप हा प्राणशक्ति वाढविणारा आहे.


श्री गणेशाला वक्रतुंड का म्हणतात ?

सर्वसाधारणत: वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाचा, सोंडेचा असा अर्थ समजला जातो; पण ते चूक आहे.
‘वक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्ड: ।’ म्हणजे वक्रमार्गाने(वाईट मार्गाने)चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुण्ड.’


पूजेत डाव्या सोंडेचा गणपति का ठेवावा ?

पूजेत शक्यतो डाव्या सोंडेचा गणपति ठेवावा. उजव्या सोंडेचा गणपति हा अतिशय शक्तीशाली व जागृत आहे, असे म्हटले जाते.याउलट डाव्या सोंडेचा गणपति शीतल व अध्यात्माला पूरक असतो, याची पूजा नेहमीच्या पद्धतीने केली जाते.

गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी तयार करण्यात येणारी मूर्ती कशी असावी ?

पुराणांत गणपती हा मळापासून बनला असल्याचे सांगितले आहे. चिकणमाती किंवा शाडूमाती यांपासून तयार केलेल्या गणेशाच्या मूर्तीमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट होण्याचे प्रमाण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या तुलनेत खूप जास्त असते. तसेच गणेशमूर्ती ही शक्यतो पाटावर बसलेली व हातात पाश अंकुश धारण केलीली असावी. नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी. त्यामुळे त्यातून अधिक प्रमाणात गणेशाची शक्ती कार्यरत होऊन पूजकाला अधिक लाभ होतो.

श्री गणपतीला दुर्वा व लाल फुले का वहावित ?

दुर्वांमध्ये श्रीगणेशाचे तत्त्व जास्तीतजास्त प्रमाणात आकृष्ट करून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे गणपतीला दूर्वा वाहिल्याने मूर्तीत मोठ्या प्रमाणावर गणेशाची शक्ती जास्त प्रमाणात आकृष्ट होऊ मूर्ती जागृत होते. या दूर्वा नेहमी कोवळ्या अन् लहान आकाराच्या एकत्र जुडी करून वाहव्यात. दूर्वांना ३, ५, ७ अशा विषम संख्येच्या पात्या असाव्या. गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरणे फार महत्त्वाचे असते. याचे कारण म्हणजे; गणपतीचा वर्ण लाल आहे. पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचे तत्त्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होते व त्यामुळे मूर्ती जागृत व्हायला मदत होते.

मोदक
अ. 'मोद' म्हणजे आनंद व 'क' म्हणजे भाग. मोदक म्हणजे आनंदाचा लहानसा भाग.
मोदकाचा आकार नारळासारखा म्हणजे 'ख' या ब्रह्यरध्रांतील पोकळी सारखा असतो.
कुंडलिनी 'ख' पर्यंत पोहोचल्यावर आनंदाची अनुभूती येते. हाती धरलेला मोदक, म्हणजे
आनंद प्रदान करणारी शक्ती.

आ. 'मोदक' हे ज्ञानाचे प्रतिक आहे; म्हणून त्याला 'ज्ञानमोदक' असेही म्हणतात. ज्ञान
प्रथम थोडे आहे असे वाटते (मोदकाचे टोक हे याचे प्रतीक आहे); पण अभ्यास करू
लागल्यावर समजते की, ज्ञान हे फारच मोठे आहे. (मोदकाचा खालचा भाग हे त्याचे
प्रतीक आहे.) मोदक गोड असतो, ज्ञानाचा आनंदही तसाच असतो.


आरती अन् नामजप

गणेश चतुर्थीच्या काळात आरती म्हणणे म्हणजे कर्णकर्कश्य आवाजात ती म्हणणे, असे जणू समीकरणच झाले आहे. त्याऐवजी प्रत्यक्ष भगवान श्री गणेशासमारे उभे आरती आपण आरती म्हणत आहोत असा भाव ठेवून भावपूर्ण आणि आर्ततेने आरती म्हटली पाहिजे. तर तिचा लाभ होतो. खूप आरत्या म्हणण्याऐवजी फक्त गणेशाची आरती म्हणावी. त्यानंतर त्या ठिकाणी बसून काही वेळ श्रीगणेशाच नामजप केल्यास अधिक प्रमाणात लाभ मिळतो. गणेश चतुर्थीच्या काळात ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ किंवा ‘श्री गणेशाय नमः ।’ नामजप जास्तीतजास्त केल्यास गणेशतत्त्वाचा खूप जास्त लाभ होतो.

घंटा

एखादी गोष्ट कधी तरी खूप आवडते आणि कधी एकदम नकोशी होते. प्रत्येकाच्याच आठवणीत एक महत्त्वाचं स्थान असलेली ही वस्तू आहे- ती म्हणजे घंटा! आमच्या शाळेत एक पितळेचा गोल तुकडा तारेने टांगलेला असायचा. शाळा सुरु व्हायची वेळ झाली, की महादेव शिपाई त्या पितळेच्या गोल तुकड्यावर अडकवून ठेवलेली हातोडी सोडवून घंटा वाजवायचा. शाळा सुरु होतांना वाजणारी घंटा अंगावर काटा उभा करायची, कारण जर उशीर झाला तर हेडमास्तर हातात रुळ घेऊन समोरच्या दरवाजात उभे असायचे. उशीर झालेल्या मुलांना हातावर फटके द्यायला! हीच घंटा जेंव्हा शाळा सुटल्यावर वाजायची तेंव्हा मात्र हिचा आवाज खूप कर्ण मधुर वाटायचा.एकाच घंटेच्या आवाजाचे किती प्रकारचे अर्थ निघू शकतात नाही का? शाळेत ८ वी मधे असतांना एक बदली शिक्षिका आल्या होत्या , त्यांचा पिरियड संपण्याची घंटा वाजू नये असे वाटायचे. :) आणि नावडत्या शिक्षकाचा पिरियड सुरु झाला, की कधी पिरियड संपल्याची घंटा वाजते इकडे लक्ष असायचं.

या घंटे मुळे आयुष्यातला खूप मजेचा वेळ ( म्हणजे झोपेचा) :) वाया गेला आहे. शाळेत असतांना उद्यापासून रोज सकाळी अभ्यासाला उठायचं म्हणून आई अलार्म क्लॉक ( जे मेकॅनिकल चावी चे असायचे त्याला) अलार्मची चावी फिरवून अलार्म सेट करून ठेवायची. सकाळी चार वाजता तो अलार्मच्या घंटीचा आवाज ऐकून घरातले सगळे जरी खडबडून उठले तरीही मला मात्र जाग यायची नाही, आणि मग पाठी वर चार धपाटे खाऊनच उठणे व्हायचे. समजा एखाद्या वेळेस जाग आली तरी पण डोक्याखालची उशी कनावर दाबून झोपायचा प्रयत्न करायचो.. तेंव्हापासून अलार्म क्लॉक मला न आवडणारी वस्तू म्हणून जी डोक्यात बसली, ती आजपर्यंत! अजूनही सकाळची फ्लाईट असली की ह्या अलार्म क्लॉकची आवाज ऐकू आला की नको ते गावाला जाणं असं वाटायला लागतं. हल्ली मोबाइल मधे किंवा फोन वर अलार्मची सोय आल्या पासून अलार्म क्लॉक ही वस्तू इतिहास जमा झालेली आहे- पण माझ्या आयुष्यातली एक खूप महत्त्वाची वस्तू म्हणून लक्षात राहील माझ्या.

लहानपणी मला नेहेमी फायरब्रिगेड चा ट्रक ड्रायव्हर व्हायची इच्छा होती. फायरब्रिगेड च्या ट्रक वर पण अगदी मागच्या भागात एक मोठी चकचकीत पितळी घंटा असायची. तिच्या लंबकाला बांधलेली एक दोरी ड्रायव्हरच्या मागे उघड्या जागेवर उभ्या असलेल्या फायर मॅन च्या हाती असायची. कुठे आग लागली कंडक्टर प्रमाणे दोरी ओढून घंटा वाजवत ,तो फायर ट्रक जायचा. ते पाहिलं की ही बेल वाजवायला मिळावे म्हणून तरी आपण फायरब्रिगेड मधे मोठं झाल्यावर काम करायलाच हवं, असं वाटायचं. हल्ली ती घंटा जाऊन तिच्या जागी सायरन आलाय, पण त्या घंटेची मजा सायरन मधे नाही.

उन्हाळ्यात अमरावतीला रात्री घरासमोरून एक कुल्फीवाला जायचा. ही कुल्फी म्हणजे माझा जीव की प्राण! खूप आवडायची मला ती. एका हातगाडीवर मटका कुल्फी चा माठ आणि वर बांधलेली एक घंटा असायची. त्या घंटेच्या आवाजाची तर आम्ही दररोज रात्री वाट पहायचो. दोन कुल्फी वाले होते, एक भोंगा हॉर्न वाजवायचा, आणि दुसरा हा घंटी वाला. हा घंटीवाला माझा फेवरेट. हा घंटीचा आवाज ऐकला की मी पंचवीस पैसे दे म्हणून घरी मागे लागायचो, आणि एकदा पैसे हातात पडले की दुसऱ्याच क्षणी त्या कुल्फीवाल्याकडे धाव घ्यायचॊ.

नाटक सुरु होण्यापूर्वी, मोगऱ्याच्या गजऱ्यांचा आणि पर्फ्युम्स च्या सुवासाच्या पार्श्वभूमीवर स्टेज वरून तीन वेळा हातात पितळी घंटा घेऊन एक माणूस वाजवत जायचा. तिथे त्या सुगंधी पार्श्वभूमीवर तिचा आवाज पण खूप छान वाटायचा. हल्ली मात्र त्या घंटेची जागा इलेक्ट्रीक बेल ने घेतलेली आहे. काही गोष्टी कधी बदलू नये असे मला वाटते, त्यातलीच ही एक.

पूर्वी रेल्वे स्टेशन वर गाडी येण्यापूर्वी सूचना देण्यासाठी घंटा वाजवली जायची , ती घंटा ऐकली की सगळे सरसावून नीट सामान सेट करून गाडी मधे चढण्यास तयार रहायचे, ती पण हल्ली बंद केल्या गेली आहे, आणि त्या ऐवजी अनाउन्समेंट केली जाते, पण घंटेची आठवण काही पुसल्या जात नाही. कदाचित पुढच्या पिढीला अशी काही पद्धत होती हे माहिती पण रहाणार नाही.

जेंव्हा मला माझी पहिली सायकल मिळाली, ( ७वी मधे ) तेंव्हा सायकल घेतांना त्याला कुठली घंटी बसवायची ह्याचंच स्वप्न रंजन मी करत होतो. त्या काळी दोन प्रकारच्या घंट्या होत्या, एक म्हणजे फक्त एकदाच टिण्ण वाजणारी, आणि दुसरी म्हणजे तिला आत स्प्रिंग असायचं आणि स्प्रिंग अनवाईंड होऊन घड्याळाच्या अलार्म सारखा आवाज यायचा ती . मला दुसरी घंटी लावायची होती सायकलला. सायकल घेतल्यावर सायकल घेण्याच्या आनंदा पेक्षा घंटी वाजवायला मिळणार , अगदी हवी तेवढी! हा आनंद काही वेगळाच होता.

मी लहान असतांना माझ्या आजोळी जायचो, तेंव्हा घरी असलेल्या गाई म्हशी चरायला नेण्यासाठी सकाळी गुराखी यायचा, तो जेंव्हा सगळ्या जनावरांना घेऊन जायचा तेंव्हा प्रत्येक गाईच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज वेगवेगळा असायचा. त्या घंटे मधे लंबक जो असतो, तो लाकडी असायचा आणि म्हणूनच त्या मुळे होणारा घंटा नाद पण अगदी वेगळाच असायचा. शाहरुख च्या एका सिनेमात जी घंटा तो आणतो, त्याच प्रकारची घंटा असायची ती. गाईंच्या गळ्यातल्या घंटांचा लयबद्ध आवाज हा संध्याकाळी गाई घरी आल्या की सकाळ पेक्षा नक्कीच वेगळा वाटायचा. एकच घंटा पण आवाजात इतका फरक कसा काय वाटू शकतो?

नाशिकच्या नारोशंकर देवळात १८ व्या शतकाच्या मध्यंतरी बसवलेली एक घंटा आहे, ती घंटा गोदावरीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीच्या वर वाढली, की आपोआप वाजेल अशी व्यवस्था केल्या गेलेली होती. धोक्याची घंटा म्हणूनच हिचा उपयोग केल्या जायचा.

घंटेचं आयुष्यातलं स्थान खूप मोठं आहे . घंटा म्हणजे केवळ धोक्याच्या वेळेस वाजवली जाते असे नाही, तर आनंदाच्या क्षणी पण तेवढ्याच उत्साहाने वाजवली जाते. दूर कशाला, आपल्या देवाला पण घंटा वाजवूनच उठवल्यावर मग पूजा करता येते, किंबहुना घंटे शिवाय पूजा पुर्ण होतच नाही. म्हणून घंटेचं महत्त्व आयुष्यभर रहातं. कितीही विसरायचं म्हटलं, तरी विसरली न जाणारी ती घंटा..

जाता जाता, कालच एक मित्राचा फोन आला होता, म्हणतो, संध्याकाळी भेटतो का? कुठेतरी ’बसू’ या थोडा वेळ. ” मी त्याला विचारले की ” तुझी बायको माहेरी गेली का? तर म्हणतो, ” घंटा , जाते ती माहेरी”… मी जोरात हसलो, आणि ठरवलं की एक पोस्ट नक्की होऊ शकतं या घंटा विषयावर. त्याच्या त्या एका शब्दात सगळं जे काही मनात होतं ते बाहेर पडलं.जरी जूनी पितळी घंटा संपली विस्मृती मधे गेली , तरी ही वाक्प्रचारांसाठी वापरली जाणारी ” घंटा ” मात्र कधीच विसरली जाणार नाही हे बाकी नक्की!

र्बमगठिव्का


अलीकडेच सातार्ला (साताऱ्याला) जाण्याचा योग आला. इथेही मोबाईल (इकडे शेल्फोन म्हणतात)धारकांची वाढती संख्या सहज नजरेत भरण्यासारखी होती. ज्याला पाहावे त्याच्या मोबाईल हाताला आणि हात कानाला. इथल्या शेल्फोनधारकांच्या संभाषणात ‘र्बमगठिव्का’ आणि ‘र्बमगठिव्तो’ हे दोन शब्द पुन:पुन्हा उच्चारले जात होते. ऐकून ऐकून कान आणि मेंदूचं पार भेंडाळं व्हायला आलं, मात्र ‘र्बमगठिव्का’ ही काय भानगड आहे याचा मला काहीच उलगडा होत नव्हता. कुतुहलापोटी मी प्रत्येक शेल्फोनधारकाचे संभाषण अगदी जीवाचे कान करून ऐकू लागलो. यातून एक गोष्ट मात्र फायद्याची ठरली ती म्हणजे मोबाईल फोनच्या संबंधित बऱ्याच इंग्रजी शब्दांच्या देशीकरणाच मला चांगलाच उलगडा झाला. खालच्या बाजारातून वरच्या बाजारापर्यंत फेरफटका मारताना ‘र्बमगठिव्का’चा उलगडा होईपर्यंत जी जी संभाषणे मी ऐकली त्यातले काही तुकडे जरी आपण ऐकले तरी आपल्या शब्दसंचामध्ये नवीन शब्दांची नक्कीच भर पडेल. तर ऐकूया

संभाषण नं. १.

क : आर्कवा धर्न ट्राय कर्तोय तुजा आप्ला सार्खा आव्टाफकव्रेचज दाव्तोय. कंचा हाय तुजा?
ख : माजा यार्टेल (एअरटेल). तुझा ?
क : माजा ब्येस्नेल (बी.एस.एन.एल.)
(कव्हरेज या शब्दाला इकडे असंख्य पर्याय आहेत. कौरेच, कौरेज, कव्रेज, करवेज आणि कर्वेजसुद्धा.)
ख : आर्आता आमच्याकड आयडय़ान् वडाफोनचंबी टावरं झाल्याती. आन् रिंज (रेंज) बी बरी घाव्ते.
क : आता हा कंचा म्हंन्लास वडा क् काय त्ये.
ख : हौ ऽऽ वडा वडाच. आर्पय्ला आरिंज म्हंजी संत्र न्हव्तं का, मगं हुच (HUTCH) झालं. आनात्ता वडाफोन.
आणखी बरंच काही संभाषण होत असतं. त्यात अधूनमधून ‘र्बमगठिव्का’ व ‘र्बमगठिव्तो’ ही चालूच असतं.

* * * * *

संभाषण क्र. २..

ग : आर्तुहाय्स कुठं, पंध्रा दिस झालं सार्खा ट्राय कर्तुय सरख आप्लं वेट्वची टॅप वाज्तीय. बर्तुजा म्हात्रा आजा कसाय ? (‘कसाय’चा अर्थ ‘कसा आहे’ असा घेणे)..
घ : आर्आजाला गाच्कुन पंध्रा दिस झालं की.
ग : हात्तिच्यामाय्ला! र्आमग येकाद् यश्मेस करायचा का न्हाय.
आणखी बरंच काही आणि अधूनमधून ‘र्बमगठिव्का’.

* * * * *

संभाषण क्र. ३

ट : आर्तुजी क्वालर्टुन (कॉलरटय़ुन) बादाल्ली वाट्टं.
ठ : व्हय. जाला की म्हैना, आन् रिंग्टुनबी बदली केलीया. कराची का तुला डांलोड (डाऊनलोड)?
ट : करू की मंग कवातरी. तुज्यात कोंचं शिम्कार्ड हाय म्हंलास.
ठ : माज्यात बीप्येल (बी.पी.एल.)
ट : टॉक्टाय्माचंय का बिलाचंय?
ठ : त्ये काय ठावं न्हाय गडय़ा. तातु म्हन्ला व्हता पिर्पेट (प्रीपेड) क् काय हाय. पन रिंज न्हाय गडय़ा.
ट : आमच्याकड् रिलांसनटाटाची बरी घाव्ते (रेंज). घरात वाईच नेटवरचा (नेटवर्कचा) प्राब्लेम अस्तो. बाकी बाज्रारात झ्ॉक.
आणखी बरंच काही बोलणं होत असताना मध्ये मध्ये ‘र्बमगठिव्का’ ‘र्बमगठिव्तो’ होतच असतं.

* * * * *

संभाषण क्र. ४

ड : तुजा हँशेट कोंचा हाय रं ?
ढ : माजा नोक्या. लाँग्लाय्फची (लाँग लाईफ) बॅट्री नोक्याचीच गडय़ा.
बाकी मोट्रोला, सामसुम, येरिक्शन, येल्ची बिल्चीचं काय बी खरं न्हाय बग.
तुजा कोंचा हाय ?
ड : माजाबी नोक्याच हाय. यफ यम, रेडोन्क्यॅम्रा (रेडिओ अन् कॅमेरा)बी हाय.
ढ : माज्यात बी हाय रं. माज्यात विडो
(व्हिडीओ)बी हाय आन् चार जीभीची (जी.बी.) मेम्री पन् हाय.
आणखी बरंच काही बोलणं होत असतं आणि मध्ये मध्ये र्बमगठिव्का. या सगळ्यांबरोबरच मध्ये मध्ये ‘आर्पन’ (अरे पण),
‘हात्तिच्यामाय्ला’, ‘च्या माय्ला’ आणि ‘चॅआय्ला’ अशा ठराविक शब्दांचा योग्य आणि अयोग्य ठिकाणी भरपूर वापर होत असतो. बाकी सर्व कठिण शब्दांचे अर्थ मी लावू शकत होतो परंतु हे ‘र्बमगठिव्का’ माझी पाठ सोडत नव्हतं. शेवटी न राहवून एकाचं तोंड आणि फोन बंद झाला तेव्हा त्याला मुद्दामच विचारलं.
मी : हे ‘र्बमगठिव्का’ म्हंजे काय राव?
नाना पाटेकरच्या स्टाईलमध्ये तो म्हणाला, ‘भायर्न आलाय दिस्तासा.’
मी : हो, मुंबईहून.
मग विक्रम गोखलेच्या स्टाईलमध्ये (विथ अ‍ॅक्शन) त्याने मला समजावलं. ‘र्बमगठिव्का’ म्हंजी, र्बर ऽऽ मंऽग ऽऽ ठिवू ऽऽ क्का. म्हंजी फून (फोन) ठिवू ऽऽ क्काऽ’
(हात्तिच्या मा.. माझ्या तोंडात आलंच होतं. मात्र ओठाबाहेर फुटू दिलं नाही.) ‘र्बमगठिव्काच्या’ गुंत्यातून एकदाचा मोकळा झालो. डोकं हलकं हलकं झालं. इतका साधा सरळ शब्द मला कळला कसा नाही. विचार करतच होतो इतक्यात माझा शेल्फोन वाजला. मी हॅलो बोलायच्या आतच पलीकडून जोरात आवाज आला.
‘आर्हाय्स्कुठं तू? कवा धर्न ट्राय कर्तुया तुझा सार्खा आप्ला सीचहॉप (स्वीच ऑफ), वेट्व नाय्त आप्लं बीजी.’
मी : कोण बोलताय ?
पलिकडून : आर्मीसर्जा (अरे मी सर्जा).
या सातार्करांची सर्व शब्द जोडून एक वाक्य एका शब्दात बोलण्याची कला मात्र फक्कड हाय बगा. मी कोणा सर्जाला ओळखत नव्हतो. त्याच्याकडून चुकून माझा नंबर लागला गेला असावा. तरीसुद्धा थोडी मजा करावी म्हणून जोरात ओरडून-
मी : आर्पन हिथ्लं नेटवर पार ढय़ापाळंय बग. माजा आव्टाफकौरेचज झालाय. बाज्रात पोचल्याव मंग मीच लावतो तुला, र्बमगठिव्का ?
सर्जा : आर्पन.. मला... आर्र..
त्याचं बोलणं तोडत मी ‘र्बमगठिव्तो’ बोलून (जवळ जवळ ओरडूनच) माझा शेल्फोन सिचहॉप केला.

आळशी माणसं


"आळशी माणसं खुप हुशार असतात". माझ्या या वाक्यावर आईची प्रतिक्रिया ठरलेली आहे. "बरं बाई.तुमचा रेडा गाभणा. देतो, चांगलं दहा शेर दुध देतो." आळशीपणा आणि हुशारी यांचं समीकरण जरीआईला पटलं नसलं तरी माझा यावर ठाम विश्वास आहे. माझ्या अनेक [आळशी] आप्तेष्टांचा या मताला सुप्त पाठींबा आहे हे मला ठाऊक आहे.

आळशी माणसं कधीही कौटन किंवा रंग जाणारे कपडे विकत घेत नाहीत. सिंन्थेटिक, म़ळखाऊ रंगाचे, मशिन वाश/ बाई वाश असेच कपडे घेतात. रिंकल फ्री कापड हा त्यांचा आवडता प्रकार. १-१ कपडा वेगळा धुणार कोण आणि कौटनच्या कपडयाला इस्त्री करणार कोण? एवढा सगळा विचार कपडे घेताना करावा लागतो आणि त्यासाठी चणाक्ष बुध्दी लागते. रात्री झोपायच्या आधी दिवा बंद करायलाउठायचं नसेल तर जवळ स्वीच घेण्याची व्यवस्था घराचं वायरिंग चालु असतानाच करुन घ्यावी लागते. इतक्या बारीक-सारीक गोष्टी लक्षात ठेवुन करणं हे काही येरागबाळ्याचं काम नाही. म्हणजे नंतर नुसता हार घातला की काम झालं.

ही माणसं जेवतात अगदी सावकाश. यांच जेवण होइपर्यंत ताटं उचलुन झालेली असतात, उरलं सुरलं काढुन ठेवलेलं असतं. अगदी पुसुन घ्यायची वेळ झाली तर ताट हातात घेऊन जेवत बसतात. नंतर यांना काही काम पडत नाही. हे लोक बहुदा भात खात नाहीत. भाता आधीचं जेवण होईपर्यंत एतकाचेंगटपणा करतात की भाताची आणि झोपेची वेळ एकच येते. बरं भात खाल्ला नाही म्हणजे जाडी वाढत नाही आणि जाडी वाढली नाही म्हणजे व्यायाम करावा लागत नाही. चहा गाळल्यावर चोथा हातांनीकधी काढत नाहीत, त्यात पाणी घालुन परत गाळतात आणि तेच डस्ट-बीन वर आदळतात. देवालाही सोडत नाहीत. पुजेला बसताना पंचपात्रात पाणी घ्यायला नको म्हणुन सरळ देवाला नळाखाली धरतात. चेष्टा नाही - प्रत्यक्ष पाहिलं आहे.

हे लोक पब्लिकमध्ये मात्र प्रिय असतात. कधीही फारशी कटकट करत नाहीत. महिनोंमहिने यांचं पासबुक अपडेटेड नसतं. ते असावं असा त्यांचा हट्टही नसतो. बँकेत गेले आणि प्रिंटर बंद असेल तर सरळ बाहेर येतात. वाट बघत किंवा हुज्जत घालत बसत नाहीत. भाजी घेताना कोणती भाजी केवढ्याला बगैरे विचारत बसत नाहीत. सगळं घेऊन झालं की एकदमच कीती झाले ते विचारतात. जणु काही त्यांनीच आपल्याला गणित शिकवलंआहे अशा थाटात मान डोलवत पैसे देऊन मोकळे होतात. तो सुट्टे नाहीत म्हणाला तर उरलेले पैसे त्याला दान करतात. आपले पाकिट उलथं-पालथं करुन सुट्टे शोधायच्या किंवा शेजारच्या दुकानातुन सुट्टे करुन घ्यायच्याभानगडीत पडत नाहीत. त्यामुळे भाजीवाले, रिक्षावाले इ. लोक यांच्यावर सदैव खुष असतात. अशा लोकांमुळेचतर रिक्षा, टॅक्षी चालु आहेत. अहो, चितळे, वैद्य यंचा धंदा चाललाच नसता जर सगळ्याच बायकांनी मोदक, पुरणपोळी घरीच करायच ठरवलं असतं तर.

ही शोधाची जननी आहे" आळशी लोक काम बाकी छान करुन घेतात. उंटावरुन शेळ्य हाकायची सवय असते ना. आपलं काम समोरच्याकडुन कसे करुन घ्यावं हे त्यांना बरोबर कळते. आळशीपणा हा एक गुण "मॅनेजर" म्हणवुन घेणा-या प्राण्याकडे असणं आवश्यक आहे असं मला मनापासुन वाटतं. अति उत्साही मॅनेजर प्रत्येक-न-प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत बसतो. आपलं काम तर वाढवतोच पण हाताखालच्या लोकांना फार इरीटेट करतो. खरंतर माणुस आळशी आहे म्हणुनच तो उत्क्रांत झाला. दुनिया ज्यांची सारखी उदाहरणे देत असते त्या मुंग्या, मधमाशा किंवा कोळ्यासारखं काम करत बसला असता तर त्यांचासरखाच राहिला असता. माझ्या मते, "गरज ही शोधाची जननी आहे" असं म्हणण्यापेक्षा "आळस ही शोधाची जननी आहे" असं म्हटलं पाहिजे.

पायावर चालत राहिला असता तर वाहनं तयार झालीच नसती. सगळे निरोप प्रत्यक्ष जाऊन सांगायचे ठरवले असते तर पोस्ट, टेलिग्राम, ई-मेल या गोष्टी अस्तित्वात आल्याच नसत्या. रीमोट कंट्रोल, कौर्डलेस फोन यांची गरज किती होती बघा आणि त्यामागे आळस किती होता ते बघा.... आणि आता तुम्हींच सांगा - आळशीपणा आणि हुशारी यांच नातं आहे की नाही?

"ड्राय डे" ,"पुतळे" व "आचारसंहिता"

विद्यार्थी : सर ड्राय डे म्हणजे काय?

मास्तर : कोरडे दिवस.

विद्यार्थी : विस्कटून विस्कटून सांगा सर.

मास्तर : या दिवशी दारूची दुकाने बंद असतात.

विद्यार्थी : का सर?

मास्तर : अरे आपल्याला महापुरुषांची आठवण व्हावी असा शासनाचा यामागचा उद्देश आहे.

विद्यार्थी : मग सर एकतीस डिसेंबरला विशेष परवाने देऊन सरकार उत्तेजन का देतं?

मास्तर : लोकांनी नव्या वर्षाचं आनंदाने स्वागत करावं म्हणून.

विद्यार्थी : म्हणजे आनंदासाठी पिण्यास हरकत नाही असंच ना?

मास्तर : हो तसंच.

विद्यार्थी : मग सर, स्वातंत्र्य दिनी, प्रजासत्ताक दिनी जनतेला दु:ख होत असतं का?

मास्तर : ...........

विद्यार्थी : दु:खामुळे ड्राय डे असतो का?

मास्तर : ...........

विद्यार्थी : बोला ना सर.

मास्तर : हा तुझा विषय नाही. तू पीत नाहीस ना? मग गप्प बस.

विद्यार्थी : पण सर, तीस जानेवारीला दु:खामुळे तर दोन ऑक्टोबरला आनंदामुळे ड्राय डे, असं असतं का?

मास्तर : तसं नाही बाबा. थोर पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथीला त्यांची आठवण राहावी म्हणून ड्राय डे असतो.

विद्यार्थी : सर, ड्राय डेच्या दिवशी महापुरुषांची आठवण येते हे भन्नाट आहे. पण अगोदर सवय लागली पाहिजे. ना?

मास्तर : तोच तर सरकारचा उद्देश आहे.

विद्यार्थी : म्हणजे... जाणून बुजून शासनाने लोकांना दारूबाज केले.

ड्राय डेमुळे तर कळले, महात्मा गांधी आज गेले.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

पुतळे

विद्यार्थी : सर देव जळी-स्थळी-पाषाणी आहे ना?

मास्तर : हो.

विद्यार्थी : मग सर दारूची दुकानं मंदिरापासून पंचाहत्तर मीटर दूर का ठेवतात?

विद्यार्थी : देवाला पंचाहत्तर मीटर पलीकडचं दिसत नाही का?

मास्तर : तसं नाही रे बाळा. मंदिराचं पावित्र्य जपलं पाहिजे.

विद्यार्थी : पण काही देवांना दारूचा नैवेद्य लागतो.

मास्तर : तुझं सामान्य ज्ञान बरंच बरं दिसतंय.

विद्यार्थी : देवाचं सोडा, पण राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यासमोरही वाईन शॉपला बंदी आहे.

मास्तर : हो. बरोबरच आहे ते.

विद्यार्थी : पण सर एखादा राष्ट्रपुरुष पिणारा असेल तर?

विद्यार्थी : सांगा ना सर, वाईन शॉप बंद केल्यास त्या पुतळ्यास काय वाटेल?

मास्तर : राष्ट्रपुरुष तसे नसतात रे.

विद्यार्थी : सर, आजकालचे बहुतेक आमदार-खासदार तर घेणारेच आहेत. ह्यांच्यापैकीच काहीजण उद्याचे राष्ट्रपुरुष असणार. त्यांचे पुतळे होणार. समोर वाईन शॉप नसेल तर त्या पुतळ्यांना काय वाटेल सर?

विद्यार्थी : बोला ना सर...

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

आचारसंहिता

विद्यार्थी : सर आचारसंहिता म्हंजी काय?

मास्तर : अरे, निवडणुकीत पाळायचा आचार-विचार.

विद्यार्थी : तसं नाही, विस्कटून विस्कटून सांगा.

मास्तर : अरे बाबा, मतदारांना उमेदवाराने किंवा पक्षाने प्रलोभने दाखवू नयेत यासाठी काही नियम केलेले असतात.

विद्यार्थी : पण सर, पुतळ्यांना-फोटोंना का झाकलं जातं?

मास्तर : गांधी, नेहरू, फुले, आंबेडकर यांच्या चित्रांचा वापर करू नये म्हणून.

विद्यार्थी : पण सर, मतदानाच्या ठिकाणी महापुरुषांची चित्रंसुद्धा झाकली जातात.

मास्तर : हो, त्यांचा परिणाम होऊ नये म्हणून.

विद्यार्थी : सर, महापुरुषांचा वाईट परिणाम होतो?

विद्यार्थी : बोला ना सर, महापुरुष का झाकतात?

विद्यार्थी : सर हत्ती झाकले, कमळ झाकलं, पण हाताचं काय करणार?

विद्यार्थी : सर एक आयडिया. उमेदवाराला सत्यनारायण घालायला सांगा. मतदार आपोआप घरी येतील.

मास्तर : हुशार आहेस!

विद्यार्थी : आणखी एक आयडिया सर...

मास्तर : बोल बाळा.

विद्यार्थी : मतदाराने स्वत:चेच तळहात पाहिले तर त्याचा त्याच्या मनावर परिणाम होईल आणि तो काँग्रेसला मत देईल. त्यामुळे प्रत्येक मतदाराला हातमोजे दिले तर?..

ह्या पोराला 'वाह्यात म्हणावं की विचारवंत' हे गुरुजींना कळेना. तरी नवीन शैक्षणिक धोरणानुसार उत्तर देणं भाग होतं. 'मतदारांना हातमोजे वाटण्याची विनंती आयुक्तांना करू', असं पुटपुटत गुरुजींनी चष्म्याची काच पुसली. पुटपुटत पुटपुटत आपण वाईन शॉपजवळ कधी आलो, ते त्यांचं त्यांना कळलंच नाही.

ड्राय डेमुळेच 'पूर्वनियोजित साठा' करण्याची सवय महाराष्ट्रात वाढू लागली होती. गुरुजींनाही रात्री 'टीचर्स'ची संगत जडली होती. सहाव्या वेतनामुळे मुलेही गुरुजींना गुरुजी न म्हणता 'सर' म्हणू लागली होती. सहाव्या वेतनाचा मान राखण्यासाठीच गुरुजींनी 'देशी'पण सोडलं होतं. ते दिवसाचे 'सर' आणि रात्री 'टीचर्स'झाले होते.

प्रजासत्ताक दिनाच्या आनंदासाठी एक, तीस जानेवारीच्या पुण्यतिथीच्या दु:खासाठी एक आणि निवडणुकीच्या गोंधळासाठी एक असा पूर्वनियोजित साठा घेऊन गुरुजी घराकडे वळले.

हरवलेल्या संवेदना...

पैसा खुळखुळतोय, पण माणुसकी हरवत चालली आहे. वाटेल तशी वाहने धावत आहेत
आणि अपघात वाढत आहेत; पण जखमींना मदत करण्याची प्रवृत्ती संपत चालली आहे.
समृद्धी येऊनही आपल्या संवेदना, भावना जणू गोठल्या आहेत. कधी जागं होणार
आपल्यातलं "माणूसपण'?

"जखमी तरुणाला लोटले मृत्यूच्या खाईत' ही बातमी वाचली आणि मन सुन्न झाले.
मनात विचार आला, 23 वर्षांचा तरुण मुलगा गेला. त्याच्या कुटुंबीयांवर
आकाशच कोसळले असेल. त्याच्या आई-वडिलांची काय अवस्था झाली असेल? जी मुलं
गाडी चालवीत होती, ती नक्कीच धुंदीत असतील. त्यांच्याच वयाच्या एका
मुलाच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याचं त्यांना काहीच वाटलं नसेल का?
बिचारा जखमी अवस्थेतही त्या मुलांजवळ मदत मागत होता, आपल्या आईला फोन
करायला सांगत होता; तरीही त्या निष्ठुरांना त्याची कीव आली नाही. "या
जागी आपण असतो तर!' असा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. निष्ठुरपणे
त्याला जखमी अवस्थेत निर्जन ठिकाणी सोडून सर्व जण पसार झाले.

अशा तऱ्हेच्या घटना अनेक ठिकाणी अनेक वेळा घडत असतात. त्या वेळी
प्रत्येकाच्या मनात चीड निर्माण झालेली असते; पण नंतर त्यांचा शोध,
चौकशी, पुरावे यामध्ये वेळ जातो, तोवर लोकं विसरून जातात. मग वाटतं, या
अशा गुन्हेगारांना कधी शिक्षा होणारच नाही. स्वत:ला आधुनिक म्हणविणाऱ्या
लोकांमध्ये संवेदना, माणुसकी हरवत चालली आहे, फसवणूक लुबाडणूक वाढत आहे.
माणसाकडे भरपूर पैसा आहे. त्यामुळे लहान वयातच गाड्या चालवणे, व्यसनाच्या
आहारी जाणे, नियमांचे उल्लंघन करणे या गोष्टी अफाट वाढल्या आहेत. धुंदीत
गाड्या चालवून दुसऱ्यांचे जीव घेतात, मदतीसाठी कुणी हाका मारल्या तर
दुर्लक्ष करतात, त्यामुळे कित्येक जीव उपचाराअभावी मृत्यू पावतात. काही
बातम्या वाचून अंगावर शहारे येतात. छोटी छोटी मुलं गाडीच्या चाकाखाली
चिरडली जातात, ज्येष्ठ नागरिक ठोकरले जातात. गाडी चालविणाऱ्या
प्रत्येकाच्या मनात ही भावना निर्माण झाली पाहिजे, की या मुलांच्या जागी
उद्या आपली मुलंही असू शकतील, या वृद्धांच्या जागी आपले आई-वडील असू
शकतील. वाहन चालविणाऱ्या प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे, की
प्रत्येकाचीच कुणीतरी घरी वाट पाहत असतं त्यामुळे प्रत्येकानेच सावधानता
बाळगायला पाहिजे. पण असं होत नाही. आपण "माणूस' आहोत, हेच सर्व जण विसरत
चालले आहेत. आपल्यापेक्षा पशुपक्षी बरे! त्यांना भावना आहेत. एखादा पक्षी
मेला तर त्याचे नातलग एकमेकांना हाका मारून लगोलग भोवती गोळा होतात. जखमी
असेल तर काळजी घेतात; पण आपण माणसे आहोत याची जाणीवही उरली नाही. पूर्वी
असं नव्हतं. दुसऱ्याच्या जाण्यानंही, दुःखानंही डोळे पाणावत असत; पण आज
सगळंच हरवलंय. हीच का आमची आधुनिकता?

आज प्रत्येक माणसागणिक घरात वाहन आहे. ही चैन नसून, गरज आहे. पण या अशा
बेफाम गाड्या चालविणाऱ्यांचाही सुळसुळाट वाढला आहे. आज मला वाटतं,
प्रत्येक घरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की संध्याकाळी सर्व जण
घरात सुखरूप परत आले की आजचा दिवस पार पडला म्हणून परमेश्‍वराचे आभार
मानत असतील. स्त्री ही ममतेचा सागर असते असं म्हणतात. तीच स्त्री आज
मुलीचा गर्भ आहे म्हणून तिला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकत आहे, मग
कुठं हरवली संवेदना?

म्हणून माणसांप्रमाणे संवेदना जागृत ठेवा; व्यावहारिक न होता भावनिक होऊन
जागा. आज गरज आहे संवेदना जपण्याची... माणुसकी जपण्याची...

संध्या गावित...

माणसाचे चार मित्र

एका गावात एक मुलगी राहात असते. तिला चार मित्र असतात.
त्यापैकी चौथ्या मित्रावर ती जिवापाडप्रेम करत असते. त्याला ती नेहमी मोठमोठ्या भेटवस्तू देत असते. जगातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट त्याला मिळायला हवी, असा तिचा कटाक्ष असे.
त्या खालोखाल तिसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते. त्याला ती नेहमी शेजारची राज्ये दाखवत असते; मात्र, ते बघून तो आपल्याला कधीतरी सोडून जाईल अशी भीती तिच्या मनात नेहमीच असते.
दुसऱ्या मित्रावरही ती प्रेम करत असते....
तिचा दुसरा मित्र अतिशय निष्ठावान असतो. तिची संपत्ती, तिची मालमत्ता राखण्यात त्याचा मोठा सहभागअसतो.
तिचा पहिला मित्र ...त्याचा आत्मविश्‍वास वाखाणण्यासारखा असतो. मनाने तो खूप प्रेमळ, दयाळू आणि संयमी असतो. तो तिला नेहमी समजून घेत असतो. ती जेव्हा कधी संकटात सापडते, काही समस्या तिला भेडसावतात; तेव्हा तेव्हा ती आपले मन त्याच्याकडे मोकळे करते. तोही तिला समजून घेतो, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगतो.
तरीही, तिला तो फारसा आवडत नसतो. तो मात्र तिच्यावर खूप मनापासून प्रेम करत असतो. ती क्वचितच त्याची दखल घेत असते.

एक दिवस ती मुलगी आजारी पडते. उपचारांचाही काही परिणाम होत नाही. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, हे तिच्या लक्षात येते. तिच्या मनात विचार येतो,""माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे. माझे जिवाभावाचे चार मित्र आहेत; पण जेव्हामाझा मृत्यू होईल, तेव्हा मी एकटीच असेन.'' या विचारांनी ती अस्वस्थ होते.
ती आपल्या सर्वांत आवडत्या चौथ्या मित्राला म्हणते, ""मी तुझ्यावर सर्वाधिक प्रेम केले. जगातल्या सर्वांत मौल्यवान भेटी मी तुला सतत दिल्या. तुझी खूप काळजी घेतली. आता माझा अंतकाळ जवळ आला आहे. तू माझ्याबरोबर येशील ना? माझी साथ करशील ना?''
""अजिबात नाही,'' असे म्हणून आणखी काहीही न बोलता तो मित्र निघून जातो.
त्याचे हे बोलणे तिचे काळीज चिरत जाते.
त्यानंतर ती मुलगी तिसऱ्या मित्राकडेयेते. ""आयुष्यभर मी तुझ्यावर प्रेम केले. आता मी काही दिवसांचीच सोबती आहे. तू माझ्याबरोबर येशील ना?''
तिच्या या बोलण्यावर तो थंडपणे "नाही'म्हणतो. ""जीवन खूप सुंदर आहे. तू गेल्यानंतर मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करीन.''
त्याच्या या बोलण्यावर ती निराश होते.
आपली निराशा लपवत ती दुसऱ्या मित्राकडे येते. ""तू निष्ठेने माझ्यासंपत्तीचे आणि मालमत्तेचे रक्षण केलेस... यावेळीही तसाच वागशील ना? येशील ना माझ्याबरोबर?''
""मी तुझ्याबरोबर जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंत येऊ शकेन. त्यापुढे नाही.''
त्याच्या या उत्तराने ती मुलगी पुरती कोलमडून जाते. काय करावे तिला कळत नाही.

... तेवढ्यात एक आवाज येतो, ""मी येईन तुझ्याबरोबर. तू जिथे जाशील, तिथे मी येईन.''
ती मुलगी आवाजाच्या दिशेने बघते, तर समोर तिचा पहिला मित्र असतो.. पोषणाअभावी, दुर्लक्षामुळे खूप अशक्तझालेला.
मुलगी म्हणते, ""मी खरेतर तुझी खूप काळजी घ्यायला हवी होती; पण आता वेळ निघून गेली आहे.''
वास्तवातही, या मुलीप्रमाणे आपलेही चार मित्र असतात.
आपला चौथा मित्र म्हणजे शरीर. त्याचे आपण कितीही कौतुक केले, कितीही चोचले पुरवले, तरीही मरणाच्या वेळी ते आपले साथ सोडते.
आपला तिसरा मित्र म्हणजे, आपले कुटुंबीय आणि मित्रपरिवार. ते आपल्या कितीही जवळचे असले, तरी आपली सोबत ते जास्तीत जास्त दफनभूमीपर्यंतच करू शकतात.
दुसरा मित्र म्हणजे, आपली मालमत्ता, संपत्ती, आपली पत- प्रतिष्ठा. आपल्या मरणानंतर हे सगळे आपोआप दुसऱ्याचे होते.
आणि पहिला मित्र म्हणजे कोण?
आपला पहिला मित्र म्हणजे आपला आत्मा.
सत्ता, संपत्ती, भौतिक सुखे मिळविण्याच्या नादात त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. खरे तर आत्मा ही अशी एकमेव गोष्ट आहे, जी नेहमी आपल्याबरोबर असते. शेवटपर्यंत आपली साथ करते.

❂❂❂ शिवरायांबाबत जगातील मान्यवरांचे उदगार ❂❂❂



▶मि. अनाल्ड टायबर्न (जगविख्यात इतिहासकार) - "छत्रपती शिवाजी महाराज्यांसारखे राजे जर आमच्या देशात होऊन गेले असते तर, त्यांच्या स्मृतींचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन नाचलो असतो."

▶इब्राहीम-लि-फ्रेडर (डच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाप्रसंगी सोन्याच्या सिंहासनावर बसताच सर्व मराठ्यांनी अत्यंत प्रेमाने "छत्रपती शिवाजी महाराज कि जय" अशी गर्जना केली."

▶मार्शल बुल्गानिन (मा. पंतप्रधान - रशिया) - "साम्राज्यशाही विरुद्ध बंद उभारून स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजीमहाराज्यांनी रोवली."

▶प्रिन्स ऑफ वेल्स (इंग्लंड) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात मोठे योद्धे होते. त्यांच्या स्मारकाची कोनशीला बसविताना मला अत्यानंद होत आहे."

▶ब्यारन कादा (जपान) - "छत्रपती शिवाजी महाराज हे सत्पुरुष होते. त्यांनी अखिल मानवजातीचे हित केले."

▶एन्टोनियो (पोर्तुगीज व्हायसराय) - "छत्रपती शिवरायांच्या नौदलातमुळे सागरी किल्ल्यात वाढ झाली. राज्यांच्या नाविक दलाची शत्रूला भीती वाटते."

▶मि. मार्टिन मांडमोगरी (फ्रेंच गव्हर्नर) - "छत्रपती शिवाजी राजे त्यांच्या गुप्तहेरांना भरपूर पगार आणि बक्षिसे देत असत. त्यांची तलवार यशासाठी आदीव तत्पर असे."

▶डेनिस किंकेड (युरोपिअन इतिहासकार) - "स्वजनांच्या कल्याणासाठी संकृतीचे रक्षण करण्यासाठी संपत्ति हि हवीच असते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे महान राजे आहेत."

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा

२६ जानेवारी व १५ ऑगस्ट या दिवशी आपण राष्ट्रीय ध्वज उभारतो. आपल्या सदऱ्यावर
लावतो; परंतु नंतर हेच राष्ट्रीय ध्वज दुसऱ्या दिवशी, रस्त्यावर, कचऱ्यात,
बसस्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर, कुठेही चुरगळलेल्या अवस्थेत, फाटलेल्या
अवस्थेत पायदळी तुडविले जातात. याचा अर्थ आपण आपल्या देशाची शान पायदळी
तुडवितो. असे इतस्तत: विस्कटलेले राष्ट्रध्वज पाहिले की मनाला प्रचंड यातना
होतात.
याबाबत सरकारने, सामाजिक संस्थांनी ज्येष्ठ नागरिकांनी, दक्ष
नागरिकांनी काही उपाय शोधले पाहिजेत. राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्याकरिता
पुढील काही उपाययोजना सुचवाव्याशा वाटतात.
सर्व शाळांमध्ये राष्ट्रध्वज
उभारून राष्ट्रीय सण सााजरे होतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रत्येक
वर्गातून राष्ट्रध्वज गोळा करावेत व मुख्याध्यापकांकडे सुपूुर्द करावेत.
सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा जवळच्या शाळेत अथवा जवळच्या पोलीस
स्टेशनमध्ये राष्ट्रध्वज जमा करावेत. याकरिता शाळेने पोलीस स्टेशनने डबे
ठेवावेत. रेल्वे स्टेशन अगर बसस्टॉप वा इतर सार्वजनिक ठिकाणी पडलेले
राष्ट्रध्वज नागरिकांनी कर्तव्यदक्ष भावनेने जवळच्या बस डेपोमध्ये अथवा
सरकारी कार्यालयात, पोलीस स्टेशनमध्ये जमा करावेत. स्थानिक समाजसेवक
संस्थांनी आपआपल्या विभागातील रस्त्यांवरील व कचऱ्यात पडलेले राष्ट्रध्वज
गोळा करण्याची व शासनाकडे जमा करण्याची जबाबदारी स्वीकारावी. शासनाने सर्व
जमा केलेले राष्ट्रध्वज योग्य रीतीने नष्ट करण्याकरिता तात्पुरत्या
स्वरूपात विशेष कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. या कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वज
नष्ट करताना आदरपूर्वक व सन्मानाने नष्ट करावेत. देशातील प्रत्येक राज्यात
याबाबत दक्षता घेऊन राष्ट्रध्वजाचा अपमान टाळावा.
कागदी लहान आकाराचे
राष्ट्रध्वज, प्लास्टिकचे काडीवाले राष्ट्रध्वज, धातूचे राष्ट्रध्वज असे
वेगवेगळे ध्वज जमा करावे. धातूचे राष्ट्रध्वज पुन्हा वापरता येणे शक्य
असते. ते जपून ठेवावेत. शासनाने अशा जमा केलेल्या विविध प्रकारच्या
राष्ट्रध्वजांची आदरपूर्वक व योग्य रीतीने विल्हेवाट लावावी.
वरील
उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत यात शासनाला सुधारणा करणेही शक्य आहे.
यातील किमान ५० टक्के उपाययोजना जरी अंमलात आणल्या तरी राष्ट्रध्वजाचा
होणारा अपमान टाळता येईल. त्याकरिता देशातील सर्व शाळांनी, समाजसेवी
संस्थांनी, सरकारी कर्मचाऱ्यांनी, कर्तव्यदक्ष नागरिकांनी ही गोष्ट मनावर
घेतली पाहिजे.

-दर्शाना मंचेकर
manchekardarshana@gmail.com

शेवटचा क्षण

हिला मित्र : एक प्रश्न विचारू?

दुसरा मित्र : हा विचार ना?

पहिला मित्र : समज जर तुला असे कळले कि,
तुझ्याकडे जगण्यासाठी आता फक्त एकाच क्षण उरलाय.
आणि या क्षणात तू कोणत्याही पण फक्त एकाच आवडत्या व्यक्तीला भेटू शकतोस, तर तू कुणाला भेटशील?

दुसरा मित्र : अअअअअअ......
असे असेल तर मी त्या क्षणातकोणालाच भेटणार नाही....

पहिला मित्र : असे का?सांगशील?

दुसरा मित्र : सांगतो ना.....
हे बघ,
जर मी तुला म्हटले कि,मी त्या क्षणात माझ्या आईवडिलांना भेटेन.
तर तू म्हणशील कि,फक्त एकालाच भेटायचं......एकतर आई नाहीतर बाबा....एकाचच नाव सांग
मग मी म्हणेन कि,"आईला भेटेन,खूप प्रेम आहे तिचे माझ्यावर...."
मग तू म्हणशील,"म्हणजे तुलाअसे म्हणायचेय का कि तुझ्या बाबांचे तुझ्यावर प्रेम नाही....
अरे ते दाखवत नाहीत पण आई एवढीच त्यांना पण तुझी तितकीच काळजी आहे...
मग मी पुन्हा कोड्यात पडेन आणि म्हणेन कि,ठीक आहे मग मी त्या क्षणात माझ्या बाबांना भेटेन.
मग तुझा पुढचा प्रश्न असेल कि,"आई वडिलांचे नाव घेतलेस,पण तुझ्या प्रेयसीचे नाव नाही घेतलेस.
ती पण इतकी प्रेम करते तुझ्यावर.तिला भेटावेसे नाही वाटणार का?"
मग मी पुन्हा कोड्यात पडेन.
पण खरे सांगायचे तर
नात्यांमध्ये असा क्रम नाही लावता येत,
हे नाते आधी आणि ते नाते नंतर.......
मला जरासा क्षण मिळाला तर मी कोणालाच प्रत्त्यक्ष कोणालाच भेटणार नाही
त्या क्षणात मी माझे डोळे बंद करून घेईन आणि
माझ्या सगळ्या आवडत्या व्यक्तींना मनातल्या मनात आठवेन...माझी आई,बाबा,ती आणि माझे मित्र मैत्रींनी........आणि सगळेच
कारण
तो यम माझ्या त्या शेवटच्या क्षणावर ताबा ठेवू शकतो
पण माझ्या मनावर नाही".........

आई

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२
वर्षाचा मुलगा राहत होते..

उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार
त्याच्या हातात १० रुपये तरी असावे, पण
घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने
बाजूच्या शेतात राबायला गेली संध्याकाळी
मजुरीचे पैसे आणले..

तितक्यात मुलगा शाळेतून
आला आई ला म्हणाला मला जेवायला दे
मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे
सकाळी लवकर उठेन..

मुलगा सकाळी लवकर
उठला त्या माऊलीला पण उठवले,
मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई
लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून
घेतो
माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते..

मुलगा अंघोळ करून आला आई जवळ बसला आणि आई
ला म्हणाला मला लवकर दुध आणि भाकरी दे
मला उशीर होतोय
आई ने आजू बाजूला पहिले दुध उतरवायला काहीच
सापडत नव्हते..

पुन्हा मुलाचा आवाज आला आई
लवकर कर माउलीने विचार न करता तसाच
दुधाचा टोप हाताने उतरवला गरम
दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ
लागल्या हाताची लाही लाही झाली..

पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर न
उशीर होतोय त्या माउलीने पुन्हा टोप उचलून
दुध प्यालात ओतले आणि मुलाला दिले..

त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून
त्या मुलाने मान खाली घालून न्याहरी केली..

आईने जवळचे १० रुपये त्या मुलाला दिले,
मुलगा जत्रेत गेला संध्याकाळी परतला आई ने
विचारले बाळा जत्रेत काय काय पहिले..

मुलाने जत्रेतल्या गमती जमाती सांगितल्या मग आईने
विचारले दिलेल्या १० रुपयाचे काय केलेस
काही खाल्लेस कि नाही..

त्या मुलाने आई ला सांगितले की तू डोळे बंद कर
मी काहीतरी आणले आहे तुज्यासाठी माऊलीने
डोळे बंद केले मुलाने खिश्यातून सांडशी काढून
आईच्या हातात दिली, आई च्या डोळ्यात
त्या संड्शीच्या स्पर्शाने अश्रू आले
आई धन्य झाली..

आईच्या हाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर
इजा करून गेली..........